Skip to main content

मुंबईचे आगळे रूप पाहताना - ३

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 15/08/2013 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे आगळे रूप पाहताना - १ मुंबईचे आगळे रूप पाहताना - २ tower2 आता माझगाव डॉक्स वरून आणखी पलिकडे भायखळा परिसरात व लालबाग परळ कडे बघितले तर सर्वत्र टॉवरच दिसत होते.पैकी डोक्यावर घुमट असलेला टॉवर म्हणजे भायखळयाचा फॉर्च्युन टॉवर आणि मधोमध उभी असलेली उंच इमारत जे जे उड्डाणपूलाच्या अलिकडे मुंबई सेंट्रल कड

कोकणी मांसाहारी थाळी

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 15/08/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'अन्न हे पूर्णब्रह्म'च्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सर्व मिपाकरांचे व रेवतीचे खास अभिनंदन. ह्या सदरामुळे आम्हाला वेग-वेगळे पदार्थ बनवता व शिकता आले, त्यात मिपाकरांचे प्रतिसाद नवीन, वेगळे काही बनवण्यास प्रोत्साहित करत होते. कोकणातले निवडक पदार्थ घेऊन चवीने खाणार्‍यांसाठी मी कोकणी मांसाहारी थाळी सादर करत आहे , आशा आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल.

गोवन थाळी

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 15/08/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या सदरास सुरुवात करून आज १ वर्ष झाले. ह्या वर्षभरात अनेक पाककृती सादरकरण्याची मला मिपाने संधी दिली, मिपा सदस्यांनी कौतुक केले. भरून पावलो. आजच्या ह्या वर्धापनदिनानिमित्त ही 'गोवन थाळी' सादर करताना आनंद होतो आहे. स्विकार व्हावा.

Thali

आत्महत्येला कव्हर!

लेखक मीराताई यांनी गुरुवार, 15/08/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगू का? तशा माझ्यापुढे समस्या खूप आहेत, पण माझी मुख्य समस्या ही आहे की, माझ्या समस्या कोणाला समजतच नाहीत. पहा, तुम्ही पण हसलात न मला? हसू नका हो! अगदी पोटतिडिकीने सांगतोय, माझी कोणतीच समस्या कोणालाच समजत नाही.खरंच का लोक एवढे बिनडोक असतात? की त्यांच्या बेपवाईमुळे असं घडतं? कोण जाणे! पण या काळातही माझा मनुष्यप्राण्यावरचा विश्वास टिकून आहे खरा! कदाचित, ...कदाचित मलाच माझ्या समस्या नीट सांगता येत नसाव्यात. तसा मी मुखदुर्बळच! म्हणजे, असं आई म्हणते लहानपणापासून; अर्थात माझ्या लहानपणापासून, तिच्या नव्हे. माझं हे असंच होतं, एक सांगायला जावं, तर त्यातून अर्थ वेगळाच निघणार! असो. तर काय?

मिले सुर मेरा तुम्हारा...

लेखक अनुप ढेरे यांनी गुरुवार, 15/08/2013 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लागणारं हे गाणं माहित नसणारा माणूस विरळाच. अशोक पत्की आणि लुइस बँक्स यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जाहिरात क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव, पियुश पांडे यांनी लिहिलेलं हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं 'मेरे देश की धरती' सारखं स्फुरण चढवणारं नाहिये. किंवा 'ए मेरे वतन के लोगों' सारख डोळ्यात पाणी आणणारं पण नाहिये. हे गाणं मनाला काहिशी हुरहुर लावणारं आहे. भीमसेन जोशी यांच्यापासून सुरु होणारं हे गाणं आपल्याला ८-९ भाषा वापरून, अनेक अभिनेते, गायक-गायिका, खेळाडू, लेखक यांच्या मार्फत बहुतांश भारताची सफर घडवुन आणते.

गेले ते दिवस... आता राहिल्या त्या फक्त आठवणीच

लेखक देवांग यांनी बुधवार, 14/08/2013 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
90 चा दूरदर्शन आणि आपण- 1. रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो... . 2. "रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट बघायची... . 3. "जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र मंडळी घरी जमायची... . 4. शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर बसायचं... . 5. रामायण-महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे... . 6. "चंद्रकांता" पाट्या पासून शेवट पर्यंत बघायचं... . 7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण आठवडाभर याचा विचार करत बसायचो... . 8. शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत बसायची... . 9.

धाडस ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 14/08/2013 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता.. मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते.. त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू.. खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती.. इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला.. काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला.. वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!! थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली..

किमया

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 14/08/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा,… शब्दांची किमया अर्थबोध मानभावी माया जाण काय समजे ना कांही वय तितुके बघ गेले वाया हसणे रडणे भाव भावना अंत:कळा हृदयास कळाया कोश कठीण भिजण्यास हवे स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया ……………………अज्ञात
काव्यरस

विषय

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 14/08/2013 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांनी बघीतले दृष्यातले सुख। अंतरी वाढली कामाची भुख। डोळ्यांनी देवाचे रुप बघायचे असते हे मात्र कधी कळ्लेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥१॥ हातांनी दिला लोकांना मार। अंतरी वाढली क्रोधाची धार। हातांनी देवाला नमस्कार करायचा असतो हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥२॥ मनाचा नाही कळला हा डाव। अंतरी वाढला लोभाचा भाव। मनानेच देवाचे नामस्मरण करायचे असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्माकडे वळलेच नाही ॥३॥ नाकाने घेतला भलताच वास। अंतरी वाढली लोभाची रास। नाकातुनच जपाअजपा चालू असते हे मात्र कधी कळलेच नाही। आमचे मन...... कधी सत्कर्

येथे तिरंगा विकला जातो'..........

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी बुधवार, 14/08/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो... प्रजाकसत्ताक दिनावरील एक कविता प्रस्तुत करतो..!.. या वर्षीचा प्रजासत्ताक दिन जसा जवळ आला, डोक्यात आमच्या एक जबरदस्त प्लान चमकला ! चला, या वर्षी सगळा आळस झटकुन टाकुयात, आपल्याच अंगणात डौलाने मस्त तिरंगा फडकावुयात ! भरपूर उत्साहात २ तास सगळे मॉल पालथे घातले, शेवटी कोप-यावर छोटेसे १ दुकान नजरेस पडले, 'येथे तिरंगा विकला जातो' पाटीवर लिहिले होते ! दिसते तसे नसते हे आम्हाला नंतर उमगले होते !! दुकानदाराला म्हटले आम्ही अभिमानाने 'तिरंगा पाहिजे एक' त्याने न्याहाळुन विचारले 'ओरिजिनल की डुप्लीकेट' चवताळुन ओरडलो, 'आजादी' नंतर डुप्लीकेट कशाला फडकावणार? बसा, बसा, त्याने म्हटले, तुमच्या सारखे