Skip to main content

दूध

लेखक कुमारकौस्तुभ यांनी सोमवार, 30/12/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की, राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे.

मिर्झा ग़ालिब...........भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 30/12/2013 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire मिर्झा ग़ालिब...........भाग-१ जेव्हा ग़ालिब दिल्लीत आला तेव्हा तो तसा तरुणच होता. म्हणजे त्याचे वय त्यावेळेस १९ असले तरीही कवी म्हणून त्याला थोडी फार प्रसिद्धी मिळाली होती. ती प्रसिद्धी पुढे वाढतच जाणार होती. पण त्याच्या लोकप्रियतेचे एकमेव कारण त्याचे काव्य नसून त्याचा स्वभाव हेही एक प्रमुख कारण होते.

बलिदान त्याविना हे ... (गझल)

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 30/12/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
असते मनात काही उमजून येत नाही वाटे किती फुलावे उगवून येत नाही घनघोर मंथनाची आश्वासने फुकाची नुसतेच भोवरे पण घुसळून येत नाही कुंकू पुसून केली तलवार रक्तवर्णी बलिदान त्याविना हे उजळून येत नाही तू बोल ऐकतो मी माझेहि ऐक काही मौनात प्रेमगाणे उमलून येत नाही पेरून चिंतना घे शिंपून लेखणीला शब्दास अर्थ आता लगडून येत नाही -- अमेय

बाप माणुस

लेखक jaypal यांनी सोमवार, 30/12/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाप माझा बाप बाप मानुस होता. फाटकी चड्डी मळकट बनियान मनाने मात्र तो साफ माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. टकलावर तुरा अन डोळ्यावर जाड काचा. आरे मोठठ व्हायच तर भरपुर वाचा. अस नेहमी ओरडणारा तो ताप माणुस होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. वयात आली जवानी घेऊन नवि उर्मी. स्वभावात रगेल पणा बोलण्यात उद्धट गुर्मी. दोस्तांच्या गप्पात मग एकेरी उल्लेख होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. आज जेंव्हा मी हळवा बाप होतो. लेकाला माझ्या घट्ट जवळ घेतो. फुटतो सारा बांध कारण समोर चेहरा त्याचा होता. बाप माझा बाप बाप मानुस होता. तक्रार नाही केली की कधी नाही चिडला. आयुष्य भर झिजला संसाराचा गाडा ओढला. माझा बा

सुरतवर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लान होता ????????

लेखक मारकुटे यांनी सोमवार, 30/12/2013 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
यासिन व रियाझमधील फोन संभाषण यासिन: भाईजान... एखाद्या छोट्या अणुबॉम्बची व्यवस्था करता येईल का? रियाझ: नक्कीच करता येईल.

भटकंती २

लेखक इन्ना यांनी सोमवार, 30/12/2013 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती आणि टूर ह्या दोन शब्दांत एक फरक आहे. कुठे जायचं? कसं जायचं? किती दिवस? काय काय करायचं? खाण्यापिण्याची सोय काय? आधी जाऊन आलेलं आहे का कोणी? थोडक्यात, परीटघडीचा प्रवास म्हणजे टूर. अस्मादिक भटकंतीवर जास्त विश्वास ठेवणारे. एकदा कुठे जायचं आणि किती दिवस ते ठरलं, की बाकीचं जसं समोर येईल तसं.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग १

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 29/12/2013 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat महाभारतात भगवान कृष्णासकट कुणीही देव नाही असं माझं मत आहे. आहेत ती सारी माणसंच. पराक्रमी, कसलातरी पीळ घेऊन जगणारी. प्रत्येकाचे पाय मातीचे. हर्ष, खेद, सुख, दु:ख, वेदना, लोभ, सूड, कौर्य अशा अनेकानेक भावनांचा विविधरंगी पट या कथेत गुंफला आहे. हा इतिहास पराक्रमी पुरुषांचा असला तरी त्यामागे कुशल राजकारणाचा देखिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि या राजकारणाचे धागेदोरे महाभारतात फार दुरवर जाणारे आहेत. या राजकारणाचा विचार करताना तीन महापुरुषांनी केलेल्या घडवुन आणलेल्या घटनांचा परामर्ष या लेखात घेतलेला आहे.