ज्ञानाचा सागर अथांग आहेच, आपण सर्व बाजूंनी इतर लोकांच्या बरोबर बांधले गेलो असल्यामुळे सुसाट धावू शकत नाही हे सुद्धा खरे आहे, पण त्यामुळे आपल्या मर्यादा फार फार तर थोड्याशा संकुचित होतात. ही बंधने नसली तरी आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक मर्यादा असतातच. आपण दिलेले उदाहरण घेतले तर रस्त्यावर कर्फ्यू असला आणि आपण पोलिसांच्या गाडीतून निघालो तरी तासाला हजार मैलांचा वेग घेऊ शकणार नाही. उभ्या आणि आडव्या रस्त्यांची एकंदर लांबी दहा कोटी मैल असेल तर आपल्या आयुष्यभरात त्या सर्व रस्त्यांवरून जाऊ शकणार नाही.
आपली मूलभूत क्षमता हीच मुख्य मर्यादा आहे असे मला वाटते. पण तिचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून न घेता इतरांना दोष देणे हा सोपा मार्ग आहे. ट्रॅफिक जॅमचे कारण दाखवून आपण घराबाहेर पडतच नाही ही सर्वात मोठी चूक आपण करतो.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
पण तिचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून न घेता इतरांना दोष देणे हा सोपा मार्ग आहे. ट्रॅफिक जॅमचे कारण दाखवून आपण घराबाहेर पडतच नाही ही सर्वात मोठी चूक आपण करतो.
घारे साहेबांशी सहमत आहे. मर्यादा असण्यापेक्षा त्या रुंदावता येतील का, याचा विचार व त्या दृष्टी ने प्रयत्न महत्त्वाचे. खरंतर मर्यादा उमजुन केलेले प्रयत्न हे एक उत्तम उदाहरणच होईल, जे वास्तवदर्शी असेल.
प्रतिक्रिया
ज्ञानाला मर्यादा कशामुळे पडतात?
पण तिचा