गाभा:
पुरोगामी होऊन जुन्या रुढी परंपरांना छेद द्यावा अशी अगदी योग्य भूमिका मांडणारी बहुतेक मंडळी कधीकधी मात्र कोड्यात टाकतात.
होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात. असं करून आपण ज्या विचारसरणीला विरोध करतो तिचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचा खप आपणच वाढवतोय
हे का बरं दिसत नाही यांना?
हे म्हणजे दिवाळीला आंघोळ करताना नरकासूर (नरकासूरच ना?) फोडण्यासारखंच आहे.
विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?
प्रतिक्रिया
15 Apr 2016 - 8:10 am | नाना स्कॉच
विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?
आंबेडकर फ़क्त पुरोगाम्यांचे का? बरंय! बरंच आहे!
असो.
15 Apr 2016 - 9:17 am | बोका-ए-आझम
ते अजिबात आंबेडकर पुरोगाम्यांचे वगैरे म्हणालेले नाहीत. त्यांनी तथाकथित पुरोगाम्यांच्या दुटप्पीपणावर आक्षेप घेतलेला आहे.
15 Apr 2016 - 9:35 am | नाना स्कॉच
तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत??
पुरोगाम्यांनी आंबेडकर जयंतीला डीजे लावा किंवा धांगड़धिंगा करा ह्याचा 'पुरस्कार' केल्याचे दाखवता का उदाहरण? किंवा स्वतःही धिंगाणा केल्याचे तरी उदाहरण दाखवता का एखादे?? का पुरोगामी दुटप्पीपणा तो बहाना है, बाकी औरही निशाना है म्हणायचे??
एकीकडे पुरोगामी ढोंगी म्हणायचे दुसरीकडे ते डीजे अन दंग्याला सपोर्ट करतात म्हणायचे, म्हणजे नेमके काय असेल? पुरोगामी सगळे आंबेडकराईट असतात असे म्हणता आहात की आंबेडकराईट सगळे पुरोगामी असतात अन पर्यायाने दुटप्पी असतात असे म्हणता आहात?
स्वतः लेखकाने जरी स्पष्टीकरण दिले तरी चालेल, बाकी सोडा, ठळक केलेल्या (स्वटंकित) वाक्यांचा अर्थ काय अभिप्रेत आहे ??
15 Apr 2016 - 11:04 am | बोका-ए-आझम
मी नाही किंवा धागाकर्त्यानेही नाही. यावरूनच काय ते लक्षात आलं. असो. पुरोगाम्यांनी निषेध केलेला नाही यावरून त्यांचा पाठिंबा आहे हे लक्षात येतंच. पुरोगामी मोदींवर किंवा कोणत्याही भाजप नेत्यावर आरोप करताना हेच तर्कशास्त्र वापरतात, त्यामुळे तेच त्यांनाही लागू पडतं.
27 Apr 2016 - 1:34 pm | स्वामी संकेतानंद
होय. फेसबुकवर दोन पोस्ट्स आहेत तशा. आणि त्याखाली भरपूर् कमेंट्स आहेत आणि शेअर पण मिळाले होते.
15 Apr 2016 - 8:23 am | अत्रे
नेमके कोणाबद्दल बोलताय हे कळेल का? पुरावा द्यावा.
काल्पनिक शत्रू का निर्माण करावेत माणसाने मी म्हणतो?
15 Apr 2016 - 10:57 am | वडापाव
माझ्या चेपुवरील मित्रयादीत असे बरेच महाभाग आहेत जे असा दुटप्पीपणा करताना वारंवार दिसून येतात. त्यांची नावं इथे किंवा इतरत्रही प्रकाशित करणं मला सौजन्याला धरून वाटत नाही.
बाकी औरही निशाना वगैरे काही नाही. काल्पनिक शत्रुही नाहीत. पण अशी दुटप्पी भूमिका घेणारी माणसं खरोखर आहेत. मला कही पे निगाहे कही पे निशाना फालतुगिरी जमत नाही, जे वाटतं ते स्पष्टपणे ज्याला त्याला बोलून मोकळा होतो. चेपुवर मला आलेला अनुभव इतरांनाही आला असेल असं वाटून मी तो मिपावर मांडला आहे. इतर कोणाला हा अनभव येत नसेल तर चांगलंय, मग मीच तेवढा दुर्दैवी म्हणायला हवा!
नाना स्काॅच, तुम्हाला बोक ए आझम यांनी उत्तर दिलेलं आहे तेच माझं उत्तर मानावं. मी काही समस्त पुरोगाम्यांना बोल लावत नाही. मी स्वतः नास्तिक आहे आणि सगळ्या धार्मिक रुढी परंपरांचा मला तिटकारा आहे. पण त्यांसोबतच पुरोगामित्वाच्या नावाखाली ज्या बावळट रुढी प्रचलित होत चालल्या आहेत त्यांनाही विरोध करावा इतकंच माझं म्हणणं आहे.
15 Apr 2016 - 10:59 am | विजय पुरोहित
मला कही पे निगाहे कही पे निशाना फालतुगिरी जमत नाही, जे वाटतं ते स्पष्टपणे ज्याला त्याला बोलून मोकळा होतो. +१११११११
15 Apr 2016 - 11:06 am | नाना स्कॉच
पण त्यांसोबतच पुरोगामित्वाच्या नावाखाली ज्या बावळट रुढी प्रचलित होत चालल्या आहेत त्यांनाही विरोध करावा इतकंच माझं म्हणणं आहे.
+100 सहमत!!
आता थोड़े डिटेल बोलतो
आपण म्हणता पुरोगामित्वाच्या नावं चालणाऱ्या खुळचट रूढ़ीपरंपराना विरोध, तर त्याला मी सहमती देतोच आहेत, फ़क्त जर कोणी म्हणत असेल की 'नव्या पुरोगामी परंपरा' म्हणजे अमुक एक धर्म किंवा जातीचे सण फेवर करणे आहे तर ते मला अमान्य आहे सर.
15 Apr 2016 - 11:12 am | वडापाव
मला 'नव्या फुरोगामी परंपरा' असं म्हणायला हवं होतं. संपादकांना शक्य असल्यास धाग्याचं नाव बदलून 'फुरोगाम्यांचे सण रुढी परंपरा' असं करावं.
15 Apr 2016 - 7:41 pm | विवेकपटाईत
स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे ९०% लोक ढोंगी असतात. अश्या लोकाना मी फार जवळून पहिले आहे. बाहेर एक आणि घरात ते वेगळे असतात. आपल्या फायद्या साठी ते पुरोगामी असतात.
15 Apr 2016 - 8:18 pm | तर्राट जोकर
ढोंगीच म्हणायचं तर भारतातली ९९ टक्के जनता ढोंगी मग काय सेकुलर, फेकुलर, धर्मांध, निधर्मांध, डावे, उजवे, अधले मधले. स्वार्थीपणात १०० टक्के प्रामाणिक आणि ढोंग करण्यात एकमेकांचे भाऊ.
16 Apr 2016 - 8:20 am | बोका-ए-आझम
मी आणि तुम्ही उरलेल्या १% लोकांमध्ये येतो.
16 Apr 2016 - 8:28 am | अत्रुप्त आत्मा
16 Apr 2016 - 9:00 am | विजय पुरोहित
लोल...
16 Apr 2016 - 5:03 pm | अजया
=)))
17 Apr 2016 - 11:27 am | असंका
=))
25 Apr 2016 - 7:48 pm | मितान
Lol !!!
17 Apr 2016 - 11:48 am | पैसा
तजोनी हल्ली उत्तरे द्यायचे सोडलंय म्हणून! =))
15 Apr 2016 - 8:27 pm | श्रीगुरुजी
याकूब मेमन, अफझल गुरू इ. चा महापरिनिर्वाणदिन साजरा करणे, टिपू सुलतानचा प्रकटदिन साजरा करणे इ. सोहळे पुरोगाम्यांचे सण मानता येतील का?
24 Apr 2016 - 8:20 pm | आनंदी गोपाळ
ते 'त्यांचे' सण आहेत, असे तुमच्यासारखे प्रचारक कुजबूज मोहिमांतून सांगत असत, आजकाल जाहीरपणे संस्थळांवर लिहू लागलेत.
चांगल्या विचारांचा प्रतिवाद करता न आल्याने त्याची बदनामी करणे हे जुनेच तंत्र आहे, पण ते पुन्हा एकदा इफेक्टिवली वापरले जाताना दिसते आहे.
24 Apr 2016 - 8:45 pm | श्रीगुरुजी
अरे अरे, माफ करा. याकूब मेमन, अफझल गुरू, टिपू सुलतान इ. विचारवंतांची बदनामी केल्याचे महापातक केल्याबद्दल व त्यामुळे तुमच्यासारख्या निधर्मी पुरोगाम्यांचे मन दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो.
आता खूष?
24 Apr 2016 - 11:03 pm | mugdhagode
तुम्ही का त्रास करुन घेताय ?
बुडाला --- पापी ! म्लेंछसंहार जाहला ! असा रोज १०८ वेळा जप करावा... --- च्या जागी याकुब्या , अफझुल्या वगैरे शब्द घालावेत.
25 Apr 2016 - 8:55 am | भंकस बाबा
तुमचे सेक्युलरव्वादी सध्या इशरत जहाँ, बाटला हाउस या प्रकरणी मूग गिळून बसले आहेत.
फार कशाला शायरा बानो प्रकरणात तर यांच्या कानावर काहीच आले नाही दिसते.
कनहैया तर जिथे जातो तिथे मोदींच्या नावाचा जप करत असतो.
म्हणजे कन्हैयाच्या लेखी पप्पू,इटालियन मैडम, लालू, मुलायम सगळे संत आणि मोदी तेवढे एक चोर!
फुकट प्रसिद्धिचे सर्व स्टंट संपले म्हणुन विमानात नाटके करून हां मुर्ख लक्ष वेधायला बघत आहे.
लवकरच याचा दिग्गिराजा होणार!
म्हणजे कुत्रे पण नाय विचारणार हो!
15 Apr 2016 - 9:24 pm | निमिष ध.
एकूणच फेबु वरील जनता बघून लेखकाचा पुरोगामी या शब्दाबद्दल गोंधळ उडालेला दिसतोय. खरे पुरोगामी असतील तर ते कुठल्याही जाळपोळीला विरोधच करतील आणि डीजेला सुद्धा. पण आता राजकारणाकरता फक्त पुरोगामी म्हणून घेत असतील तर मात्र वेगळा विषय आहे. पण त्याकरता लेखाचे नाव आणि एकूणच बाज चुकलेला वाटतोय.
फुरोगामी शब्द आवडला. जसे स्युडो-सेक्युलर तसेच हे फुरोगामी !
15 Apr 2016 - 9:55 pm | वडापाव
फुरोगामी शब्द माझा नाही.
16 Apr 2016 - 9:57 am | सतिश गावडे
बिच्चारे पुरोगामी. पब्लिक नाहक बदनाम करतंय त्यांना.
एक ते ब्लॉगर ज्यांना उठता बसता जळी स्थळी काष्ठी पाषाणी पुरोगामी दिसतात. आणि एक हे धागाकर्ते.
आगरकर, गोखले, राजा राममोहन रॉय, शाहू, फुले, आंबेडकर ही आदरणीय नावे पुरोगामी होती. तुम्ही भलत्याच लोकांना पुरोगामी म्हणून धोपटत आहात.
16 Apr 2016 - 10:22 am | सुबोध खरे
गावडे साहेब
रुपयाची किमत स्वातंत्र्याच्या वेळेस १ रुपया होती ती घसरत घसरत आता साडे तीन पैशाइतकी राहिली आहे. तितकीच किंमत आता प्रामाणिकपणा निस्वार्थीपणा या गुणांची राहिली आहे. तेंव्हा तुमची तुलना स्वातंत्र्य पूर्व काळातील पुरोगाम्यांची आजच्या तथाकथित पुरोगाम्यांशी करणे हा त्या लोकांचा अपमान आहे असेच मी समजतो.
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाचा बोकड( तट्टाणी म्हणायचे होते पण या लोकांची तेवढी पण लायकी नाही). हे सरकारी कुरणावर चरणारे बोकडच आहेत.
16 Apr 2016 - 11:10 am | नाना स्कॉच
डॉक्टर साहेब
हल्ली हल्ली 'पुरोगामी सरकारी मलीदा खातात/चरतात' वगैरे सतत ऐकायला येते , हे खातात म्हणजे नेमके काय करतात? कुठल्या स्वरुपात खातात? कॅश ऑर काइंड ? अशी काही उदाहरणे देता येतील का?
माझ्या वाचण्यात असे एक उदाहरण आलेले आठवते, ते म्हणजे अभिनेत्री अन तथाकथित पुरोगामी 'नंदिता दास' ह्यांच्या चित्रकार का संगीतकार काका ला अलॉट झालेला सरकारी बंगला अन तो खाली करायला त्यांची झालेली घालमेल, त्यावरून नंदिता सरकार विरोधक असल्याचे ,सिद्ध केले गेले होते.
आपल्याला असे वाटते का की सगळे तथाकथित पुरोगामी असलेच कॅश किंवा काइंड फेवर सरकारकडून कायम घेतात?? भारतातल्या सध्या बदनाम असलेल्या (रास्त बदनामी का अवाजवी ह्या वादात पडायची इच्छा नाही) सगळ्या पहिल्या फळीच्या पुरोगाम्यांनी असे फायदे घेतले आहेत का?? असल्यास त्या संबंधी अजुन वाचायला आवडेल म्हणजे पुढे मला सुद्धा कॉन्फिडेंटली 'होय हे तमाम लोकं सरकारी मलीदा खातात' असे आत्मविश्वासाने म्हणता येईल !
आगाऊ धन्यवाद अन उणे अधिक माफ़ी ___/\___
16 Apr 2016 - 2:49 pm | श्रीगुरुजी
या विषयावर गॅरी ट्रुमन यांचा खालील प्रतिसाद माहितीपूर्ण आहे.
http://www.misalpav.com/comment/755336#comment-755336
अजून एक लेख
https://www.newsbred.com/indian-media-sick-and-hurting
16 Apr 2016 - 11:32 am | राही
आज पुरोगामी हा टिंगलटवाळीचा शब्द ठरला असला तरी यातले काही खरोखर निष्ठेने आणि शांततेने जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धानिर्मूलन, एखाद्या धर्माच्या माणसांबद्दल त्यांच्या धर्मावरून/जातीवरून अप्रीती न दाखवणे, कर्मकांडे त्यागणे असे आचरण किमान स्वतःपुरतेतरी करीत असतात, स्वतःच्या आचरणाने इतरांना आदर्श घालून देत असतात. त्यासाठी इतरांचे शिव्याशाप खात असतात. ते कुणाचेच नसतात त्यामुळे कुठलाही एक धर्म, जात त्यांच्या हयातीत त्यांच्यामागे ठामपणे उभी राहात नाही. पुढे तीस-पस्तीस वर्षांनंतर त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्ष्यात येऊ लागते आणि पन्नास-शंभर वर्षांनंतर ते महान विचारवंत ठरतात. आगरकर काय, फुले काय, र.धों. कर्वे काय, सर्वांची त्यांच्या हयातीत प्रचंड कुचेष्टा आणि उपेक्षा झाली. कुणाच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली, कुणाची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली. त्यांना जाहीर निर्भत्सनेला तोंड द्यावे लागले. समाज त्यांच्याविरुद्ध विखार ओकत होता. समकालीनांना काळाच्या अतिसमीपतेमुळे यांच्या कर्तृत्वाचे मोल लक्ष्यात येत नसते. पण या मूठभर लोकांमुळेच हळूहळू बदल घडून येतात. आणि प्रत्येक पिढीत असे लोक निपजतच असतात. पुनरुक्ति करायची तर आपल्यासमोर असल्याने त्यांचे मोठेपण आपल्या लक्ष्यात येत नाही.
बदल घडतात हे गृहीतक मान्य असेल तर वरील मांडणीस आक्षेप घेण्याचे कारण दिसत नाही. बदल होतच नाहीत, सर्व काही जैसे थे आहे, हजार-पाचशे किंवा शेदोनशे वर्षांपूर्वीसारखेच आहे असे म्हणायचे असल्यास मुद्दा संपला.
काळ एव्हढा झपाट्याने बदलतो आहे की कालच्या सुधारकाची तत्त्वे आज जगताना सामान्य वाटू शकतात पण एकेकाळी ते जगणे सामान्य नव्हते हे लक्ष्यात आले की झाले.
काळाच्या चौकटीत दृश्य कसे दिसते ते महत्त्वाचे.
16 Apr 2016 - 7:38 pm | बोका-ए-आझम
तुम्ही म्हणताय तसे पुरोगामी हे कुठल्याही देशाला अभिमानास्पदच आहेत आणि ते कधीही दांभिकपणे वागणार नाहीत. हमीद दलवाईंनी तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, आमच्या धर्मात असंच असतं असं म्हटलं नाही. हे खरे पुरोगामी. आणि हमीदजींनी हे कुठल्याही लौकिक यशाच्या अपेक्षेशिवाय केलं. पण आजचे NGO-पुरोगामी तसे आहेत का? ते तर नुसतेच हंगामी आहेत. त्यांचं पुरोगामीत्व हे सोयीस्कर आहे. शिंगणापूरला स्त्रियांना बंदी ब-याच काळापासून आहे. आत्ताच आंदोलन करण्याची गरज का उद्भवावी? गेल्या दोन वर्षांत असं काय झालं की मंदिरप्रवेशाच्या केलाच पाहिजे अशी निकड निर्माण झाली? अशा सोयीस्कर भूमिका घेणाऱ्यांना काहीही म्हणा, पुरोगामी म्हणू नका. तो त्या शब्दाचा अपमान आहे, कारण महात्मा फुले आणि आगरकरांसारखे महान लोक त्या अभिधानाशी जोडले गेलेले आहेत.
16 Apr 2016 - 12:13 pm | सुबोध खरे
राही ताई
पुरोगामी हा शब्द टिंगल टवाळीचा का झाला आहे? तर हिंदू धर्मावर टीका करणे आणी इतर धर्मांची तळी उचलणे यात धन्यता मानणार्यांनी आम्ही पुरोगामी आहोत आणी हिंदू धर्म "मानणाऱ्या" लोकांना बुर्झ्वा ठरवले आहे. धर्म मानणे किंवा न मानणे हा वैयक्तिक प्रश्न असताना केवळ हिंदूंची बाजू घेणाऱ्या भाजप ला विरोध पण धर्मांध असणार्या इतर कोणत्याही पक्षाबरोबर युती करणे हे सर्व तथाकथित पुरोगामी लोक करत आले आहेत.यात "सर्व" समाजवादी आणि कम्युनिस्टही येतात.दुटप्पीपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे.कम्युनिस्टांची निष्ठा कुठे आहे हे तर स्वातंत्र्य लढ्यापासून स्वच्छपणे दिसत असूनही ते पुरोगामी ठरतात.
शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय "घटनादुरुस्ती" करून फिरवणारे राजीव गांधी पुरोगामी लोकांना मान्य होतात पण धर्मांतराला बंदी करा म्हणणारे हिंदू लोक मात्र पुरातन होतात. एकीकडे घटना हीच सर्वोच्च मानायची पण त्याच वेळेस अल्पसंख्यांकांना झुकते माप द्यायचे हा पुरोगामीपणा ठरत आहे. म्हणून आज तीन वेळा तलाक हा स्त्रियांच्या मुलभूत हक्काच्या विरुद्ध आहे असे सर्वोच्च न्यायालय म्हणते तेंव्हा सर्वोच्च न्यायालयाला आमच्या वैयक्तिक बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही असे म्हणणार्या मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळा चा(AIMPLB) निषेध करण्याची हिम्मत एकाही पुरोगाम्याने दाखवलेली नाही.
अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन हा एकमेव अजेंडा असणारे अनेक लोक स्वतःला "पुरोगामी" म्हणवतात. इशारत जहानला "बहिण" मानणारे किंवा तिच्या नावाने रुग्णवाहिका सेवा सुरु करणारे पुरोगामी ठरतात हीच एक शोकांतिका.
बाकी "आताच्या" तथाकथित पुरोगामी लोकांनी आपण आगरकर,सावरकर, आंबेडकर किंवा फुले आहोत हे म्हणणे म्हणजे "टिनपाट" कवीने स्वतःला उद्याचा कालिदास म्हणण्यासारखे आहे.
16 Apr 2016 - 1:59 pm | mugdhagode
पूर्ण बहुमताचे भाजपा येउन दोन वर्षे झाली. आता तरी गांधी नेहरु काँग्रेसला सोडा.
रच्याकने , साखरपुडा / लग्न करुन राष्ट्रकार्य करायला संसार सोडतात , ते तलाक तरी बोलतात का ? पोटगी देतात का ?
16 Apr 2016 - 1:59 pm | सतिश गावडे
डॉक, तुमचं म्हणणं योग्य आहे. मी ही तेच म्हणतोय की भलत्याच लोकांना पुरोगामी म्हणून धोपटलं जातंय. त्यामुळे पुरोगामी हा शब्द बदनाम होतोय.
17 Apr 2016 - 12:15 am | राही
पुरोगामी आणि अल्पसंख्य समाज इतकेच समीकरण आहे का? आपल्या मनात तसे असेल तर पुरोगाम्यांनी चालवलेल्या अनेक चळवळी, समाजसुधारणा ह्याबद्दल लोकांना माहिती नाही असे म्हणावे लागेल. महिलांविषयी तर अनेक गट वेगवेगळ्या क्षेत्रांत सक्रिय आहेत. वेश्यांचे आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या रात्रीच्या निवार्याचा प्रश्न(त्या वेळी ही मुले आईबरोबर राहू शकत नाहीत.), महिला कामकर्यांचे, घरगुती महिला कामगारांचे प्रश्न, त्यांचे वेतन, राइट टु पी, बायकांचे आरोग्यविषयक आणि मासिकपाळीसंबंधी प्रश्न, (सॅनिटरी नॅप्किन्सची उपलब्धता आणि प्रबोधन- यासाठी पुष्कळ श्रम आणि वेळ खर्ची पडला) त्यांचे लैंगिक शिक्षण, कचरा वेचणार्या बायकांचे संघटन, त्यांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण, देवदासीप्रथा निर्मूलन, त्यांचे पुनर्वसन (याला बर्यापैकी यश आले आहे.) स्त्रीभ्रूणहत्याविरोध, गर्भलिंगनिदानविरोध, बेटी बचाओ जागृती, जातपंचायत निर्मूलन, वाळीत टाकण्यास प्रतिबंध, असे अनेक पैलू आहेत या कार्याचे. आणि हे कार्य दोन पातळ्यांवर चालते. १) वैचारिक प्रबोधन, माध्यमांद्वारे प्रसार्/प्रचार, २)प्रत्यक्ष फील्ड वर्क. वैचारिक प्रबोधनामुळे फील्ड वर्कसाठी भूमी आणि भूमिका तयार होते. या कार्याचाच एक भाग म्हणजे जातिभेद निर्मूलन, मंदिरप्रवेश वगैरे. शिवाय नाडलेल्यां महिलांच्या न्यायालयीन लढ्यासाठी साहाय्य, अॅडॉप्शन्संबंधी कायदे महिलांना अधिक अनुकूल करणे, कायदेविषयक इतर अडचणींचे निवारण( फ्लेविया अॅग्नेस यांचे नाव अनेकांनी ऐकले असेल.) महिलांनी अपारंपरिक व्यवसायात शिरावे म्हणून उत्तेजन, प्रशिक्षण, मानसोपचार, बेबनाव झालेल्या जोडप्यांचे समुपदेशन अशी अगणित कामे चालतात. आणि 'आत्ताच का' या प्रश्नावर 'आत्ता का नको' असा प्रतिप्रश्न करता येईल. (मंदिरप्रवेशाच्या चळवळीला दीर्घ इतिहास आहेच.)
आणि जेव्हा सकल महिलालढ्याचा समग्र इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात या मंदिरप्रवेश चळवळीचा उल्लेख असेलच असेल. विरोधकांचा मात्र असेल की नाही याबद्दल शंका आहे.
18 Apr 2016 - 8:10 pm | सुबोध खरे
राही ताई
आपण पुरोगामी आणि समाजसेवा यात गल्लत करत आहात. हि जाणून बुजून आहे कि अनवधानाने आहे ते माहित नाही पण अनवधानाने आहे असे समजून मी भाष्य करीत आहे.
श्री सत्य साई बाबा, मत श्री अमृतानंदमयि देवी पासून ते तिरुमला तिरुपती देवस्थान, श्री मंजुनाथ देवस्थान धर्मस्थळ हे धार्मिक लोक बरेच समाजसेवेचे प्रकल्प राबवत असतात. मदर तेरेसा यांचे धर्मप्रसाराच्या छुप्या अजेन्द्याच्या मागे का हॊइन पण समाजसेवेचे लक्षणीय काम करीत आहेत यात शंका नाही. वनवासी कल्याण आश्रम सारख्या इतर संस्था किंवा रुबिना पटेल आणि त्यांची रुबिना प्रशिक्षण संस्था सुद्धा समाजसेवेचे भरीव काम करत असतात. यातले कोणीही आम्ही पुरोगामी आहोत असा दावा करीत नाहीत.
तेंव्हा आपण उद्धृत केलेली बरीच कामे पुरोगामी नसलेले लोकही करीत असतात. तेंव्हा समाजसेवा हि पुरोगामी लोकांची "मक्तेदारी" नाही. मुळात समाजसेवा हि कोणाचीच मक्तेदारी नाही कि पुरोगाम्यांनी आपण एवढे आणि तेवढे काम करतो आहोत आणि आमच्यावर कोणी टीका करू शकत नाही असा दावा करावा. सामान्य माणूस सुद्धा जेंव्हा आपल्या मोलकरणीच्या मुलाची फी भरतो तेंव्हा तो पण समाजसेवेचा आपला खरीच वाट उचलत असतो. बाबा आमटे किंवा प्रकाश आमटे सारखे लोक दिग्गज आहेत म्हणून सामान्य माणूस कः पदार्थ आहे असेही नाही.
आज तुम्ही मिपावर विचारले तर जवळ जवळ १०० % लोक काहीतरी समाजसेवा करत असतातच. तेंव्हा पुरोगामी लोक एवढे काम करता याची यादी देण्याची गरज नव्हती. कारण त्यातून पुरोगामी"च" लोक समाजसेवा करतात आणि त्यांना बोलायचा कोणाला हक्क नाहि असा एक सूर निघतो असे माझ्या अल्पमतीला वाटते.
विरोधकांचा मात्र असेल की नाही याबद्दल शंका आहे.
सगळे विरोधक समाजसेवा करीतच नाहीत असच अर्थ आपल्या या शेवटच्या वाक्याचा निघतो. एखादा हाडाचा समाजसेवक सुद्धा त्याच्या विचार सरणी प्रमाणे मंदिर प्रवेशाला विरोध करीत असेल. याचा अर्थ त्याची समाजसेवा "कुचकामी" आहे असे आपण म्हणू शकत नाही.
16 Apr 2016 - 2:00 pm | नुस्त्या उचापती
हे म्हणजे पुरोगाम्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आंबेडकरवादयांना गोळ्या घालण्याचा प्रकार झाला .
16 Apr 2016 - 2:07 pm | सस्नेह
आक्षेप रूढी-परंपराप्रिय पुरोगामी लोकांबद्दल आहे की वाहतूक कोंडी आणि गोंगाटाबद्दल आहे ?
माझं मत, वाहतूक कोंडी आणि गोंगाट निर्माण करणार्या सर्व उपक्रमांवर कायद्याने बंदी घालायला हवी.
17 Apr 2016 - 11:15 am | राही
अगदी सहमत.
आणि त्याहूनही अधिक म्हणजे यापुढे कोणत्याही सणाचे सार्वजनिकीकरण होऊ नये. आहे तेव्हढे बस्स झाले. तेही कमी होईल तर बरे.
16 Apr 2016 - 2:11 pm | नुस्त्या उचापती
नाही . ह्यांचं वेगळंच दुखणं आहे .
16 Apr 2016 - 7:33 pm | वडापाव
दुखणी खूप आहेत हो. हे त्यातलंच एक आहे असं समजा. आणि दुखणं जसं मांडलंय तसंच आहे. छुपं काही नाही.
16 Apr 2016 - 9:25 pm | भीमाईचा पिपळ्या.
अवघड जागी दुखणे आणि जावै डॉक्टर ;)
16 Apr 2016 - 2:20 pm | श्रीगुरुजी
ढोंगी पुरोगाम्यांवर हा एक उत्कॄष्ट लेख आहे.
http://www.loksatta.com/agralekh-news/as-compare-to-dadri-more-dangerous...
16 Apr 2016 - 2:38 pm | सतिश गावडे
काही दिवसांपूर्वी झालेल्या माफी प्रकरणात कुबेरांना माफ करुन लोकसत्ता वाचतो अशा अग्रलेखांसाठीच. :)
16 Apr 2016 - 7:42 pm | विजय पुरोहित
गुरुजी भारीच आहे लेख! लोकसत्तामध्ये इतके निःपक्ष लिखाण यावे हे आश्चर्यच आहे. ढोंगी फुरोगाम्यांचा चांगलाच पर्दाफाश केलाय.
16 Apr 2016 - 2:43 pm | राही
लिहिण्यात माझी थोडी चूक झाली. "आज पुरोगामी हा शब्द टिंगलटवाळीचा ठरला असला तरी" या शब्दांऐवजी मी असे लिहायला हवे होते की 'पुरोगामी हा शब्द नेहमीच समकालीनांकडून टिंगलटवाळीचा ठरत आला आहे.' पुरोगामी याचा अर्थ सांगायला नकोच. काळाच्या पुढे जाणारा, पुढे पाहाणारा तो पुरोगामी. बहुतेक समकालीनांकडे बहुधा पुढे काय घडणार आहे ते समजण्याइतका द्रष्टेपणा नसतो आणि हे साहजिकच आहे. फारच थोडे लोक काळाची पावले ओळखू शकतात. त्यामुळे पुरोगामी हे नेहमीच अल्पसंख्य असतात. आणि प्रवाहाविरुद्ध पोहणारा वेडाच असतो, नाही का? उगीच आत्मघात करून घेणारा? आपल्याच पायांवर कुर्हाड मारून घेणारा?
मुसलमानांमध्ये जागृती वगैरे पुरोगाम्यांकडून अपेक्षित असते. तर या बाबतीत असे म्हणता येईल की त्या धर्मातल्या सुधारणावाद्यांना बळ देण्याचे काम कित्येक वर्षे बिनबोभाट्याने चालू आहे. तलाकपीडित महिलांचा प्रश्न, मुस्लिम महिलांचा मशीदप्रवेशाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न यामध्ये अनेक सुधारणावादी गट कार्यरत आहेत. किंबहुना देशातल्या सर्व प्रमुख सुधारणावाद्यांचा (धर्म/जात/निरपेक्ष) आपसात बर्यापैकी संपर्क असतो. प्रसिद्धी मुद्दामच टाळली जाते कारण ती कार्यहानी करते.
(आता पुढील परिच्छेदावर वादविवाद आणि असहमती होऊ शकते. मी कायदेतज्ज्ञ नाही. यावर इथले कायदेतज्ज्ञ योग्य मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा ठेवून लिहिले आहे.)
सुप्रीम कोर्टाने (१९८५) 'सेक्यूलर अॅलिमनी लॉ'चा आधार घेत असा निर्णय दिला होता की शाह बानोच्या पतीने तिला रु.१७९ असा मेन्टेनन्स तहहयात द्यावा. मुस्लिम लॉमध्ये 'इद्दत'च्या (पतीचा मृत्यु अथवा घटस्फोट या नंतरचा दु:खाचा आणि अलिप्ततेचा ठराविक काळ. या काळामध्ये ती महिला पुनर्विवाह करू शकत नाही.) काळापुरताच मेन्टेनन्स देण्याची तरतूद आहे. ही तहहयात मेन्टेनन्सची तरतूद कडव्या मुस्लिमांना आवडली नाही आणि त्यांनी 'धर्मामध्ये हस्तक्षेप' असा गदारोळ केला. त्यावर राजीव गांधी सरकारने वरकरणी मुस्लिमांना खुश करताना 'मुस्लिम लॉ अॅक्ट १९८६(Protection of Rights on Divorce) मंजूर केला. हा कायदा विरोधकांच्या खूपच उपयोगी पडला कारण शाह बानो निवाडा गुंडाळून ठेवणारा कायदा' या नावाखाली त्याची प्रसिद्धी आणि एन्कॅशमेंट करता आली. पण या कायद्यात एक कलम [section 3(1)(a)] घातले गेले होते ज्या योगे घटस्फोटित पत्नीसाठी 'रीज़नेबल अँड फेअर' मेन्टेनन्स ठेवण्याची आणि अदा करण्याची जबाबदारी पतीवर आली. म्हणजे वास्तवात या कायद्याने शाह बानो निवाड्याची पायमल्ली तर केली नाहीच उलट तो निर्णय उचलून धरला. मुस्लिम महिलांच्या मागणीला/स्थितीला बळकटी आली, कारण 'सेक्यूलर अॅलिमनी लॉ' अन्वये अॅलिमनीची कमाल मर्यादा रु.५०० होती तर या नव्या मुस्लिम वुइमेन्स अॅक्टमध्ये अशी कोणतीही कमाल मर्यादा नव्हती. यावर शाह बानोच्या वकीलांनी एक पिटिशन फाइल केले.'जर हा कायदा मुस्लिम घटस्फोटित महिलांना पोटगी नाकारत असेल तर तो घटनाविरोधी आहे म्हणून तो रद्द करावा' या स्वरूपाचे हे पिटिशन होते. यावर २००१मध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा शिक्कामोर्तब केले की "या कायद्यात कुठीही मुस्लिम महिलांना पोटगी नाकारण्यात आलेली नाही. उलट, जरी मुस्लिम वुइमेन्स अॅक्ट हा शाह बानो निवाडा फिरवण्यासाठी केलेला दिसला तरी वास्तवात तो या निवाड्यातले rationale codify करणारा आहे". म्हणजे वरकरणी हा नवीन लॉ मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा/करण्यासाठी केलेला वाटला तरी त्याने मुस्लिम महिलांचे स्थान अधिक सुरक्षित केले. (विकीवरून साभार.)
16 Apr 2016 - 5:17 pm | पैसा
रुबिना पटेल यांच्याबद्दल वाचले होते की त्यांच्या चांगल्या सुशिक्षित नवर्याने न्यायालयाच्या निर्णयानंतरही त्यांना पोटगी किंवा मुलाचा ताबा द्यायला नकार दिला होता, तसेच मुस्लिम महिला असल्याने पोलिसांनी केस दाखल करून घ्यायला नकार दिला होता.
16 Apr 2016 - 6:00 pm | सुबोध खरे
@राही ताई
काय पुरोगामी कोलांटी आहे?
त्यावर "राजीव गांधी सरकारने वरकरणी मुस्लिमांना खुश करताना"
कशाला शब्दांचे खेळ करता?
राजीव गांधीनी निवडणूक वर्षात स्वच्छ आणि उघडपणे मुसलमानांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला होता. This case caused the Congress government, with its absolute majority, to pass the Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, 1986 which diluted the judgment of the Supreme Court and, in reality, denied even utterly destitute Muslim divorcées the right to alimony from their former husbands हे विकीचेच शब्द आहेत
However the Court held that if the Act accorded Muslim divorcees unequal rights to spousal support compared with the provisions of the secular law under section 125 of the Criminal Procedure Code, then the law would in fact, be unconstitutional
हे daniel लतीफी केस मधील सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे.
त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याच कायद्याचा अर्थ असा वेगळा लावत मुसलमान स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत याचे कारण भारतीय दंडविधान संहिता (क्रिमिनल प्रोसीजर कोड) सर्वाना एकच आहे. ( सिव्हिल प्रोसिजर कोड- नागरी कायदा वेगळा असला तरीही) यामुळे हे सर्वोच्च न्यायालयाला करता आले. अन्यथा मुसलमान स्त्रिया सहाव्या शतकात ढकलल्या गेल्या. त्यावेळेस सुद्धा कोणताही पुरोगामी राजीव गांधींचा विरोध करायला पुढे आला नव्हता.
Makarand Paranjape sees the overruling of Supreme Court verdict in Shah Bano case which happened when the Congress party was in power, as one of the examples of the party's pseudo-secular tactics which allowed "cynical manipulation of religion for political ends
कशाला राजीव गांधीनी मुसलमान स्त्रियांना न्याय मिळवून द्यायला मुद्दाम असा कायदा पास केला असा शब्द्च्छल करता.
16 Apr 2016 - 7:58 pm | mugdhagode
http://www.rediff.com/news/2007/jun/09sc.htm
मुस्लिम स्त्री पोटगी मागु शकते.
आणि जर ती सक्षम असेल तर पोटगी नाकारलीही जाऊ शकते.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Qualified-woman-cant-clai...
http://vikaspedia.in/social-welfare/women-and-child-development/meera-di...
हेही पहा..
16 Apr 2016 - 8:18 pm | mugdhagode
In the absence of a husband, from whom can she ask maintenance?
If a Hindu woman is unable to maintain herself on her own or from the estate of her husband, she can seek maintenance from
her parents, or her children, failing which she can seek maintenance from her father-in-law.
A Muslim woman, after the iddat period can ask for maintenance from her parents, children, relatives who would be entitled to
inherit her property and the State Wakf board.
तुमच्या भगवंतानी कितीतरी हजार बायकांची जबाबदारी घेतली म्हणून कौतुक करता ना? हा त्याचाच प्रकार.
16 Apr 2016 - 8:20 pm | mugdhagode
http://www.saathii.org/sites/default/files/legal-literacy/property-right...
16 Apr 2016 - 9:01 pm | सुबोध खरे
मोगा खान
तुमचं वक्फ बोर्ड मशिदीतील इमामाला अडीच हजार रुपये आणी मुअझ्झीन ला महीना दोन हजार रुपये पगार देतं. ते तलाक पिडीत महिलेला काय देणार?
http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/Trying-times-for-imams...
http://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/AP-State-Minorities-Co...
http://www.thehansindia.com/posts/index/2016-01-01/Imams-muezzins%E2%80%...
उघडं गेलं नागड्य़ाकडे अशी परिस्थिती. काय लाल करता उगाच?
18 Apr 2016 - 7:13 pm | श्रीगुरुजी
राही यांचा शहाबानो खटल्यासंदर्भात वरील प्रतिसाद वाचून अत्यंत आश्चर्य वाटले. प्रतिसादात पूर्णपणे चुकीचे विश्लेषण केले आहे.
वरकरणी? हा कायदा धर्मांध मुस्लिमांच्या पुढे मान तुकवून त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी केला होता. या खटल्यापूर्वी अशी पद्धत होती की नवर्याने ३ वेळा तलाक म्हणून घटस्फोट दिला की पोटगी म्हणून लग्नात कबूल केलेली मेहेरची रक्कम द्यावी लागायची. कित्येकवेळा ही रक्कम १ रूपया इतकी कमी असायची. शहाबानोला नवर्याने ६० व्या वर्षी घटस्फोट दिल्यावर तिची पंचाईत झाली कारण ती स्वतः अशिक्षित होती व तिच्याकडे उत्पन्नाचे साधनच नव्हते. त्यामुळे तिने एका वकीलाच्या मदतीने न्यायालयात खट्ला दाखल करून पोटगी मागितली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल देऊन तिला तहहयात पोटगी द्यायचा निर्णय दिला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा धर्मांध मुस्लिमांनी कांगावा केला. अनेक शहरातून या निर्णयाविरूद्ध मोर्चे काढण्यात आले. धर्मांध मुस्लिमांच्या पुढे गुडघे टेकून राजीव गांधींनी अक अत्यंत अन्यायकारक कायदा केला. या नवीन कायद्यानुसार घटस्फोटित मुस्लिम स्त्रियांचा पोटगी मिळण्याचा हक्क काढून घेतला गेला. नवीन कायद्यानुसार घटस्फोटानंतर मुस्लिम नवर्याने बायकोला फक्त इद्दतच्या काळापुरतीच पोटगी देणे बंधनकारक केले. सर्वसामान्य मुस्लिम स्त्रियांकरता इद्दतचा काळ म्हणजे ३ मासिक पाळींचा एकूण काळ (म्हणजे अंदाजे ३ महिने). ३ महिन्यानंतर तिला पोटगी देण्याची जबाबदारी तिच्या माहेरवर ढकलण्यात आली. माहेरची माणसी पोटगी देण्यास असमर्थ असली तर पोटगी देण्याची जबाबदारी सरकारी मदतीवर चालणार्या वक्फ बोर्डावर ढकलण्यात आली. म्हणजे मुस्लिम नवर्याने मनात येईल तेव्हा ३ वेळा तलाक म्हणून बायकोमुलांना घराबाहेर काढून नवीन लग्न करायचे व आधीच्या बायकोमुलांची जबाबदारी सरकारने घ्यायची.
अत्यंत चुकीचे विश्लेषण. कोणतीही कमाल मर्यादा ठेवली नाही पण पोटगीची किमान रक्कम पण ठेवली नाही. त्यामुळे घटस्फोटीत मुस्लिम स्त्रीला दरमहा किमान किती रक्कम मिळावी यावर काही नियंत्रणच राहिले नाही. तसेच तिला कायम माहेरच्या किंवा वक्फ बोर्डाच्या दयेवर ढकलून दिले.
27 Apr 2016 - 5:25 pm | पुंबा
पोटगी नाकारली नाही असे आपण म्हनता ते क्षणभर खरे धरू, पण ह्या कायद्याने मुस्लिम महिलांना घटस्फोतानंतर पोटगी देणे पतीला कंपल्सरी केले नाही ना. मग कुठलाही मुस्लीम पती पोटगी का देईल?
16 Apr 2016 - 8:45 pm | सुबोध खरे
मोगा खान
तुमच्याच दुव्यातील वाक्ये खाली देत आहे
"तुमचा" इस्लाम बायकांची किंमत पुरुषांच्या अर्धी ठरवतो( तो सहाव्या शतकातच अडकला आहे आणी बाहेर येण्याची शक्यता नाही)
Muslim Law
Daughters
In inheritance, the daughter's share is equal to one half of the son's in keeping with the concept that a woman is worth half a man.
Hindu Law
Daughters
Daughters have equal right of inheritance as sons to their father's property.
Daughters also have a share in the mother's property.
MUSLIM Wives
In Islamic law a woman's identity, though inferior in status to a man's is not extinguished in him when she marries
Thus she retains control over her goods and properties. She has a right to the same maintenance he gives to his other wives, if any, and may take action against him in case he discriminates against her.मुळात दुसरी बायको उरावर आणून कशी बसवता येते
The Supreme Court has held that in the case of divorce, a Muslim husband is liable to make reasonable and fair provision for the future of the divorced wife which obviously includes her maintenance as well. Such a reasonable and fair provision extending beyond the iddat period must be made by the husband within the iddat period in terms of Section 3 (1Ha} of the Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, 1986 and liability of Muslim husband to pay maintenance is not consigned to iddat period.हे दंड विधान संहितेत आहे म्हणून
Right to mehr' according to the terms of the contract agreed to at the time of marriage.गरीब महिलांमध्ये मेहर १ रुपया असतो. तेंव्हा एखाद्या बाईला तीन वेळा तलाक म्हणून तोंडावर एक रुपया फेकून हाकलून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
She will inherit from him to the extent of one eighth if there are children or one fourth if there are none. If there is more than one wife, the share may diminish to one sixteenth. In circumstances, where there are no sharers in the estate as prescribed by law, the wife may inherit a greater amount by will. A Muslim may dispose of one third of his property by will, though not to a sharer in the inheritance.
HINDU Wives
A married woman has exclusive right over her individual property. Unless she gifts it in part or wholly to anyone. She is the sole owner and manager of her assets whether earned, inherited or gifted to her.
Entitled to maintenance, support and shelter from her husband, or if her husband belongs to a joint family, then from the family.
Upon partition of a joint family estate, between her husband and his sons, she is entitled to a share equal to as any other person. Similarly, upon the death of her husband, she is entitled
to an equal share of his portion, together with her children and his mother.
In a crucial ruling, the Supreme Court said that a 1986 law framed in the wake of Shah Bano case would not come in the way of an estranged Muslim woman seeking alimony from her husband under section 125 CrPC, which provides for maintenance to a divorced or neglected woman.
हे भारतीय दंड विधान संहिता( क्रिमिनल प्रोसिजर कोड) मुसलमानांना लागू आहे म्हणून शक्य आहे. शहाबानो केसला सर्वोच्च न्यायालयाने काढलेला कालवा आहे म्हणून. मुसलमान नेत्यांचा आणी पुरुष पुंगवांचा दुटप्पी पणा येथेच सिद्ध होतो. त्यांना समान नागरी संहिता नको पण दंड विधान संहिता एकाच हवी आहे कारण शरीय खाली चोरी केली तर हात तोडले जातील आणी बलत्कार केला तर दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा मिळेल. तेंव्हा फौजदारी कायदा आधुनिक भारताचा आणी नागरी कायदा ६ व्या शतकातील पुरुषांच्या फायद्याचा. हि शुद्ध हरामखोरी आहे.
स्वतःलाच खड्ड्यात घालणारे दुवे देता. याला फुटबॉल मध्ये सेल्फ गोल म्हणतात
16 Apr 2016 - 9:16 pm | mugdhagode
In a crucial ruling, the Supreme Court said that a 1986 law framed in the wake of Shah Bano case would not come in the way of an estranged Muslim woman seeking alimony from her husband under section 125 CrPC, which provides for maintenance to a divorced or neglected woman.
जरा नीट वाचा.
16 Apr 2016 - 11:44 pm | राही
१९८६च्या (शाह बानो केस संदर्भातल्या) कायद्याने मुस्लिम महिलांची गळचेपी केलेली नाही, हा कायदा मुस्लिम महिलांच्या पोटगीच्या आड येत नाही. उलट थोडे संरक्षणच दिले आहे.
असो.
17 Apr 2016 - 12:38 am | बोका-ए-आझम
कसं काय संरक्षण मिळतं ते.
18 Apr 2016 - 10:14 am | सुबोध खरे
राही ताई
उगाच राजीव गांधींचे लंगडे समर्थन करून नका. भारतातील झाडून सगळ्या कायदे पंडितांनी त्यांच्या या घटना दुरुस्तीचा निषेध केला आहे यात श्री फली नरिमन किंवा श्री सोली सोराबजी यांसारखे प्रख्यात घटना पंडित आहेत. ( हि नवे मुद्दाम देत आहे कारण एकतर हि सर्व मान्य नवे आहेत आणि हे दोघेही "हिंदू/ प्रतिगामी" नाहीत.
भारतीय दंडविधान संहिता आणी मुस्लीम वैयक्तिक कायदा यात फारकत करून दंड विधान संहिता मुसलमानांना लागू होते आणी म्हणून मुस्लीम वैयक्तिक कायदा दंडविधान संहितेच्या आड येऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. Before Memory Fades हे श्री फली नरिमन या अतिशय उच्च घटना पंडितांचे आत्मचरित्र जरूर वाचा आणि मग असे फालतू श्लेष काढा. http://www.amazon.in/Before-Memory-Fades-An-Autobiography-ebook/dp/B0058... येथे उपलब्ध आहे.
किंवा "आधुनिक भारतावर सखोल परिणाम करणारे १० महत्त्वाचे खटले" हेही पुस्तक वाचून पहा http://www.freepressjournal.in/ten-cases-that-impacted-modern-india/248794
26 Apr 2016 - 7:47 pm | ऋषिकेश
राहितैताणि तुम्ही दोन वेगळ्या प्रतलावरून बोलताय आणि दोघांचेही मुद्दे वैध आहेत.
शहाबानो प्रकरणानंतर राजीव गांधींनी जो ऐतिहासिक गोंधळ घातला त्यात त्यांनी तलाकच्या पद्धतीत हस्तक्षेप करताना कच खाल्ली हे खरे आहे. मात्र राही यांचा रोख तिथे नसावा. त्यांचा रोख सद्यपद्धतीमध्ये मुस्लिम महिलांना जे हक्क दिलेत त्या हक्कापासून हिंदू महिला वंचित असल्याकडे असावा. पहिल्या पत्नीला घटस्फोट देताना 'तनखा'चा हक्क तर झालाच शिवाय दुसर्या पत्नीलाही तसा हक्क उपलब्ध आहे. हिंदुमध्ये जिथे एकापेक्षा अधिक बायका केल्या जातात तिथे दुसर्या बाईच्या हक्कावर गदा येते. तिला सद्य कायदा न्याय देऊ शकत नाही. सद्य हिंदू वैयक्तिक कायद्यानुसार दोघींशी लग्न करणेच बेकायदेशीर आहे. शिवाय किमान एका पिडीत व्यक्तीने (दोन्ही पैकी एका पत्नीने) अथवा तिच्या निकटतम नातेवाईकांनी तक्रार केल्याशिवाय पोलिस तक्रारही दाखल करून घेऊ शकत नाहीत, अटक/कारवाई तर दूरची गोष्ट. त्यामुळे कायदा काहिहि असला तरी अल्प तरीही सायझेबल प्रमाणात हिंदू पॉलिगामी चाल्ते. अशावेळी दुसर्या हिंदू स्त्रीच्या हक्कांवर घाला येतो. जो मुसलमान स्त्रीच्या बाबतीत येत नाही. राहिंचा रोख इथे असावा.
यावर एक फार वेगळा दृष्टिकोन मांडणारा लेख पलिकडल्या हिमाल साउदेशियनच्या अंकात होता. त्याचा दुवा:
http://himalmag.com/common-code-uncommon-challenges/
बघा पटतंय का वाचून. जरा मोठा लेख आहे हे मान्य :)
26 Apr 2016 - 7:59 pm | तर्राट जोकर
=))
16 Apr 2016 - 11:35 pm | mugdhagode
इस्लामने स्त्रीयांचे अधिकार इस्लामच्या सुरुवातीपासुनच मान्य केले आहेत. मुलाच्ञा निम्मे मुलीला , निदान अधिकार तरी दिलेत
दहा हजार वर्षाचे वय असलेल्या धर्मात विवाहीत मुलीला संपत्तीत अधिकारच नव्हता. पिता रक्षति कौमार्ये ..... वगैरे ....
ज्यांच्यावर चिखल्फेक करायला हा धागा काढलाय त्यांचे दैवत डॉ. बाबासाहेबानी कायदे केल्याने आताशी ५० वर्षात हे अधिकार मिळालेत.
आणि चालले इस्लाम ,बौद्ध व पुरोगाम्यांवर टीका करायला !
असल्या कुंभकर्णी समाजाला जागं करायला एक दिवस लावला डीजे जोरात तर बिघडलं कुठं ?
17 Apr 2016 - 12:21 am | वडापाव
डीजे लावल्याने कुठल्या प्रकारची जनजागृती होते हो??
तुम्ही हिंदूंवर टिका केली की आम्ही तुम्हाला मुस्लीमधार्जिणे म्हणायचं आणि आम्ही इस्लामवर केली की तुम्ही आम्हाला हिंदू धार्जिणे/भक्त म्हणायचं. या पळवाटा सोडा आता.
मी कोणावरही चिखलफेक करायला धागा काढलेला नाही. वर एका कमेंटीत सांगितलं तसं, मी स्वतः नास्तिक आहे आणि जात-धर्म दोहोंचा उघड उघड विरोधक आहे. होळीला आगी लावणे आणि समस्त सणांचे रस्त्यांवर येऊन धिंगाणा घालून साजरीकरण करणे याला माझा कायमच विरोध राहिला आहे. त्याचबरोबर याही निरर्थक रुढींचा विरोध व्हावा इतकंच माझं म्हणणं आहे.
मुद्यांवर बोला आणि त्यांत रस नसेल तर नका बोलू. नसलेला subtext मुद्दाम घुसवून नसते फाटे कशाला फोडता?
17 Apr 2016 - 12:40 am | बोका-ए-आझम
ते frustrated आहेत. त्यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्हीकडून थपडा पडतात त्यामुळे त्यांचा असा तोल सतत ढळलेला असतो. आजारी माणूस आहे. सोडून द्या. अल्ला के नाम पे सोडून द्या.
17 Apr 2016 - 1:01 am | वडापाव
दोहोंकडून थपडा मलाही पडल्याहेत हो. कधी कोणी भक्त म्हणतं तर कधी islamophobe. पण काहीजण एकच गाल सुजवून घेण्यात धन्यता मानतात. कारण दुसरी बाजू थपडा न देता सरळ गळा कापेल याची भिती तरी असते. ते नाहीतर अजून काहीतरी भलतंच शिजत असावं डोक्यात. नेमकं काय ते नाही समजू शकलो अजून.
17 Apr 2016 - 3:59 am | भंकस बाबा
दूसरी बाजू थपडा न देता सरळ गळा कापेल.
आपल्या सेक्युलरवाद्याना याची चांगलीच कल्पना आहे, त्यामुळे ते अखलाखच्या वेळेला गळे काढून रड़तात आणि संघाच्या एखाद्या कार्यकरत्याची हत्या वा हल्ला झाल्यास कानाडोळा करतात.
17 Apr 2016 - 6:34 am | mugdhagode
हेच लॉजिक उलटही लावता येते.
जो आपला नसतो तो मेल्यावर रडायची गरज नसते.
म्हणुनच अखलाख किंवा कुणी दलित मेल्यावर संघी / भाजपी रडत नाहीत का ?
17 Apr 2016 - 7:05 am | वडापाव
संघ-भाजपाच्या बरोब्बर उलटी भूमिका घेणारे लोक पुरोगामी असतात अशी व्याख्या आहे का पुरोगामित्वाची?
17 Apr 2016 - 9:27 am | भंकस बाबा
ज्या दिवशी कळेल त्यावेळी पेढ़े वाटिन म्हणतो! ऑ ,पेढ़े म्हटले तर त्याला जातीयतेचा वास येईल नाही?
काश्मीरात भूंकप झाल्यावर हे जातीय संघवाले तिथे मदतीचा हात पुढे करायला गेले होते, छया तुमच्या गणितानुसार तो धर्मप्रसार करायचा छुपा एजेंडा होता नाही?
पण तुमचे ते कवटी टोपीवाले अशा आपत्तीच्या ठिकाणी का दिसत नाही?
कदाचित् ते 5 च्या जागी 50 नमाज पढ़त असतील व् दुवा करत असतील की याना संकटातून वाचव!
'अल्लाह काफिरोपे कहर बरपा रहा है.' हे उद्गगार आहेत ओवेसिचे, उत्तराखंडमधे प्रलय येऊन यात्रेकरु संकटात सापडल्यावर! आणि इथेच मिपावर त्याला विद्वान् ठरवन्याचा प्रयास चालला होता.
17 Apr 2016 - 1:27 am | mugdhagode
ते खरेसाहेबाना उद्देशुन लिहिलं होतं.
वडापावजी ,तुम्ही का त्रास करुन घ्व्ताय ?
17 Apr 2016 - 1:56 am | वडापाव
यातलं खरे काकांना उद्देशून नेमकं काय होतं? धागा काढण्याच्या उद्देशाबद्दल तुम्हाला व काहीजणांना शंका वाटतेय म्हणून मी माझं स्पष्टीकरण दिलं. मी काही आंबेडकर विरोधी नव्हे. उलट त्यांचे जितके विचार वाचलेत त्यांमुळे भारावलो आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पुस्तकं वाचून काढण्याचा संकल्प केलाय. असो.
धाग्याचं नाव पुरोगाम्यांचे सण न ठेवता फुरोगाम्यांचे सण ठेवायला हवं होतं असं मी आधीच म्हटलं. खरेखुरे पुरोगामी जे जनजागृतीचं कार्य करत आहेत त्यांच्याबद्दल कायम मनात प्रचंड आदर राहील. अगदी वेगळ्या, न पटणा-या विचारप्रवाहातले असूनही प्रत्यक्षात चांगलं, समाजाच्या हिताचं काम करणा-या माणसांबद्दलही भरपूर आदर आहे (मी तर नुसताच विचार करतो काम तर काही करत नाही. उदया मी चुकून त्यांच्याहून जास्त काम करू शकलो तरी आदर कायम राहील). पण आत्मावलोकनाची/आत्मपरीक्षणाची गरज सगळ्यांनाच असते. एकीकडे आपण समाजाला भावनेच्या आहारी न जाता विवेकाधारित जीवनशैली अनुसरण्याचे सल्ले द्यायचे आणि दुसरीकडे आपणच भावनांच्या नावाखाली भलभलत्या उचापत्यांचा उदो उदो करायचा? किंवा अनुल्लेखाने विरोध करणं टाळायचं? कशासाठी?
इथे जे हिंदु-मुस्लीम पेटलंय त्यावरही माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे, पण जे म्हणेन ते तुमच्यासाठी नवीन नसेल आणि हा धागाही त्याबद्दल नाही त्यामुळे मी यात माझी मतं मांडत नाहीये. तरी तुमच्या चर्चेतून बरंच नव्याने कळतंय त्यामुळे ही चर्चा सुद्धा या धाग्यामार्फत एकीकडे सकारात्मक निष्कर्षाप्रत चालू राहावी असंच वाटतं.
17 Apr 2016 - 3:25 pm | काळा पहाड
इथे कोणीही (तुमच्याशिवाय) त्रास करून घेत नाहीये. जरा घराकडे लक्ष दिलंत तर तुम्हालाही बरे दिवस येतील. सासरा काय म्हणतो म्हणे तुमचा?
18 Apr 2016 - 11:32 am | नाखु
मिपाकरांसारखा?? दुसरं काय?
18 Apr 2016 - 10:10 am | सुबोध खरे
मोगा खान
हिंदू धर्मातील एकही ग्रंथात कर्मकांडाचे तुम्ही प्राणपणाने पालन केलेच पाहिजे किंवा हाच अंतिम ग्रंथ आणी इथे लिहिलेले आहे तेच अंतिम सत्य असे लिहिलेले नाही.
५००० वर्षापूर्वीचा धर्म प्रवाही तरी आहे १४०० वर्षापूर्वीचा धर्म जसा त्याच काळात अडकून पडला आहे कि अजून १४०० वर्षे तरी महिलांना कोणतेही अधिकार मिळण्याची शक्यता नाही. वर तुम्ही त्याचे समर्थन करता आहात हा केवळ पुरुषी अहंकार आहे.
मी बौद्ध धर्मावर किंवा "प्रामाणिक" पुरोगाम्यांवर कुठे टीका केली हे दाखवून द्या. मी फक्त राही ताई शाहबानो केस मध्ये राजीव गांधींचे लंगडे समर्थन करतात त्यावा टीका केली आहे. आणी तुम्हाला कायद्याच्या भाषेचा नीट अर्थ लावता येत नसेल तर कुणा कायदेपंडिताकडून लावून घ्या. भारतीय दंडविधान संहिता आणी मुस्लीम वैयक्तिक कायदा यात फारकत करून दंड विधान संहिता मुसलमानांना लागू होते आणी म्हणून मुस्लीम वैयक्तिक कायदा दंडविधान संहितेच्या आड येऊ शकत नाही असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. Before Memory Fades हे श्री फली नरिमन या अतिशय उच्च घटना पंडितांचे आत्मचरित्र जरूर वाचा आणि मग असे फालतू श्लेष काढा. http://www.amazon.in/Before-Memory-Fades-An-Autobiography-ebook/dp/B0058... येथे उपलब्ध आहे.
किंवा "आधुनिक भारतावर सखोल परिणाम करणारे १० महत्त्वाचे खटले" हेही पुस्तक वाचून पहा http://www.freepressjournal.in/ten-cases-that-impacted-modern-india/248794 किंवा वेळ असेल तर माझ्याकडे आहेत ती येउन घेऊन जा.
किंवा डी जे वर अथवा मागासवर्गीयांवर कुठे टीका केली ते दाखवून द्या
उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका . वादात हार मानण्याची तुमची दिलदार वृत्ती नाहीच म्हणून फाटे फोडणे बेफाट आरोप करणे विसंगत विधाने करणे असे केले जाते आणी मग अशी "चिडचिड" होते.
16 Apr 2016 - 9:32 pm | भीमाईचा पिपळ्या.
आंबेडकर जयंतीला काही कार्यकर्त्यांनी डिजे, मंडप, मिरवणूका ई. गोष्टींना फाटा देवून विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटली आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली आहे. झापडं जर्र्र्रार्र्रा बाजूला केली तर असे प्रश्न 'उठणार' नाहीत ;)
16 Apr 2016 - 9:56 pm | पैसा
तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना अभिनंदन सांगा जरा! सगळ्या गणेसोत्सव दहीहंडी वगैरे मंडळानी असे उपक्रम केले तर कितीतरी बरे!
16 Apr 2016 - 10:17 pm | वडापाव
आक्षेप त्या 'काही' कार्यकर्त्यांना करताना दिसतोय का मी?? मुठभर लोकांनी डीजे, मंडप, मिरवणुका इ. गोष्टींना फाटा दिला म्हणजे समस्त सण साजरीकरणाच्या पद्धती चांगल्या झाल्या का?
16 Apr 2016 - 10:41 pm | भीमाईचा पिपळ्या.
आज मूठभर आहेत उद्या अजुन वाढतील. हाही एक सकारात्मक बदल म्हणून किमान आपण दखल घेवू शकतो ना.
वरती राही ताईचा प्रतिसाद म्हणजे 'मंथूनी नवनिता'... आहे. खरंतर त्या प्रतिसादानंतर इथे चर्चा करण्याचे प्रयोजणच उरत नाही. :)
@ पैसा ताई, काल 'ती' बातमी टिव्हीला पाहीली. सोलापूरची बातमी होती. इथे सोलापूरचे कोणी सदस्य असतील सविस्तर सांगतील ते.
बाकी ते दहिहंडी, गणेशोत्सव बद्दल नाही पटले. त्या आमच्या पिढ्यांनपिढ्यांच्या परंपरा आहेत. तुम्ही हिंदूधर्माच्या रूढीपरंपरांबद्दल लिहायला नको होते ;)
17 Apr 2016 - 12:23 pm | भीमाईचा पिपळ्या.
वरती नानाने म्हटल्याप्रमाणे 'दुखणे वेगळेच' दिसते आहे.
17 Apr 2016 - 1:55 pm | वडापाव
कुठल्या नंबराचा चष्मा लावता ते तुम्हालाच माहिती.
22 Apr 2016 - 6:36 am | Ram ram
Original peksha batge kattar astat
23 Apr 2016 - 1:57 am | गामा पैलवान
अग्गोबाई मुगोबाई, वाचायला शिकल्यात का हो ताई?
तुम्ही भले शिकल्या असाल वाचायला, पण आम्हाला निरक्षर समजता काय? तुमचं हे विधान धादांत असत्य आहे :
>> दहा हजार वर्षाचे वय असलेल्या धर्मात विवाहीत मुलीला संपत्तीत अधिकारच नव्हता. पिता रक्षति कौमार्ये ..... वगैरे
मनुस्मृतीत मुलीला पित्याच्या संपत्तीत वाटा दिला आहे. शिवाय बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मनुस्मृतीवर आधारलेलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
23 Apr 2016 - 6:53 am | mugdhagode
बाबासाहेबांच्या हिंदु कोड बिलाचे क्रेडिट मनुस्मृतीला !
किती कोड ( गे) आहात हो पैलवान तुम्ही !
23 Apr 2016 - 11:46 am | गामा पैलवान
मुगोबाई, श्रेय दिल्याचं ते बाबासाहेबांनीच म्हंटलंय.
आ.न.,
-गा.पै.
23 Apr 2016 - 7:06 am | mugdhagode
http://nirmukta.com/2011/08/27/the-status-of-women-as-depicted-by-manu-i...
23 Apr 2016 - 11:49 am | गामा पैलवान
मुगोबाई,
तुम्ही दुवा दिलेल्या लेखाची सुरुवात तुफान विनोदी आहे. म्हणे मनुस्मृती हे ब्राह्मणधर्माचं पुस्तक आहे. मनु क्षत्रिय होता हेही माहीत नाही. फार छान! मेकॉलेछाप शिक्षण घेतलं की असे मस्तपैकी तारे तोडता येतात.
आ.न.,
-गा.पै.
23 Apr 2016 - 3:54 pm | mugdhagode
मनु कोण होता , हे इथे महत्वाचे नाही
.. मनुस्मृतीतील लिखाणाबद्दल बोला.
25 Apr 2016 - 9:02 am | भंकस बाबा
जरा उठून एक सर्वे करा, किती हिंदुना मनुस्मृति माहीत आहे ते.
त्याचबरोबर कितिना कुराण माहीत आहे ते.
ज्याना कुराण माहीत आहे ते कितिशे त्याचे पालन करतात कारण जर पालन करायला गेले तर जगणं मुश्किल होईल.
बाकी तुम्ही असे टीनपाट प्रतिसाद टाकताना माफ़ी म्हणुन कलमा पढता काय?
25 Apr 2016 - 5:47 pm | गामा पैलवान
हो का मुगोबाई ! मनु कोण होता ते महत्त्वाचं नाही म्हणता? मग मनुवादी म्हणून शिव्या कोणाला हासडतात बरं?
आ.न.,
-गा.पै.
25 Apr 2016 - 9:06 am | भंकस बाबा
घोड़े साहेबाना आधी ते कोण आहेत ते ठरवू दे मग पुढ़च बघू.
दुधात चिंचेचि चटणी घालून पिणारे हे, यांना काय धर्म कळणार!
23 Apr 2016 - 12:21 pm | चेक आणि मेट
26 Apr 2016 - 8:05 pm | सूड
डिफाईन पुरोगामी प्लीज..
26 Apr 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी
खालील दिलेल्या लक्षणांपैकी एक किंवा अधिक लक्षणे असणारे भारतात "पुरोगामी" या सन्माननीय पदवीने गौरविले जातात.
- हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा ठेवणे. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्यांचा तिरस्कार.
- हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल तिरस्कार. हिंदू या शब्दाबद्दल घृणा.
- हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म स्थानिकांवर लादला, तेच दंगली करतात व अल्पसंख्याकांचे शिरकाण करतात. इ. इ. चा गोबेल्स तंत्राने सर्वत्र प्रचार करणे.
- इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे असा सतत प्रचार करणे, हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास करणे.
- २६/५/२०१४ पूर्वी देश अत्यंत सहिष्णु होता. परंतु या दिवसानंतर देशात कमालीची असहिष्णुता आली आहे, विचारवंतांचा गळा घोटला जात आहे, फॅसिस्ट राजवट आली आहे, विचारस्वातंत्र्य नष्ट झाले आहे इ. प्रचार करणे.
- हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. प्रकारांना, प्रतिभाशाली कलाकाराच्या उस्फूर्त प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, कलाकारांचे अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा देणे व जेव्हा इतर धर्माच्या बाबतीत असे प्रकार घडतील तेव्हा तातडीने अशा कलाकृतींवर बंदी घालण्यासाठी आंदोलन करणे.
- हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी करणे.
- हिंदूंवर इतर धर्मियांकडून अत्याचार होतात तेव्हा तोंडात मिठाची गुळणी घेऊन, डोळे मिटून व दोन्ही कान झाकून गप्प राहणे व इतर धर्मियांवर हिंदूंकडून साधा ओरखडा उमटला तरी बेंबीच्या देठापासून किंचाळून आक्रोश करणे.
- बॉम्बस्फोट करून निरपराध नागरिकांचे प्राण घेणार्या अतिरेक्यांच्या फाशीचा "न्यायालयीन हत्या" असा प्रचार करून छाती पिटत विरोध करणे.
वरीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसतात त्यांनाच "पुरोगामी" म्हणतात.
26 Apr 2016 - 10:50 pm | नुस्त्या उचापती
गुर्जी , तुम्ही फारच विचार करता ब्वां . पुरोगाम्यांचा भलताच अभ्यास दिसतोय तुमचा .
27 Apr 2016 - 7:03 am | mugdhagode
त्यांची अवस्था रावणासारखी झाली आहे.. श्री मत कहो , राम का नाम मत लो ... असे रावण दिवसातुन इतक्या वेळा ओरडायचा की त्यातूनच त्याचे तोंडुन रामनाम बाहेर पडुन तो मोक्षास व सद्गतीस गेला.
27 Apr 2016 - 7:24 am | mugdhagode
त्यांची म्हणजे गुरुजींची...
गांधी , नेहरु , खुदा , येशु , बाबासाहेब यांचे स्मरण गुरुजी व तत्सम लोक रोज इतक्या वेळा करतात की त्यातूनच त्यांचा पुण्यसंचय वाढत राहील.
27 Apr 2016 - 7:23 pm | गामा पैलवान
मुगोबाई, तुम्ही हरामखोर हे विशेषण पुन्हापुन्हा उच्चारून पुण्यसंचय करता ना? बरोब्बर ओळखलं की नाही?
आ.न.,
-गा.पै.