Skip to main content

संघाने मला काय दिले?

लेखक रमेश भिडे यांनी गुरुवार, 12/05/2016 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

वाचने 34072
प्रतिक्रिया 221

प्रतिक्रिया

हे सगळे आम्ही संघात न जाताही करतो.

In reply to by mugdhagode

आपल्याला वार लावून जेवण्याचा अनुभव आहे हे समजून बरे वाटले.

In reply to by तर्राट जोकर

एक तर हे साधे संस्कार वाटतात तेवढे सोपे नसतात त.जो. साहेब.. त्यासाठी एक तर तुम्हाला खुप कडक स्वभाव असावा लागेल अथवा तुमच्या घरात सगळेच शिस्तप्रिय असावे लागतील. सामान्यपणे असे असण्याचे प्रमाण खुपच कमी असेल.

समूहात आणि प्रत्यक्ष फिल्डवर शिकलेल्या गोष्टी जास्त पक्क्या असतात. ज्यांना केवळ विरोधासाठी विरोध करायचा आहे त्यांचा भाग सोडून द्या.

त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. पोराबरोबरच बापालाही संघात जाण्याची गरज आहे . पुढच्या शिबिरात बापाने जावे.

"संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात." ????????????????? ?????????????????????????/// ?????????????????????????????????????????// कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....

शिबिरात चांगलेच पिदवून घेतलेले दिसतेय लेकराला, 'टेली शॉपिंगच्या' जाहिरातीसारखे वाटते. संघात जाणार्‍या माझ्या बर्‍याच (सगळ्यांच्या नव्हे) मित्रांच्या घरातील वॉश बेसिनच्या नळाला हात लावायलाही किळस वाटेल इतके कळकट असतात, त्यांच्या पाणी प्यायच्या पेल्यालाही ओशट वास येतो.

संघाने मला काय दिले?? कंपुबाजी द्यायचा प्रयत्न केला , मीच घेतली नाही. दांभिकता द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतली नाही. इतरांना तुच्छ लेखणे द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतले नाही. लेखात लिहिलेल्या सवयी आम्हाला गरीबी ने शिकवल्या आहेत १ आवरून ठेवणे - घरात बोंबलायला सामानच कमी त्यात कपडे वर्षात दोन जोड़ी न आवरून जातोय कुठे कपडे फाटले तर उघडे रहावे लागले ह्यातून आवराआवर शिकलो २ म्हातारी कंबर तुटेपर्यंत काम करुन परत पाण्याला मैलभर चालत जायची तिथे पाणी वाचवणे शिकलो ३ घरात टीवी वगैरे चैन कधीच नव्हती तेव्हा गोट्या अड्डूल गस्टिल खेळणे अन पुस्तके वाचणे हे शिकावेच लागले ४ नेतृत्व गुण शिकायला कारणीभूत, कांडी हरवल्यामुळे भोकाड पसरलेला मित्र अन त्याला पेन हरवला म्हणून अर्धमेला होइस्तोवर कुटनारा त्याचा बाप ह्यांच्यापासून वाचवायला सगळ्या पोराकडून चार चार आणे वर्गणी काढून मित्राला पेन घेऊन देणे अन मुस्काड मारून परत हरवु नको हे सांगणे ठरले बघा विशेष सूचना :- अस्मादिक बाल शाखेत गेलेले आहेत अन अस्मादिकांची कॉमेंट ही वैयक्तिक अनुभवांवर आधारीत आहे, संघ ऑन अ लार्ज असेलही महान वगैरे मी मला जो वैयक्तिक अनुभव आला अन जो बप्तिस्मा संघाने द्यायचा प्रयत्न केला त्या आधारावर बोलतो आहे. आग्रहाची विनंती :- संघ अनुभवायची गोष्ट आहे वगैरे मखलाशी आहेर आणु नये, आपले शिव्याशाप हाच आमचा आहेर "आमच्या ककाच्या डोक्याला ताप द्यायला नाही यायचं बरं" -बाल शाखेत जाणारा पुतण्या बबल्या अजिबात कळवु नये अन लोभ तर मुळीच ठेऊ नये धन्यवाद

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अगदी अगदी, उपरोल्लेखित गुण शिकण्यासाठी संघाची गरज भासली नाही. किंबहुना संघात नियमित जाणार्‍या सहाध्यायींपेक्षा जास्त चांगले वागायला जमले. आईबाप आणि परिस्थिती शिकवतेच. शिकणे आणि शिकवणे यात कोताही झाली की बाह्याधाराची किंमत वाटायला लागते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही वेगळ्या संघाबद्दल बोलत असाल कदाचित. हा धागा बहुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आहे. ज्याच्याबद्दलचा माझा अनुभव वेगळाच आहे. मी काय शिकलो ही गोष्ट वेगळी. पण वाईट काही शिकलो नाही. बाकी संघात शिकायला मिळत नाहीत अश्या गोष्टी बर्‍याच असाव्यात. पण योग्य वेळी योग्य गोष्टी शिकायला मिळाले तरी खुप झाले. असो. संघात न जाताही एक चांगला माणूस घडु शकत नाही असे काही नाही. तुमच्या रुपाने एक उदाहरण आमच्यासमोर आहेच. संघात जाउनही कदाचित आमच्या हातुन आपल्या एवढी देशसेवा घडु शकत नसेल (आमच्यापरीने प्रयत्न करतो). परंतु तरीही संघामुळे अनेक चांगल्या गोष्ती मनावर बिंबल्या हे नक्की. संघ नसता तर हे घडले नसतेच असे सांगता येत नाही पण संघामुळे घडले असेल तर वाईट काही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू साहेब, ज्या गरिबीने आपल्यासारखा चांगला माणूस घडवला तीच गरिबी कधी कधी गुन्हेगार घडवायला सुद्धा कारणीभूत ठरते. अर्थात श्रीमंत घरातून सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती बळावू शकते. मुद्दा असा आहे, ध्येयापासून भरकटलेल्या गरीब किंवा श्रीमंत मुलाला संघासारखी एखादी संघटना योग्य मार्गवर आणत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. आता ही गोष्ट फक्त संघातच घडू शकते असं काहीही नाही. बाकी सैन्यानंतर संघा इतकी शिस्तबद्ध संघटना माझ्या तरी पाहण्यात नाही

In reply to by चिनार

तुम्ही सैन्य आणि संघाची शिस्तीबद्दल तुलना केली तर एक सहज विचार माझ्या मनात आला. सैन्यात शिस्त बाणवायला ConformityObedience आवश्यक असते. ह्याबद्दल खरेसर आणी बापुसाहेब जास्त योग्य सांगू शकतील. सैन्यासारखी शिस्त संघात येत असेल तर ते वरील दोन गोष्टींशिवाय शक्य नाही असे वाटते. त्यापैकी Conformity हा मुद्दा जास्त गंभीर आहे असे मला वाटते व माझ्या संघाबद्दलच्या मतांमधे ह्या मुद्द्याचा मोठा भाग आहे. कन्फॉर्मिटीचा मला अभिप्रेत अर्थ असा की वरिष्ठ सांगतील ते मुकाट फॉलो करणे, त्याविरुद्ध विचार प्रकट न करणे, त्या वरिष्ठांच्या मूळ विचाराला छेद देईल असे कोणतेही कृत्य न करणे (भले त्यात मानवी मूल्यांचे हित समाविष्ट असले तरी). जे विशिष्ट हेतूने, ध्येयाने एकत्र येतात, संघटन करतात त्यांच्यात ह्या गोष्टीचा मोठा प्रभाव असतो. जबरदस्त इंटीग्रीटी असलेली कोणतीही संघटना त्यास अपवाद नसावी. ह्या विषयावर चर्चा झाल्यास आवडेल.

In reply to by तर्राट जोकर

सैन्यासारखी शिस्त संघात येत असेल तर ते वरील दोन गोष्टींशिवाय शक्य नाही असे वाटते. त्यापैकी Conformity हा मुद्दा जास्त गंभीर आहे असे मला वाटते व माझ्या संघाबद्दलच्या मतांमधे ह्या मुद्द्याचा मोठा भाग आहे. कन्फॉर्मिटीचा मला अभिप्रेत अर्थ असा की वरिष्ठ सांगतील ते मुकाट फॉलो करणे, त्याविरुद्ध विचार प्रकट न करणे, त्या वरिष्ठांच्या मूळ विचाराला छेद देईल असे कोणतेही कृत्य न करणे (भले त्यात मानवी मूल्यांचे हित समाविष्ट असले तरी). जे विशिष्ट हेतूने, ध्येयाने एकत्र येतात, संघटन करतात त्यांच्यात ह्या गोष्टीचा मोठा प्रभाव असतो. जबरदस्त इंटीग्रीटी असलेली कोणतीही संघटना त्यास अपवाद नसावी.
हं . सगळ्याच केडर बेस्ड संघटनांत हे थोड्याफार फरकानं असणारच की . राजकिय, सामाजिक विषयांचा मी जाणकार नाही. पण माझा अंदाज असा की अगदि कम्युनिस्टांतही हे लक्षण/ फीचर दिसणारच. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसमध्ये, भारवलेल्या कार्यकर्त्यांतही दिसेल. आणि कोणतीही संघटना असू देत किंवा कंपनी, कोणतीही ओर्गनायझेशन ही प्रत्येक सदस्याच्या सहमतीनंतरच चालेल असं ठरवलं तर तिचं चालणं मुश्किल होइल. आपण काम करतो ती कंपनी सुद्धा एक ऑर्गनायझेशन असते. तिची सगळी ध्येय धोरणं आणि हरेक कृती कुठं आपल्याला मान्य असतात ? मला खुद्द आपल्या देशाची काही धोरणं मान्य नाहित. पण राहतोच की मुकाट्यानं इथ एक कायदाभिरु नागरिक म्हणून. (स्वगत -- च्यायला लैच अवांतर होतय का ? सॉरी बॉस.)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संघाने मला काय दिले?? कंपुबाजी द्यायचा प्रयत्न केला , मीच घेतली नाही. दांभिकता द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतली नाही. इतरांना तुच्छ लेखणे द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतले नाही. ह्याविषयी, तसेच आपण जेव्हा बालशाखेत जात होतात त्यावेळचे इतरही काही बरेवाईट अनुभव असतील, त्या सगळ्याबद्दल आपण इथे कृपया सविस्तर लिहाल का?

संघात न जाताही एक चांगला माणूस घडु शकत नाही असे काही नाही. प्रतिसाद पोचला धन्यवाद! मी गेलो तो संघ किंवा मुळ संघाला माझ्यासमोर विपर्यस्त पद्धतीने मांडणाऱ्या लोकांबद्दल बोलतो आहे बुआ मी तर! मुद्दा काय उडदामाजी काळे गोरे! संघ १०० टक्के चुकही नाही अन बरोबरही नाही व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल ह्यावर बहुदा तुमचे आमचे एकमत असावे परत एकदा धन्यवाद

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संघ १०० टक्के चुकही नाही अन बरोबरही नाही व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल हे फारच जेनेरिक विधान आहे. हे संघालाच नाही तर सगळ्याच आस्थापना, संस्था, व्यक्ती, सुरक्षा दले यांनासुद्धा लागू होते. तुम्ही त्यापलीकडे जाऊन ते दांभिकता, कंपूबाजी वगैरे लिहिले आहे. म्हणून म्रूत्युंजय साहेबांनी लिहिले असावे. बाकी ते वैयक्तिक अनुभवाचे काही पटले नाही. एखादा तुकडी चुकार असेल तर संपूर्ण सैन्याला दोषी धरण्यासारखेच आहे. ऑन अ लार्ज स्केल काही चुकीचे धोरण वगैरे टीका असेल तर पटू शकते. - संघाशी असंबंधित सामान्य माणूस

In reply to by अप्पा जोगळेकर

. हे संघालाच नाही तर सगळ्याच आस्थापना, संस्था, व्यक्ती, सुरक्षा दले यांनासुद्धा लागू होते. अगदी अगदी लागु होते त्यात काही वादच नाही, १००% sacrosanct काहीच नाही ह्यात वाद असायचे कारण नाही, कदाचित म्हणून मला मी करतो ते काम जस्ट अनदर जॉब वाटतो त्यात ग्लोरिफिकेशन नसावे हे मी वेळोवेळी नमूद सुद्धा केले आहेच तुम्ही त्यापलीकडे जाऊन ते दांभिकता, कंपूबाजी वगैरे लिहिले आहे. म्हणून म्रूत्युंजय साहेबांनी लिहिले असावे. ह्यावर मी पुढे "संघ असेलही महान फ़क्त मला दिसलेला अन आलेला अनुभव जसा आला त्यावरून मांडतो आहे" अश्या स्वरुपात बोललोच आहे, मला संघ म्हणून जो जो अनुभव आलाय तो मी लिहिला आहे बुआ वैयक्तिक मी माझ्या अनुभवांची जबाबदारी घेतोय, त्यावर प्रतिसाद देताना कोणाला पुर्ण संघाची जबाबदारी घ्यायची असले तर तो त्याचा प्रश्न आहे माझा नाही, माझ्या अनुभवांवरुन आकलनावरुन निरीक्षाणांवरुन संघ जसा वाटला ते मी मांडले त्याचे सर्वत्रिकरण करायची गरज नाही , शिवाय धागा लेखकांनी सुद्धा "मला काय मिळाले" हेच मांडले आहे तेव्हा मी धागा प्रमाणिक लिहिले असे मी समजतो बाकी ते वैयक्तिक अनुभवाचे काही पटले नाही. एखादा तुकडी चुकार असेल तर संपूर्ण सैन्याला दोषी धरण्यासारखेच आहे. ऑन अ लार्ज स्केल काही चुकीचे धोरण वगैरे टीका असेल तर पटू शकते. धागा धोरणात्मक संघ त्याची ध्येय धोरणे इत्यादीवर असता तर मी ऑन अ लार्ज स्केल संघात चांगले वाईट काय मिळाले/नाही मिळाले, असते/नसते ते बोललोही असतो, धागा वस्तु वैयक्तिक काय मिळाले वर केंद्रित आहे म्हणून मी तितकेच बोललो, बाकी तुमची मर्जी अप्पा :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संघाबद्दल तुमचे आणि माझे अनुभव पुर्ण वेगळे आहेत हे तर ओघाने आलेच. फक्त एक शाखा म्हणुन नाही तर संघातील ज्या प्रचारकांची, कार्यकर्त्यांची ओळख झाली आहे त्यापैकी बरेच लोक तत्वनिष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कारी आणि दुरदृष्टी असलेले विद्वान लोक होते त्यामुळे तुमचा आणि माझा संघाबद्दलचा दृष्टीकोन वेगळा असणार यात शंकाच नाही. पण एक संघटना म्हणुन संघाच्या सेवाभावी वृत्तीबद्दल आणि कार्याबद्दल मला आदर आहे. त्यामुळेच तुमचा आणि माझा संघच वेगळा आहे असे लिहावेसे वाटले. त्यामुळेच संघ आणि इतर म्हणजे उडदामाजी काळे गोरे हे मला मान्य नाही. पण व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल यावर दुमत नाही. असो. धन्यवाद. वैचारिक मतभेद असुनही शांतपणे चर्चा करता येणार्‍या थोड्या आयडी पैकी आपण एक असल्याने आपण आपले आपले अनुभव मांडले आहेत त्यावर येथेच थांबुयात

माझं संघाबद्दल फार चांगलं मत नै ये, पण व्यक्तिमत्वात बदल होणार्‍या कोणत्याही उपक्रमाचं ब्वा मला लै कौतुक हेही नम्रपणे नमुद करतो. आपल्या मुलामधे बदल झालेले पाहुन आनंद वाटला. शुभेच्छा. अजून एक, मी कॉलेजला जाईपर्यंत अशा सांस्कृतिक उद्योगात होतो. शीबीर, शाखा, खेळ, शहरप्रमुख अशी सर्व पदंही भूषवली आहेत. पण, तेव्हा काय कळत नव्हतं, आता थोडं थोडं कळायला लागलं आहे. -दिलीप बिरुटे (दक्ष)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणजे तुम्च्या सदैव दक्ष राहाण्याचे मूळ संघाच्या शाखेमुळे (जात होता तेंव्हा पासून आहे तर). भीतीने लांब पळालेला नाखुस.

मी संघात असताना एकदा ब्राह्मण कुटुंबाकडे राहयची वेळ आली, त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या संघात होत्या.घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आले.बाकी विप्रांची झोपणाची व्यवस्थाअ घराच्या आत करण्यात आली, व आम्हा दोघातीघांची व्यवस्था बाहेर पडवीत करण्यात आली.अत्यंत सापत्न वागणुक मिळाली.तेव्हा या संघटनेचे जातियवादी स्वरुप समजले,ही संघ संघटना फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला खुली झाली, त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने असल्या संघटनेचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

तांदुळात एक खडा निघाला. तेंव्हा सगळे तांदूळ खड्यानीच भरलेले आहेत असे म्हणण्यासारखा हा प्रतिसाद आहे. सरळ स्पष्ट ब्राम्हण द्वेष आणी संघ द्वेषाने भरलेला प्रतिसाद आहे. इतके खाली उतरू नका चंद्रनील साहेब. संघाला थोडे सुद्धा ओळखणारे लोक हा प्रतिसाद अजिबात अमान्य करतील.

In reply to by सुबोध खरे

संघाला ओळखणारे किंवा संघ जाणणारे हे कधिच मान्य करणार नाहित. एखाद खडा असेल गोष्ट वेगळी मात्र त्यामुळे संघ असा आणि तसा म्हणणं चुकीचं....तशी वागणुक देणार्‍यांनाही आणि प्रस्तुतकर्त्यालाही संघ कळला नाही अस सिद्ध होतयं.

In reply to by सुबोध खरे

आजन्म संघात घालवलेले, आसिंधु-सिंधु हिंदु बांधवतेच्या गर्जना देणारे अनेक संघी जातीय द्वेषापासुन स्वतःला सोडवु शकत नसलेले बघुन मला फार आश्चर्य वाटायचं. पण मग जातीभेद समाजात मुरल्याची कारणं, एकुणच हिंदु संघटनेचा कन्सेप्ट, संस्कृती आणि देशकारणाचा परस्पर संबंध, देशाच्या समस्या आणि त्यांचं परिशीलन या बद्द्ल परस्परविरोधी पण एकदम लॉजीकल विचारधारा, या सगळ्यांचा शेवटी मानवतेवर होणारा परिणाम... हे सगळं पुढे येत गेलं व संघ आणि संघी यातला भेद समजत गेला. ज्यांच्यापुढे केवळ नतमस्तक व्हावे असे अनेक महानुभाव भेटले, त्यातले बरेचसे संघी देखील होते. सांगायचा मुद्दा असा कि संघावर जातीयतेचा आरोप लागण्याचं एक कारण जुन्या पिढीतल्या अनेक संघी लोकांची मानसीकता आहे. हे एकदम नाकारता येत नहि.

In reply to by अर्धवटराव

http://misalpav.com/comment/839359#comment-839359 विठा मोड- हे आधीच सांगितले आहे, तस्मात आपला मुद्दा नवीन राहिलेला नाही- विठा मोड

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

मी जोशी हायस्कूलमध्ये असताना एकदा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या जोशी हायस्कूल मध्ये शिकल्या होत्या. घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आलेजोगळेकर म्हणजे तू भटाचा का असे एक आजी म्हणाल्या. मी पुन्हा एकदा मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले. अत्यंत सापत्न वागणुक मिळाली. तेव्हा या शाळेचे जातियवादी स्वरुप समजले. ही शाळा फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला तेंव्हा खुली झाली, जेंव्हा मी शाळा सोडून कोलेज मध्ये गेलो. त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने जोशी हायस्कूलचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये. तसेच मुलांना कोणत्याही आजींच्या संपर्कात येऊ देऊ नये.

In reply to by अप्पा जोगळेकर

हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, एखादी शाळा किंवा जगातल्या सगळ्या आज्या 'ऑन अ लार्जर स्केल' महान असतीलही पण माझी कमेंट वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

जसे या उपरोधिक प्रतिसादातून तुम्ही चंद्रनील यांच्या अनुभवातील ३ पिढ्या संघात घालवलेल्या कुटुंबाच्या विचारसरणीचा/वर्तणूकीचा संघाशी संबंध नाकारताय, त्याच मापदंडाने रमेश भिडे यांच्या लेखातील १०-१५ दिवस शिबिरात घालवलेल्या मुलाच्या वागणूकीचाही संघाशी संबंध नाकारता येतो.

In reply to by बाळ सप्रे

नाही नाकारता येत कारण रमेश भिड्यांच्या लेखातल्या देवर्‍यांनी स्वतः तो बदल संघामुळे झाला आहे असे म्हटले आहे. ती बाब त्यांची स्वतःशी निगडीत आहे. आणी मुल्हेरकर एका व्यक्तीच्या अनुभवावरुन संघाबद्दल निष्कर्ष काढत आहेत. एका व्यक्तीवरुन संघटनेबद्द्दल निष्कर्ष काढता येत नाही. माझ्या ३ पिढ्या संघाशी संबंधित आहेत आणि मी सर्व जातिधर्माच्या लोकांकडे जाउन जेवुन आलो आहे आणि ते देखील माझ्याकडे येउन जेवुन गेले आहेत. तसे करताना त्यात माझ्याबाजुने तरी कुठलाही भेदभाव कधी केला गेला नाही. किंबहुना असे करताना "जात " हा विचारच कधी मनात आला नाही. सध्या पद्धतशीरपणे जो ब्राह्मणांबद्दल अपप्रचार केला जातो तेव्हा त्यामुळेच हे सगळे विचित्र वाटते

In reply to by मृत्युन्जय

देवरे आणि चंद्रनील दोघांचाही अनुभव आहे .. दोघांना वेगळे अनुभव आले.. ठीक आहे. माझा मुद्दा अप्पांच्या प्रतिवादाविषयी होता.. असा उपरोधिक प्रतिसाद लिहून मूळ देवरे यांच्या लेखाचेही वाभाडे काढता येतील एवढेच.. बाकी देवरे आणि चंद्रनील यांच्या अनुभव कथनात दोघांचाही संघाविषयीचा पूर्वग्रह डोकावतोय.. दोन्ही विरुद्ध टोकांना अतिशयोक्त आहेत.

In reply to by बाळ सप्रे

आणि हो.. वाईट अनुभवाविषयी संघ तुम्हाला समजलाच नाही आणि चांगल्याचं श्रेय द्यायला चढाओढ हे आता खूप अंगवळणी पडलय..

In reply to by बाळ सप्रे

परत एकदा सांगतो.: १. एक स्वयंसेवी संस्था आहे. त्या संस्थेच्या विचारसरणीने माझ्या आयुष्यात आमुलाग्र सकारात्मक बदल घडुन आला. मला ती संस्था आवडते. असे एक माणुस म्हणतो. २. एक माणुस एका स्वयंसेवी संस्थेचा सभासद आहे. त्या माणसाचा व्यवहार अभद्र आहे. त्यासाठी ती संस्थाच अभद्र आहे असे दुसरा माणुस म्हणतो. संस्था अनेक सभासदांनी बनलेली असते. त्यामुळे त्या संस्थेतील अधिकाधिक लोक जर नकारात्मक प्रवृत्तीचे असतील तर ती संस्था चुकीची म्हणता येइल कदाचित. पण एका माणसाच्या चुकीच्या वर्त्नामुळे (जो काही संघटनाप्रमुख पन नाही) आख्खी संघटनाच चुकीची आहे हा आरोपच मुळात हास्यास्पद आहे आणि त्यामुळे पहिल्या अनुभवाशी दुसरा अनुभव कंपेअर करता येत नाही, आणि हो. उठसुट संघाला नावे ठेवायची फ्याशन फार जुनी आहे फक्त आता मोदीविरोधामुळे संघविरोधही प्रबळ आहे इतकेच. आता सरावलो आहे त्याला.

In reply to by मृत्युन्जय

तुम्हाला संघ आवडतो की नाही यावर काहीच वाद नाहिये इथे. ते परत मला कशाला सांगताय. प्रतिवादाच्या पद्धतीवर प्रतिसाद होता.. आणि जसं चांगल्या अनुभवावरून लोक संघाला चांगलं म्हणू शकतात तसं वाईट अनुभवावरून वाईट म्हणणारच.. वाईट आलं की मात्र त्या माणसाला संघापासून नामानिराळा करणे योग्य नव्हे.. जसं शिबिर भरवणारे संघाचे प्रतिनिधित्व करतात तसचं संघाच्या कामाला आलेल्या माणसांची संघप्रेमासाठी रहायची सोय करणारी कुटुंबही संघाचंच प्रतिनिधित्व करतात..

In reply to by बाळ सप्रे

मी स्वतः आयुष्यातला काही काळ संघात घालवलेला आहे. संघाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी पण झालेला आहे. विविध गोष्टींच्या निमित्ताने संघाचे कार्य जवळून बघितले आहे, आणि तसेच शाखेत असणार्‍या काही "कार्यकर्त्यांच्या" टवाळक्या, इतकेच नव्हे तर काही संघाच्या क्रियाशील सभासदांच्या जीवनाची काळी बाजू देखील जवळून पाहिलेली आहे. काही वेळेस त्याची झळ देखील सोसलेली आहे. परंतु संघाचे तत्वज्ञान आणि सकारात्मक कार्य इतके मोठे आहे की त्यापुढे या गोष्टींचे फारसे महत्व वाटत नाही. एका विशिष्ट वळणावर वैचारिक मतभेदांमुळे संघापासून वेगळा झालो, पण तरीही मी आजन्म संघाचा हितचिंतक राहीन.

In reply to by बाळ सप्रे

असा उपरोधिक प्रतिसाद लिहून मूळ देवरे यांच्या लेखाचेही वाभाडे काढता येतील एवढेच.. जरुर काढावेत. मुल्हेरकरांनी उगाच इथे 'जात' आणली आहे म्हणून प्रतिसाद देणवाआवश्यक वाटले.

In reply to by मी-सौरभ

दुसर्याचे खरे खुरे अनुभवही यांना कल्पनाविलास वाटतात आणि त्यांचे पालन-पोषणकर्ते त्याचा अगदी मनःपूत पाठींबा देऊन जयजयकारही करतात. चालायचंच शिक्ष्णाने माणुस प्रगल्भ होते यावर कितपत विश्वास ठेवावा हेच आपले आपण ठरवावे. तयार नाखु

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

का, तर त्यांच्या कुठल्यातरी पुतणीने ब्राम्हण मुलाशी लग्न केलेलं म्हणून. मी ना त्या मुलाचा भाऊ ना त्याचा काका-मामा. आणि ही मुंबईतली गोष्ट आहे. आता बोला. तरीही आमच्या मोठ्या बहिणीने मराठा मुलाशी लग्न केलं तेव्हा आम्ही कुठलाही विरोध केला नाही. हे आमचे जावई सगळ्या सासुरवाडीत एकदम आवडते आहेत. एका कुटुंबाकडून असला अनुभव आल्यावर संपूर्ण संघटनेविषयी इतकी टोकाची भूमिका घेणं हे जरा जास्तच आहे. आणि हे जातीयवादी संस्कार त्यांच्यावर संघाने केले होते याचा काय पुरावा आहे का?

In reply to by बोका-ए-आझम

९६ कुळी मराठा अशी कोणतीही जात अस्तीत्वात नाही. कागदावर फक्त "हींदू मराठा" ही एक जात आहे. बाकी चालू द्या.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

मी संघात असताना एकदा ब्राह्मण कुटुंबाकडे राहयची वेळ आली, त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या संघात होत्या.घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आले.बाकी विप्रांची झोपणाची व्यवस्थाअ घराच्या आत करण्यात आली, व आम्हा दोघातीघांची व्यवस्था बाहेर पडवीत करण्यात आली.अत्यंत सापत्न वागणुक मिळाली.तेव्हा या संघटनेचे जातियवादी स्वरुप समजले,ही संघ संघटना फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला खुली झाली, त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने असल्या संघटनेचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये.
हे वाचून गोंदवले प्रकरणाची आठवण आली व सदस्य कोण आहे याचाही अंदाज आला.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

चंमु साहेब, खूप सरसकटीकरण होतय. ठाण्यातल्या एका अग्रगण्य बँकेत काम केले आहे. या बँकेची स्थापना संघाने केली. बँकेच्या व्यवस्थापनाने मुद्दामुन ठाण्यातील दुरवर असलेल्या खेड्यापाड्यातील आदीवासी आणि दलीत मुलांना नोकर्‍या देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुसंख्य कर्मचारी ब्राह्मण आहेत हे मान्य तरीही ब्राह्मणेतर मुलांना शिक्षणात आणि मार्कांत विशेष सुट देण्यात येते. यातील कीतीतरी मुले नंतर वरच्या पदावर पोचली. कामात चुका करत असतानादेखील त्यांना सांभाळून घेण्यात आले (याठीकाणी ब्राह्मणांवर मात्र कडक कारवाइ होत असे) त्यामुळे एखादा संघातील माणूस फक्त तुमच्याशी वाइट वागला म्ह्णून अख्खा संघच तसा आहे असे म्हणू नका.

डॉक्टर माझा अनुभव लिहिणे ही गैर आहे का? जगभरातल्या अनेक संघटनांचा दाखवायचा हेतू एक आणि अंत्यस्थ हेतू वेगळाच असतो हे मला सुचित करायचे आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

असा अनुभव आला असेल तर निस्श्चीत्च तो चांगला नाही आणि निंदनीय आहे.पण जरा ही चित्रफीत पहा आणि ठरवा भुजबळ कुटुंबीय भारावले ही बाब तुम्ही वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली आहे काय? किंवा त्याचा पाठपुरावा केला आहे काय असल्यास तोही टंकावा. नितवाचक

त्या ब्राह्मण कुटुंबाची वागणूक चुकीचीच आहे, पण अशी किती कुटुंबं तुम्हाला भेटली? तुम्ही म्हणता ते फुले आंबेडकरांच्या विचाराने वागणारे सर्वच जण सर्वसमावेशक वागतात का?

राजस्तान की गुजरातेत शालेय अभ्यासात नेहरुंचा उल्लेख गाळला आहे व संघ गाणी पुस्तकात सामील केली आहेत म्हणे. आता लवकरच या राज्यांत सुसंस्कारीत प्रजा जन्मास येइइल अशी अपेक्षा.

In reply to by mugdhagode

पाठ्यपुस्तके वाचुन पोरे निपजतात का निपजलेली पोरे ठराविक वयाची झाली की शाळेत जाऊन बुके वाचतात!?? अरे भाई कहना क्या चाहते हो आप??

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्यांना काय म्हणायचं नसतं , त्यांना फक्त अंधळा द्वेष करायचा असतो बापू :) जाऊद्या , तुम्ही कायला शक्ती आणि वेळ वाया घालवताय

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दोन्हीही होइल हो. शाळेत सध्या असलेली मुले आता सुधारतील. नंतर काही काळानी त्यानाही मुले होतील. ती बाय डिफील्ट जन्मापासुनच सुसंस्कारीत असतील.

In reply to by mugdhagode

कृपया कोणती संघ गाणी सांगू शकाल का? शालेय मुलांना शिकवू नयेत असे त्यांचे अर्थ आहेत का? संघाचे एक गाणे आपल्या आर्मीच्या मराठा लाईट इंफंट्रीच्या बँड पथकाने गेल्या महिन्याच्या 21 तारखेला रायगडावर म्हंटलेले मी स्वतः पाहिले व ऐकले आहे. हेही आपण चूक म्हणाल का?

चंद्रनील साहेब, मी "संघात असताना " तुम्ही जर खरंच संघात होतात तर संघ जातपात मानत नाही हे तुमच्या लक्षात आलं असतं. ते जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही संघात गेलातच नाही असा आरोप करण्याचे मी धारिष्ट्य करेन. तीन पिढ्या "संघात" असलेले "ब्राम्हण" कुटुंब असा देखावा उभा करून तुम्ही एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे तो खालच्या पातळीचा आहे एवढेच मी म्हणेन. संघ पोथीनिष्ठ आहे झापडबंद आहे हे मी मान्य करेन. किंवा त्यांची वरिष्ठ पिढी पुराण मतवादी किंवा हटवादी पण आहे हे हि मान्य करेन पण संघ जातपात मानतो हे मला मान्यच नाही. आपलयाला असा अनुभव आला त्याबद्दल आपण संघातील कोणाशी चर्चा केलीत का?आपला ब्राम्हण द्वेष स्पष्ट दिसतो आहे आणि त्यात संघाला गोवण्याचा आपला प्रयत्न अतिशय हीन पातळीचा आहे एवढेच मी म्हणेन. तो पूर्ण तुमचा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे कोणी शहानिशा करण्याची शक्यता नाही अशी खेळी खेळण्यात आपला काय हेतू आहे ते मला माहित नाही. लष्करात असल्यामुळे माझा संघाशी संबंध फारसा आलेलाच नाही परंतु लातूर किंवा गुजरात येथे झालेल्या भूकंपात काम करणारे देशभरातील स्वयंसेवक मी प्रत्यक्ष पहिले आहेत . आम्ही लष्करी माणसे आपली नोकरी म्हणून तिथे भूकंप सहाय्य कार्याला गेलो होतो आणि तो आमच्या कर्तव्यच भाग होता. परंतु स्वतःच्या खिशातील पैसे टाकून हे स्वयंसेवक काय श्रद्धेने तेथे काम करत होते ते पाहिले तर हि माणसे काय मातीची घडवली गेली आहेत याचा प्रत्यय येतो. लष्कर किंवा निमलष्करी दले सोडली तर तोंड बंद ठेवून इतक्या शिस्तीत काम करणारी संघटना भारतात दुसरी नसेल असे मला वाटते. असाच अनुभव माझ्या मित्रांना सुद्धा उत्तराखंड येथे भूकंपात आणि काश्मीरच्या पुरात आला आहे. काश्मीर मध्ये तर त्यांनी तेथील जनतेला( सर्व मुसलमानच होते ) मदत केली ती तर त्यांच्यावर मुस्लीम द्वेष्टे असा जाहीर आरोप असतानाही. जर आपण डोळे उघडे ठेवून पाहण्याचा प्रयत्न केलात तर सत्यस्थिती आपल्याला जाणवेल पण केवळ द्वेषाने भारून तुम्हाला आपलेच म्हणणे खरे आहे असे म्हणायचे असेल तर मी येथेच पूर्ण विराम देतो आहे.

In reply to by मृत्युन्जय

+१०००

In reply to by सुबोध खरे

नेपाळ भूकंपाच्या वेळी सुद्धा जगभरातल्या मिल्ट्रीज आल्या असताना ढिगार्याखाली गाडलेल्या प्रेतांना बाहेर काढण्याचे काम करणार्या केवळ तीनच संघटना होत्या; भारतीय लश्कर, भारताची आपातकालीन सेवा संस्था आणि राषट्रीय स्वयंसेवक संघ.

In reply to by सुबोध खरे

साहेब, धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे त्यामुळे 'वैयक्तिक अनुभव' या नावाखाली काहीही ठोकून द्यावे असा प्रकार आहे. म्हणजे सगळेच वैयक्तिक अनुभव खोटे नसतील पण असे बरेच 'वैयक्तिक अनुभव' लिहिले गेले की आपोआप बदनामी होतेच. टिंगल करावी असे बरेच मटेरिअल शाखेत असते. पण द्वेष करावा असे काय आहे हे समजण्या पलीकडे आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

खात्रीने सांगतो ते उत्तर देणार नाहीत आणि त्यांची जाहीर पाठराखण करणारे इकडे फिरकणार नाहीत हे ही खरे मी वर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली जाणार नाहीत. ठोकुनी दे ऐसाजे आणि इतरांनी दिलेल्या अनुभवास मात्र "कल्पनाविलास" म्हणून हेटाळणे खचितच भूषणास्पद नाही. मिपा नितवाचक नाखु

In reply to by सुबोध खरे

आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती व संघटना काम करत असतात .

In reply to by mugdhagode

आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती व संघटना काम करत असतात .
हो ना, आलेली मदत लाटण्याची. किंवा मदत पोचायच्या आधीच त्याचे पैसे लुबाडायची.