Skip to main content

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 23/03/2014 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

देव पाहिलेला माणूस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 23/03/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/03/2014 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
१) राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. एक व्यक्ती नगरसेवक म्हणून अथवा सहकारी संस्थेतीतल पदावर १० वर्षे, विधानसेभेत १० वर्षे लोकसभेत १० वर्षे राज्यसभेत १२ वर्षे राहीली तर जवळ पास ४२ वर्षांचे किमान करिअर करता येऊ शकते. खूपच लोकप्रीय असेल तर जवळपास ५७ वर्षाचे करीअर करता येऊ शकेल. सांगण्याचा उद्देश एवढाच कि ज्यांना करिअर करायचे आहे त्यांना पुरेशी संधी राहते आणि इतरांनाही पुरेशी संधी मिळते.

ओसाडवाडीचे ईलेक्शन..

लेखक नानासाहेब नेफळे यांनी रविवार, 23/03/2014 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
इलेक्शन मंट्ले की ओसाडवाडीत एकच चैतन्य संचारायचे, तरणीबांडं पोक्त व्हायची ,थेरडी तरुण व्हायची ,बाया बापड्या व्हायच्या ,पाराची लोकसभा व्हायची. गावाला दर पाचवर्षांनी इलेक्शन लागायचं. मंग आख्खा गाव या एकाच विषयाभोवती फिरायचा. गाव तसा हजार उंबर्याचा ,टुमदार. मधोमध भैरोबाचे देवळ ,देवळाला लागूनच ग्रामपंचायतीचे हापिस. रोजच्या कामाला, शेताकडं, तालुक्याच्या गावी जायच्या अगुदर भैरोबाला जायचा गावच्या गडी माणसांचा शिरस्ता व्हता. देवळात आल्यासरशी शेजारी ग्रामपंचायतीची खबरबात घ्यायची हुक्की अनेकानला यायची. मागच्या पाच वर्षात सरपन्च रावसाहेब जमदाडे पाटलाच्या कारभारावर गावकरी नाराज व्हते.

पाक-कला - अननसाचा शिरा (पाईनॅपल)

लेखक प्रमोद्तम्बे यांनी रविवार, 23/03/2014 05:49 या दिवशी प्रकाशित केले.
अननसाचा शिरा (पाईनॅपल) साहित्य : दोन वाट्या अननसाचे काप किंवा फोडी , दोन वाट्या जाड रवा , एक वाटी साखर (अननस जास्त आंबट असेल तर साखरही जास्त घ्यावी) , अर्धी वाटी साजूक तूप , १०- १२ काजू पाकळ्या, १०- १२ बेदाणे , ६ वाट्या गाईचे दूध , ५-६ केशराच्या काड्या , एक छोटा छानचा वेलची पूड. कृती : एका वाटीत थोडे (४ चमचे) गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत घालून बाजूला ठेवा, एका स्टीलच्या पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन त्यात अननसाचे काप किंवा फोडी घालून गॅसवर मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवून घ्या.

यापैकी कोणीही नाही! NOTA

लेखक भाते यांनी शनिवार, 22/03/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा निवडणुका लवकरच येत आहेत आणि यावेळी पहिल्यांदाच मतदान करताना आपल्याला मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय अधिकृतपणे निवडण्याची संधी मिळणार आहे. २००९ मध्ये निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार त्यांची (निवडणुक आयोगाची) मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय देण्याची तयारी आहे, जे सरकार सहसा मान्य करत नाही. २७ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मतदान पत्रिकेवर मतदारांसाठी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय असणे गरजेचे आहे, ज्यामुळे मतदारांचा निवडणुक प्रक्रियेतला सहभाग वाढु शकतो.

दल(ब)दल

लेखक जयनीत यांनी शनिवार, 22/03/2014 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
" मला माहीत होतं हा प्रश्न विचारल्या जाणारच! " पत्रकारांचा प्रश्न ऐकून नेताजी किंचितही विचलीत झाले नव्हते . " बघा माझ्यावरचा दलबदलूपणाचा आरोप हा काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत माझे विरोधक हा निराधार आरोप माझ्यावर नेहमीच लावत असतात, त्यात काहीही तथ्य नाही. उलट असल्या आरोपांनी माझी जनतेप्रती निष्टाच सिद्ध होत नाही का? तुम्हीच सांगा प्रत्येक निवडणुकीत जनता वेगवेगळ्या पक्षाला निवडुन देते, दर निवडणुकीत जनतेचा कल बदलतो त्यात माझा काय दोष? आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी जनतेशी नाळ जुळलेला एक समान्य कार्यकर्ता आहे " नेताजींच्या चेह-यावर पुनश्च चिरपरिचित हास्य आले. टाळ्यांचा गडगडाट झाला.

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

लेखक प्रमोद्तम्बे यांनी शनिवार, 22/03/2014 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवाचे दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्याू विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा (आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे. साहित्य : एक मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद. कृती : विळीवर कैरीची जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत ठेवावे.

कोथिंबीर वडी

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 22/03/2014 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: २ वाट्या हरभरा डाळ(भिजवलेली) कोथिंबीर (धूवून चिरलेली) ३ वाट्या ३ चमचे डाळीचे पीठ (बेसन) २ चमचे ओवा १ चमचे धने २ चमचे तीळ तिखट ३ चमचे(आवडीप्रमाणे) मीठ चवीप्रमाणे २ चमचे चिंचेचा कोळ २ चिमूट खायचा सोडा तेल पाककॄती : हरभरा डाळ ३ -४ तास भिजत घालावी.कोथिंबीर धुवून चिरावी.(फार बारीक चिरू नये). भिजलेली डाळ मिक्सरमधून वाटुन घ्यावी. वाटलेल्या डाळीत तिखट,मीठ्,ओवा,धने,चिंचेचा कोळ्,खायचा सोडा,डाळीचे पीठ आणि कोथिंबीर घालावे. वरी

मदतीचा हात हवाय…….

लेखक अनिकेत प्रकाश आमटे यांनी शनिवार, 22/03/2014 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.