Skip to main content

ऋण

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 07/02/2014 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
भांबावतो कल्लोळ. माझ्या उरात दडू पाहतो. पाहता पाहता नभही अलगद झाकोळून येतं. आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... तुझा माझा मांडलेला पसारा पाहते. त्यातून स्वत:ला निर्लेपपणे बाजूला काढायचं ठरवते. हळूच एक प्रश्न डोकं वर काढतो, विचारतो, कधी चुकतं करशील तुमच्या नात्याचं देणं? परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...
काव्यरस

यादवी माजली

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 06/02/2014 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
यादवी युद्ध किंवा यादवी माजली हे शब्द आपण वर्तमानपत्रांतुन बर्‍याचदा वाचत असु कदाचित. पण या शब्दाचा उगम कदाचित आपल्याला माहिती नसेल. आजच्या काळाचा विचार करता याचा संबंध बिहारच्या लालुप्रसाद यादवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाइल. या सत्शील माणसापाठी या असल्या भयंकर शब्दाचा उगम जोडला जाउ नये या साठी हा लेखन प्रपंच. "यादवी माजली" या शब्दामागे आहे खरे सांगायचे तर एक आद्य अट्टलबिहारी. वाजपेयी नव्हेत. खरोखरचा अट्टल बिहारी. श्रीकृष्ण. (अटलबिहारी म्हणजे माझ्या मते विष्णुचा आठवा अथवा सर्वात महत्वाचा अवतार.) तर यादवीचा संबंध आहे श्रीकृष्णाशी.

शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...

लेखक विनोद१८ यांनी गुरुवार, 06/02/2014 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो....!! मी आत्ता नुकतीच एक बातमी दै. लोकसत्ता'मध्ये वाचली, कदाचित आपणही ती वाचली असेल. 'आप' ने शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दिवसात त्याचे दिल्लीच्या एकन्दरीत राजकारणावर काय परिणाम होतील ?? यावर विचारमन्थन व्हावे असे वाटते, सदर बातमीचा दुवा खाली देत आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-government-moves-against-... विनोद१८

शेअर बाजारांतील तेजी-मंदी : खेळ मनोव्यापारांचा

लेखक प्रसाद भागवत यांनी गुरुवार, 06/02/2014 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर बाजाराचे पार्‍यासारखे चंचल स्वरुप आणि त्यातील सतत हेलकावे खाणारे समभागांचे भाव, हे आपल्या सगळ्यांसाठीच एक अनाकलनीय विश्व आहे. सर्वसामान्यपणाने बाजार मुलतः मागणी-पुरवठा या तत्वावर आधारित असतो हे खरे असले तरी मग मुळांत मागणी वा पुरवठ्याच्या प्रमाणांत सारखे बदल का होतात हा प्रश्न उरतोच, आणि या प्रश्नाची अनेक उत्तरे असली तरी गुंतवणुकदारांची मानसिकता हे या घडामोडींमागील एक प्रबळ कारण आहे हे निश्चित. बाजाराचे खरे तर स्वतःचे असे कोणतेही स्वरुप नसते वा त्याला त्याची अशी स्वतःची दिशाही नसते.

छायागीत ४ - मुड मुडके ना देख मुड मुडके...

लेखक Atul Thakur यांनी गुरुवार, 06/02/2014 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
लक्ष्मीमंदिरात नेतो म्हणुन जुगाराच्या क्लबात नर्गीसला आणणारा राजकपुर नेमका नादिराच्या हातात सापडतो. आणि ती थंडपणे त्याच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगु लागते. निरागस नर्गीस या अपरीचित वातावरणात अजुन सावरलेली देखिल नसते की कुणीतरी जबरदस्तीने तिच्याशी हात मिळवतात तर कुणी ओळख करुन घ्यायला पाहतात. "श्री ४२०" मात्र तेथेही नर्गीस कुठल्याशा गावाची राजकुमारी आहे अशी थाप ठोकायला मागेपुढे पाहात नाहीत. नादीरा मात्र आता अशी मागे हटणार नसते.

चिमुटभर

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 06/02/2014 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी ………………अज्ञात
काव्यरस

कविता, मीटर आणि मी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 06/02/2014 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला,आजकाल आमी बी कविता करतो , असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर?

शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...

लेखक विनोद१८ यांनी गुरुवार, 06/02/2014 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो....!! मी आत्ता नुकतीच एक बातमी दै. लोकसत्ता'मध्ये वाचली, कदाचित आपणही ती वाचली असेल. 'आप' ने शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दिवसात त्याचे दिल्लीच्या एकन्दरीत राजकारणावर काय परिणाम होतील ?? यावर विचारमन्थन व्हावे असे वाटते, सदर बातमीचा दुवा खाली देत आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-government-moves-against… विनोद१८

एक गीत

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 06/02/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर, आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे. ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे, परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे ! एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की, अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे? हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले? तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे? बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा, ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे! पुढील कडवे मात्र नवीन आहे बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी, ये फिरुन परतुनी, डोळ

मुखपृष्ठ

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/02/2014 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आपण सर्वांनी मिपाकर जयंत कुलकर्णी म्हणजेच आपले लाडके जकुकाका यांच्या रसाळ अन अभ्यासपूर्ण अशा युध्दकथामालांचा आनंद घेतला असणार. मीहि त्यांच्या लेखनाचा मोठा फॅन आहे. या युध्दकथा त्यांच्या आगामी "युध्दाचे वादळ" या मोठ्या ग्रंथउपक्रमाचा भाग आहे हे त्यांनी नमूद केलेलेच आहे. तसेच या ग्रंथासाठी मुखपृष्ठ कसे असावे किंवा चोखंदळ मिपाकरांकडून काही कल्पना आहेत का यासाठी त्यांनी धागा पण काढलेला होता. त्यालाच प्रतिसाद म्हणून याचे डिझाइन्स मी स्वतः करावे असे वाटले.