शेतकर्यांचा संप
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी
काय आहेत संपावर जाणार्या शेतकर्यांच्या प्रमुख मागण्या ?
१) शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.
२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.
३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.
४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
५) शेतकर्यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.
७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.
८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.
का केल्या शेतकर्यांनी ह्या मागण्या?
शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.
मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?
राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.
सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?
दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्यांन्ची कोंडी केली आहे.
शेतकर्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?
अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.
संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक टोक 'फडणीसंसाठी आटापिटा'
विचारलेल्या कळीच्या प्रश्नाचे
माझा कळीचा प्रश्न हा होय, आता
आय माय स्वारी
पहिलं वाक्य तुमचं टंकल्यावर
ह्या संपाच्या निमित्ताने
एकंदरीत महाराष्ट्रात लायक,
एकंदरीत महाराष्ट्रात लायक,
थोडा भुईवरचा भार कमी होईल
(No subject)
ही आकडेवारी
रस्त्यावर येऊन जाळपोळ करणारा
आता नेमकी सुगीच्या काळात
घेतला संप मागे.
संप मागे.
दुधाचे भाव आणि अल्पभूधारकांचे
आता इथे संपाच्या बाजूने
आपण न्यायाधीश असल्याच्या
कार्पोरेट शेतीला परवानगी द्यावी
चला संप मिटला तर
जाउद्याना
शेतकरी व समाज एक गुंतागुंत
सिंचनाचा प्रश्न इतका
सरकारने खरे तर इतर
आमच्या परीने खुलासा ..
अखेर संप मागे घेतला आहे
एक विचारायच होतं
माझे काही बालिश प्रश्न...
शेती आणि दूध विकणे हे
संप मिटला नाही.
शेती, ग्रामीण भाग,तसेच तेथील
बाकीच्यांचे सोडा हो निष्पक्ष
संप सुरुच आहे, चर्चा सुरुच
एक कळत नाही. जिथला शेतकरी
काय ठरलं मग संपाचं?
सगळे प्रतिसाद नाही वाचले.
मी शेतकरी नाही. मी कर भरतो.
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.याची आवश्यकता नव्हती.मी शेतकरी नाही. मी कर भरतो.
मी शेतकरी नाही. मी कर भरतो. मी फुकट्या नाही.याची आवश्यकता नव्हती.असे म्हणता ? ब्वारं !
ओके. शहरीद्वेषाचा आरोप
शंभर रूपयाने दूध
आज दूध ५३रू लिटरने घरात येतं
तुमच्या मते आडते व दलाल हाच
शेतकरी द्वेष नावाचा शब्दप्रयोग मात्र इथे दिसत नाही. का बरे ? प्रतिसाद वाचले तर तसंच दिसतेय.बरोबर आहे, इथे वादविवाद घालणार्यांचा रोख संपावर आणि शेतकर्यांच्या उरावर बसून राजकारण करणार्यांवर आहे, शेतकर्यांवर नाही. कारण पिझ्झा खात असले तरी त्यांची बुद्धी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधलेली नसते.किती शब्दच्छल ? किती शब्दच्छल
कसे असते.. हवेत आरोप केले आणि
माफ करा. चुकून तुम्हाला एकदम
खटासी खट साहेब
आपण शब्दश: वर्ड टू वर्ड
मित्रा खटासि खट
शेतकऱ्यांच्या संपाचा उद्रेक