काही शंका!
नचिकेतने १८० च्या वेगानी गाडी चालवली यात दोष त्याचाच होता ना! त्यात देवाचा दोष काय होता? बळी मात्र इतर चौघांचे गेले. भारतीय रस्त्यावर १८० च्या वेगाने गाडी चालवणारा माणूस म्हणून मला त्याची कणव मुळीच आली नाही. उलट त्याच्या परिवाराबद्दल वाईट वाटले. त्यानी उगाच प्राण गमावला.
छोट्या जिवासाठी कदाचित हे शक्य आहे पण, नचिकेतचे काय? अजूनही पुराणमतवादी असणारा, दगडामध्ये देव शोधणारा, वासराला उपाशी ठेवून गणपतीच्या मूर्तीला दूध पाजणारा, आपल्या घरी पाळणा हालण्यासाठी कोंबड्या, बकऱ्याचे घर उद्ध्वस्त करणारा, समाजाच्या भल्यासाठी तयार झालेल्या 'धर्म' या संकल्पनेचा वापर समाजाच्या विघटनासाठी करणारा हा सनातन भारतीय समाज नचिकेतला नव्या रूपात स्विकारेल?? आणि समाजाने स्वीकारले तरी, बायको मुले तरी त्याला परत 'कदाचित' "कदाचित" वेगळ्या रूपामध्ये मिळतील पण, तीर्थरूपाचे काय
नचिकेताला समाजाने नवीन रुपात स्वीकारायचा प्रश्न येतोच कुठे. तसे असते तर त्याचे गॅरेज चाल्लेच नसते ना.
बाकी वासराला दूध पिऊ न देता ते माणसाने प्याले तरी चालते, कोंबड्याबकर्यांची घरे बळीसाठी उध्वस्त होऊन नाही चालणार पण जर माणसानी डायरेक्ट खायला उध्वस्त केली तर ती चालतात. हे कसे बरे?
ऊठसूट काही झाले की आपले श्रध्दाळू लोकाना झोडत रहायचे.
घरट्याच्या पहील्या २ कथा चांगल्या वाटल्या पण ही कथा मात्र निष्कर्शामुळे नाही पटली.
पुण्याचे पेशवे
Since 1984
अंगावर शहारा आला अपघाताचे वर्णन वाचून..तुनळीवर अपघात बघतोय असे वाटले..
काही शंका..
हा प्रसंग भारतात घडला काय..जर असे असेल तर १८० च्या वेगाने कोठल्या रस्त्यावर नचिकेत गाडी चालवू शकत होता? द्रुतगतीमार्गावरसुद्धा एवढ्या वेगाने कोणी गाडी चालवू शकणार नाही.
खादाडमाऊ
हा प्रसंग भारतातच घडला आहे........
मी पात्रांची नावे बदलली आहे.....अगदी गाडिची कंपनी आणि वेग सुद्धा......वेगवेगळ्या
वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी वेगवेगळ्या वेगाचे आकडे आले होते...त्यात ८० ते १८० ह्या मधल्या जवळपास सर्वच वेगमर्यादा दिल्या गेल्या होत्या.
मी एवढा भयंकर अपघात म्हणुन १८० वेगमर्यादा लिहिली......चुक झाली असल्यास क्षमस्व!!!
प्रतिक्रिया
काही
का ते
बापरे
हा प्रसंग