पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे,
दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे,
उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना,
तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना,
चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना,
सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना..
विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले,
मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले,
उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले,
भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे...
पुढे वाढवली तरी चालेल..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1428
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
काव्यरस..
+१
In reply to काव्यरस.. by चांदणे संदीप
धन्यवाद .मी अजून लहान आहे .