Skip to main content

अन्नदाता सुखी भव भाग ४ - वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 30/09/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 आपण पाहिलं की नॉर्मन देव वगैरेनी शेतातल्या पिकांनांच जास्त तगडं बनवलं आणि त्यामुळे शेतकऱ्याला साधारणतः तेव्हढ्याच जमिनीत, तेव्हढ्याच पाण्यांत आणि तेव्हढ्याच प्रयत्नांत (पण जास्तीचे खत वापरायला लागून) अनेक पटीने जास्त धान्य मिळू लागले.

कुमाऊं – कौसानी-रानीखेत

लेखक के.के. यांनी बुधवार, 30/09/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
=============================== भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ =============================== कुमाऊं – कौसानी-रानीखेत मुन्स्यारीचे दोन दिवस मस्तच गेले. इथुन पुढे आम्ही कौसानीला जाणार होतो.

कुल्यार जांय...

लेखक माधुरी विनायक यांनी बुधवार, 30/09/2015 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव कोकणात. तसं गोव्यापासूनही जवळ. म्हणजे आमच्या घरापासून साधारण अर्धा तास चालत जायच्या अंतरावर तेरेखोलची खाडी आणि तिच्या पल्याड गोवा. सहज पोहत जाण्याजोगं अंतर. मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो की बाबा पेडण्याच्या बाजाराला चालत जायचे. आमचे वाडीतले इतर कार्यक्रम ठरलेले असायचे, त्यामुळे त्यांच्यासोबत बाजारात जायचं फार अप्रुप नव्हतं. पण बाजारातून आणलेल्या कांदा भज्यांचं आकर्षण होतं. त्याचबरोबर मोठ्या बांगड्यांसारख्या गोल आकाराचे पाव मिळायचे. बांगड्या म्हणजे काकणं, म्हणून पावाच्या त्या प्रकाराचं नाव 'काकना'.

एक होती मुंबई.. ("Mumbai Fables")

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 30/09/2015 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली. मुंबईची सुरुवात ही अशी झाली. अमेरिकावासी लेखक ज्ञानप्रकाश यांनी लिहिलेले "Mumbai Fables" हे पुस्तक मायानगरी मुंबईच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा वेध घेते. इतिहासही किती रोचक, रोमहर्षक आणि वाचनीय असू शकतो याचा धडा म्हणजे हे पुस्तक.

करू तो क्या करू ?

लेखक सुजल यांनी बुधवार, 30/09/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या ट्रेन मध्ये लेडीज डब्यात दुनियाभरच्या लेडीज ना आवश्यक अशा गोष्टी विकायला येतात. अगदी पायाच्या नखांपासून डोक्याला लावायच्या क्लिप्स पर्यत. मी सतत नेलपेंट्स / कानातले/अंगठ्या / रुमाल्स / केसांनच्या क्लिप्स अशा गोष्टी नेहमीच लेडीज डब्यातूंनच खरेदी केल्या आहेत . त्यात विशेष अस काही नाही. तर झाल काय एकदा मी मोठ्या कानातल्या रिंगा अशाच खरेदी केल्या . त्या रिंगा बर्याच म्हणजे अगदी बर्याच मोठ्या होत्या आणि तीन चतुर्थावश्य होत्या म्हणजे पूर्ण गोलाकृती नव्हे. घेतल्या घेतल्या आणि लगेच दुसर्या दिवशी ऑफिस ला जाताना घातल्या पण . काय ती हौस ताबडतोब वापरण्याची.

अनुभूती........................मच्छिंद्रगडावरची.

लेखक नूतन सावंत यांनी बुधवार, 30/09/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांपूर्वी नणंद म्हणाली,”हल्ली न् बऱ्याच वेळा मी माच्छिन्द्रगडावर जाऊन आले. खूप छान वाटतं तिथे.” “म्हणजेकुठे ग?” या माझ्या पृच्छेवर तिने सविस्तर उत्तर दिले. “अहमदनरच्या पुढे आष्टी तालुक्यात मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तिथे. अग, ठाण्यात घर घेतलं तेव्हा साबांनी दिराच्या मित्राशी बोलायला सांगितलं होतं, तो नवनाथ उपासक आहे. त्यावेळी मी खूप कठीण काळातून जात होते.त्याने मला नवनाथ कथासार वाचायला सांगितलं होतं. तो वास्तूशी संबधितही जाणकार आहे. त्याच्याबरोबर तो काही लोकांना तिथे घेऊन जातो. तशी मी आणि माझ्या काही मैत्रिणी त्या लोकांबरोबर जात असू.

मटणाचं कालवण! (शतशब्द्कथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 30/09/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फाट्यावरच्या ट्रकमधून गर्दी सांडून ओघळ फुटल्यासारखी गाव आणि वस्त्यांकड निघालेली. कलंडलेल्या उन्हातनं तिघी वस्तीकडं निघाल्या. गर्दीत मिसळू न देण्यासाठी सासूने त्या दोघींचे हात धरलेले! भयानक दुष्काळ पडलेला! दुष्काळी कामावरूनच तिघी परतत होत्या. स्वयंपाकासाठी काय करायचं हा नेहमीचा प्रश्नही सोबत चालत होता. पण कुणीच काही बोलत नव्हत. मुक्याच जणू! नेहमीच्या वळणावर तिघी थांबल्या. थोरली सून रस्ता उतरली, ढासळलेल्या पवळंवरून पलिकडं गेली. कंबरेच्या विळ्याने 'विचका' स्वयंपाकासाठी काढू लागली.

गोष्ट छोटी डोंगरा एवढी.....( वर्गणीचा हिशोब )

लेखक राजू यांनी बुधवार, 30/09/2015 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राच्या ऑफ़िसमध्ये एका मंडळाचे काही कार्यकर्ते गणेशोत्सवात सी सी टि व्ही संदर्भात चर्चा करण्यास आले होते. पण अजून फ़्लेक्स स्टार अध्यक्ष आले नव्हते म्हणून ते गप्पा मारत बसले होते. कार्यकर्ता नं 1- आपण ह्या वर्षी काहितरी वेगळा देखावा करुया. कार्यकर्ता नं 2- आयला खरच आपण कायतर वेगळे केल पाह्यजे. साले ते वरच्या मंडळाचा तो अमर्या लय भाव खातो. का. 1- आं काय? अमर्या साला त्याचा काय संबंध? का. 2- तसं नाय ते काय करतय नगरसेवकाच्या हापीस वर पडीक असतय ना मग तिथ कामासाठी आलेले त्याला ओळखत्यात मग वर्गणीच्या येळेला सालं चांगल्या पावत्या फ़ाडतय. का. 1-अरे पण आपण देखाव्याचा विषय का.

कॅलेंडर गर्ल्स

लेखक सुजल यांनी मंगळवार, 29/09/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर गर्ल्स माझ्या मते मधुर भांडारकर ने दोनतीन वर्षांपूर्वीच डिक्लेयर केलाय. मी या या विषयावर चित्रपट काढणार आहे म्हणून . त्याच सगळ वेल प्लाण्ड व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट असतात हे सांगायला नकोच . अर्थात त्याच्या चित्रपटांचा प्लॉट ही ठरून गेलाय. रियल लाईफ वर आणि जास्त करून सेलिब्रिटी वर्ड मध्ये जे काय चाललेलं असत त्या वर्ड मधल्या भानगडी / त्या वर्ड मध्ये शिरण्या करता कराव्या लागणाऱ्या उचापत्या /त्या वर्ड मध्ये "औट ऑफ द वे" जाऊन कराव्या लागणाऱ्या तडजोडी . ग्लॅमर वर्ड मधला नाटकीपणा या सगळ्याच मिश्रण करून त्याचे सिनेमे असतात.

खरेच आपण डिजिटल झालो आहोत?

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/09/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
साधरणपणे १० वर्षापुर्वी पर्यंत आपल्यातील बहुतेक जण व काही ठिकाणी आतासुध्दा काही जण सार्वजनिक शौचालय वापरत आहेत. तेंव्हा त्या शौचालयात काही कलाकृती व गावातील,आळीतील भानगडी,वाद एकतर्फी प्रेमाची जाहिरात वाचायला मिळत असे. एवढेच नाही त्या बातम्या अपडेट करणारे व त्या चविने वाचणारे,पाहणारे आज बहुसंख्येने व्हाट्स अप वर व उरले सूरलेले ईतर सोशल नेटवर्कवर आजही आहेत. खरेच या महाभागांमुळे आपण किती डिजिटल झालो आहोत हे समजते आहे. शांताबाय ....शांताबाय ....या फॉरवर्ड होणाऱ्या गाण्याला व इतर अश्लील क्लिप्स,नॉन-वेज जोक्स आणि फालतू फॉरवर्ड जोक्सला वैतागलेला एक त्रस्त सोशल साईट्स वापरकर्ता..... ( विशेष सूचन