ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग तीन
ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक
ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन
स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते. १४ एप्रिल चा दिवस मावळला आणि शहरातील आगी दूरवरून दिसून येत होत्या. संपूर्ण शहर केविलवाण्या आणि घाबरलेल्या अवस्थेत पुढचा दिवस उगवण्याची वाट पहात होते. या भयंकर विस्फोटानंतर लागलेल्या आगी जवळपास तीन दिवस धुमसत होत्या. अखेर जळण्यासारखे काहीही शिल्लक न राहिल्यामुळे त्या तीन दिवसांनंतर हळूहळू शमल्या. मात्र अनेक ठिकाणी लहान सहान आगी दोन आठवडे जळत होत्या
या दिवशी मुंबई अग्निशमन दलाने आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. युद्धभूमीत शौर्य गाजवणा-या वीरांप्राणे लढत दिली होती. समोर विनाश दिसत असतांनाही जिवाची पर्वा न करतां कर्तव्य पार पाडले होते. या दलाचे ६६ अधिकारी, कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. ८४ गंभीर स्वरूपात जखमी झाले होते केवळ ६८ जण काम करण्याच्या परीस्थितीत होते पण त्यांच्याकडे काहिही साधने शिल्लक राहिली नव्हती. मुंबई सारख्या शहराच्या अग्निशमन दलाची ही अवस्था झाली होती. म्हणुनच या विरांना आणि त्यांच्या सारख्याच आपले प्राण पणाला लाऊन काम करणा-या अग्निशमन दलाच्या विरांना आदरांजली म्हणून १४ एप्रिल हा दैवास अग्निसुरक्षा दिन म्हणून साजरा करतो.
त्यावेळी युध्द काळामुळे बातम्यांच्या प्रसारणावर अनेक बंधने होती. या भयंकर स्फोटाची बातमी स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रात तिस-या पानावर साधारण अपघात अशा स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. त्या दिवशी जर्मनीच्या युध्दातील पराक्रमाच्या बातम्यांना जास्त महत्व दिले गेले होते. या घटेनेची सर्वप्रथम बातमी १५ एप्रिलला जपानी मालकीच्या 'रेडिओ सेईगून' ने बाहेरील जगापर्यंत पोहोचवली त्यावेळी देखील लोकप्रिय असलेल्या बी.बी.सी. रेडिओने नव्हे. ब्रिटिश सरकारच्या बातम्यांचे नियंत्रण करणा-या मंडळाने मे, १९४४ च्या दुस-या आठवड्यात या घटनेची बातमी देण्यास परवानगी दिली त्यानंतर टाईम मासिकाने २२ मे, १९४४ ला या घटनेचा वृतांत प्रसिध्द केला तेव्हा देखील बाहेरच्या जगासाठी ही 'नवीन बातमी' होती.
या स्फोटामुळे झालेल्या हानी चे आकडे भयंकर आहेत. या स्फोटाच्या वेळी कुलाबा वेधशाळेतील भूकंप मापन यंत्रावर भूकंपाची नोंद झालीच पण १७०० कि.मी. दूर सिमला येथील भूकंप मापकावर देखील धरणीकंपाची नोंद झाली. स्फोटाच्या केंद्रस्थानापासून ९०० यार्ड पर्यंतचा परीसर पूर्णत; भस्मसात झाला. संपूर्ण व्हिक्टोरीया गोदी, शेजारची प्रिन्सेस गोदी, पश्चिमेला असलेली माल साठवण्याची गोदामे, उत्तरेला बर्मा ओइल इन्स्टालेशन, दक्षिणेला असलेला तांदळाचा बाजार यासर्व भागात भीषण आगी लागल्या होत्या. पश्चिमेला असलेल्या गोदामांतून आग शेजारच्या नागरी वस्तीत पसरली होती.
१३७६ ज्ञात जीवितहानी अज्ञात यापेक्षा कितीतरी जास्त असावी असे अनेक जण मानतात कारण आजूबाजूच्या झोपडपट्टीतील अनेक व्यक्ती जळत्या कापसाच्या गासड्या, जळते तेलाचे पिंप, विस्फोटकांचे स्फोट यामुळे मरण पावल्या होत्या अगणित लोक जखमी झाले होते. यांची काहीच नोंद सरकारी कागदपत्रात झाली नाही. हजारो लोक जखमी झाले. गोदीवर वाहतुकी साठी असलेला ३४,६३९ टन माल नष्ट झाला. ५५००० टन खाद्यान्न नष्ट झाले त्यामुळे महागाई आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणात वाढली. ६००० अस्थापनातील ५०००० लोकांच्या नोक-या गेल्या. ३००० लोक बेघर झाले. अनेकांचे नातेवाईक सकाळी घरून निघाले होते ते कधीच घरी परतले नाही.
३१ पेट्यांमध्ये बंद असलेल्या सोन्याच्या विटा या स्फोटात गहाळ झाल्या त्यावेळी दिल्या गेलेल्या माहितीनुसार जवळपास सर्व सोन्याच्या विटा पुन्हा हस्तगत करण्यात आल्या. काहींनी या सोन्याच्या विटा प्रामाणिकपणे परत केल्या तर काही विटा पोलिसांनी धाडी टाकून परत मिळवल्या मात्र १९६०, २००९, २०११ मध्ये देखील मुंबईतील काही ठिकाणी या विटा सापडल्या त्या ब्रिटिश सरकारला हस्तांतरीत करण्यात आल्या.
बंदर जवळपास नष्ट होऊन तेथे पडलेली इमारती, जळालेला माल, आणि इतर स्वरुपाचा पाच लाख टन कच-याचा ढीग तयार झाला. पुन:र्निर्माणाचे काम अवघड होते. बुलडोझर तोडक्या मोडक्या गोदामांवरुन फिरवले गेले. दुरुस्त करण्या पलिकडच्या जहाजांना बुडवण्यात आले. काहिंची दुरुस्ती करण्यात आली. सर्वात शेवटी व्हीक्टोरिया गोदीच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. ८००० व्यक्ती ७ महिने अहोरात्र हे काम करीत होत्या हे फक्त गोदीच्या बाबतीत बाहेरही अशाच प्रकारे जीवन पुन्हा वेग घेत होते.
सात महिन्यांनंतर बंदर पुन्हा सुरु झाले.
या घटनेची चौकशी करणा-या आयोगाचा अहवाल यथावकाश आला. कापासाच्या गासड्या स्फोटकांच्या बरोबर साठवणे, जहाजात स्फोटके आहेत असे दर्शवणारा लाल बावटा न लावणे, बंदरात जहाज पोहोचल्या नंतर स्फोटके वेळेत न उतरवणे
मुंबईने या नंतरच्या काळातही अनेक संकटांना तोंड दिले. १९९३ चे बॉम्बस्फोट, मुंबई लोकल मधील साखळी बॉम्ब स्फोट, २००५ चा महाप्रलय परंतु या संकटांमध्ये कारस्थान किंवा नैसर्गीक आपत्ती होती. मात्र गोदीतील स्फोट मात्र एकामागून एक मानवी चुकांच्या साखळीचा परिणाम होता. अनेकांना या घटनांपैकी एखादी घटना मोठे संकट वाटेल ज्याने ज्या प्रमाणात ज्या घटनेत परिस्थितीचे चटके सहन केले त्या प्रमाणात त्याला ते संकट मोठे वाटेल यात शंका नाही.
स्मारक
समाप्त
स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते. १४ एप्रिल चा दिवस मावळला आणि शहरातील आगी दूरवरून दिसून येत होत्या. संपूर्ण शहर केविलवाण्या आणि घाबरलेल्या अवस्थेत पुढचा दिवस उगवण्याची वाट पहात होते. या भयंकर विस्फोटानंतर लागलेल्या आगी जवळपास तीन दिवस धुमसत होत्या. अखेर जळण्यासारखे काहीही शिल्लक न राहिल्यामुळे त्या तीन दिवसांनंतर हळूहळू शमल्या. मात्र अनेक ठिकाणी लहान सहान आगी दोन आठवडे जळत होत्या
या दिवशी मुंबई अग्निशमन दलाने आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. युद्धभूमीत शौर्य गाजवणा-या वीरांप्राणे लढत दिली होती. समोर विनाश दिसत असतांनाही जिवाची पर्वा न करतां कर्तव्य पार पाडले होते. या दलाचे ६६ अधिकारी, कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. ८४ गंभीर स्वरूपात जखमी झाले होते केवळ ६८ जण काम करण्याच्या परीस्थितीत होते पण त्यांच्याकडे काहिही साधने शिल्लक राहिली नव्हती. मुंबई सारख्या शहराच्या अग्निशमन दलाची ही अवस्था झाली होती. म्हणुनच या विरांना आणि त्यांच्या सारख्याच आपले प्राण पणाला लाऊन काम करणा-या अग्निशमन दलाच्या विरांना आदरांजली म्हणून १४ एप्रिल हा दैवास अग्निसुरक्षा दिन म्हणून साजरा करतो.
त्यावेळी युध्द काळामुळे बातम्यांच्या प्रसारणावर अनेक बंधने होती. या भयंकर स्फोटाची बातमी स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रात तिस-या पानावर साधारण अपघात अशा स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. त्या दिवशी जर्मनीच्या युध्दातील पराक्रमाच्या बातम्यांना जास्त महत्व दिले गेले होते. या घटेनेची सर्वप्रथम बातमी १५ एप्रिलला जपानी मालकीच्या 'रेडिओ सेईगून' ने बाहेरील जगापर्यंत पोहोचवली त्यावेळी देखील लोकप्रिय असलेल्या बी.बी.सी. रेडिओने नव्हे. ब्रिटिश सरकारच्या बातम्यांचे नियंत्रण करणा-या मंडळाने मे, १९४४ च्या दुस-या आठवड्यात या घटनेची बातमी देण्यास परवानगी दिली त्यानंतर टाईम मासिकाने २२ मे, १९४४ ला या घटनेचा वृतांत प्रसिध्द केला तेव्हा देखील बाहेरच्या जगासाठी ही 'नवीन बातमी' होती.
या स्फोटामुळे झालेल्या हानी चे आकडे भयंकर आहेत. या स्फोटाच्या वेळी कुलाबा वेधशाळेतील भूकंप मापन यंत्रावर भूकंपाची नोंद झालीच पण १७०० कि.मी. दूर सिमला येथील भूकंप मापकावर देखील धरणीकंपाची नोंद झाली. स्फोटाच्या केंद्रस्थानापासून ९०० यार्ड पर्यंतचा परीसर पूर्णत; भस्मसात झाला. संपूर्ण व्हिक्टोरीया गोदी, शेजारची प्रिन्सेस गोदी, पश्चिमेला असलेली माल साठवण्याची गोदामे, उत्तरेला बर्मा ओइल इन्स्टालेशन, दक्षिणेला असलेला तांदळाचा बाजार यासर्व भागात भीषण आगी लागल्या होत्या. पश्चिमेला असलेल्या गोदामांतून आग शेजारच्या नागरी वस्तीत पसरली होती.
१३७६ ज्ञात जीवितहानी अज्ञात यापेक्षा कितीतरी जास्त असावी असे अनेक जण मानतात कारण आजूबाजूच्या झोपडपट्टीतील अनेक व्यक्ती जळत्या कापसाच्या गासड्या, जळते तेलाचे पिंप, विस्फोटकांचे स्फोट यामुळे मरण पावल्या होत्या अगणित लोक जखमी झाले होते. यांची काहीच नोंद सरकारी कागदपत्रात झाली नाही. हजारो लोक जखमी झाले. गोदीवर वाहतुकी साठी असलेला ३४,६३९ टन माल नष्ट झाला. ५५००० टन खाद्यान्न नष्ट झाले त्यामुळे महागाई आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणात वाढली. ६००० अस्थापनातील ५०००० लोकांच्या नोक-या गेल्या. ३००० लोक बेघर झाले. अनेकांचे नातेवाईक सकाळी घरून निघाले होते ते कधीच घरी परतले नाही.
३१ पेट्यांमध्ये बंद असलेल्या सोन्याच्या विटा या स्फोटात गहाळ झाल्या त्यावेळी दिल्या गेलेल्या माहितीनुसार जवळपास सर्व सोन्याच्या विटा पुन्हा हस्तगत करण्यात आल्या. काहींनी या सोन्याच्या विटा प्रामाणिकपणे परत केल्या तर काही विटा पोलिसांनी धाडी टाकून परत मिळवल्या मात्र १९६०, २००९, २०११ मध्ये देखील मुंबईतील काही ठिकाणी या विटा सापडल्या त्या ब्रिटिश सरकारला हस्तांतरीत करण्यात आल्या.
बंदर जवळपास नष्ट होऊन तेथे पडलेली इमारती, जळालेला माल, आणि इतर स्वरुपाचा पाच लाख टन कच-याचा ढीग तयार झाला. पुन:र्निर्माणाचे काम अवघड होते. बुलडोझर तोडक्या मोडक्या गोदामांवरुन फिरवले गेले. दुरुस्त करण्या पलिकडच्या जहाजांना बुडवण्यात आले. काहिंची दुरुस्ती करण्यात आली. सर्वात शेवटी व्हीक्टोरिया गोदीच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. ८००० व्यक्ती ७ महिने अहोरात्र हे काम करीत होत्या हे फक्त गोदीच्या बाबतीत बाहेरही अशाच प्रकारे जीवन पुन्हा वेग घेत होते.
सात महिन्यांनंतर बंदर पुन्हा सुरु झाले.
या घटनेची चौकशी करणा-या आयोगाचा अहवाल यथावकाश आला. कापासाच्या गासड्या स्फोटकांच्या बरोबर साठवणे, जहाजात स्फोटके आहेत असे दर्शवणारा लाल बावटा न लावणे, बंदरात जहाज पोहोचल्या नंतर स्फोटके वेळेत न उतरवणे
मुंबईने या नंतरच्या काळातही अनेक संकटांना तोंड दिले. १९९३ चे बॉम्बस्फोट, मुंबई लोकल मधील साखळी बॉम्ब स्फोट, २००५ चा महाप्रलय परंतु या संकटांमध्ये कारस्थान किंवा नैसर्गीक आपत्ती होती. मात्र गोदीतील स्फोट मात्र एकामागून एक मानवी चुकांच्या साखळीचा परिणाम होता. अनेकांना या घटनांपैकी एखादी घटना मोठे संकट वाटेल ज्याने ज्या प्रमाणात ज्या घटनेत परिस्थितीचे चटके सहन केले त्या प्रमाणात त्याला ते संकट मोठे वाटेल यात शंका नाही.
स्मारक
समाप्त
याद्या
7610
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
उशीर झाला...
भयंकरच आहे.
हो ..
In reply to भयंकरच आहे. by श्रीरंग_जोशी
कशाला परत दिल्या विता काय महित???
अवांतर..
In reply to कशाला परत दिल्या विता काय महित??? by भटक्य आणि उनाड
ही तलवार कोठे आहे...
In reply to अवांतर.. by उपास
हा पण भाग मस्त झाला आहे.
या पूर्वीच्या भागांचे दुवे
हे दुवे....
In reply to या पूर्वीच्या भागांचे दुवे by लाल टोपी
पहिल्या आणि दुसर्या भागाचे
धन्यवाद..
In reply to पहिल्या आणि दुसर्या भागाचे by गणपा
तीनही भाग वाचले. खूपच चांगली
+१
In reply to तीनही भाग वाचले. खूपच चांगली by रेवती
सुंदर मालिका!! पण एका
सुरुवातीला
In reply to सुंदर मालिका!! पण एका by गुलाम
फोटो साठी. गणपा यांचे..
नवीन माहिती मिळाली.. उत्तम
मनःपूर्वक आभार!
मस्त झाला हा ही भाग
जबरदस्त
छान माहितीपुर्ण लेखमालिका!!!
वडील अग्नीशमन दलात असल्यामुळे
या घटनेत जे ब्रीटीश आणि
छान माहिती
!!!