चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)
In reply to थोडेसे मनातले.. by गणेशा
In reply to धन्यवाद! लिहीत रहा. तुमचे by श्रीगुरुजी
In reply to थोडेसे मनातले.. by गणेशा
In reply to मी मोदींना 2014 साली मत दिले by Vichar Manus
In reply to मी मोदींना 2014 साली मत दिले by Vichar Manus
आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.येडपट आहे का बे हि पोट्टी... आणि नासाला 'टोला' लगावल्याची बातमी देणार्या वृत्तपत्राबद्दल काय बोलावं... शहाण्यांनी असले उद्योग केल्यामुळेच आमच्यासारख्या सामान्य लोकांचा विश्वास उडतो या मंडळींवरुन :(
In reply to पोट्टी वेडी नाही by Rajesh188
In reply to पोट्टी वेडी नाही by Rajesh188
In reply to ग्रेटा मलालाच्या मार्गावर by श्रीगुरुजी
In reply to माझ्या मते फिजिक्स, by सुक्या
In reply to अर्थशात्र ह्या विषयाला नोबेल by साहना
In reply to माझ्या मते फिजिक्स, by सुक्या
आणी अर्थशात्र म्हणजे पुस्तकी ज्ञान. त्याचा खर्या जीवनात काहीही उपयोग नाही ...सहमत आहे. मी जे काही थोडेफार अर्थशास्त्र वाचले आहे त्यावरून लक्षात आले की अर्थशास्त्रात फार डोकेफोड करायची गरज नाही. फक्त अर्थव्यवस्थेत विनाकारण कोणत्याही कारणाने (चांगल्या हेतूनेही) सरकारने ढवळाढवळ करू नये आणि फक्त डिमांड-सप्लायच्या फोर्सेसना काम करू द्यावे. बाकी हार्वर्ड, केंब्रिज, बर्कले वगैरे मोठ्यामोठ्या विद्यापीठांमधील ढुढ्ढाचार्य प्रोफेसर बहुतेकवेळा सरकारने काय करावे हे सांगतात आणि नंतर गंडतात*. त्यापेक्षा सरकारने अर्थव्यवस्थेत नाक खूपसू नये असे म्हणणारे आमचे फ्रीडमन, हायेक, व्हॉन मिजस हे मोठे नावाजलेले आणि थॉमस सॉवेल, लॉरेन्स रीड, डॅन मिशेल, डॉनल्ड बॉडरॉक्स वगैरे त्यामानाने कमी नावाजलेले लोक बरेच चांगले. *: याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे २००१ चे नोबेल पारितोषिक विजेते जोसेफ स्टिगलिझ. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन त्यांनी ह्युगो चॅव्हेजच्या समाजवादी धोरणांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच त्याच ह्युगो चॅव्हेज आणि त्याचा उत्तराधिकारी मॅड्युरो यांच्या धोरणांमुळे एकेकाळचा श्रीमंत देश भुकेकंगाल झाला त्यानंतर हे स्टिगलिझ साहेब गायब झाले आहेत. तेव्हा जे काही थोडेफार अर्थशास्त्र मी वाचले आहे त्यावरून मी जवळपास या अनुमानापर्यंत आलो आहे की अर्थशास्त्र शिकायची गरज नसते. डिमांड-सप्लाय ही सिस्टीम इतकी रोबस्ट आहे की समस्या निर्माण झाल्यास त्याचे समाधान शोधायची कुवत त्यातच आहे. त्यासाठी मोठ्यामोठ्या ढुढ्ढाचार्य प्रोफेसर लोकांनी डोकेफोड करून जाडेजाडे ग्रंथ लिहायची अजिबात गरज नाही. असो.
In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार
In reply to तोडफोड कशाला? by मुक्त विहारि
In reply to तोडफोड करणे चूकच आहे by Rajesh188
In reply to मग हाच न्याय एयर ईंडिया किंवा by सुक्या
In reply to सरकारी कंपन्यांना खासगी उद्योगपती ना विकणे ह्याला माझा विरोध ना by Rajesh188
In reply to मग त्या कंपण्या कुणी by सुक्या
In reply to मग त्या कंपण्या कुणी by सुक्या
In reply to गलवान खोर्यातील चकमक by धर्मराजमुटके
In reply to गलवान खोर्यातील चकमक by धर्मराजमुटके
In reply to शेतकरी आंदोलनाला, by मुक्त विहारि
In reply to मूवी by Rajesh188
In reply to https://www.loksatta.com/pune by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी by Rajesh188
In reply to https://www.loksatta.com/pune by श्रीगुरुजी
In reply to चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य .... by मुक्त विहारि
In reply to पाटील आणि फडणवीस महाराष्ट्र by श्रीगुरुजी
In reply to मध्यंतरी, मी तुमच्या ह्या मताशी सहमत न्हवतो .... by मुक्त विहारि
भाजपला, महाराष्ट्रात, दुसरा पर्याय शोधावा लागेल. आयाराम गयाराम पण बरेच असल्याने, ही गोष्ट अजूनच कठीण झाली आहे.
खडसे, बावनकुळे, मुंडे असे जे पर्याय होते, ते सर्व पर्याय या जोडगोळीने राजकीयदृष्ट्या संपविले व त्यांना संपविण्यासाठी भाजपश्रेष्ठींंचीही संमती होती. गडकरी हा अजून एकच पर्याय शिल्लक आहे. भाजप २०१४ पर्यंत इतर मागासवर्गीय नेतृत्व असलेला पक्ष होता. परंतु पक्षातील सर्व इतर मागासवर्गीय नेत्यांना संपवून व अनेक आयारामांना (विशेषतः मराठा जातीचे) पक्षात आणून या जोडगोळीने हा मराठा जातीचा पक्ष बनविला आहे. परंतु मराठा जातीचे मतदार भाजपला फारशी मते देत नाहीत व आता इतर मागासवर्गीय मतदार दूर जात आहेत. त्यात भर म्हणून भाजपचे पारंपरिक समर्थक ब्राह्मण मतदार सुद्धा नाराज आहेत.
पवार यांच्या खेळीचे दुरगामी परिणाम, भाजपला महाराष्ट्रात भोगायला लागतील.
ही फडणवीस-पाटलांची खेळी आहे. पवार फक्त या खेळीचा फायदा घेत आहेत.
In reply to भाजपला, महाराष्ट्रात, दुसरा by श्रीगुरुजी
In reply to जर मराठ्यांनी भाजपा ला मतदान by रात्रीचे चांदणे
In reply to जे चाललंय ते चांगलं चाललंय. by शाम भागवत
In reply to जर मराठ्यांनी भाजपा ला मतदान by रात्रीचे चांदणे
संख्येच्या दृष्टीने मराठा लोकसंख्या ही महाराष्ट्र मध्ये जास्त आहे म्हणून त्याचेच प्रतिबिंब प्रत्येक पक्षाच्या आमदाराच्या संख्येत दिसणारं.
मराठा ३२% असल्याचा दावा आहे. इतर मागासवर्गीय अंदाजे ५२% असल्याचा दावा आहे (१९३१ च्या जनगणनेनुसार). ब्राह्मण ४%, मागासवर्गीय १५%, मुस्लिम १३-१४%, इतर धर्मीय ४-५%, आदिवासी/भटक्या जमाती वगैरे ८-१०% याची बेरीज केली तर १२५% हून अधिक होते. माझ्या मते मराठे १५-१६% असावे. परंतु अनेक शतके मराठे राज्यकर्ते असल्याने व मराठा अत्यंत आक्रमक जात असल्याने सरकार, विधीमंडळ अशा सर्व ठिकाणी मराठ्यांचे प्राबल्य आहे.
१६४ मधून भाजपा चे १०५ निवडून आलेत. गेल्या २०-३० वर्षात तरी दुसऱ्या कुठल्या पक्षाला हे जमले नसावे,
यामध्ये सेनेबरोबरील युती व आयाराम ही प्रमुख कारणे आहेत. १०५ मध्ये २ आमदार मित्रपक्षांचे व १७-१८ आमदार आयाराम आहेत.
१९९० मध्ये कॉंग्रेसचे एकट्याचे १४१ आमदार होते. तसेच २०१४ मध्ये भाजपचे एकट्याचे स्वबळावर १२२ आमदार होते. या तुलनेत २०१९ मध्ये युती असूनही फक्त १०५ आमदार येणे ही घसरण आहे.
बावनकुळे आणि मुंढे हे फडणवीस यांना पर्याय होऊ शकत नाहीत, मुंढे स्वतः निवडणूक हरल्या आहेत. हा फडणवीसांनी त्यांचे खच्चीकरण केले असावे त्याच बरोबर विनोद तावडे हे मराठा असून सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणजेच मराठयांना favour केले जातेय हे ही पटत नाही.
भाजपमध्ये सुरूवातीपासूनच इतर मागासवर्गीयांचे प्राबल्य होते. खडसे, बावनकुळे, मुंडे, फरांदे, डांगे असे अनेक इतर मागासवर्गीय नेते भाजपने पुढे आणले. २०१४ मध्ये अचानक फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे व खडसेंनी जाहीररित्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने फडणवीस सावध झाले. त्यांनी लगेच मुंडे व खडसे यांना काही प्रकरणात गुंतवून काटा काढण्याचा प्रयत्न केला व शेवटी २०१९ मध्ये काटा काढला. तावडेंचेही नाव माध्यमातून येत होते. त्यांचाही काटा काढला गेला. बावनकुळे विदर्भातील वरीष्ठ नेता असल्याने त्यांचाही काटा काढून फडणवीसांनी आपला मार्ग निष्कंटक केला. योगायोगाने हे सर्व इतर मागासवर्गीय नेते आहेत. यांच्या खच्चीकरणामुळे इतर मागासवर्गीय मतदारात चुकीचा संदेश गेलाय.
इतर मागासवर्गीय मतांवर झालेला परीणाम ओळखून फडणवीसांनी मराठा जातीला जवळ करण्याचा आटापिटा केला. राणे, विखे, मोहिते, भोसले, पद्मसिंह पाटील असे अनेक मराठा आयाराम भाजपत आणले. मेधा कुलकर्णी, विजय काळे या ब्राह्मण आमदारांची उमेदवारी कापून मराठ्यांना दिली. त्यांना विधानपरीषदेचे आश्वासन देऊनही पाळले नाही. पुणे पदवीधर मतदारसंघात सुद्धा मेधा कुलकर्णींना उमेदवारी न देता सांगलीच्या मराठा उमेदवाराला उमेदवारी दिली. बहुसंख्य मराठा सदस्य असलेला आयोग नेमून मराठे प्रगत असूनही ते अत्यंत मागास आहेत असा अहवाल तयार करून घेतला व तो दाखवून तब्बल १६% राखीव जागा मराठ्यांना दिल्या. हे करताना भाजपचे समर्थक असलेल्या अराखीव वर्गावर अन्याय केला. सारथी नावाची सरकारी संस्था स्थापन करून त्याद्वारे मराठ्यांवर सवलतींची खैरात केली. फडणवीसांनी इतर सर्व जातींकडे दुर्लक्ष करून, प्रसंगी त्यांच्यावर अन्याय करून फक्त मराठ्यांना फेवर केले. त्यांच्या दुर्दैवाने इतर जातींची मते कमी झालीच, पण मराठ्यांचीही फारशी मते भाजपला मिळाली नाहीत.
फडणवीस व पाटील नेतेपदी कायम राहिले तर पुढील स्थानिक व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार आहे.In reply to संख्येच्या दृष्टीने मराठा by श्रीगुरुजी
In reply to गुरूजींना जे कळतं ते मोदी व by शाम भागवत
In reply to मोदी व शहा सर्वज्ञ आहेत असे by श्रीगुरुजी
In reply to मी उत्तर मिळेपर्यंत म्हणजे by शाम भागवत
तसेच भाजपामधले फडणीस विरोधक जास्ती जास्ती आक्रमत होत जाणंच पुढे त्यांना फायदेशीर ठरणार आहे. कारण अस्तनीतले निखारे फारच त्रासदायक असतात.
खडसे बाहेर पडलेत (बाहेर पडण्याची त्यांची वेळ चुकली). तावडे, पंकजा मुंडे व बावनकुळे निष्प्रभ झालेत. गडकरी दिल्लीत रमलेत. मुनगंटीवार व महाजन फारसे प्रभावी नाहीत व ते फडणवीसविरोधात नाहीत. त्यामुळे आता भाजपत फडणवीस विरोधक शिल्लक नाहीत.
माझ्या मते फडणवीसांना पर्याय नाही. त्यांची विश्वासार्हता जनतेत वाढत चाललेली आहे. त्यामुळे त्यांना धोका नाही.
पूर्ण असहमत.
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत सेनेबरोबर युती असूनही भाजपला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या. २०१४ मध्ये विदर्भातील ६२ जागांपैकी ४४ जागा भाजपने स्वबळावर जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये युती असूनही फक्त २९ जागा जिंकल्या. बावनकुळे व गडकरींना डावलल्याचा हा परीणाम असू शकतो. आयाराम नसते तर भाजप फार तर ८५ पर्यंत गेला असता. मुंडे व खडसेंच्या सुनेचा पराभव झाल्याने इतर मागासवर्गीय जातीत आता नाराजी अजून वाढलीये व पुढील निवडणुकीत याचा जास्त परीणाम दिसेल. ब्राह्मणांमध्येही फडणवीसांविरूद्ध नाराजी वाढत आहे. अजित पवारांशी हातमिळवणी केल्याने अनेक कट्टर भाजपसमर्थक नाराज आहेत. यावर्षी ४ महापालिकांंची निवडणुक होण्याची शक्यता आहे. चारही ठिकाणी भाजप सत्तेत नाही. परंतु भाजपच्या जागा कमी होण्याची बरीच शक्यता आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये १० महापालिकांंची निवडणुक आहे. त्यात ८ ठिकाणी भाजप सत्ताधारी आहे. त्यातील बहुसंख्य महापालिका भाजप गमाविणार हे नक्की. नुकत्याच झालेल्या पदवीधर-शिक्षक विधानपरीषद आमदार निवडणुकीत भाजपला पुणे व नागपूर हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या फरकाने गमवावे लागले. फडणवीस-पाटील या जोडीच्या विरूद्ध असलेल्या वातावरणाचा हा परीणाम आहे.
स्वच्छ चारित्र्याचा, बहुमत नसतानाही, पवार साहेब समोर असतानाही, शिवसेनेचे रूसवे फुगवे चालू असतानाही, पाच वर्षे राज्य करत राहाणे ही कामगिरी मला सामान्य वाटत नाही.
केवळ अनैतिक तडजोडी करून आणि सहकाऱ्यांचा व मतदारांचा विश्वासघात करून त्यांनी सत्ता टिकवली. सेनेच्या सर्व मागण्या मान्य करून उद्धवना खुश ठेवणे, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई न करता बॅकअप सपोर्ट तयार ठेवणे, पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांंना चौकशीच्या जाळ्यात अडकवून त्यांना संपविणे, भ्रष्ट व जातीयवादी आयाराम पक्षात आणणे, मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून खुश ठेवणे या मार्गाने त्यांनी सत्ता टिकवली. परंतु हे करताना महाराष्ट्र हिताकडे दुर्लक्ष करणे, अराखीव वर्गावर अन्याय करणे, भाजपच्या मताधाराला सुरूंग लावणे या गोष्टींची त्यांनी पर्वा सुद्धा केली नाही. अशा मार्गाने सत्ता टिकविणे याला राजकीय कौशल्य म्हणत असतील. परंतु यातून फक्त फडणवीसांचाच फायदा झाला आहे.
In reply to तसेच भाजपामधले फडणीस विरोधक by श्रीगुरुजी
In reply to बापरे! by शाम भागवत
In reply to बरं. एका वर्षात समजेलच. by श्रीगुरुजी
😀
In reply to संख्येच्या दृष्टीने मराठा by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी, फडणवीसांनी तुम्ही by रात्रीचे चांदणे
श्रीगुरुजी, फडणवीसांनी तुम्ही म्हणता तस त्यांच्या मार्गतले भाजपा मधील अडथळे दूर केले असतील पण हे करताना त्यांनी जात पात बघितली नाही. त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही.
हे बरोबर आहे. भाजपच्या पूर्वीच्या अवतारावर, म्हणजे जनसंघावर, ब्राह्मणी छाप होती. त्यामुळे एका ठराविक मर्यादेपलिकडे जनसंघ वाढत नव्हता. भाजप या नव्या अवतारात जनसंघ परतल्यानंतर भाजपच्या वसंतराव भागवतांनी पक्षवाढीसाठी "माधव" (म्हणजे माळी, धनगर, वंजारी) हे सूत्र अंमलात आणून पक्षात इतर जातीतील नेते पुढे आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे (वंजारी), ना. स. फरांदे (माळी), अण्णा डांगे (धनगर), एकनाथ खडसे (लेवा पाटील), बावनकुळे (तेली), महादेव शिवणकर असे अनेक नेते पुढे आले व त्यातून पक्ष वाढत गेला. ९० च्या दशकात मंडल आयोगामुळे या जाती इतर मागासवर्गीय गटात गेल्या व भाजपत इतर मागासवर्गीयांचे प्राबल्य वाढले. प्रमोद महाजन हे एकच मुख्य ब्राह्मण नेता होते व त्यांना केंद्रीय राजकारणातच रस होता. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. परंतु ते नसल्याने अचानक फडणवीस मुख्यमंत्री झाले. नंतर पंकजा मुंडे व खडसे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने भविष्यात हे आपल्या जागी येऊ नयेत यासाठी त्यांच्यामागे प्रकरणे लावून देऊन नंतर पद्धतशीर काटा काढला. बावनकुळेंंना अडकविता न आल्याने त्यांना उमेदवारी नाकारून बाजूला केले. विनोद तावडेंनाही प्रतिस्पर्धी समजून काटा काढला. फडणवीसांनी जात न पाहता फक्त आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांंचा काटा काढला. परंतु हे सर्व नेते इतर मागासवर्गीय जातीतील असल्याने फडणवीस इतर मागासवर्गीय नेत्यांना संपवित आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.
>>> त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही. त्याच बरोबर मोहिते पाटील, विखे आशा लोकांना भाजपा मध्ये स्थान दिले हे केवळ आपापल्या प्रदेशातील प्रस्तापित आल्यामुळे ते मराठे असल्याचा ह्यात काहीही संबंध नसावा. >>>
भाजपत आणलेले बहुसंख्य आयाराम मराठा आहेत. २०१७ पासून फडणवीसांनी मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून शेवटी बनावट अहवाल बनवून १६ टक्के राखीव जागा दिल्या. ब्राह्मण आमदारांना उमेदवारी नाकारून मराठा उमेदवार दिले. त्यामुळे ते भाजपला मराठा पक्ष बनवित आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.
>>> एका बाजूला तुम्ही आस म्हणता की भाजपा चे 105 आले ते आयराम आणि सेने मुळे आणि हे बरोबरच आहे पण त्याच वेळी तुमचा सेने बरोबर युती साठीही विरोध आहे. सध्या तरी महाराष्ट्रा मध्ये आपल्या स्वतःच्या जीवावर सत्तेत येईल असा एकही पक्ष नाही. >>>
पक्षातील इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविले नसते, ब्राह्मणांवर अन्याय केला नसता, मराठ्यांचे लांगुलचालन केले नसते तर घायकुतीला येऊन तब्बल १२४ जागा सेनेला देऊन युती करण्याची गरज नव्हती.
>>> फडणवीसांनी ह्याच साठी दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपा मध्ये घेतले असेल, काहीही करून त्यांना 144 च्या जवळ जायचे होते व सेने वरचे अवलंबन कमी करायचे असणार. >>>
आपल्या कारस्थानी निर्णयांंमुळे इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मते कमी होणार हे फडणवीसांनी नक्कीच ओळखले होते. ही कमी भरून काढण्यासाठी त्यांनी आयाराम पक्षात आणून वारंवार मातोश्रीवर फेऱ्या मारून सेनेला युती करायला लावली.
>>> 2014 मध्ये भाजपा चे 288 मधून 43 च्या सासरी ने 123 आमदार निवडून आले तर 2019 ला 164 मधून 64 च्या सरासरी ने105 आले. याचाच अर्थ भाजपा कमी झाला नाही पण स्वतः एकटे लढून सत्तेत येता येत नाही म्हनून युती करावी लागली. >>>
इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मतांचा फटका बसणारच होता. सवलतींचा वर्षाव करूनही फारशी वाढीव मराठा मते मिळणार नव्हती. अशा परिस्थितीत भाजप एकटा लढला असता तर फार तर ५० आमदार निवडून आले असते. त्यामुळे अत्यंत कासावीस होऊन फडणवीसांनी युती केली व पोत्याने आयाराम भाजपत भरले. म्हणून तर १०५ आले. परंतु सेनेला युतीला राजी करण्यासाठी तब्बल १२४ जागा देणे, ४ वेळा जिंकलेला पालघर मतदारसंघ सेनेला देऊन टाकणे, सेनेच्या मागणीमुळे सोमय्यांना उमेदवारी नाकारणे अशा अटी मान्य केल्या. त्याबरोबरीने काही काळ मुख्यमंत्रीपद देण्याचे सुद्धा निदान मोघम आश्वासन सुद्धा दिले असावे. यातून भाजपचे नुकसानच झाले. आधीच्या चुकांचा परीणाम कमी करण्यासाठी अजून चुका केल्या.
>>> परंतु तरीही भाजपा ने फडणवीसांना बदलण्याची घाई करू नये. चंद्रकांत पाटलांना मात्र तात्काळ हटवले पाहिजे. >>>
एवढ्या चुका करूनही फडणवीस बदलले नाहीत. अजूनही चुका सुरूच आहेत. बरीच वाट पाहून शेवटी खडसे बाहेर पडले. पंकजा मुंडे, बावनकुळे, मेधा कुलकर्णी, तावडे यांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. अजूनही बाहेरील मराठा उमेदवार लादणे सुरू आहे. त्यामुळे फडणवीस व पाटील या दोघांनाही नेतेवदावरून काढणे आवश्यक आहे.
मी भाजपचा कायमच समर्थक आहे. परंतु २०१९ विधानसभा निवडणुकीत मतच दिले नाही कारण फडणवीसांचे काही विश्वासघातकी निर्णय अक्षम्य आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मत देणार. परंतु जोपर्यंत फडणवीस-पाटील नेते आहेत तोपर्यंत मी व माझे कुटुंबीय इतर कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.
In reply to शिपायाच्या तेरा जागांसाठी by खेडूत
In reply to शिपायाच्या तेरा जागांसाठी by खेडूत
In reply to देशच च द्यावा का कोणाला तरी चालवायला by Rajesh188
In reply to लै म्हंजे लैच विनोदी प्रतिसाद by सुबोध खरे
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
In reply to तुम्ही काय by Rajesh188
In reply to डोळे उघडे आहेत म्हणून तर ..... by मुक्त विहारि
In reply to लै म्हंजे लैच विनोदी प्रतिसाद by सुबोध खरे
In reply to खरे साहेब विनोदी नाही by Rajesh188
In reply to मुंबई मध्ये पुर आला तेव्हा by सुबोध खरे
In reply to मुंबई मध्ये पुर आला तेव्हा by सुबोध खरे
In reply to त्यांनी मागे by प्रसाद_१९८२
In reply to उच्च शिक्षित by Rajesh188
In reply to राजेश जी तुमचे बरोबर आहे. by Vichar Manus
In reply to हे नैसर्गिक आहे. by कानडाऊ योगेशु
In reply to काय नैसर्गिक आहे by Rajesh188
In reply to नैसर्गिक नियम लावले तर by Rajesh188
In reply to काय नैसर्गिक आहे by Rajesh188
समर्थन करायचे म्हणून कोणत्या ही चुकीच्या गोष्टी चे करायचे हे अयोग्य आहे.मुळात हे समर्थन नाही. हे वास्तव आहे आणि त्यानुसारच एखाद्याला मार्ग आखावा लागतो. जंगलातल्या कायद्याचे थोडे सभ्य रूप समाजव्यवस्थेत दिसते. इथे कोणी कोणाला जीवानीशी मारत नसले तरी एखाद्याचा प्रभाव कमी कसा होईल ह्याचे प्रयत्न होताना दिसतातच. उदा. सत्तेत राहण्याची काकांची उर्मी नैसर्गिक आहे नैतिक नाही.
In reply to देशच च द्यावा का कोणाला तरी चालवायला by Rajesh188
In reply to देशच च द्यावा का कोणाला तरी चालवायला by Rajesh188
In reply to शिपायाच्या तेरा जागांसाठी by खेडूत
In reply to सरकारी नोकरी म्हणजे by उपयोजक
In reply to काही भानगड नाही by Rajesh188
In reply to फक्त शिवजयंती साजरी करण्यास by आनन्दा
In reply to जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.....शिवसेनेचा मराठी बाणा... by मुक्त विहारि
In reply to ये दोस्ती हम नही छोडेंगे.. by बाप्पू
In reply to ह्या प्रवृत्तीवर कडक कारवाई हवी by Rajesh188
In reply to फक्त अधिकारीच कशाला? by मुक्त विहारि
In reply to WhatsApp भारतीय पर्याय by उपयोजक
In reply to क्लीनअप मार्शलकडून मारहाण by उपयोजक
In reply to स्वस्त पेट्रोलसाठी नेपाळ? by उपयोजक
In reply to गुंड गजा मारणेने मिरवणूकीसाठी वापरलेली लँड क्रूझर by उपयोजक
In reply to हे स्पष्टीकरण by उपयोजक
In reply to किसान आंदोलनाला स्टेज डान्सर चा देखील पाठींबा by धर्मराजमुटके
In reply to शिवसेना आणि बेगडी हिंदुत्व by मुक्त विहारि
In reply to सामना सारख्या टिनपाट पेपर चे by सुक्या
In reply to पूर्वीच्या निकम्म्या by नगरीनिरंजन
In reply to पूर्वीच्या निकम्म्या by नगरीनिरंजन
In reply to इंधन आयात करणे थांबवणे म्हणजे by पिनाक
In reply to जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला by श्रीगुरुजी
In reply to माझ्या मते शिवसेनेला एवढी by पिनाक
In reply to Pinak by Rajesh188
In reply to Admin साहेब, कृपया या id by पिनाक
In reply to माझ्या मते शिवसेनेला एवढी by पिनाक
In reply to शिवसेना पायाखालील चादर ओढेल by श्रीगुरुजी
In reply to जैतापूरचं इतकं नाव घेत आहात by नगरीनिरंजन
In reply to इंधन आयात करणे थांबवणे म्हणजे by पिनाक
In reply to आता पर्यंत च्या भरताच्या इतिहासातील by Rajesh188
In reply to आनंदाची बातमी by उपयोजक

In reply to संजय राठोड पोहरादेवीच्या यात्रेत अवतीर्ण by चंद्रसूर्यकुमार
In reply to पोहरादेवीत गर्दी केलेल्यांपैकी १९ जणांना कोरोनासंसर्ग by चंद्रसूर्यकुमार
In reply to काही दिवसांपूर्वी पंजाबमधील by श्रीगुरुजी
In reply to कृषी कायद्याबद्द्ल ...... by बबन ताम्बे
In reply to आपक्तालीन परीस्थिती मधे काय by मराठी_माणूस
In reply to कृषी कायद्याबद्द्ल ...... by बबन ताम्बे
मधेच अवकाळी पाऊस, गारपीट, पिकांवर रोग अशा नैसर्गिक आपत्ती आल्या, तर कंपन्या अंग काढून घेऊ शकतात.अशा प्रसंगी आपल्याकडे विकायला पीक नाही म्हणून शेतकर्यांनी अंग काढून घेतले तर समजू शकतो पण पीक विकत घेणार्या कंपन्या का अंग काढून घेतील?
In reply to कृषी कायद्याबद्द्ल ...... by बबन ताम्बे
In reply to 1. Companies futures ट्रेड by पिनाक
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे.... by बबन ताम्बे
शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवाहाच खरा कळीचा मुद्दा आहे. काही शहरी लोक हा प्रश्न नीट समजाउन न घेता , शेती आणि शहरी उद्द्योग यांची तुलना करतात आणि शेती विषयी असंवेदनशीलता व्यक्त करतात. मोठ्या उद्योगा मधे प्रत्येक विभागामधे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळी काम करत असतात. (उदा: एमबीए, सीए, ईंजीनीअर्स वगैरे) . तेच लोक बाहेरच्या जगाशी संपर्कात असतात आणि स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करुन उद्योगाला लाभ होईल असेच व्यवहार करतात. इथे एकाच शेतकर्याक्डुन उत्पादनापासुन विक्री पर्यंत सर्व काही व्यवस्थित पार पाडण्याची आपण कशी अपेक्षा करु शकतो
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे.... by बबन ताम्बे
पण काय हवं ते काँट्रयाक्ट मधे लिहायला शेतकरी तेव्ह्ढा जागरूक अथवा सुशिक्षित हवा.एक गोष्ट सांगा- समजा कंपन्यांनी काही शेतकर्यांना फसवले तर आताच्या काळात ही घटना लपून राहिल का? आठ दिवसात देशभर ती बातमी पोहोचेल आणि सगळ्यांना त्याविषयी कळेल. अशा परिस्थितीत इतर शेतकरी कंपन्यांबरोबर करार करायला पुढे येतील का? म्हणजे शेतकर्यांना न फसविण्यात कंपन्यांचे पण हितसंबंध आहेत असे वाटत नाही का? म्हणजे कंपन्यांना या उद्योगात राहायचे असेल तर शेतकर्यांना फसवू नये एवढे कळणार नाही? अर्थात कंपन्या धुतल्या तांदळाच्या आहेत असे अजिबात नाही पण डिमांड-सप्लाय मार्केटमध्ये हे स्वसुधारणा तंत्र असते त्यामुळे डांबरट लोकांना पण आपल्या स्वार्थासाठी का होईना मार्केटमध्ये सौजन्याने वागावे लागते याकडे पण दुर्लक्ष व्हायला नको इतकेच.
In reply to कंपन्या by चंद्रसूर्यकुमार
In reply to सध्याच्या शेतकर्याच्या by आग्या१९९०
In reply to मग तुम्ही आहात ना त्यासाठी. by आनन्दा
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे.... by बबन ताम्बे
In reply to कंपनी शेतकऱ्यांच्या फायद्याचा by पिनाक
In reply to तुमचं म्हणणं बरोबर आहे.... by बबन ताम्बे
In reply to > ण काय हवं ते काँट्रयाक्ट by साहना
In reply to > ण काय हवं ते काँट्रयाक्ट by साहना
In reply to एक दोन मोठ्या कंपन्या आर्थिक by आग्या१९९०
In reply to ही पण शक्यता आहे. by बबन ताम्बे
In reply to कृषी कायद्याबद्द्ल ...... by बबन ताम्बे
त्याच्या नुकसानभरपाईची कायद्यात तरतूद केली तर शेतकर्यासाठी हा कायदा वरदान ठरेलअसा क्लॉज टाकला तर भारीच ! पण एकंदरीत शेतकर्यांचेच नुकसान. कारण कंपन्या काही असा क्लॉज मान्य करणार नाहीत !
थोडेसे मनातले..