Skip to main content

दमण बद्दल माहिती

लेखक कबीरा यांनी बुधवार, 14/05/2014 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
दमण बद्द्ल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याचे ठिकाण? खादाडी साठी उत्तम जागा? २-३ दिवस जायचे आहे.

९० डिग्री साऊथ - १२

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 14/05/2014 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ११ ३० मार्चला अ‍ॅटकिन्सन आणि कोहेन कॉर्नर कँपवर पोहोचले होते. वाटेत टेडी इव्हान्सची स्लेज त्यांना आढळून आली होती. वा-याचा जोर वाढतच होता. तापमान घसरत चाललं होतं. हिवाळा तोंडावर आला होता. सर्व परिस्थितीचा विचार करुन अ‍ॅटकिन्सनने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो, " एखाद्या डेपोवर अथवा कँपवर ते असतील तरच त्या परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्यं होतं, अन्यथा त्यांना शोधणं अशक्यंच होतं. आम्ही सात दिवसाची सामग्री कॉर्नर कँपवर ठेवली होती.

आम्हाला सदर कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मसुदा लिहिण्यास मदत करावी

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 14/05/2014 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
ऐका हो ऐका, आमच्या गावी ओसाडवाडीच्या माळरानावर, हर ५ सालाबाद परमाने जत्रेमध्ये, यापावतो दस्तूर खुद्द जादुगार न. म. सरकार यांचे जादूचे शो १६ मे पासून, लागणार हाये हो, जादुगार हे मुळचे रा. मु. पो. ढेबेवाडीचे असून, त्यांचा टुरिंग शिनेमाचा ह. मु. ओसाडवाडीच्या नदीकाठ येथे आहे.

गांधीजींबद्दलची भुमिका डावे-समाजवादी स्पष्ट करतील का?

लेखक विकास यांनी बुधवार, 14/05/2014 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज निवडणुकींच्या निकालाच्या (अगदी अगदी) पूर्वसंध्येस एका बातमीत खालील वाक्ये वाचनात आली: "....गांधी यांच्या महिलांबाबतच्या आणि जातीयवादाबाबतच्या विचारांचा इतिहास पाहिल्यास त्यांना महात्मा केलेच कोणी, असा प्रश्न निर्माण होतो...त्यांचा उल्लेख 'देशातील पहिले भांडवलदार पुरस्कृत समाजसेवक' असा केला... 'कधी संत तुकाराम यांच्यावरील नाटके तयार करून ४६ रुपये जमा करणे तर कधी अस्पृश्यता उच्चाटनाच्या नावखाली ब्रिटीश कंपन्यांकडून दोन लाख रुपये मागणे, अशाप्रकारचे कार्य करणारे गांधी हे महात्मा असूच शकत नाहीत.

९० डिग्री साऊथ - ११

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 13/05/2014 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - १० १५ मार्चला चेरी-गॅराड आणि डिमीट्री हट पॉईंटला येऊन पोहोचले. परतीच्या प्रवासात डिमीट्रीने आपलं डोकं जडावल्याची आणि उजव्या हातात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. हट पॉईंटला पोहोचल्यावर त्याच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली होती. चेरी-गॅराडला मात्रं तो पुन्हा दक्षिणेकडे येणं टाळण्यासाठी सबब शोधतो आहे अशी पक्की खात्री वाटत होती ! स्कॉटच्या तुकडीची अवस्था आता गंभीर झाली होती. हिमवादळाचा जोर वाढतच होता. तापमान -४५ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरलं होतं.

आलिया निवडणूक असावे सादर !!

लेखक चिनार यांनी मंगळवार, 13/05/2014 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस ज्याची वाट बघत होतो तो मतदानाचा दिवस आता चोवीस तासांवर आला होता. " उद्या मतदान करायचं " एवढा एकच विचार मनात घोळत होता . याआधी दोन -तीन वेळा मतदान केलं असलं तरी यावेळचा मतदानाचा उत्साह काही संपता संपत नव्हता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. मला आज सकाळपासूनच माझ्या लहानपणीचं निवडणुकीच्या वेळेस चं वातावरण आठवत होत. कोणत्यातरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो.

अशीच एक फँटसी..(४)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 12/05/2014 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) अशीच एक फँटसी..(३) रविवारी सकाळी तो अन उर्मी श्री श्री गुरुदेवांच्या प्रशस्त हॉलमध्ये बसून भक्तजनांची गर्दी कमी होण्याची वाट पहात होते. श्रीश्रींची एकांत भेट मिळण्यासाठी त्यांना दीड तास थांबावे लागले. अखेर एकदाची भेट मिळाली अन अर्णवने आपली नवीन समस्या सविस्तरपणे गुरुदेवांच्या कानावर घातली. त्याचे बोलणे संपेपर्यंत गुरुदेव शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. त्यानंतरही पाचेक मिनिटे त्यांनी डोळे उघडले नाहीत.

तुम बीन जाऊं कहां...

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 12/05/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम बीन जाऊं कहां" या गाण्याचा विषय निघाला कि रफी आणि किशोरचे चाहते तलवारी पाजळुन बसतात आणि मग खणखणाट सुरु होतो. राजेशखन्नाच्या जमान्यात चित्रपट पाहायला सुरुवात केलेली पिढी निर्विवादपणे या गाण्यात किशोरच वरचढ आहे असा निवाडा देते. मला या वादात पडायचं नाहीय. माझं रफीप्रेम मला रफीच वरचढ आहे असं म्हणायला लावणार. मात्र चित्रपटापुरतं बोलायचं झालं तर किशोरवर अन्याय झाला आहे असं नक्कीच वाटतं. चित्रपट पाहताना गाणं बेमालुमपणे सिच्युएशन मध्ये मिसळलं असेल तर त्याची लज्जत काही औरच असते.

लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

लेखक वेताळ यांनी सोमवार, 12/05/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती.