Skip to main content

अजित पवार, धरण आणि धमकी

लेखक काळा पहाड यांनी शनिवार, 19/04/2014 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे. 'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.

मतदान---शंभर टक्के

लेखक निलरंजन यांनी शुक्रवार, 18/04/2014 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
भारत देश म्हणजे गेली साठ वर्षे मानाने संसदीय लोकशाही राबविणारा देश , देशाला आपल्या लोकशाही चा सार्थ अभिमान लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य वा देश पण इतके असूनही देशाला अजूनही निवडून आलेला प्रतिनिधी शंभर टक्के लोकांनी निवडलेला नाही नक्की होतेय काय ? कशी होईन समर्थ लोकशाही? मतदान सक्तीचे करावे का? लोकांना मतदानासाठी खेचून आणण्यामधे नेते कमी पडतात का? मतदान केंद्रावर पोहचायाची व्यवस्था नक्की कुणी करायची? निवडणूक आयोगाने नक्की काय करावे म्हणजे शंभर टक्के मतदान होईल आणि सुदृढ सशक्त लोकशाही अस्तित्वास येईल? तुमचे प्रत्येक प्रामाणीक प्रतिसाद मिळवून देईल देशाला महान मग तुमचा प्रतिसा

(( वाढीव ))सांगीतिक भटकंती :सवाई गंधर्वांचा वाडा(कुंदगोळ), गंगुबाई हंगालांचे घर (हुबळी) आणि संगीत गुरुकुल

लेखक पुतळाचैतन्याचा यांनी शुक्रवार, 18/04/2014 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांची इच्छा पूर्ण होण्यासाठी मुहूर्त लागावा लागतो. केवळ वेळ असून चालत नाही, वेळ यावी लागते. हुबळीची बायको असून वर्षात ४ वेळा सासुरवाडीला जाऊन पण केवळ १६ कि.मी. असणाऱ्या गावाला जायला झाले नव्हते. आज महाराष्ट्रातील सर्वात श्रेष्ठ गायक कोण होते हा प्रश्न आला कि भीमसेन जोशींच्या गुरूंचे म्हणजेच सवाई गंधर्व रामभाऊ कुन्दागोलाकारंच नाव ओघानेच येत. त्यांच्या वाड्यात जाउन त्या हवेचा फील घ्यायचा नंतर काही फोटो पहायचे असा फार वर्ष पासूनचा बेत होता. तसे गंगुबाई हंगालांचे घर हुबळी गावातच आहे. पूर्वी एकदा तिथे जाऊन आलो होतो पण फोटो काढायचा विसरलो होतो. आता नक्की प्लान करून गेलो होतो.

गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 18/04/2014 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता.

व्यवहारज्ञान

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 18/04/2014 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा चांगलाच उत्साह दिसत होता. तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल... मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय . म्हणजे त्यात तिने कॉलेज मध्ये जाऊन कुठली पदवी संपादन केली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच ती सारं काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी.

चेंबूर - कालिना उड्डाणमार्ग अखेर वाहतुकीसाठी उघडला!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 18/04/2014 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेली १० वर्षे रखडलेला चेंबूर ते कालिना (सी एस टी मार्ग) उड्डाणमार्ग आज सकाळी वाहतुकीस खुला झाला. ठाणे ते कालिना कचेरी घरापासुन अगदी कचेरीत शिरेपर्यंत वाटेत २ सहकार्‍यांना घेण्यासाठीचे दोन थांबे धरुनही केवळ ३५ मिनिटे लागली. त्यातही रमाबाई नगर ते कालिना विद्यापिठाच्या अलिकडील टप्पा हे अंतर अवघ्या ९ मिनिटात संपले. पहिलाच दिवस असल्याने सर्वत्र वाहतुक पोलिस दक्ष होते. मजा आली. वेळ तर वाचलाच पण घाटकोपरला महामार्ग सोडल्यानंतर घ्यावे लागणारे गल्ली-बोळ, लाल बहादूर शास्त्री मार्ग, भंगार साम्राज्याचा बराचसा भाग व त्या त्या भागातली वाहतुक कोंडी, मनस्ताप हे सगळे टळले.

येल्लगिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - १

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 18/04/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतातलं घनदाट अरण्यं होतं ते. दुपार कललेली होती. सकाळभर खाण्याच्या शोधात भटकणारे पक्षी आणि जनावरं सावलीला विसावली होती. असह्य उन्हाच्या तलखी मुळे डेरेदार वृक्षाच्या सावलीतही जीव नकोसा होत होता. वाराही साफ पडला होता. गवताची काडी देखील हलत नव्हती. जंगल अगदी शांत होतं. या शांततेचा भंग होत होता तो जंगलात चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या गुरांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांच्या आवाजाने. गुरांच्या गळ्यात घंटा बांधण्यामागे दोन उद्देश होते. एक म्हणजे आपली गुरं कुठे आहेत हे गुराख्याला कळावं आणि दुसरं म्हणजे वाघ-चित्त्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून गुरांचं संरक्षण व्हावं.

चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 18/04/2014 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल कार बनवणे आणि विकणे इतकं आव्हानात्मक आहे हे त्यावर काम करण्याआधी माहीत नव्हतं. यावेळी आपण कार बाजाराची गुंतागुंत ( Complexity) आणि ग्राहकाची निर्णय प्रक्रिया पाहूयात, म्हणजे नंतर त्याचा संदर्भ येईल तेव्हा पटकन लक्षात येईल. अर्थात दुचाकीला पण बऱ्याच प्रमाणात हे सगळं लागू होतं, पण दुचाकीसाठीची ही प्रक्रिया थोडीशी सोपी आहे. गिऱ्हाइकाच्या मनाचे खेळ वाहनाच्या उपलब्ध प्रकारात आणि पर्यायात थेट परावर्तित होतात. जगात कुणाला काय आवडेल हे अचूक कसं सांगणार? यासाठी मार्केटिंग- विपणन विभागात अनुभवी संशोधक काम करत असतात.

अंगठी अनामिकेत का ?

लेखक अक्शु यांनी गुरुवार, 17/04/2014 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत? . . एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. ......... . . त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे.

कविता क्रमांक एक

लेखक सुशेगाद यांनी गुरुवार, 17/04/2014 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
वारा शापित आत्म्यासारखं सैरावैरा इकडे तिकडे भटकतो , माझ्या गालांना , केसांना स्पर्शतो , तो स्पर्श तेवढा हलका नसतो , ती झुळूक नसते वाऱ्यामध्ये श्वास घेऊ शकत नाही इतका भन्नाट वारा. पावसाच्या मातीचा पहिले सुंगध एखाद्या काचेच्या नक्षीदार बाटलीमध्ये साठवून ठेवावा बाकी सर्व रुक्ष ऋतुंमध्ये ती बाटली उघडावी आणि हळू हळू तो सुंगंध माझ्या सर्वांगात मिसळवून टाकावा. अगदी ओल्या मातीसारख वाटायला हव मन तुझ्या पापण्या खाली गेल्यावरच तुझ्याकडे बघायचं धाडस पुन्हा याव माझ्या डोळ्यात पावसाच्या थेंबासारख्या कवितांची अक्षर तुझ्या विरहाच्या मेघातून बरसावीत. एकेक क्षण खूप जड चाललाय.