[शतशब्दकथा स्पर्धा] मातृत्व
अनाथ आश्रमात लहान मुलांची किलबिल होती. मानसी व मानस दोन्ही मोठ्या अधीरतेने त्या मुलांना पाहत होती...
कारण आज खूप प्रतीक्षेनंतर त्यांना एक मुलगी दत्तक मिळणार होती.....
तेवढ्यात त्यांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
तिला घरी आणले. मोठ्या जोरात तिचे बारसे झाले. "मृणाल" नाव ठेवले.
मृणालला येऊन तीन महिने झाले. मानसी व मानसला मृणालचा लळा लागला. घर गोकूळ झाले.
लग्नाला बारा वर्षे होवूनही घरात पाळणा हालला नव्हता, म्हणून तिचे कोड कौतुक होत होते. तिला हवे ते मिळत होते.
अचानक एक दिवस मानसी चक्कर येऊन पडली. तिच्या पोटात दुखू लागले.
मिसळपाव
रात्रीचे दहा वाजत आले होते.अनघा अरविंद्च्या खांद्यावर डोके ठेऊन रडत होती.अरविंद तिला समजावुन सांगत होता "रडु नकोस पोरी.तुझ्या सासरी तु सुखी राहा.सासरच्या लोकांचं मन सांभाळ."आज अरविंद्च्या लाडक्या छ्कुलीचं लग्न होतं.ती सासरी जात होती आणि अरविंद तिला सगळं समजावुन सांगत होता.पण अनघाच्या डोळ्यांतलं पाणी काही थांबत नव्हतं.अखेर ती अलिशान ऑडी कार मध्ये ब