Skip to main content

२०१४-निवडणुकांची रणधुमाळी

लेखक सचीन यांनी बुधवार, 18/12/2013 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुका जवळ येत आहेत ह्या निवडणुकांचा निकाल हा देशाचे भवितव्य ठरवणारा असेल. देश विकासाच्या दिशेने अजून मोठाली क्षेत्रे काबीज करणार कि धर्माचे राजकारण करत पाकच्या, बांगलादेशाच्या रांगेत जाऊन बसणार. देशाने गेल्या ६६ वर्षात शून्यातून सुरवात करून अफाट प्रगती केली. दुसर्या बाजूला अनेक अडचणी आहेत अफाट लोकसंख्या, भ्रष्टाचार,धार्मिक दंगे,जातीय समस्या, दहशतवाद ,भाषिक वाद, प्रांतवाद ,बुवाबाजी, अंधश्रद्धा, निरक्षरता .दुसरा कुठला देश असता तर ह्या साऱ्यांमध्ये हतबल होवून गेला असता नष्ट झाला असता.

पुढच्यासाठी

लेखक अमेय६३७७ यांनी बुधवार, 18/12/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
कुणास ठाउक बाग कुणाची कुणी शिंपली हिरवी झाडे तारुण्याचे मोल, कुणाच्या हाडांची अन झाली काडे हिरवळ दिसते, पानोपानी मंजुळ किलबिल मंद स्वरांची जागोजागी खूण सापडे चराचरातिल अद्वैताची विश्वाचा हा जरी कोपरा कोप-यातले विश्व सुखाचे भय- क्रोधाला इथे न थारा इथे न वाढे तण्य फुकाचे आनंदाने भोग दान हे घाल तशी भर अपुली काही किंवा केवळ पाही इतुके कीड- वाळवी लागत नाही ठेव आठवण त्या पहिल्याची झाड लावले येथे ज्याने आपसूक मग सुचेल तुजला पुढच्यासाठी ठेवुन जाणे -- अमेय

घनन-घन घनगड

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 18/12/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
कैलासगड, घनगड, तैल-बैला, कोरीगड पावसाळ्याची सुरवात,मस्त वातावरण, त्यात रविवार आणि ट्रेक प्लान. यावेळी सकाळी ५ वाजता उठून सिंहगड पकडून कर्जतला जायचा जाम कंटाळा आलेला. बाइक पण बऱ्यांचं दिवसात पिदडवली नव्हती. म्हणून मग मुळशी जवळचे किल्ले करायचा प्लान झाला. भूषण मुंबई वरून पहाटे चारची गाडी पकडून पुण्यात ९ वाजता हजर.

<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 18/12/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया.

अर्थक्षेत्र भाग १ - (शेअर मार्केट मधला पहिला लॉस!)

लेखक ज्ञानव यांनी बुधवार, 18/12/2013 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे एक स्नेही बापट फटाफट जे आज बरीच वर्षे माझे क्लायंट आहेत.फटाफट हे नाव त्यांनि स्वतःच ठेवले आहे.

दुचाकी विकत घेण्यासाठी मदत हवी आहे

लेखक खटपट्या यांनी बुधवार, 18/12/2013 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रीण पुण्यामध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. ती उत्तर भारतीय असून तिला पुण्यातील काहीही माहिती नाही. तिला जुनी स्कुटी विकत घेण्यासाठी पुण्यातील मिपाकरांची मदत हवी आहे. पुण्यातील कोणा मिपाकराला जुनी स्कुटी विकायची असल्यास कृपया व्यनि करा. जुनी दुचाकी विकत घेताना काय कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात या बद्दल माहितीची अपेक्षा. पुण्यात जुन्या दुचाकीची दुकाने कोणाला माहिती असल्यास पत्ते कळतील काय ?

धुसरिका - व्युत्क्रम

लेखक जातवेद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
कधितरी झाडांवर सावली पडेल पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो विषयांतर करू नकोस विकासाच्या गतीची ऐशी तैशी चहा पिताना कपात बसली माशी नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली कालची फ़ॅटल एरर कोण काढली? सरता सरता काळ सरेना काय मस्त खेळती ही सेरेना मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय टाटा माझा स्वीकार करा

हठयोग- कुंडलिनी (१)

लेखक शरद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी...हठयोग मागे पातंजल योगशास्त्रावर लेख लिहला होता तेव्हा कांही जणांनी कुंडलिनी बद्दल विचारणा केली होती. आज आपण त्या संबंधी थोडी माहिती पाहू. सर्व जण मान्य करितात की ब्रह्माचा-परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात वास करत असतो. पण जीवाला त्याची जाणिव नसते. अद्वैत तत्वज्ञान सांगते की मायेचा पडदा जीवावर अज्ञानाचे झापड घालतो. हा पडदा दूर केला की जीवाला आपण ब्रह्मच आहो याची जाण होते. हठयोगात हे जरा निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी "कुंडलिनी" नावाची एक शक्ती प्रत्येकाच्या शरीरात वास करीत असते असे मानले. ही शक्ती निद्रित असते.

नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत

लेखक Hrushikesh यांनी मंगळवार, 17/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांन्नो, नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे.

बंद होणार्‍या विमा योजना - वस्तुस्थिती काय आहे ??

लेखक प्रसाद भागवत यांनी मंगळवार, 17/12/2013 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेले महिना दोन महिने लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत बर्‍याच वावड्या उठत आहेत. बहुतांशी सर्वच कंपन्याच्या प्रतिनिधीं कडुन ' लोकप्रिय’ प्लान्स बंद होणार आहेत, प्रिमियम वाढेल --' ई. कारणे सांगुन ग्राहकांची फसवणुक चालु असल्याचे पाहण्यात आले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की IRDA ( विमा क्षेत्र नियमित करणारी सर्वो्च्च संस्था) ने काही मोठे बदल सुचविले हे खरे आहे परंतु हे बदल निश्चितपणे ग्राहक हिताचे आहेत.