जुलै २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Banks) निवडणुका सुरू आहेत तर काही ठिकाणी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारणात या निवडणुका व बँकांच्या माध्यमातून चालणारे अर्थकारण महत्त्वाचे असते. विविध सहकारी संस्था, सेवा सोसायट्या, गट वगैरेंची प्रतिनिधी या बँकांवर संचालक असतात.
ठाण्याची निवडणूक एकनाथ शिंदे प्रणित गटाने जिंकली. अहिल्यानगर व नांदेडची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण राजकारणात रस असलेल्या मिपाकरांनी या निवडणुका follow करायला हरकत नाही.
सध्या Citizen Vigilante या जर्मनी व ब्रिटनने अप्रत्यक्षरीत्या बंदी घातलेल्या सिनेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सद्गुणविकृतीचा प्रादुर्भाव झालेल्या युरोपातील जनमानस या सिनेमात प्रतिबिंबित झालेले दिसते.

वाचने
529
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुन्हेगारी, बेरोजगारी आणि…
गुन्हेगारी, बेरोजगारी आणि सामाजिक अस्थिरता यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे खापर स्थलांतरितांवर फोडण्याची प्रवृत्ती या चित्रपटात ठळकपणे दिसून येते. समाजातील प्रत्येक समस्येचे कारण "बाहेरून आलेले लोक" असतात. चित्रपट चांगला आहे तरी एकतर्फी वाटतो . एकदा का इमिग्रंट वर संशय सुरु झाला कि मग सर्व इमिग्रण्टस सारखे दिसू लागतात . मग सर्व UP वाले भैये किंवा पाकिस्तानी मुसलमान होतात . मग सर्वच भारतीय घाणीत राहणारे होतात . (online comments bagha ). असल्या चित्रपटा मुळे सर्व नॉन-व्हाईट लोकांवर इम्पॅक्ट होतो.
केतन अग्रवाल हत्या प्रकरण ....
हत्येच्या पूर्वी काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो.
सिया गोयलने केतन अग्रवालकडे लग्नापूर्वीच एक कोटी रुपये ( व्यवसायासाठी वगैरे ) मागितले. ते त्याने दिले. ते पैसे तिने तिचा प्रियकर चेतन चौधरीस दिले. त्याने त्याचं काय केलं कोणास ठाऊक.
जसजसं लग्नं जवळ येऊ लागलं, तसतसा सियाचा धीर सुटू लागला. तिने केतनपाशी पैसे हरवल्याची ( व्यवसायात खोट आल्याची वगैरे ) बतावणी केली. मी एव्हढे पैसे घालवल्याने आता हे लग्न करणं बरोबर नाही, असा काहीसा सूर लावला. त्यावर केतन म्हणाला की आता लग्नं मोडणं अशक्य आहे. मला माझ्या कुटुंबियांना पैशांचा हिशोब द्यावा लागेल. जरी लग्नं मोडलं तरी माझे कुटुंबीय तुला कुठूनही शोधून काढतील.
त्यावर तिने केतनला संपवायचा निर्णय घेतला. तो अर्थात चेतनशी सल्लामसलत करूनंच. हत्येपश्चात ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वत्र माहिती आहेत.
मला जे वाटलं ते लिहलं आहे. या तर्कविलासास या क्षणी कोणताही पुरावा नाही. भविष्यांत मिळू शकतो.
-गा.पै.
एक कोटीमुळेच सगळी भानगड…
In reply to केतन अग्रवाल हत्या प्रकरण .... by गामा पैलवान
एक कोटीमुळेच सगळी भानगड झालेली दिसते. नाहीतर ठरवून होणाऱ्या विवाहात एखाद्या मुलाला सांगितलं की माझा तुला नकार आहे तर कोणी कशाला इतकं कोणाच्या मागे लागेल.
महाराष्ट्राची खरी ओळख ?
"महाराष्ट्राची खरी ओळख संविधानात नव्हे, तर ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृती या अखंड परंपरेत आहे." अश्या अर्थाचे विधान महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत्यांनी केले आहे.
वाट्सप युझरनेम
सुरू होणार आहे. आता एखादं आवडीचं नाव घेऊन ठेवायची सोय दिली आहे.
त्याचा उपयोग होईल असं वाटतंय. फोन नंबर न देता संपर्काचं साधन.
माझं नाव ....
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
माझं नाव घ्यायला गेलो तर आधीच आरक्षित झालं होतं. मग वडिलांचं आद्याक्षर मध्ये ठेवलं, तर नशिबाने मिळालं.
-गा.पै.
युजर नेम फीचर भारतात आणू नये…
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
युजर नेम फीचर भारतात आणू नये असं केंद्र सरकारने "मेटा"ला सांगितल्याची बातमी वाचली होती नुकतीच.
रिजर्व केलं.
In reply to युजर नेम फीचर भारतात आणू नये… by गवि
तिकडे प्रा.डॉ.ची फ्यासिलिटी नसल्याचा निषेध व्यक्त करुन इंग्रजी रिजर्व केले.
-दिलीप बिरुटे
भारत सरकारने व्हॉट्सऍप usernames program
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
तहकूब करायला सांगितला आहे मेटा कॉर्पोरेशनला
ह्याच्या अगोदर सरकारने मेटा कॉर्पोरेशनला भारतीय नंबर वरून WhatsApp वापरण्यासाठी SIM Binding सक्तीचे करण्यास सांगितले होते पण ते काही पुढे सरकले नाही/ सरकवले नाही.
वाट्सप युझरनेम दिलं तरी…
In reply to वाट्सप युझरनेम by कंजूस
वाट्सप युझरनेम दिलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने फोन नंबर दिसत राहावा असे मला वाटते.
खामेनीच्या अंत्यसंस्काराला…
खामेनीच्या अंत्यसंस्काराला विश्वघाबरू जाणार नाही.
रामलल्लाच्या नावावर आयोध्या…
रामलल्लाच्या नावावर आयोध्या आयोध्या राम राम करुन सत्ता आणून देशाला लुटले आता, राम लल्लाचे सोने चांदी लुटले, देणग्यात अपहार केला, दर्शन रांगेत पण पैसे केले, या सगळ्यां फोकलीच्यांना राम नरकात घालणार शंभर %
तरी, पण तिकडे ते आवाज देणार मित्रो... अरे आवरा रे यांना. तिकडे तेल दराची एवढी घसरण झाली पण भारतीय तेल कंपन्या दर अजिबात कमी करायला तयार नाही. नायराच्या पंपावर दर कमी आहेत.
गोबरयुगात जी वाताहात व्हायची ती होणार आहेच मतदानाची सॉरी कर्मभोगाची फळं चाखावीच लागतील यात वाद नाही.
-दिलीप बिरुटे
गोबरयुगात जी वाताहात व्हायची…
In reply to रामलल्लाच्या नावावर आयोध्या… by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बकरीवाद्यांची तडफड पाहून जाम मजा येतेय!
गोबरवाद्यांना तीही सोय नाही…
In reply to गोबरयुगात जी वाताहात व्हायची… by कांदा लिंबू
गोबरवाद्यांना तीही सोय नाही. तोंडात गोबरची गुळणी धरून गप्प बसावे लागते . बिच्चारे!
त्या कवितेसारखं...
In reply to गोबरवाद्यांना तीही सोय नाही… by आग्या१९९०
कांबळेंच्या कवितेसारखे हे नुसतेच कण्हतात. अं. ;)
-दिलीप बिरुटे
चपखल
In reply to त्या कवितेसारखं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चपखल
रागा आजोबा!
In reply to त्या कवितेसारखं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही कितीही कण्हत राहा, कांबळेसारखे नाही अजून कुणासारखे; तुमचे रागा* काही पंप्र होणार नाहीत बहुतेक!
*(खरंतर रागा आजोबा. साठी उलटली, नाही का? आमच्यात ज्येष्ठांना आदरपूर्वक बोलतात हं!)
व्यवस्थेतील लोकांवर टीका...
सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे', असे सांगतानाच 'भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा ठरू शकत नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना ठणकावले.
हे काय चालले आहे ? जनतेला सरकारचे गुलाम बनवायचे आहे का ? ते निषेध करू शकत नाहीत, आंदोलन करू शकत नाहीत. हे सर्व काय आहे? आता तर अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहेत. नागरिकांनी निषेध केला तर तुम्ही गुन्हे दाखल करता. हे काय आहे ? निषेध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने केवळ 'भाजप सरकार मुर्दाबाद', 'अमित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत ? अशा घोषणांसाठी हद्दपारीचे आदेश का ?' अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायमूर्ती जामदार यांनी केली.
पोलीस मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे सेवक नाहीत. जनतेचे सेवक आहेत' असे न्यायालयाने सुनावले. ( लोकसत्ता बातमी )
अशा काही निकालांनी व्यवस्थेविरुद्ध लिहिणा-या बोलणा-यांचा आत्मविश्वास वाढतो. बळ मिळतं.