"मला तुझ्यावर भरवंसा आहे."
ह्या चार शब्दात एखाद्याच्या आयुष्यात बदलाव आणण्याची क्षमता आहे.
लेख नेहमीप्रमाणेच खास!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
खरोखर "मला तुझ्यावर भरवंसा आहे." या चार शब्दांच्या जादूचा अनुभव मी घेतलेला आहे.
माझ्या मॅट्रिकच्या परिक्षेच्या निकालाचा दिवस होता. मी सकाळपासूनच अस्वस्थ होतो. कारण
परीक्षेत मी काय दिवे लावले होते ते माझे मला पुरते ठाऊक होते. त्या काळी निकाल वर्तमान पत्रातून
छापून येत असें. मी घरा बाहेर पडायलाच तयार नव्हतो. तेंव्हा माझी आई मला हेंच म्हणाली होती,
"जा तू. पेपर घेऊन ये. तू नक्की पास झाला असशील. मला तुझ्यावर भरवंसा आहे.
आणि खरोखर मी पास झालो होतो. स्पेशल भूगोल या विषयांत, जो पेपर मला अवघड गेलेला होता,
मला केवळ ३६ मार्क होते. पण मी पास झालो होतो.
तुमच्या कडे अनुभवाचा साठा आहे. तसा तो सर्वांकडे लहान मोठ्या फरकाने असतो. पण त्या अनुभवाची घटना, त्यातील संवाद तुमच्या लक्षात राहिलेले दिसतात.ते शब्दात अचूक मांडता आणि एवढच नाही तर त्यातून तुम्ही घेतलला बोध आम्हा सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो.
प्रतिसाद किती, कसे याच्याशी तुम्ही जास्त संवेदनाशील नाही असे दिसते.
आम्ही वाचतो, आणि शिकतो ही आपल्या लिखाणातून.पण प्रत्येक वेळी प्रतिसाद देतोच असे नाही.
तरी लिहित रहा.
मीनल.
प्रतिक्रियेबद्दल आपल्या सर्वांचे आभार.
मीनल,
माझे लेख जास्त "पारदर्शक"असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया जास्त आकर्षित होत नसाव्या.प्रतिक्रियाच हवी असल्यास तसंच लेखन लिहिण्याची कुवत अंगात असावी लागते.ती माझ्यात नसावी.
एकदा प्रसिद्ध संगीततज्ञ श्रीनिवास खळे यांना हिंदी सिनेमात गाणी लिहिण्याचा आग्रह एका हिंदी प्रोडयुसरने केला.
"आप पहिले ट्युनें करो,बादमे हम आपको गानेके लब्झ -शब्द- देयेगे"
असं तो प्रोडयुसर खळ्यांना म्हणाला.
खळे म्हणाले,
"ट्युनें??" "ऐसा हमने कभी किया नही.
हम को माफ करना.जो लोग ऐसा कर सकते आहे उनकी तारिफ होना चाहिये"
नंतर खळे म्हणतात.
"अहो शब्दांनंतर सूर येतात.त्या शब्दांत सूरांचा आत्मा असतो. मग "टुयने" शब्दांच्या अगोदर कशी लिहायची?"
"प्रतिसाद मनी धरोनी,कुणी लेख लिहित नसावे"
ही माझी कविता (May 15,2009) माझ्या "कृष्ण उवाच" ह्या ब्लॉगवर जाऊन मुद्दाम वाचावीस.ब्लॉगच्या मार्जीनमधे search मधे "प्रतिसाद" लिहून सर्च करावेस.
प्रतिसादबद्दलच्या तुझ्या संदर्भामुळे असं लिहिण्याचा माझा प्रपंच एव्हडेच.तुझ्या सुचनेनुसार लेख लिहितच रहाणार.असाच लोभ असावा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
खरंच या शब्दांत खूप ताकद असते.
"एखाद्याला आपल्यावर भरवसा आहे" ही गोष्टच जगण्याला एखादे कार्य करण्याला बळ देणारी आहे.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
१०१% सहमत!
जादूचे शब्द
आवडला.....
अनुभव
सामंतकाका,
आभार
व्वा
व्वा!
नेहमीप्रमाणेच छान लेख!!