पत्रं
लेखनविषय:
( काही वर्षांपूर्वी लिहिलेली आहे ... आत्ता आठवली )
पत्रं लिहिण्यास कारण कि ...
आजची सकाळ खूप छान होती
कसलीच मला घाई नव्हती
घड्याळाचा बंद करून गजर
ठरवले लवकर उठायचेच नाही |
रोजची धावपळ , गोंधळ गडबड
ऑफिसची वेळ गाठायची धडपड
त्यातच सतत वाजणारा फोन
माझ्यासाठी अजिबात नसते सवड |
संध्याकाळची ही न्यारी तऱ्हा
सगळेच प्लान्स - तीन - तेरा
अर्जंट मिटींग , कॉन्फरन्स, कॉल्स
संपता संपता रात्रीचे बारा |
आज मात्रं तसे काहीच नाही
कारण तुझी ती अमेरिकावारी ..
स्वैपाकाला सुट्टी, शाळेला बुट्टी
आनंदी आनंद - घरी अन दारी |
पण माहीत नाही असं का ?
वाटतय काही चुकतंय का ?
मोकळी सकाळ नकोशी भासते
तुझं नसणं असं खुपतंय का ?
मग म्हणलं ,
करूया थोडी कामं - वेळ तरी जाईल
पॉटलक - भिशी ?
आज तरी नकोच बाई
मुलाचा आभ्यास राहील मग
शॉपिंग ची नको इतक्यात घाई |
असं का होतय समजत नाही
वाटलं तुलाच विचारावं काही
संसारी होऊन मी विसरले का ?
काय आवडतं मला अन काय नाही ?
तर पत्रं लिहिण्यास कारण की ...
विचारायचे आहे तुला काही
कळते आहे का तुला कारण
सारं का आणि कशासाठी ?
हसून म्हणशील - हे सारं
घरासाठीच मी करतोय ना ?
सुखासाठी तुमच्याच तर
घड्या ळा मागे मी धावतोय ना ?
पटतंय मला सारं सारं
तरीही काही चुकतंय का ?
सारं काही मिळतंय पण ..
तू तर कधीच नसतोयस ना ?
समजले आहे बहुदा काही
नसण्याची तुझ्या मला सवय नाही
असतील काही फायदे आणि तोटे
तुझ्याशिवाय जगणे , मला जमत नाही |
वाचन
3504
प्रतिक्रिया
22