भारत विश्वनेता बनला आहे
२०१४ साली मा. मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यावेळी सर्व भारतीयांचे मन अगदी भरून आले. भारताची वाटचाल आता सुखसमृद्धीच्या वाटेने सुरू झालेली होती.
भारतात त्यापुर्वी अनेक समस्या होत्या. लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अतिरेकी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या याआधीच्या सरकारांकडून सोडविल्या गेल्या नव्हत्या. मोदीसरकारच्या आगमनापासून या अशा समस्या सुटण्यास प्रारंभ झाला.
मोदीजींनी मोदी सरकारच्या आदेशानुसार काम करणे सुरू केले. मोदीसरकार आल्यापासून निसर्गाने साथ देत योग्य वेळी पाऊस पाडणे, योग्य वेळी उन पाडणे, योग्य वेळी हिवाळा सुरू करणे असे सुरू झाले. याचा फायदा शेतकर्यांना झाला. उदंड पीके उत्पादन सुरू झाले. शेतकरी आबाद तर झालाच पण त्याच्या कष्टाला आता योग्य मोल अन खते मिळू लागली.
मोदीसरकारने मोदीजींच्या आदेशानुसार बेरोजगारांसाठी अनेक योजना आणल्या. गावोगावी मोदीजींचा डंका वाजू लागला. जेथे तेथे मोदीजींचीच छबी दृष्टीस पडू लागली. बेरोजगार नोकरीला लागताच मोदीजींना धन्यवाद देऊ लागले.
सरकारी अधिकारी आपल्याला मिळत असलेल्या पगारावर खुष दिसत आहेत. भ्रष्टाचाराचे कोणी नावही घेत नाहीत. सरकारी कारकून आलेल्या अभ्यागतांना चहा देऊन स्वागत करतात अशीही उदाहरणे पुढे येऊ लागली.
सर्व रस्ते सिमेंटचे होवू लागल्याने प्रवास वेगवान होवू लागला. नातेवाईक एकमेकांकडे दिवसाआड भेट देऊ लागले. बुलेट ट्रेन, स्टॅच्यू ऑफ युनीटी अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातही पैशांचा ओघ मोदींमुळे, मोदी सरकारमुळे वाढू लागला आहे.
आपल्या मोदीसरकारचे, भारताचे परदेशांशी दृढ संबंध राहण्यासाठी मोदीसरकारच्या वतीने आपले लाडके पंतप्रधान मोदीजी वरचेवर परदेशांचे दौरे आयोजीत करत असतात. परदेशातील अशा जाण्यामुळे, तेथील वातावरण हसून खेळून केल्याने आपल्या भारताची सर्व जगात प्रतिष्ठा वाढली आहे. भारत देशाकडे इतर देश विश्वनेता म्हणून बघत आहे.
मितरों मितरों करून बनवले आहेत मित्र
मोदीजी सर्व जगाचे हलवत आहेत सुत्र
विश्वनेता बनला आहे आता भारत
आशेचा दिवस सुरू झाला, सरली आता रात्र
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
या काय म्हणतात ..पहा :
धागा डिलीट करण्याची मागणी…
In reply to या काय म्हणतात ..पहा : by चौथा कोनाडा
धागा डिलीट करण्याची मागणी करत असाव्यात.