Skip to main content

मी आणि माझे नशीब

लेखक सुनिल जाधव १९७९ यांनी रविवार, 20/04/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

सामान्य आणि अ सामान्य

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 20/04/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री अमोल पालेकर पोलिसाकडे तक्रार करून आले त्यांचे नाव मतदार यादीतून गायब कसे झाले याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांचे म्हणणे दिसते माझे नाव मतदार यादीत आहे का नाही हे मी नेट वर पाहिले मतदार यादी नेट वर दिसते हे मी वर्तमानपत्रातून वाचले माझे नाव मतदार यादीत दिसत नव्हते नेटवरून मी तक्रार नोंदविली एका आठवड्यात मला SMS वरून कोणाला भेटावे ते कळवण्यात आले मी त्या अधिकारी व्यक्तीस जाऊन भेटलो माझे म्हणणे ऐकल्यावर मला माझे नाव नोंदवून मिळाले माझे नाव गायब का झाले तेही समजले मी सामान्य माणूस असल्याने कायदे पाळण्याकडे माझा जास्त कल आहे चांगले अधिकारी भेटले तर माझे काम लवकर होते हा योग कधीतरी येतो ह

आर्र....राजकुमार

लेखक तिमा यांनी रविवार, 20/04/2014 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आर्र... राजकुमार पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले. जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच.

शिल्पे घडविली बहु कुशलता..

लेखक सूड यांनी रविवार, 20/04/2014 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
तर!! सांगायची गोष्ट अशी, की मिपाकर कुठेही गेले की धागा हा निघालाच पाह्यजे (असं म्हणतात). बरं, असे काही प्रवासवर्णाचे धागे लिहायचे म्हणजे जाम टेंशन येतं. त्यात लेण्यांबद्दल लिहायचं म्हणजे आणखीच टेंशन!! तरीही म्हटलं आता लोक एवढा आग्रह करतातच आहेत तर खरडाव्या चार ओळी. पुष्कळ दिवसांपासून हो-नाही करत लांबत चाललेला वेरुळ लेण्यांच्या भेटीचा विषय पुन्हा एकदा निघाला. आणि व्हॉट्स अ‍ॅप, प्रत्यक्ष भेटीतून प्लान बनू लागले. दोन दिवसांचाच प्लान करायचा असं कळल्यावर बर्‍याच जणांनी हात वर केले, म्हणजे सहमती दर्शवली.

मुनुस्वामी आणि मागाडीचा चित्ता

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 20/04/2014 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानच्या पूर्व किना-यावर मद्रास आणि पश्चिम किना-यावर मँगलोर यांना जोडणारी सरळ रेषा काढली तर त्या रेषेवर मधोमध बंगलोर शहर येईल. समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचावर असल्याने बंगलोरची हवा अत्यंत आल्हाददायक असते. अती थंड नाही आणि अती उष्णही नाही, अती पाऊस नाही आणि अगदी कोरडंही नाही असं तिथलं हवामान कोणालाही सुखद वाटण्यासारखंच आहे. आजचं बंगलोर हे दुस-या महायुध्दापूर्वी अगदी लहानसं आणि टुमदार शहर होतं. दुस-या महायुध्दात भौगोलीक स्थानवैशिष्ट्यामुळे आणि औद्योगीक प्रगतीमुळे बंगलोरची झपाट्याने वाढ झाली.

गडीमाणस

लेखक मालविका यांनी रविवार, 20/04/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी .

एका फुलाची गोष्ट (गूढ कथा)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/04/2014 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आश्रमात स्वामी त्रिकालदर्शी ध्यानावस्थेत बसले होते, मला पाहताच त्यांनी डोळे उघडले, क्षण न गमविता मी प्रश्न विचारला, स्वामीजी, वातावरण लय तापलंय, काय निकाल लागेल काहीच कळत नाही. स्वामी त्रिकालदर्शी: वत्सा तुझ्या समाधाना साठी एक कथा सांगतो, एका पुष्प वाटिकेत गुलाबाचे सुंदर फुल उमललेले होते. एक द्वाड मुलगा सायकल चालवीत तिथे आला. सुंदर गुलाबाच्या फुलाला पाहून त्याने आपल्या हाताने देठा सकट गुलाबाचे फुल उपटले. सायकलवर स्वार होऊन तो घरी पोहचला. पूजा घरात पूजा करीत असलेल्या आईच्या हाती त्याने फुल दिले.

तिला समुद्र आवडतो...

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 19/04/2014 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिला समुद्र आवडतो... तिला पाऊसही आवडतो... आणि हे त्याला चांगलंच ठाऊक आहे तिचा रूसवा कळतो त्याला तो कसा काढायचा, हे सुद्धा कळतं... पाठीवर स्पर्श जाणवला की सुसाट सुटतो तो काही बोलत नाही, विचारतही नाही ती तिच्याच रूसव्यात दंग एक हलका धक्का आणि समोर पसरलेला समुद्र ती शांत.. स्तब्ध.. सुखावलेली... समुद्राच्या दिशेने धावलेली... वळून त्याच्याकडे बघताना भरून आलेलं आभाळ अवचित आलेला पाऊस आणि वाहून गेलेला रूसवा...

.......चीनमधे व्हायरस

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 19/04/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
चीनचा एक प्रांत आहे सिकीयांग, तिथले आतंकवादी चीनमधे आतंक माजवतात आणि पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशात आश्रय मिळवतात. मागे चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी झरदारी अंकल पाकिस्तानचे अध्यक्ष होते तेव्हा झरदारींना याबाबत सूचना दिली होती. की चीनमधल्या अतिरेक्यांना पाकिस्तानात पनाह(आश्रय) मिळता कामा नये. याकडे आम्ही भारतीय कसे पाहतो... चीन पाक सहकार्य गेली अनेक वर्षे अधिकच दॄढ होताना दिसते आहे. पण पाकिस्तानबरोबर हस्तांदोलन करताना चीनच्या शरीरात काही व्हायरस शिरत आहेत.

येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या - २ (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 19/04/2014 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
येल्लागीरीच्या टेकड्या चंद्रकोरीच्या आकाराच्या आहेत. दक्षिण रेल्वेच्या जालारपेट जंक्शनपासून दोन मैल अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूटांवर या टेकड्या जमिनीतून झाड उगवावं तशा उभ्या आहेत. जालारपेट स्टेशनपासून एक पायवाट येल्लागीरीच्या माथ्यावर जाते. काही ठिकाणी घनदाट जंगल तर काही ठिकाणी सरळसोट कातळांवरुन चढत जाणारी ही वाट वाटसरुची कसोटी पाहणारी आहे. आणि जोडीला नरभक्षक झालेला बिबट्या, मग तर काय विचारायलाच नको ! १९४१ सालच्या सुमाराला मी येल्लागीरीला जमिनीचा एक छोटासा तुकडा विकत घेतला होता.