आश्चर्य...यूपीएकडून रालोआला श्रेय!
कोर्टात प्रतिज्ञापत्र भरताना कबुली द्यायला लागली.
एखाद्या छोट्याशा गावात झालेलं छोटेखानी विकासकाम असो किंवा देशपातळीवर साकारलेला मोठा प्रकल्प असो, त्याचं श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची मंडळी एकमेकांच्या उरावर बसल्याचं आपण कैकदा पाहिलंय. पण, यूपीएनं देशातील रस्तेविकासाचं श्रेय आज खुलेपणानं भाजपप्रणित रालोआ सरकारला देऊन सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
गेल्या ३२ वर्षांत देशात राष्ट्रीय महामार्गाचा जेवढा विस्तार झाला, त्यातील अर्धा भाग माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधला गेल्याची कबुली केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे.
मिसळपाव
रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल.