धुमसता पंजाब
सत्य हे नागवे असते , त्याला कोणत्या कुबड्यांची गरज भासत नाही , ते कटू असले तरी पचवावे लागते, ते सुन्न करू शकते वा एखाद्यास पेटवून उठवू शकते. असे फार कमी चित्रपट असतात की ज्यांना सत्य घटनेवर आधारित अश्या कुबड्यांची व बुरख्यांची गरज भासत नाही , जे दाखवितात ते वास्तवच असते नि असे पडद्यावर दाखवण्यात आलेले वास्तव प्रत्यक्षात बदल (निवडणुकांतून ) घडवू शकते. नि असा बदल त्यांनी घडावावा ही पंजाबच्या जनतेकडून अपेक्षा!!!!!
फार तत्वज्ञान न सांगतां मुद्द्यावर येतो. आजच " उडता पंजाब " मॅटीनी शोला पाहिला आणि चित्रपट आवडला. सध्या वास्तव्य गुरगावला असल्यामुळे ( अनेक पंजाबींशी संबंध असल्यामुळे ) नि कालच " I am khalistani , Right to freedom " असा टी -शर्ट घातलेला युवक बघितल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता होती आणि चित्रपटाने निराश नाही केले. हा चित्रपट मुख्यतः ४ जणांभोवती फिरतो , टॉमी (शहीद कपूर), मेरी जेन/फुगलीया (आलिया), डॉ. प्रीत ( (करीना) -(गीत नाव हिला जास्ती सूट होते ), सरताज ( दिलजीत ). पात्रे चार असली तरी यात तीन समांतर कथा आहेत ज्या शेवटास एकत्र गुंफल्या जातात. नावावरून नि प्रसिद्धीवरून आपण सर्वांस माहीतच आहे की "नशेचे व्यसन" हा या चित्रपटाचा गाभा आहे. ह्यातील तीनही कथा या व्यसनाशी निगडित आहे , परंतु तरी सुद्धा प्रत्येक कथा ही व्यसनाच्या दृष्टीने , नशेखोराच्या पार्श्ववभूमीच्या दृष्टीने वेगळी आहे. कोणी या व्यसनात स्वतःहून ओढला गेलाय नि फार वाहवत गेलाय ,नि ते व्यसन सुद्धा फार किमती नशेचे - कोकेन ! त्यास लोक रोल मॉडेल मानायला लागतात , तो म्हणजे गब्रू ( उर्फ फुद्दु) टॉमी. तर कोणी चुकून मिळालेल्या हेरॉईन पाकिटाच्या विक्रीतून पैसे मिळवण्याच्या नादात , दुष्टचक्रात अडकलेले , ती म्हणजे मेरी जेन. तर कोणी व्यवस्थेचा भाग असून , नशेच्या व्यापारात मिळणाऱ्या चिरीमिरीतून संतुष्ट असताना ,नशेचा वणवा हा स्वतःच्या घरापर्यंत पोहोचला आहे हे कळल्यावर उद्ध्वस्त न होता त्याविरुद्ध लढा देणारा , तो म्हणजे सरताज ( नाव अगदी समर्पक दिलेले आहे ) नि सरताज ची मार्गदर्शक डॉ. प्रीत. टॉमीची व्यक्तिरेखा शहीद कपूर ने चांगली वठवली आहे. टॅटॊ नि वेषभूषेसाठी पैकीच्या पैकी मार्क्स !!!! नशेखोर टॉमी सुधारित नि स्वैर अश्या दोन्ही प्रकृतीत तो उठून दिसतो. दिलजीत हा चित्रपटात ASI च्या भूमिकेत आहे तर करीना ही डॉक्टर /समुपदेशक आहे. दिलजितचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असला तरी त्याने आपल्या व्यक्तिरेखेस योग्य तो न्याय दिला आहे, करीनाने डॉक्टर ची असलेली भूमिका जराही loud न होता संयत पणे साकारली आहे , या बद्दल विशेष कौतुक . परंतु चित्रपटात अजून एक अशी व्यक्तिरेखा आहे , जी स्वतःची वेगळीच छाप सोडून जाते , ती म्हणजे मेरी जेन / पुगलिया / बिहारी मजूर ( आलीया ). तिने या आधी सुद्धा नॉन ग्लॅमरस भूमिका साकारल्या असल्या तरी ही भूमिका तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील फारच वरच्या श्रेणीतील म्हणावी लागेल. या भूमिकेसाठी तिने पकडलेला गावरान लहेजा , कळकट मळकट असूनसुद्धा उत्कट आशावादी असणारी मेरी तिने फार सुंदर रित्या सादर केली आहे.
हा चित्रपट प्रौढांसाठी आहे याचे एकमेव कारण म्हणजे शिवराळ भाषा !!!! परंतु ती कथेची गरज( च ) आहे. शिव्या देण्याच्या बाबतीत या चित्रपटात लिंगभेद नाही , तसेच जो जोरकसपणा अश्या भावना व्यक्त करतांना दाखवायला लागतो त्याबातीत सुद्धा आलियाच्या सर्वांच्या वरचढ ठरेल. चित्रपट संपादन नि छाया चित्रणाच्या बाबतीत फारच उजवा(चांगला)आहे. चित्रपट कोठेही रटाळ होत नाही , प्रत्येक फ्रेमला पुरेपूर न्याय देण्यात आलाय. " चित्ता वे " नी " ऊड - दा पंजाब " ही गाणी आधीच प्रसिद्ध झालीयेत. "एक कुडी - दलजित व्हर्जन " गाणे फारच श्रवणीय आहे. अमित त्रिवेदीने संगीताची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. दिग्दर्शन उत्तम आहे परंतु, संवाद लेखक विशेष प्रशंसेच्या पात्र आहेत. चित्रपटाच्या निर्मितीत अनुराग कश्यप याचा हात आहे हे सर्वांना माहीत आहेच , पण हा चित्रपट बालाजी फिल्म्स सोबत सहनिर्मिती आहे. असे असून सुद्धा , या चित्रपटावर बालाजीचा किंचित सुद्धा ठसा जाणवत नाही ( हे नमूद करण्याचे कारण की , बाहुबलीचा मध्यंतराच्या आधीच भाग हा करण जोहर निर्मित तर मध्यंतर नंतरचा चित्रपट राजा मौली ने दिग्दर्शित केला आहे , अशी माझी ठाम धारणा आहे ). चित्रपटातील काही प्रसंग मनात विशेष घर करून जातात, पलायनानंतर टॉमी नि मेरीचा प्रसंग , प्रीत नि दिलजीत मधील CCD वाला प्रसंग, दिलजीत कल रात को गलत हुआ हे म्हणणारा प्रसंग . यादी मोठी आहे. चित्रपटात नशेखोर ,पंजाब पोलिस नि हा धंदा चालवणारे व्यापारी/नेते यांचे भयानक कॉकटेल असल्याने मारधोड असणे स्वाभाविक आहे , पण ती बिलकुल कृत्रिम वा बिभत्सक वाटत नाही. सामान्यतः अनुराग कश्यपाचे चित्रपट हे सॅड एंडींग वाले असतात, हा चित्रपट त्यास अपवाद ठरतो. चित्रपटाची लांबी उगाच न वाढवता , योग्य तो संदेश देऊन संपतो हा चित्रपटाचा अजून एक प्लस पॉईंट !!!
ह्या चित्रपटात एक लघु शंकेचा प्रसंग होता जो सेन्सर बोर्डाने कापला , परंतु तो प्रसंग कापण्याची गरज नव्हती असे व्यक्तिशः वाटते. बाकी इतर कुठले कट सुचवले असतील नि ते उच्च न्यायालयाने काढण्यास सांगितले हे बरेच झाले.
चित्रपट का पाहावाच! - पंजाबातील भयाण वास्तव दर्शनासाठी आणि आलियाच्या अभिनयासाठी.
का पाहावू नये - हस्तिदंती मनोऱ्यातच मश्गुल राहायचे असेल तर , करीना नि आलिया अश्या दोन हॉट बेब असून सुद्धा प्रेक्षकांच्या आवडीसाठी आयटम सॉंग नाही म्हणून ( आठवा बाजीराव - मस्तानी ),तीन तास A.C. त बसून डोक्याला ताप करून घ्यायचा नसेल तर वा डोके बाजूला काढून चित्रपट पाहायची अपेक्षा असेल तर
विशेष नोंद - या चित्रपटात एक नशेखोराकडून खून होतो , आणि शुद्धीत आल्यावर त्याला पश्चाताप होतो त्यावेळेस तो केविलवाण्या अवस्थेत रडतांना दाखविला आहे , या वेळेस आमच्या चित्रपट गृहात हशा , टाळ्या नि कुजबुज चालली होती. आश्चर्य वाटले ना !!!! दोन मुली त्याच्या अभिनयावर हसत होत्या की " देखो इसे ठीक से रोना भी नाही आता" , नि त्याच्या expression वर लोक हसून टाळ्या वाजवत होते , याला अज्ञानात सुख म्हणायचे की गांभीर्याची उणीव !!!!
रच्याकने - चित्रपटातील गोवा दाखवणारे बिलबोर्ड चा फोटो कोणास मिळाला तर जरूर मला द्यावा. आलिया प्रमाणे तो बिलबोर्ड मला सुद्धा अच्छा टाइम दाखवेल ही भोळी आशा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खूप छान परीक्षण केलंय.
परीक्षण मुद्दाय वाचले कारण
परिक्षण आवडले. पाहीन असे वाटत
परीक्षण आवडले.
शाहीद कपूर एक प्रामाणिक ऍक्टर
बॉर्डर स्टेट असूनसुद्धा
पैका आला की होत आस
अभ्याभौ
आपली राॅसुद्धा काही कमी नाही.
नाही बापू
असायला हरकत नाही ;)
बोक्या भाऊ म्हणतात तसे
खरोखरच दुर्दैवाचीं गोष्ट,
च्याकडे आलेल्या पै पाहुण्याला
अहो म्हणजे आधी परसदारी होती
छान लिहिलेय. फक्त आलियाचे
खरे नाव येत नाही यबाबत सहमत,
आणखी एक
असं नाहीये नाखुकाका.
खूप सुंदर चित्रपट आहे.
लई बेस परीक्षण
परीक्षण आवडले. एवढी गंभीर
काल पाह्यला हा चित्रपट.
हिंदी सिनेमे न बघायचे व्रत घेतले असल्याने...
गुड ...
झक्कास परीक्षण!
अवांतर : कर्नल विनीत
स्पष्ट करा !!
बाहुबली हिंदी - करण जोहर