Skip to main content

जीवनाची प्रभावी दशसूत्री !

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 18/08/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!! म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो. खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल. अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/08/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

नामाची महिमा न्यारी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/08/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाम संकीर्तन साधन पैं सोपे जळतील पापें जन्मांतरीची. (संत. तुकोबाराय) शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते.

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 17/08/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात. साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर. कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे.

"अव दातारम"

लेखक रातराणी यांनी सोमवार, 17/08/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
.. ॐ नमस्ते गणपतये... कानावर नेहमीचे सूर आले आणि नकळत ती त्याच्या अस्तीत्वाच्या तिच्यात असलेल्या खुणा शोधू लागली. रोजचा नियम तिचा. काही झालं तरी अथर्वशीर्ष ऐकल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. अगदीच नाही जमलं तर गाडीत एक सीडी कायम असायची. येणाऱ्या दिवसाला सामोरं जायच बळ यायच मग. एक छोटूसा गणपतीही होता. एरवी नाही व्हायचं तिला पण गणेश उत्सवाचे दहा दिवस रोज एक लालचुटुक जास्वंदाच फूल त्या छोटूशा गणपतीमागे विसावायच. वर्षभर हिच्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेला तो बाप्पा मग आनंदाने फुलांच्या पाकळ्यात गुरफुटून बसायचा. कारसीटमधे बसलेल्या बाळासारखा.

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

लेखक मारवा यांनी सोमवार, 17/08/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो.

कुठेतरी काहीतरी चुकतय

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/08/2015 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी मराठी विकिपीडियावरील एका चर्चा पानावर एकाचर्चेस खालील प्रमाणे प्रतिसाद अंश वाचण्यात आला तो असा: "अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुंबईतील आर.एम. भट शाळा. या शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या अनेक (बहुधा तमाम) विद्यार्थ्यांना आणि त्या शाळेच्या शिक्षकांनाही शाळेचे पूर्ण नाव सांगता आले नाही. कुणी शोधू शकत असेल, तर ते नाव या यादीत घालता येईल. डी.वाय.पाटील नावाच्या शिक्षणसंस्थांतील बहुसंख्य (कदाचित कोणत्याही) विद्यार्थ्याला आपल्या संस्थेचे पूर्ण नाव सांगता येण्याची शक्यता कमीच आहे. पुण्यातील एस.पी.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

लेखक मार्गी यांनी सोमवार, 17/08/2015 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापुरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद. निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़ १. ढगफुटी तर केदारनाथला झाली, मग पिथौरागढला जाऊन काय करशील? २. आता तर सर्व लोकांना वाचवलं‌ गेलं आहे, रिलिफ काम संपलं आहे, आता तिथे जाऊन काय करशील? ३.

उडत्या तबकड्या आणि कर्णमय

लेखक दिनु गवळी यांनी सोमवार, 17/08/2015 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - (उडत्या तबकड्या - काल्पनिक कथा) मुंबईला गेलेला करण अजून आला नाही, म्हणून त्याच्या घरचे सर्व जण काळजी करत अंगणात बसले होते. तेवढ्यात करणच्या येण्याची चाहूल लागली. सर्व जण उठून उभे राहिले. करण आल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. त्याचे बाबा सदानंद त्याला म्हणाले, "एवढा उशीर का बरं झाला?" तेव्हा करण म्हणाला, "बाबा, आमची बस वाटेत पंक्चर झाली होती, म्हणून यायला उशीर झाला." मग सर्व जण घरात आले. जेवण वगैरे आटोपून सर्व गप्पा मारीत बसले. तसे पाहता करणच्या घरात त्याचे आजोबा, बाबा, आई आणि एक लहान भाऊ दिनू.

चाळीतील आठवणी भाग ३

लेखक भिंगरी यांनी रविवार, 16/08/2015 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी भाग १, रविवारची एक शांत सकाळ, सकाळची सातची वेळ, आमच्या कॅम्पमध्ये (आमच्या वसाहतीला कॅम्प' म्हटले जायचे.) कॅम्पाच्या एका टोकाकडून 'कचकच' असा आवाज ऐकायला आल्याबरोबर बाबांनी माझ्या धाकट्या भावाला झोपेतून उठवले. डोळे चोळत भाऊ उठून बसला. दूरवरचा 'कचकच' आवाज त्याच्याही कानावर पडला.आज आपल्या समोर काय वाढून ठेवले हे कळायला त्याला वेळ लागला नाही. नेहमीचीच सवय झाली होती, परंतु नेहमी तो त्या आवाजाला घाबरायचा.