Skip to main content

ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

लेखक मार्मिक गोडसे यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को...

कप्पा मनातला

लेखक गणेश.१० यांनी शुक्रवार, 22/09/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे ही जिव्हाळ्याच्या माणसांसारखी पण अगदी चिकटून असणारी गोष्ट. त्यामुळेच की काय घरातल्या कपाटापेक्षा मनातल्या आठवणींच्या कपाटात कपड्यांनी थोडी जास्तच जागा व्यापलेली असते. त्यातला हा थोडासा अस्ताव्यस्त पण गंमतीचा कप्पा. माझ्या सर्वात जुन्या आठवणीतले कपडे मला स्पष्टपणे आठवतात.. (ओरिजिनली) हाफ शर्ट आणि हाफ पँट -- पूर्वाश्रमीच्या फुल पँटची आमच्या शेजारच्या टेलरच्या दुकानातून निघालेली दुसरी आवृत्ती. त्यानंतरची आठवण म्हणजे दिवाळसणाला गावी जमलेल्या सर्व भावंडांना एका रांगेत उभे करून घातलेले, टेलरने त्याच्या टेलिपॅथीने अंदाज घेऊन शिवलेले, नवीन कपडे. साम्यवादाचं अगदी छोटं घरगुती उदाहरण.

गहन हे मर्म दु:खाचे

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 22/09/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
गहन हे मर्म दु:खाचे उमजणे कठिण किती असते साचले युगांचे अवघे निमिषात अश्रुरूप घेते उफराटे गणित विषाचे समजणे कठिण किती असते मरण्यास पुरे इवलेसे जगण्यास कितीही कमी पडते शब्दांच्या निबिड अरण्यी बहरणे कठिण किती असते अमरत्व उमलण्या आधी का मरण विकटसे हसते
काव्यरस

अनवट किल्ले १९:वारणेचे वाघ, बहादुरवाडी( Bahadurwadi ) , विलासगड, मल्लिकार्जुन( Vilasgad, Mallikarjun )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 22/09/2017 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी, हिच सीमा मानुन मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले. याच वारणेच्या खोर्‍यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या वाघाच्या काळजाचा माणुस जन्मला. याच परिसरात एक प्राचीन गड विलासगड किंवा मल्लिकार्जुन व मराठाकालीन भुईकोट बहादुरवाडी वसलेले आहेत. या धाग्यात त्यांचीच माहिती घ्यायची आहे. बहादुरवाडी या भुईकोटासंदर्भात दोन कथा वाचायला मिळतात. आधी त्या पाहु आणि मग भुईकोटाची सैर करु पहिली कथा अशी आहे कि, सुमारे ३५० वर्षापुर्वी आदिलशाहीचा ४०००० सुवर्णहोनांचा खजिना विजापुरकडे चालला होता.

Cheesy Hashbrown अर्थात बटाट्याचे थालीपीठ

लेखक गम्मत-जम्मत यांनी गुरुवार, 21/09/2017 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे नाले साठी घोडा खरेदी... कुणी तरी घरी येणार म्हणून कोणत्या तरी सँडविच साठी घरी cheese इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स अशा आणलेलं होत, अर्थात सँडविच न बनवता बुर्जी पाव खाल्ल्याने हे सर्व फ्रिज मध्ये शोभिवंत होऊन पडलं. त्याचा सदुपयोग करण्या साठी हि पाकृ केली. (मी ऋजुता दिवेकर ची पंखी असल्याने ब्रेड, बिस्कीट घरी दुर्मिळ!! त्यामुळे ब्रेड का नाही आणला हा प्रश्न बाद!!

जगण्यासाठी पुरेसे

लेखक RDK यांनी गुरुवार, 21/09/2017 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको लोकांना दे सोडून नि, सोड त्यांच्या विचारांना ते काय विचार करतात, याशी तुझे कर्तव्य नाही तुझ्याबद्दल कितीही चुकीचे विचार असतील त्यांचे पण स्वतःला चांगले ओळखणारा, तुझ्याशिवाय दुसरा कोण लोकांच्या मनाचा ताबा घेण, अवघड निश्चितच असेल पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण, किती बर कठीण असेल वेळ ही दवा आहे , प्रत्येक दु:खासाठी प्रत्येकाच्या घड

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 21/09/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं । अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥

नभ उतरु आल तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन.