नवप्रवर्तनाचा सोहळा
४ ते १० मार्च राष्ट्रपती भवनाच्या आवारात ’नवप्रवर्तन उत्सव’ साजरा झाला. २०१५पासून हा उपक्रम सुरू आहे आणि यंदाचे तिसरे वर्ष होते. मला मात्र याची अजिबात कल्पना नव्हती. मुघल गार्डन पहायला म्हणून गेलो आणि बाहेर पडताना हे दिसले तर आत घुसलो. सुखद धक्का बसला. सर्वसामान्य माणसांच्या कल्पकतेला व्यासपीठ दिले होते. एक वैद्यकीय इनोवेशन्सना दिलेला विभाग सोडला तर उर्वरित सगळे संशोधक तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य भारतीय होते. जवळपास सगळेच ग्रामीण भागातील रहिवासी. त्यांचे संशोधनसुद्धा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा स्वस्त उपकरणे, वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात यादृष्टीने केलेल्या संशोधनांनाच जागा मिळाली होती. यातल्या काही इनोवेशन्सची मला माहिती होती, पण बाकी सर्व नवे होते.
या सर्वसामान्य ग्रामीण भागातील संशोधकांना देशाच्या राजधानीत, राष्ट्रपती भवनात व्यासपीठ मिळणे, त्यांना ओळख, प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळणे हा या कार्यक्रमाचा हेतु अत्यंत स्त्युत्य वाटला. भारताला महागड्या, सोफ़िस्टेकेटेड संशोधनाखेरीज अशा साध्यासोप्या, काहीशा ’जुगाड’ पद्धतीत मोडणाऱ्या पण सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणाऱ्या संशोधनांचीसुद्धा गरज आहेच.
मी टिवी पाहत नाही, त्यामुळे एखाद्या न्यूज़ चॅनेलने या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली असेल तर याची कल्पना नाही, पण मला (मी वाचत असलेल्या) कुठल्याही वर्तमानपत्रात यासंदर्भात बातमी दिसली नाही. अशा उपक्रमांना प्रसिद्धी मिळायली हवी असे वाटते. सगळीकडे नकारात्त्मक बातम्यांच्या सुळसुळाट असताना सकारात्मक, जनोपयोगी काही घडत असेल तर ते जनतेपर्यंत पोचावे.
मोबाइल मरायला टेकल्याने जास्त फोटो घेता आले नसते. त्यामुळे मी माझ्या विशेष जिव्हाळ्याच्या क्षेत्रातले म्हणजे कृषी क्षेत्रातले काही फोटो घेऊ शकलो. केरळ, मणीपूर, हि.प्र., राजस्थान, मध्यप्रदेश,ओडिशा अशा भारताच्या निरनिराळ्या भागांतील शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळाले होते. त्यांच्या पत्त्यासह माहितीपत्रक लावलेले होते. सगळ्यांच्या वाणांचे सॅम्पल आणि बियाणेसुद्धा होती.(त्यांचे फोटो काढू शकलो नाही. मोबाइल मेला. ) काही शेतकरी स्वतः हजर होते.(शेवटचा दिवस असूनही.) या सुधारित वाण निर्मात्यांना मोन्सॅन्टोसारख्या अवाढव्य कंपन्यांप्रमाणे कोट्यावधी डॉलर्सचे पेटंट राइट्स कदाचित मिळणार नाहीत, पण पारंपरिक मास सिलेक्शन पद्धतीने विकसित केलेल्या आणि स्थानिक ऍग्रोक्लायमॅटकरिता अधिक उपयुक्त असलेल्या या वाणांचे महत्व त्याने कमी होत नाही.
निरंजन भटा. भटईचे(वांग्याचे) हे वाण. स्वतः हाताळून पाहिले होते, चांगलेच वजनी आहे.
एरवी मणीपूरची सर्व प्रसिद्धी चुकीच्या कारणांसाठी होत असताना त्या पिटुकल्या राज्यातील दोन शेतकऱ्यांना इथे प्रतिनिधीत्व मिळाले होते.
सदाबहार आंबा. आंबे आणि आंब्याची कलमे पण विक्रीला होती.
उष्णकटिबंधीय क्षेत्रातही फळधारणा होऊ शकेल अशा सफरचंदाच्या वाणाची कलमे विक्रीला होती.
मला अपघातानेच लागलेला हा 'शोध' मनस्वी आनंद देऊन गेला. पुढील वर्षी हा सोहळा चुकवणार नाही.
-स्वामी संकेतानंद
या सर्वसामान्य ग्रामीण भागातील संशोधकांना देशाच्या राजधानीत, राष्ट्रपती भवनात व्यासपीठ मिळणे, त्यांना ओळख, प्रसिद्धी आणि प्रोत्साहन मिळणे हा या कार्यक्रमाचा हेतु अत्यंत स्त्युत्य वाटला. भारताला महागड्या, सोफ़िस्टेकेटेड संशोधनाखेरीज अशा साध्यासोप्या, काहीशा ’जुगाड’ पद्धतीत मोडणाऱ्या पण सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करणाऱ्या संशोधनांचीसुद्धा गरज आहेच.
मी टिवी पाहत नाही, त्यामुळे एखाद्या न्यूज़ चॅनेलने या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली असेल तर याची कल्पना नाही, पण मला (मी वाचत असलेल्या) कुठल्याही वर्तमानपत्रात यासंदर्भात बातमी दिसली नाही. अशा उपक्रमांना प्रसिद्धी मिळायली हवी असे वाटते. सगळीकडे नकारात्त्मक बातम्यांच्या सुळसुळाट असताना सकारात्मक, जनोपयोगी काही घडत असेल तर ते जनतेपर्यंत पोचावे.
मोबाइल मरायला टेकल्याने जास्त फोटो घेता आले नसते. त्यामुळे मी माझ्या विशेष जिव्हाळ्याच्या क्षेत्रातले म्हणजे कृषी क्षेत्रातले काही फोटो घेऊ शकलो. केरळ, मणीपूर, हि.प्र., राजस्थान, मध्यप्रदेश,ओडिशा अशा भारताच्या निरनिराळ्या भागांतील शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व मिळाले होते. त्यांच्या पत्त्यासह माहितीपत्रक लावलेले होते. सगळ्यांच्या वाणांचे सॅम्पल आणि बियाणेसुद्धा होती.(त्यांचे फोटो काढू शकलो नाही. मोबाइल मेला. ) काही शेतकरी स्वतः हजर होते.(शेवटचा दिवस असूनही.) या सुधारित वाण निर्मात्यांना मोन्सॅन्टोसारख्या अवाढव्य कंपन्यांप्रमाणे कोट्यावधी डॉलर्सचे पेटंट राइट्स कदाचित मिळणार नाहीत, पण पारंपरिक मास सिलेक्शन पद्धतीने विकसित केलेल्या आणि स्थानिक ऍग्रोक्लायमॅटकरिता अधिक उपयुक्त असलेल्या या वाणांचे महत्व त्याने कमी होत नाही.
निरंजन भटा. भटईचे(वांग्याचे) हे वाण. स्वतः हाताळून पाहिले होते, चांगलेच वजनी आहे.
एरवी मणीपूरची सर्व प्रसिद्धी चुकीच्या कारणांसाठी होत असताना त्या पिटुकल्या राज्यातील दोन शेतकऱ्यांना इथे प्रतिनिधीत्व मिळाले होते.
सदाबहार आंबा. आंबे आणि आंब्याची कलमे पण विक्रीला होती.
उष्णकटिबंधीय क्षेत्रातही फळधारणा होऊ शकेल अशा सफरचंदाच्या वाणाची कलमे विक्रीला होती.
मला अपघातानेच लागलेला हा 'शोध' मनस्वी आनंद देऊन गेला. पुढील वर्षी हा सोहळा चुकवणार नाही.
-स्वामी संकेतानंद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
महत्वाची माहिती. टीआरपीच्या
महत्वाची माहिती. टीआरपीच्या
सहभाग होता. नगर जिल्ह्यातील
आभार इथे लिहिल्याबद्दल
थँक्स फॉर शेअरींग.
दरवर्षी पुसा दिल्ली येथून
फ़ारच छान वाटलं बातमी वाचून.
यंदा नाही पण २०१५ साली एक
छान बातमी