पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे,
दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे,
उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना,
तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना,
चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना,
सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना..
विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले,
मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले,
उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले,
भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे...
पुढे वाढवली तरी चालेल..
प्रतिक्रिया
11 Oct 2015 - 10:51 am | चांदणे संदीप
काव्यरस = रौद्ररस??
लेखनविषय = विनोद?? आणि
"पुढे वाढवली तरी चालेल" हे सोडून कविता चांगली आहे.
Sandy
11 Oct 2015 - 10:59 am | जव्हेरगंज
+१
11 Oct 2015 - 11:17 am | माहीराज
धन्यवाद .मी अजून लहान आहे ..नविन आहे या क्षेत्रात ..आपणाकडून शिकतोय.