हसू
शाळेत पावणे आलते.
कशाला कायकी.
आमाला कायबाय इचारलं.
धडा वाचाया लावला, पाडे इचारले.
अंक्या, भान्या, निमी हुशार हायेत बक्कळ.
त्यास्नी समदं येतं.
माज्या टकु-यात शिरतं, -हात नाय.
आमचे अण्णा म्हणत्यात “डोस्क्याला भोक हाये एक”.
गवसलं न्हाय ते बेणं – एक चिंधी बांधली की काम जालं!
मला विचारलं कायतरी पावण्यानी. भ्याव वाटलं येकदम.
कांडल्यावानी झालं छातीत. ठोके नुस्ते. धाडधाड धाडधाड.
आवाज खोल हिरीतून आला.
पावणे हसले. गुर्जीबी हसले.
समदी हसली. म्याबी हसली.
पावणे गेले.
गुर्जी आले.
माजे केस वढत एक ठिउन दिली गालावर. दातच तुटला येक.
रडत म्या चिराकले, “काSओ गुर्जी”
“बक्षीSस” ते म्हणले.
मिसळपाव
स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते.