✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चंदबरदाई

ह
हृषीकेश पालोदकर यांनी
Fri, 10/21/2016 - 15:25  ·  लेख
लेख
चंदबरदाई हे नाव तुम्हाला माहिती आहे का ? ch स्वामीनिष्ठेचं आणि मैत्रीचं असं उदाहरण मानव इतिहासात फक्त छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांच्या व्यतिरिक्त कुठेच पाहायला नाही. उत्तर भारतात ही कथा खूप प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे खूप कमी लोकांना याची माहिती आहे. त्यासाठीच ही माहितीपर कथा आपल्यासाठी देत आहे. चंदबरदाई हा दिल्लीचे राजे पृथ्वीराज चव्हाण तिसरे यांचा बालमित्र आणि त्यांच्याच दरबारातील राजकवी व मुख्य सल्लागार होता. त्याने पृथ्वीराजावर “पृथ्वीराज रासो” हा हिंदी काव्यग्रंथ लिहिला जो नंतर त्याच्या मुलाने पूर्ण केला. तो गणित आणि ज्योतिषशास्त्रात पारंगत होताच पण वेश बदलून बेमालूमपणे हेरगिरी करण्यात देखील पटाईत होता. तुम्ही विविध हेरगिरीच्या आणि जेम्स बॉन्डच्या खूप कथा वाचल्या असतील पण चंदबरदाईची सर कशातच नाही. इ. स. ११४९ ते १२०० हा त्याचा जीवनकाळ. योगायोग असा कि याचा आणि पृथ्विराजांचा जन्म एकाच दिवशीचा. पृथ्वीराज हे धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण होते व ते शब्दभेदि बाण चालवीत. पृथ्वीराज चव्हाण हे राजा सोमेश्वरनंतर गादीवर बसण्याआधी डोळ्यांवर पट्टी बांधून चंदबरदाई ने सांगितलेल्या ठिकाणी अचूक बाण सोडत. कन्नोजचे राजा जयचंद हे दिल्ली राज्याचे शेजारी. दोघेही राजपूत आणि टोकाचे शत्रु. राजा जयचंद याची कन्या “संयुक्ता” व राजा पृथ्वीराज दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शत्रूच्या घरात मुलगी देणे जयचंदला शक्य नव्हते. त्याने संयुक्ताचे स्वयंवर आयोजित केले. त्यात चंदबरदाई हा राजपूत राजा व पृथ्वीराज चव्हाण त्याच्या सेवकाच्या रुपात या स्वयंवराला दाखल झाले. स्वयंवरादरम्यानच संयुक्ताला पृथ्विराजाने जयचंद समोरून पळवून नेले व नंतर लग्न केले. अपमानित जयचंदने पृथ्विराजांचा जुना शत्रू अफगाणिस्थानमधील मोहम्मद घौरीशी करार करून पृथ्विराजांचा पराभव केला. तसं पाहिलं तर याआधी या दोघांने एकटे लढून पृथ्वीराज्यांकडून पराभव पहिला होता पण हि अभद्र युती त्यांना पृथ्विराजास हरविण्यास कामी आली. पृथ्वीराज घौरीच्या हाती लागले. ह्याच घौरीला पृथ्विराजाने अभय दिले होते पण त्याने अफगाणिस्थान मधील “गझनी” येथे कैदेत ठेऊन पृथ्विराजाचे डोळे काढून घेतले. आता सुरु होते चंदबरदाईची कमाल. चंदबरदाईने खडतर प्रवास करून गझनी गाठले. तेथील बाजारात छोटे मोठे खेळ व जादू करून लोकांचे तो मनोरंजन करू लागला.नंतर त्याने जादुद्वारे सोन्याचे नाणे बनवून लोकांना दिले. यामुळे संपूर्ण गझनीमध्ये ही वार्ता वणव्याप्रमाणे पसरली आणि लवकरच राजा घौरीच्या कानापर्यंत पोहोचली. त्याने या अवलियाला त्वरित पकडून आणायचे फर्मान सोडले. अफगाण हा प्रदेश वेगवेगळ्या आदिवासी टोळ्यांचा. मुळचेच हे लोक अशिक्षित व अंधश्रद्धाळू. घौरी त्यांचाच राजा. तो तर कमालीचा अंधविश्वासू. चंदबरदाईने राजाला दरबारासमोर अनेक जादू म्हणजेच हातचलाख्या व गणिती आधार असलेले प्रयोग सादर केले.राजा व दरबार हे पाहून चकित झाले व ही व्यक्ती दैवी आहे यावर त्यांचा पक्का विश्वास बसला. त्यातच भारी गम्मत म्हणजे चंद बरदाईने मी सूर्य देखील झाकू शकतो असे घौरीला सांगून प्रयोगाची तिथी आणि वेळ पण सांगून टाकली. आधी सांगितल्याप्रमाणे चंदबरदाई हा जोतिषशास्त्रात पारंगत. जी तिथी आणि वेळ दिली ती होती सुर्याग्रहणाची. संपूर्ण प्रजेत कुतूहल पसरले.मग काय सर्व उपस्थितांसमोर व खूद्द राजा घौरी समोर चंदबरदाईने ध्यान मुद्रा धारण केली व हळूहळू चंद्राच्या सावलीने सूर्य झाकायला लागला. ओ....हो .....मग काय “ सुभानल्ला, सुभानल्ला !!!!!” म्हणत संपूर्ण राज्याने चंदबरदाईला डोक्यावर घेतले. राज्याच्या गळ्यातला तर ताईतच. घौरीने त्याला राज्यातील विषेश व्यक्तीचा दर्जा दिला ज्याला आजकाल आपण व्ही.आय.पी. म्हणतो ते. घौरीला वाटलं असा “खुदा का फरिश्ता” आपल्या सोबत असेल तर आपण कुठलीही लढाई सहज जिंकू. इतिहासातील पात्रांबद्दल असं बोलू नये पण घौरीला चंदबरदाईने आपल्या हुशारीच्या बळावर “मूर्ख” बनविले होते. आता विषेश दर्जा मिळाल्याने चंदबरदाई कैद्यांच्या कोठडी सोडल्यास संपूर्ण राज्यात कोठेही विना परवानगी फिरू शकत होता पण त्याचे काम कैद्खान्याशीच होते. त्याने युक्तीकरून कैद्यांच्या कोठडीजवळ प्रवेश मिळवलाच. त्याला घाई झाली होती राजा पृथ्विराजाची भेट घेण्याची. राजा जिवंत तरी आहे कि नाही याची पण खबर मिळत नव्हती. कैदखान्यात चंदबरदाई अल्लाचे भजन गुणगुणत जात असताना पृथ्वीराजाने त्याचा आवाज ओळखला व त्याने आवाज दिला. चंदबरदाई राजाला पाहून हळहळला. खूप हाल आणि वेदनेत पृथ्वीराज होते. जिवंतपणी डोळे काढणे हा क्रूरपणा घौरीने केला होता आणि तेही त्याचे ज्याने आपल्याला युद्धात पराभानंतर प्राणाचे अभय दिले होते.याहूनही क्रोर्य औरंग्याने छत्रपती संभाजी सोबत केले होते याची आठवण आपल्याला अजून अस्वस्थ करते. तर राजाचे हे हाल पाहून चंदबरदाई भयंकर भडकला पण पर्याय नव्हता. पृथ्विराजाच्या शौर्याची परिसीमा तेंव्हा झाली ज्यावेळी त्याने चंदबरदाईकडे सुटकेची नव्हे तर अपमानाचा बदला घेण्याची इच्छा यक्त केली, परत राजा होण्याची नव्हे तर ज्याने राज्याचा अपमान केला त्याला यमसदनी (?) धाडायचा निश्चय केला. काही दिवसांनी चंदबरदाईने घौरीला धनुर्विद्येत श्रेष्ठ सैनिक कोण आहे याची परीक्षा घेण्याची विनंती केली व घौरीने ती मान्य केली. राज्यभरातून अनेक धनुर्धर येऊन आपली विद्या दाखवून गेले. त्यात घौरीचा एक सैनिक अत्यंत तरबेज होता, त्याने त्याच्या विद्येने राजा घौरीसह सर्वांचे मन जिंकले. पण आपल्या चंदबरदाई ने काही तिळमात्रदेखील त्या सैनिकाचे कौतुक केले नाही. आता असं केल्यावर कुठल्याही राजाला अपमानित वाटणारच ना ? तेच घौरीच झालं. तो कोड्यात पडला व चंदबरदाईला त्याच्या अश्या वागण्याबद्दल विचारले. चंदबरदाईची चाल ठरल्याप्रमाणे यशस्वी होत होती. त्याने घौरीला सांगितले कि तुझ्या कैदेत असलेल्या एक कैदी शब्दाभेदी बाण सोडतो तुम्ही त्याला पण एक संधी द्या व तुमच्या सैनिकापेक्षा तो श्रेष्ठ आहे कि नाही हे पहा. घौरी साहेब चटकन मंजूर झाले कारण पृथ्वीराजाला त्याने दृष्टिहीन केले होते. झालं तर म पृथ्वीराजाला आणण्यात आले. सर्व धनुर्विद्येतील सैनिक, राज्यातील व दरबारातील प्रतिष्ठित मंडळी हा खेळ पाहण्यासाठी आधीच जमली होती त्यात नुकतेच ज्याला हरवले तो आपला कैदी पृथ्वीराज येणार म्हणल्यावर बघ्यांमध्ये अजूनच उत्साह आला. हा सर्व प्रकार राजे घौरी आपल्या सज्ज्यातून (मोठी खिडकी) पाहतच होते. चंदबरदाई या क्षणाची न जाणो किती दिवसांपासून वाट पाहत होता. अंध पृथ्विराज्याच्या हातात धनुष्यबाण दिला गेला. तो एकंदरीत बाणाचा व परिसराचा अंदाज घेतच होता तेव्हड्यात त्याच्या कानावर ओळखीचे शब्द पडले ..... "चार बांस, चौबीस गज़, अंगुल अष्ठ प्रमाण, ता ऊपर सुलतान है, मत चूको चौहान" पृथ्वीराज चव्हाणाने घेतले धनुष्य हाती व जो बाण सोडला तो सरळ घौरीच्या नरड्यात आणि घौरी साहेब क्षणार्धात अल्ला ला प्यारे झाले...........आणि चंदबरदाईने आपल्या हुशारीने आपल्या राजाचा व राज्याचा बदला घेण्याचा निश्चय तडीस नेला. सगळीकडे गोंधळ उडाला व चंदबरदाईचे खरे रूप घौरीच्या सैन्याला कळाले. त्यांने तत्काळ पृथ्वीराजाला आणि चंदबरदाईला एकाच कोठडीत टाकले. यापुढे आता आपले काय होणार हे दोघांना माहित होते. चंदबरदाईला आपल्या स्वामीची सुटका हवी होती आणि राजासोबत स्वतःची देखील. या दोघांचा जन्म एकाच वेळचा आणि दुर्दैवाने मृत्यू देखील. कैदेतूनतर सुटका शक्य नव्हती त्यामुळे दोघांनी कैदेतच एकमेकांना मारून सुटका स्वतःची सुटका करून घेतली.एक शूरवीर राजा आणि एक स्वामिनिष्ठ सैनिक किंवा दोन जिवलग मित्रांची हि कथा इथेच संपली. धन्यवाद !!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
12158 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

रामायण महाभारत

हुप्प्या
Mon, 10/24/2016 - 21:08 नवीन
रामायण आणि महाभारत हे खरोखर घडले ह्याला आजवर काहीही ठोस पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे आजवर हाती आलेल्या पुराव्यांवर आधारित काही दावा करायचा असेल तर ही दोन्ही महाकाव्ये काल्पनिक आहेत असेच म्हणावे लागेल. ठोस पुरावे म्हणजे नाणी, कागदपत्रे, शिलालेख, गाडगी मडकी, दागिने, मणी असे काहीतरी. निव्वळ शब्द नाहीत. रामायण आणि महाभारतात उल्लेख केलेल्या जागा बहुधा खर्या आहेत. पण तो ठोस पुरावा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

पुरावा काय असावा

गामा पैलवान
Mon, 10/24/2016 - 22:15 नवीन
हुप्प्या, रामकथेत वर्णिलेला रामसेतु हा पुरावा धरावा काय? तसेच महाभारतातली स्थाने आजही तशीच ओळखली जातात. हा देखील पुरावा नाही का? पाचहजार वर्षे वा त्याहून जुनी गाडगी, मडकी कित्येक सापडतात. कागद इतकी वर्षे टिकतीलसं वाटंत नाही. आर्यभट्ट आपल्या ग्रंथात म्हणतो की कलियुग सुरू होऊन साठ वर्षांची साठ आवर्तने जेव्हा पूर्ण झाली तेव्हा तो स्वत: तेवीस वर्षांचा होता. हा पुरावा धरावा का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

रामसेतू

हुप्प्या
Wed, 10/26/2016 - 07:24 नवीन
रामसेतू हा भौगोलिक वैशिष्ट्य आहे का मानवनिर्मित बान्धकाम आहे ह्याविषयी काही माहिती आहे का? जर मानवनिर्मित असेल तर त्याची तपासणी करुन त्याचे वय ठरवता येणे शक्य आहे. मोहंदजडोपेक्षा रामायण वा महाभारत जुने आहे का? मोहंदजडोत अनेक ठोस वस्तू सापडलेल्या आहेत. तशा रामायणकालीन वस्तू कधीच का सापडत नाहीत? एक द्वारकेचे उदाहरण ऐकले आहे. आजच्या द्वारकेजवळ समुद्राकाठी एक शहर सापडले आहे असे ऐकून आहे. पण तिथे काही संशोधन वा उत्खनन झाल्याचे ऐकिवात नाही. जर ही महाकाव्ये खरोखरचा इतिहास वर्णन करतात असे सिद्ध करता आले तर मला आवडेल. पण तसे अद्याप झालेले नाही. आर्यभट्टाचा मुद्दा कळलेला नाही. त्याचा रामायण वा महाभारत खरे असण्याशी काय संबंध आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हो काल्पनिक. एखादी रंजक

अप्पा जोगळेकर
Wed, 10/26/2016 - 12:35 नवीन
हो काल्पनिक. एखादी रंजक टीव्ही सीरियल जशी भविष्यात इतिहास बनू शकत नाही तद्वतच रामायण, महाभमहा, इलियड, ओडिसी ही सगळी काव्ये/महाकाव्ये इतिहास बनू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

हे लिहायचे राहिले का ?

रमेश आठवले
Mon, 10/24/2016 - 21:50 नवीन
पृथ्वीराज शब्दवेधी होता आणि त्याला आंधळा असताना अचूक वेध घेण्यासाठी दोन माहितींची गरज होती. १. निशाण कितीअंतरावर आहे आणि २. कोणत्या दिशेला आहे. चदंबरदाई ने सुलतान किती अंतरावर आहे हे सांगितल्यावर सुलतानाने बाण सोडण्यासाठी हुकूम दिला. या दुसऱ्या आवाजाचा शब्दवेध घेत पृथ्वीराज यांनी बाण सोडून सुलतानाचा वध केला.
  • Log in or register to post comments

हो बरोबर आहे तुमचं. तो उल्लेख

हृषीकेश पालोदकर
Tue, 10/25/2016 - 12:53 नवीन
हो बरोबर आहे तुमचं. तो उल्लेख आलाच नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

तर मग

अत्रन्गि पाउस
Wed, 10/26/2016 - 15:03 नवीन
सुधारित लेखन करा कि अपडेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हृषीकेश पालोदकर

त्यातच भारी गम्मत म्हणजे चंद

आदूबाळ
Wed, 10/26/2016 - 00:35 नवीन
त्यातच भारी गम्मत म्हणजे चंद बरदाईने मी सूर्य देखील झाकू शकतो असे घौरीला सांगून प्रयोगाची तिथी आणि वेळ पण सांगून टाकली. आधी सांगितल्याप्रमाणे चंदबरदाई हा जोतिषशास्त्रात पारंगत. जी तिथी आणि वेळ दिली ती होती सुर्याग्रहणाची. संपूर्ण प्रजेत कुतूहल पसरले.मग काय सर्व उपस्थितांसमोर व खूद्द राजा घौरी समोर चंदबरदाईने ध्यान मुद्रा धारण केली व हळूहळू चंद्राच्या सावलीने सूर्य झाकायला लागला. ओ....हो .....मग काय “ सुभानल्ला, सुभानल्ला !!!!!” म्हणत संपूर्ण राज्याने चंदबरदाईला डोक्यावर घेतले.
एच रायडर हॅगार्ड या लेखकाच्या किंग सॉलोमन्स माईन्स या कादंबरीतही असा प्रसंग रंगवला आहे.
  • Log in or register to post comments

हा सूर्य आणि हा जयद्रथ

रमेश आठवले
Wed, 10/26/2016 - 02:33 नवीन
हा सूर्य आणि हा जयद्रथ महाभारतात श्री कृष्णाने याच ज्योतिष विद्येचा उपयोग करून ग्रहण मोक्ष होताच ' हा सूर्य आणि हा जयद्रथ ' असा निर्देश करून अर्जुनाला जयद्रथ याचा वध करावयास सांगितले. http://www.hindufaqs.com/fascinating-stories-from-mahabharata-ep-iv-story-of-jayadrata/
  • Log in or register to post comments

मनराव, छान माहिती दिली!

संदीप डांगे
Wed, 10/26/2016 - 08:51 नवीन
मनराव, छान माहिती दिली!
  • Log in or register to post comments

इतिहास जेते लिहितात म्हणून तो

संदीप डांगे
Wed, 10/26/2016 - 08:54 नवीन
इतिहास जेते लिहितात म्हणून तो एकांगी असण्याचा धोका आहे, पण हे विधानही काव्यात्मक आहे, कारण पराभूत संपूर्ण नष्ट होत नसतात, त्यांच्याही काही लिखाणातून क्रॉस चेक होत असेल ना?
  • Log in or register to post comments

रामायण व महाभारत सत्यता

गामा पैलवान
Wed, 10/26/2016 - 11:56 नवीन
हुप्प्या, तुमचा इथला संदेश वाचला. १.
रामसेतू हा भौगोलिक वैशिष्ट्य आहे का मानवनिर्मित बान्धकाम आहे ह्याविषयी काही माहिती आहे का? जर मानवनिर्मित असेल तर त्याची तपासणी करुन त्याचे वय ठरवता येणे शक्य आहे.
रामसेतू मानवनिर्मित आहे. इतकंच नाही तर त्यापासून सुट्टा झालेला दगड पाण्यावर तरंगतो. २.
मोहंदजडोपेक्षा रामायण वा महाभारत जुने आहे का? मोहंदजडोत अनेक ठोस वस्तू सापडलेल्या आहेत. तशा रामायणकालीन वस्तू कधीच का सापडत नाहीत?
असू शकतं. म्हणूनंच सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या (=मोहंजदडो, हडप्पाच्या) वस्तू महाभारतकालीन असू शकतात. तत्कालीन सिंधुलिपी पूर्णपणे उलगडली नाहीये. ती उलगडल्यास ठोस पुरावा मिळू शकेल. ३.
एक द्वारकेचे उदाहरण ऐकले आहे. आजच्या द्वारकेजवळ समुद्राकाठी एक शहर सापडले आहे असे ऐकून आहे. पण तिथे काही संशोधन वा उत्खनन झाल्याचे ऐकिवात नाही.
माझ्या माहितीप्रमाणे तिथे संथ गतीने का होईना पण संशोधन चालू आहे. ४.
जर ही महाकाव्ये खरोखरचा इतिहास वर्णन करतात असे सिद्ध करता आले तर मला आवडेल. पण तसे अद्याप झालेले नाही.
म्हणूनंच जलद गतीने संशोधन व्हायला हवंय. माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे भारतीय पुरातत्त्वतज्ञ महाभारतयुद्ध प्रत्यक्षात होऊन गेलं असं मानतात. ५.
आर्यभट्टाचा मुद्दा कळलेला नाही. त्याचा रामायण वा महाभारत खरे असण्याशी काय संबंध आहे?
आर्यभट्टासारखा विश्वासार्ह संशोधक कलियुगाचा हवाला देतो म्हणजे महाभारतकथा खरी असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गा मा तुम्ही छान महीती दिलीत.

हृषीकेश पालोदकर
गुरुवार, 10/27/2016 - 00:43 नवीन
गा मा तुम्ही छान महीती दिलीत. संशोधनात सर्व पुराव्यांवर निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे सर्व पुरावे उपलब्ध नसल्याने गोष्टी अमान्य करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा