छान जमलाय हा भागदेखिल.
पूर्वी रात्री दीड नंतरही चालू राहणार्या डान्सबारवर धाङी पडीत. पोलीस कस्टमरकडे ढुंकूनही पहात नसत. मॅनेजर आणि (वेळेत पळू न शकलेल्या) मुली यांची वरात निघे, ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये. तोवर हॉटेल मालकाला खबर मिळेच. तो येई. तिथेच "बोलणी" होत. मग थातूरमातूर चौकशी करून सगळ्यांना सोडून दिले जाई.
"क्रीमी" पोस्टींगसाठी उगाचच नाही लाखो रुपये मोजले जात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
देजा वू....हे हॉटेलं बंद करणं, रात्री डांसबार चालू असणं याच्यावर मिपावरच चर्चा झाल्याची आठवते. पण केव्हा ते आठवत नाही. त्या चर्चेचे प्रेषक तुम्हीच काय श्रावणराव?
काही ही म्हणा स्पीड राखलीये तुम्ही !!!
आणी हा भाग सुद्धा आवडेच !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
सगळे भाग एकत्र वाचून काढलेत. तरीही समजून अन् पचवून घ्यायला अर्धा तास लागला. :)
अलिप्तपणे सगळे बघायचे, त्यातले नेमके उचलायचे अन् पुढे चालायचे; हे पत्रकाराचे गुणही दिसतातच की. फक्त राजेंचीच ओळख नाही ही!! पण राजे आवडेच. ब्येश्टेश्ट!!
थोडक्यात, गटारात उतरलात तर पाय घाण होणारच. कुणाला गटार साफ करायचं असतं तर कुणाला त्यातलाच एक भाग बनायचं असतं/ बनावं लागतं.
मुमु़क्षु
छान. भ्रष्टाचाराच्या घटना गुपचूप घडतात. त्या बद्दल माहिती नसणार्यांना त्यातले गूढ-गतिमान तपशील आणि शब्द प्रयोग माहित नसतात. आपण वातावरण चांगले निर्माण करुन पण साध्या भाषेत लिहून कथा प्रवाही ठेवली आहे. सहाही भाग आवडले.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
आत्ताच सहाही भाग वाचले.. निशब्द झालेय मी.
हे सगळं असं चाललेलं असतं याची सुतराम कल्पना नाही एक तर. त्यातून राजेंसारखा माणूस. किती वेगळंच रसायन आहे! आणि तिसरी गोष्ट, तुमचं लिखाण... ! काय सुंदर लिहीता तुम्ही.. मुद्देसूद. काही फापटपसारा नाही. एकही शब्द उगीच लिहीलाय असे वाटत नाही, तसेच एकही शब्द कमी असता तर अपूर्ण वाटलं असतं इतकं मुद्देसूद !
सातव्या भागाची वाट पाहते..
http://bhagyashreee.blogspot.com/
सत्ता, सत्तेचा गैरवापर, एकमेकांवर कुरगोडी, मोठे मोठे व्यवहार, एकंदर "ग्रे एरीया" ह्याबद्दल सामान्य माणसाला एक सुप्त आकर्षण असते. ही लेखमाला आहे मस्तच!
अवांतर - आम्हाला नाव वाचल्यावर आमच्या राजेंची आठवण मात्र येते. पण त्यांना जाच झाला की पळुन जायची जुनी सवय. :-( अण्णांना सांगुन पाहीले पाहीजे त्यांना परत आणता येईल का?
प्रतिक्रिया
छान
देजा
वाचतोये !!
जबरदस्त!!
खरच अवघड आहे.
छान.
.
आत्ताच
सही
सरकार काय
:(
बापरे... काय लिहायचे श्रामो..