Skip to main content

मेथी उडीद वड्यांची भाजी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/03/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज रोज तेच तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात.

लाल कौलांचं गाव!

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 15/03/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
अशाच एका मोठ्या विकांताला बॅगपॅक भरुन गाडीत टाकले आणि लाँग ड्राइव्हवर जायचा विचार केला. रस्ता नेईल तिथे जायचे अशा विचाराने ए ३ ह्या ऑटोबानला (फ्रीवे) ला लागलो आणि एकदम लक्षात आलं आपल्याला रोथेनबुर्गला जाता येईल की.. आता तुम्ही म्हणाल हे कोणत गाव? तर फ्रांकफुर्ट पासून साधारण १८० किमीवर ताउबर नदीवर वसलेलं हे गाव म्हणजेच रोमँटिक रोडवरचा एक थांबा रोथेनबुर्ग! जेव्हा फ्रांकफुर्ट आणि बर्लिन जर्मनीच्या नकाशावरचे ठिपके होते तेव्हा रोथेनबुर्ग मात्र नावारुपाला आलेलं एक स्वतंत्र संस्थान होतं आणि आजही मध्ययुगातला इतिहास जपून ठेवलेलं टूरिस्टांसाठी पर्वणीच असलेलं एक महत्त्वाचं गाव आहे.

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 15/03/2015 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत 
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५

हे लोकांच्या हिताचे आहे का?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 15/03/2015 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
आर आर पाटलांच्या निधनाने रिक्त झालेली जागा ही त्यांच्या पत्नीला आंदण देण्यात आली आहे. आबा पाटलांबद्दल आदर म्हणून बाकी कुठल्याही मोठ्य पक्षाने ती जागा लढवायची नाही असे ठरवले आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे का? मागे गोपीनाथ मुंड्यांच्या निधनानंंतर हेच केले गेले. मयत नेत्याबद्दल आदर असणे योग्यच आहे. पण रिकामी झालेली लोकप्रतिनिधीची जागा भरणे हा त्या नेत्याबद्दल असणार्‍या आदराचा विषय नसून लोकांचे योग्य प्रतिनिधित्व करण्याचा असला पाहिजे. लोकशाहीत असे वंशपरंपरेने जवळच्या नातेवाईकाला मग त्याची कुवत असो वा नसो, वारसाहक्क असल्यासारखे देणे हे कितपत योग्य आहे?

घरी जाताना

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 14/03/2015 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे घरी जाताना तसे काही न्यायचे नसतेच...... तेव्हा आराम खुर्चीसाठी पार्ले पुडा, शिलाई मशीनसाठी बॉबीन, पडक्या दातांसाठी चिंचाबोरे, अन मांजरी साठी दूध, इतकेच किडूकमिडूक.... पण .... अलीकडे 'घरी' जातोच कुठे आपण?
काव्यरस

गाजरं

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 14/03/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
रोम्यांटिक लोक याला मधाचं बोट म्हणतात. बिचारी छोटी मुले अन बालबुद्धीचे याला चोकलेट म्हणतात. आमच्यासारखी ओबडधोबड माणसं याला गाजरं म्हणतात. अशी गाजरं आपल्या अगलबगलेत, समोर, दूर, डोक्यावर लटकवत ठेवणारे चिक्कारजण असतात. हि गाजरं सर्व प्रकारची, सर्व आकाराची, सर्व प्रतीची असतात. हि गाजरं कधीही दिसत नाहीत. हाती लागणं तर दूरच! या गाजरांच्या मागे धावायला लावणारे तर कोपऱ्याकोपऱ्यात दबा धरून बसलेले असतात! या गाजरांची किमत आपण ठरवत नाही, पण मोजत राहतो. ...... काय काय देऊन? .....

आयटी क्षेत्राला लाभलेले अनावश्यक ग्लॅमर

लेखक उडन खटोला यांनी शनिवार, 14/03/2015 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच कोल्हापुरच्या टाँंमेटो एफएम या वाहिनीवरील एका जाहिरातपर कार्यक्रमात जयन्त पाटिल नामक एका शिक्षणसंस्था चालकाने सांगितले की गेल्यावर्षी इन्जिनियन्ग च्या ४४००० जागा महाराष्ट्रात रिकाम्या राहिल्या . याचा अर्थ काय? नवीन संयुक्त प्रवेशपरीक्षा अवघड आहे ,हे एक कारण, परन्तु तसेच आयटी व्यतिरिक्त इतर ट्रेड साठी विद्यार्थी उत्सुक नाहीत का? तसे असेल तर कठीण परिस्थिती आहे.

मोबाईल आणि आपण

लेखक Gayatri Muley यांनी शनिवार, 14/03/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
" ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती, सकाळीच तिने मुलांची परीक्षा घेतली होती, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या. उत्तर पत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले. तिचा नवरा तिथेच पडून मोबाइल बघत होता. त्याने रडण्याच कारण विचारल. ती म्हणाली सकाळी मी मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा या विषयावर लिहिण्यास सांगितले होते.

अवताराची गोष्ट....

लेखक जेपी यांनी शनिवार, 14/03/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
पिढीजात चालत आलेली गावची देशमुखी सांभाळणारा संपतराव तसा भला माणुस..सगळ्या गावचा कारभार पहात होता.. त्याच्या बद्दल कुणी वाईट-वक्कट बोलायच नाही..संपतराव सगळ्याच्या मदतीला धावायचा. तरी त्याला स्वतःला पोर नसल्याच दुखः होत.लग्नाला पाच वर्ष होऊन गेलती..सगळे देव,तिर्थ्,डॉक्टर पालथे घालुन झाले.. देशमुखाला आपला वारसा कोण चालवणार याची काळजी लागुन राहीली.. देवान बहुतेक त्याच आईकल..उशीरा का होईना घरात पाळणा हलला..देशमुखाला आभाळ ठेंगण झाल.. योगायोगान त्या वेळेस गावात भागवत सप्ताह चालु होता..देशमुखाने..भागवतकार पुराणीक बुवांना घरी बोलवल.. बुवा आले..देशमुखाने आदरभावाने त्यांचा पाहुणचार केला..पोराला त्यांच्

आमचेही कांदेपोहे – कि दारू चकणा ? एक सत्य अनुभव अंतिम भाग ३ – सुखांत ...

लेखक हेमन्त वाघे यांनी शनिवार, 14/03/2015 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दोन्ही भाग इकडे वाचा. भाग १ http://www.misalpav.com/node/30677 भाग २ http://www.misalpav.com/node/30702 “ वोडका???” .............” रम ???!!!” ............. “दारु ???????/!!” ती भयानक किंचाळली ! काही सेकंद सगळे सुन्न न्न न्न न्न ......................... ( हा स्पेशल इफेक्ट ......) मग तो कॅप्टन मराठीत म्हणाला “ mam ते cocktail आहे ना त्यात आम्ही गेस्ट च्या पसंतीचे ड्रिंक देतो .म्हणून तुमचा choice विचारला. “ तो विलक्षण शांत पणे म्हणाला. मला त्याचे कौतुक वाटले. “ ड्रिंक .....