आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे,
“मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं.
जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो.
जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे.
तुमच्यावर कोणीही, कितीही शिंतोडे फेकले,तरी, तुम्ही जर ती एक मजेदार घटना म्हणून त्याकडे पाहिलंत, तर तुम्हाला बेचैन झाल्यासारखं वाटणार नाही.
मजा करण्याचा प्रयत्न केल्यास जगातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट मजेदार दिसेल.
माझा विश्वास आहे की, आपलं जीवन आपण चांगल्या उद्देशाने जगण्यात सार्थकी लावत असतो.
मी पून्हा म्हणेन,आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही.”
मला असं वाटतं तुम्हाला ही तसंच वाटत असावं.
प्रतिक्रिया
सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही..
मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा
मनापासून लिहिला आहे आणि
प्रोएफसार आणि अमरेंद्र
लैच डेंजर चौकसदोनशेबारा भाऊ !
लिंक बद्दल धन्यवाद
मी अनेक गीता वाचल्या आहे. जर
तुम्ही हसतात आहात ? चला माझा
'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.
Pagination