स्पर्धा म्हटली की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे ओघाने आलंच. तेव्हा त्यातही काही विशेष नाट्य निदान मला तरी जाणवत नाही.
त्यात नाट्य जाणवत नाही ही सत्य परिस्थिती आहे म्हणूनच चॅनलवाले त्यात नाट्य ओततात. (म्हणजेच सर्व ठरवून करतात).
मेगा फायनल मध्ये कोणी जिंकायचं कोणी हरायचं हेही पैसे घेऊन ठरवलेलं असतं असे मी ऐकले आहे. खरे - खोटे, परिक्षक आणि स्पर्धकच जाणोत.
अवांतरः हे तमाशे करण्यात 'राखी सावंत' तरबेज आहे.
निव्वळ फालतु पणा चालु आहे.
फुकट डोक्याला ताप आहे.
मुख्य म्हणजे असले कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत.
* सरळ पिरॅमीड पालथा करताना डोक्याला शॉट्ट लागतो *
(सध्या मी कन्नु मलिक ची गाणी ऐकतोय.)
वेगवेगळे रिऍलिटी शो ह्यात कलेचा बाजार तर आहेच पण ह्या 'आजा माहिवे' कार्यक्रमात नुसते नाचगाणे नाही तर प्रेमाचाही बाजार मांडला आहे. त्यांची टॅगलाईनच आहे 'प्रेम की अग्निपरिक्षा..'
मी हा कार्यक्रम तर नाही पाहिला पण मागील महिन्यात जेव्हा ह्याची जाहिरात पाहिली होती तेव्हाच मनात विचार आला होता की नुसते नाच गाणे सोडून आता हे लोकांच्या प्रेमकहानी मध्ये ही रस घ्यायला लागले आहेत.
त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित.
आता भाग घेत आहे त्यांची स्वत:ची मर्जी, पण आपल्याला तर हा प्रकार नाही आवडला.
त्यांच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे भाग घेणार्या जोड्यांचे लग्न आधीच ठरलेले आहे, व ह्यात जो जिंकेल त्यांना लग्नाचा खर्च करावा लागणार नाही. त्यामुळेही हे नाट्य होण्यास हातभार लागत असेल. प्रत्यक्षात तिकडे काय होते ते त्याच लोकांनाच माहित.
जर इतकेच प्रेम असेल तर रजिस्टर किंवा साध्या पदधतीने लग्न करावे.
आणि जर पहीला नंबर आला नाही तर काय एकमेकांना सोदुन द्यायचे काय?
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
हा कार्यक्रम अंमळ चिवित्रच दिसतोय!! देशा विदेशात ह्या वाहिन्या पाहिल्या जातात, आणि त्यात भाग घेणार्या लोकांना एवढ्या सगळ्यांपुढे हे असले वागायला शरम नाही का वाटत? आणि या वाहिन्यांनाही दर्जेदार कार्यक्रम दाखवून आपले रेटींग वाढवायला काय होते!! ~X(
स्पर्धा घेतली जातेय ते सोडून बाकीच्या गोष्टींशी काय संबंध? स्पर्धकांनीच अश्या गोष्टींना आक्षेप घेतला पाहीजे. जर मान्य नसेल तर अश्या स्पर्धांमध्ये भाग घेउ नये. घरातली भांडणे वेशीवर(टी. व्ही.) दाखवणार्या ठीकाणी कशाला जायचे? स्पर्धेत भाग घेण्याआधी स्वतःला तपासावे की आपण अनेक प्रकारच्या टीका, हार, जीत, डोक्यात हवा जाणारे अभिनंदन ह्या गोष्टींना तोंड द्यायला खंबीर आहोत की तमाशा करणार आहोत (स्वतःबरोबर घरच्यांचाही). नंतर चॅनलवाल्यांना नावे ठेवून उपयोग नाही. ते प्रत्येक भावनेचा बाजार मांडायला व पैसा मिळवायलाच आले आहेत (जे जगजाहीर आहे).
रेवती
तात्या,
काही ना काही रडारडीचे भांडवल करुन प्रेक्षकांना आकर्षित करायचा या वाहिन्यांच गलिच्छ उद्योग पाहिला की मला वाहतूक नियंत्रकावरच्या भिकार्यांची आठवण येते. गाडीतल्या साहेबान चार पैसे द्यावेत म्हणुन ते कडेवरच्या पोरांना चिमटे घेतात आणि रडायला भाग पाडतात. मग रडणार्या मुलाचे भांडवल करुन जाणार्या येणार्याला भावनाविवश करुन भीक मिळवतात.
आजकाल मराठीतही हे भीक मागाचे खुळ आले आहे. सर्व मालिका पात्रांवर एकाहुन एक घोर प्रसंग आणवुन आपले प्रेक्षक त्या पात्रांवर आलेल्या संकटांना सहानुभुती दाखवण्यासाठी आपली वाहिनी व आपले तेच ते रटाळ मालिकारवंथन पाहत राहावेत या साठी प्रयत्नशील आहेत. लोक भीक देतात म्हणुन भिकारी येतात!
आणि अक्षरश: भीक मागायचा प्रकार म्हणजे गायन , नृत्य, विनोदकथन वगैरे स्पर्धांमधले स्पर्धक कार्यक्रमाच्या अखेरीस अगदी 'आये, भाकर वाढा माये' च्या धर्तीवर 'मला प्लीज प्लीज प्लीज मत द्या हो' असे अजीजीने सांगताना दिसतात.
स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे कौल संदेशांद्वारे पैसा कमावायची पर्वणी. साधारण संदेशाच्या मानाने कौलसंदेश कितितरी महाग असतो. रुपये सहा प्रति संदेश. यातले चार रुपये वाहिनीचे व दोन भ्रमणध्वनी सेवा आयोजकाचे. प्रेक्षकांना विनवुन, विवश करून वा भडकावुन हे वाहिनीवाले मस्त नोटा छापताहेत हे मात्र खरे. कलाकार गेले तेल लावित! आणि कला गेली काशीत!
कुणी किती संदेश पाठवावेत याला काही सीमा नाही. मग कसली आली संद्शाद्वारे निवड? अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत ज्यांत कलाकार वा त्यांच्या संबंधितांनी अनेक संजीवनपत्रे कौल देण्यासाठी घाऊक विकत घेतली होती. जेव्हा एखाद्या कार्यासाठी वा मागणीसाठी संकेतस्थळावर जेव्हा जालकर्यांकडे पाठिंबा दर्शक मत मागितले जाते तेव्हा एका एका संगणकावरून (संगणकिय पत्त्यावरुन) एकच मत देता येते. इथे तसा धरबंद नाही. म्हणजे उद्या अंबानी वहिनी स्पर्धेत उतरल्या तर बाकीचे स्पर्धक डब्ब्यात!
लोकांनी हे कौलसंदेश देणे बंद करावे, वाहिन्यावाले वठणीवर येतील.
झुकानेवाला चाहिये....हेच खरे!
सहमत आहे, वेगवेगळ्या स्पर्धकांनी, त्यांच्या परिक्षकांनी, समस करा च्या दीनवाण्या चेहर्यांनी नुसता वैताग आणला आहे.
सुरुवातीला परिक्षक भांडायचे ते खरं वाटायचं, पण अशा कार्यक्रमातही सर्व अगोदर ठरलेले असते असे ऐकुन तर हल्ली फक्त न्युज चॅनल्स, एनजीसी, डिसकव्हरी, पाहतो. बाकी अशा कार्यक्रमामुळे वरीजनल कलांकारांकडेही संशयाने बघितल्या जाईल. असेच झाले तर अशा कलेचा आणि त्या कलाकारांवर मात्र मोठा अन्यायच होईल.
आपण जे कौल संदेशा बद्द्ल लिहीले आहे ते बंद होईल पण लोकही गाढव असल्यासारखे संदेश पाठवत राहतात. पैसा जास्त झालाय ना बाबांनो तर तो आम्हाला तरी द्या असा विचार वाहिन्या व भ्रमणध्वनी सेवा आयोजक करणारच.
चॅनलवाले भावनेला हात घालणारी वक्तव्य करतात कारण त्या सूत्रसंचालक/लिका यांना खरे सूत्रसंचालन कश्याशी खातात ते माहीत नसते. ती पल्लवी जोशी किती वेळा "गाणं झालं, आता कसं वाटतय?" असं विचारते. एका मुलीनं तर सांगितलं पल्लवीला कि या प्रश्नाचं उत्तर दरवेळेस वगळं असू शकत नाही. त्या मुलीच्या धाडसाचं कौतुक वाटलं.
रेवती
म्हणजे पैशाच्या अपव्यय आणि.. वेळ जात नसणार्या लोकांच काम.
या चॅनेल वाल्यांना स्पर्धकांच्या भावनांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना टी आर पी वाढवायचा असतो. मी हे कार्यक्रम फारसे नाहीच बघत. तसंही इथे लागतच नाहीत पण आपली मराठी वरही नाही पहात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
हा 'माही वे' वाला प्रकार फक्त कलेचाच बाजार मांडतोय असे नाही. सर्व रियॅलिटी शोज याच 'तत्त्वा' वर काम करत आहेत.
रियॅलिटी शोज मधे एक्-दोन अशा सिच्युएशन असतात की त्यात लोक (स्पर्धक्/प्रेक्षक) कसे रिऍक्ट करतात हे दाखवले/पाहिले जाते. आता एकदा लोकांच्या रिऍक्शन हा मूळ मूद्दा धरला की त्यात जाणुन्-बुजुन नाट्य ओतणे हा तर चॅनलवाल्यांचा डाव्या हातचा मळ आहे.
माझ्या मते सध्या टीव्ही वरिल वेगवेगळ्या रियॅलिटी शोजची प्रतवारी अशी होउ शकेल -
१. नृत्य, गाणे वगैरे 'कलागुणांना वाव' देणारे (पण यात सहभागी लोक कसे दिसतात, त्यांचे वय, राहण्याचे ठिकाण, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे वगैरे गोष्टीच सर्व नाट्य निर्माण करतात) -
- 'आयडिया सा रे ग म (...?) प्प्प्प', 'बुगी-वुगी', 'आजा-माहिवे', 'अमूल स्टार व्हॉईस ऑफ इंडिया', 'एका-पेक्षा एक' (सचिन आणि श्रीमान बांदेकर यांच्या 'एका-पेक्षा एक' लीलांचा खेळ) वगैरे
२. विनोद (पुन्हा राहण्याचे ठिकाण, आर्थिक परिस्थिती, दिसणे वगैरे) -
- 'इंडियन लाफ्टर चॅलेंज', 'हास्य(श्य)-सम्राट'
३. लोकांच्या मागणीनुसार केले जाणारे -
- 'होम मिनिस्टर' (पुन्हा श्रीमान बांदेकर!), 'आम्ही सारे खवय्ये'(यातला लोकांच्या सहभागावर आधारीत पदार्थ दाखवण्याचा प्रकार .. )
४. गेम्-शोज -
- ह्याचे तर अनंत प्रकार (वयानुसार, बक्षिसाच्या किमती/प्रकार यानुसार, होस्ट्च्या सेलिब्रिटी स्टेटस नुसार) सध्या आहेत. साध्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांप्रमाणे 'कमजोर कडी कौन?' वगैरे सारखे माणसांच्या भावना खूपच बटबटीत पणे दाखवणारे कार्यक्रम यांत आहेत.
५. शौर्य, धाडस, भीती वगैरे -
- ए क्स एन वरचा 'फियर फॅक्टर', सोनी वरचा वादग्रस्त 'बिग-ब्रदर', एम्-टीवी वरचा 'एम्-टीवी रोडीज'
६. न्युज चॅनल वरचे काही कार्यक्रम
- 'वारदात', 'इन्स्पेक्टर ... ' (नाव विसरलो) आणि 'इंडिया टीवी सारखे न्युज चॅनल!
जगभर चॅनल्स रियॅलिटी शोजवर नवे नवे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या भारतीयकरणातून आपल्याला अशा अजुनही भडक, मुर्खपणे सादर केलेले कार्यक्रम पाहयाला मिळणार हे नक्की.
असो. यात सहभागी स्पर्धकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात -
१. या सर्व प्रकारावर मनापासुन विश्वास ठेवणारे आणि त्यात आपल्यासाठी उज्वल संधी आहे असे मानणारे (हे लोक जीव तोडुन गाताना/नाचताना किंवा प्रयत्न करताना दिसतात.)
२. या प्रकारातून आपल्याला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल या भावनेने आलेले (हे लोक अशा शोजमधे भडक पणे वागतात, चॅनलवाले अशांना हाताशी धरुन हिडिस नाटके पार पाडतात.)
पण सहभागी स्पर्धक, चॅनलवाले यापेक्षा प्रेक्षक हेच रियॅलिटी शोजमधे सर्वात मध्यभागी भुमिका पार पाडतात. उपलब्ध स्पर्धकांपैकी प्रत्येक जण(जणी) मधे प्रेक्षक कुठे-ना-कुठे रिलेट करत असतात. हे 'रिलेट' करणे - स्पर्धकाच्या बॅकग्राऊंड वर, वयावर, दिसण्यावर, राहण्याच्या ठिकाणावर (हा/ही पुण्याचा/ची, कोल्हापुरचा/ची, नागपुरचा/ची वगैरे) आणि मग स्पर्धा/शो ज्या प्रकारची असेल त्या 'गुणावर'!
एकदा का ही 'रिलेट' होण्याची प्रक्रिया पार पडली की, प्रेक्षक तो/ती स्पर्धक जिंकावा/वी किंवा हरावा/वी (हे त्या शो च्या फॉरमॅट वर ठरते) या साठी डोके चालवू लागतात. मग ऑफिस मधे, रेल्वेत, प्रवासात, इकडे-तिकडे वागताना-बोलताना इर्षेने चर्चा, वाद्-विवाद यात प्रेक्षक गुंतु लागतात. निर्णायक क्षणी एस एम एस हे तर एक सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. यातुन शो ची लोकप्रियता वाढत राहते आणि 'चुरस' निर्माण होते. ह्यात आणखी रंग आणण्यासाठी चॅनलवाले नविन वाद, स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील रडारड्/आनंदी क्षण वगैरे गोष्टी अगदी मन लावुन चित्रित करतात आणि विदाउट सेंसरशिप प्रक्षेपित करतात. प्रेक्षकांना आपला चॉइस किती योग्य/अयोग्य (शो च्या फॉरमॅट नुसार) हे कन्फर्म करता येते आणि स्पर्धक आपण कोणी हिरो (नायक्/नायिका) झालो आहोत ही समाधानाची, यशाची पायरी चढत राहतात.
कदाचित, समाजामधे कमी होत चाललेले नायक, वाढत्या स्पर्धेमुळे निर्माण झालेली असुरक्षितता (अपयशात आणि यशातही), निर्णय प्रक्रियांमधे कमी होत चाललेले सामान्य माणसाचे स्थान आणि समाजात प्रसिध्दीचे वाढते वलय यामुळे असे रिअलीटी शोज जोरात चालतात आणि चालत राहतील असे मला वाटते
छ्या! काय साला जमाना बदलला आहे! आमच्या लहानपणी मुंबई दूरदर्शन केन्द्राची फक्त एकच वाहिनी, तीदेखील संध्याकाळी ६ ते रात्री १० इतकाच वेळ पाहायला मिळत असे ते किती बरे होते!
तात्या.
प्रतिक्रिया
नाद
नाट्य...
निव्वळ
नुसती कला नाही...
त्यांच्या
नाडी सतत
हा
ज्या कलेची (नाच, गाणी)
मुंबईतले भिकारी
>>लोकांनी
दुनिया झुकती है...
असेच म्हणतो.
सर्वसाक्षी, सहमत.
हे कार्यक्रम..
रियॅलिटी शो चा बाजार
छ्या! काय