मी अजून जिंकलो नाही
म्हणतात ना ,
अंत भला तो सब भला ,
हेच खरे .
सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला
वाईट न म्हणनेच बरे
वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही
सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही
शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही
सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई
हरलास तू , असं कुणी बोलत असेल
अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल
त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं
अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं
म्हणावं ,
जिंकला आहेस तू , मी हरलो नाही
शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही
- अभिषेक पांचाळ
सुंदर कविता!
Thanx sandip sir
कविता आवडली