पाऊस
! पाऊस !
नभ आलं अंधारुन वाराही झाला बेभान टप टप टपोर्यांची झाली भुमीवर पखरण,
जाणुनी भेटी लागी आस भुमी कुशीत घेई त्यास मृदगंध तो दरवळे लागे एकमेका सहवास,
थेंब कुशीत हो निजला रोपें अंकुर हो धरला नवथर अवनीने शेला हिरवाईचा हो ल्याला,
वीज कडाडुन घेई तान रानी मोरपंखी कमान ढवळ्या पवळ्याच्या हो घुंगरांसंगे शेते नांगरु वेगानं,
आला पाऊस पाऊस वारा सांगे दाहो दिशांनी धान पेरा रे धान पेरा बळीराजाच्या हो कानी बळीराजाच्या हो कानी.
थेंब कुशीत हो निजला
सगाची कृपा. कंकाच्या
कविता आवडली...
मस्तच हो प्रमोदशेठ. खूप
सुरेख!
आवडली..
मस्त
बहिणाबाईंची आठवण झाली
हिरव्या चौकटीत पावसाची कविता!
वाह!