ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन...!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं आहे. मनाचा ठाव घेणारे शब्द, प्रेमभावना ओतप्रोत भरलेलं काव्य अशी वैशिष्ट्य असणाऱ्या महाकवीने वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सायनमधील राहत्या घरी सकाळी 9 वाजता मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, सांगा कसं जगायचं, जेव्हा तुझ्या बटांना यासारख्या पाडगावकरांच्या अनेक कवितांना रसिक वाचकांचं प्रेम लाभलं होतं. धारानृत्य, जिप्सी, भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे ते आबालवृद्धांचे लाडके झाले. पाडगावकरांची काव्यवाचनाची विशिष्ट शैली अनेकांना भावत असे.
गाजलेल्या कविता :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं सेम असतं
सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत कि गाणं म्हणत?
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा....!
शुक्रतारा, मंद वारा...!
श्रावणात घन निळा बरसला....!
सांग सांग भोलानाथ.....!
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला.....!
प्रतिक्रिया
खट्याळ आणि विनोदी...
भावपूर्ण श्रद्धांजली!
Pagination