"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी.पा. च्या दिवाळी अंकामध्ये शिवोssहम यांनी "तालीम" ही खूप चांगली कथा लिहली. एकेकाळी राजाश्रय मिळालेल्या या उपेक्षित कुस्ती प्रकाराबद्दल त्यांनी खूप चांगले लिहून पुन्हा ते सोनेरी क्षण डोळ्यापुढे उभे केले. आजही "महाराष्ट्र केसरी" "हिंद केसरी" या सारख्या स्पर्धा इथे भरतात. यातील "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न !
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन हि संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ''महाराष्ट्र केसरी '' या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.१९५३ साली हे अधिवेशन सुरु झाले. अधिवेशन हे १९५३,५५,५८,५९ रद्दच झाल्या होत्या.१९६० साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्नायीत झाल्या. मात्र १९६१ साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खर्या अर्थाने महाराष्ट्र केसरीचा श्रीगणेशा करणाऱ्या ठरल्या.औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकूण २६
जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यातून ५५० मल्ल सहभागी झाले होते.मानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी ५ सिंह झुंजणार होते.
नागपूरचे राम अग्यारी
मिरजेचे बापू बेलदार
कोल्हापूर( मुळचे सांगली जिल्हा गाव दह्यारी ता. तासगाव आताचा पलूस) दिनकरराव दह्यारी.
मुंबईचे बिरजू यादव
आणि वसंत निगडे.
वजने झाली ,आणि कुस्त्यांच्या फेर्या सुरु झाल्या.पहिली फेरी होती दिनकर दह्यारी आणि नागपूरच्या राम अग्यारी यांच्यात.
या फेरीत शाहूपुरी तालमीच्या उंच्या पुर्या आणि गोर्यापान दिनकर दह्यारी यांनी राम अग्यारी याला चीतपट करून कुस्ती-शौकिनांची मने जिंकली.
दुसरी फेरी होती बिरजू यादव आणि बापू बेलदार.
मिरजेच्या संस्थानाचा मल्ल अशी खाय्ती असणारा बापू आणि बिरजू यांच्यात बिरजू वरचढ ठरत तो अंतिम साठी पुढे आला.
पहिलीच महाराष्ट्र केसरीची गदा कोण जिंकणार म्हणून मैदानाला अक्षरश लोकांचा महापूर आला होता.
कोण होणार पहिला महाराष्ट्र केसरी अशी खुमासदार चर्चा सुरु होती.
कुस्ती-पंढरी म्हणून नावलौकिक असणारे कोल्हापूरचे दिनकर दह्यारी यांनी या गदेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली सर्वाना ठावूक होते तर दुसरीकडे बिरजूने या गदेसाठी जीवाची बाजी लावली होती.
मागच्या सर्व कुस्त्या अतिशय चटकदार करून तो अंतिम सामन्यात सहभागी झाला होता.
आणि कुस्तीची शिट्टी वाजली ,सलामी झडली.
दोन सिंह त्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या गदेसाठी अक्षरश एकमेकावर तुटून पडले.
अखेर दिनकर दह्यारी यांनी जीवाची बाजी लावून पाटावर हल्ला चढवत पट काढून बिराजुला खाली धरून आणले ,जसे खाली धरून दोन्ही गुडघे मातीला टेकले तितक्याच चपळतेने घिस्सा मारून बिरजूला अस्मान दाखवले.
पंचाने दिनकरराव जिंकल्याची शिट्टी जशी मारली तसा तो माणसांचा लोंढा मैदानात घुसला आणि दिनकर दह्यारी यांना उचलून घेऊन मैदानाला प्रदक्षिणा काढली. दिनकर (दह्यारी)पाटील यांचे वस्ताद स्वातंत्रवीर ज्ञानू जाधव (चौकीवाले) उर्फ वस्ताद आबा हे ही दह्यारी गावचे ! आपल्या गावच्या सुपुत्राने महाराष्ट्र केसरीची कुस्ती मारली या आनंदाप्रीत्यर्थ गावाने आणि आसपासच्या गावांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली.
दिनकर दह्यारी यांचे मूळ गाव सध्याचे सांगली जिल्हा आणि पलूस तालुक्यातील दह्यारी.
सागरेश्वर महादेवाच्या अतिशय जुन्या पर्वत रांगेच्या पायथ्याला अतिशय निसर्गरम्य असे हे गाव.
इथल्या गावांची नावे अतिशय वैशिष्ट पूर्ण आहेत.
दुधारी,दह्यारी,ताकारी,घोगाव.
ज्या गावातून सागरेश्वर महादेवाला दहि जायचे
ते गाव दह्यारी
ज्या गावातून सागरेश्वर महादेवाला दुध जायचे ते
दुधारी
आणि ज्यातून ताक जायचे ते ताकारी.
आणि हा अभिषेक पूर्ण झाल्यावर जे अभिषेकित मिश्रण डोंगरातून वाहत येउन साठ्याचे तिथे माश्या फार घोन्गावायाच्या.
म्हणून त्या गावाला घोगाव असे नाव पडले.
अगदी २ - ३ किलोमीटर अंतरावर हि सर्व गावे आहेत.
जवळ प्रसिध्द पैलवान विष्णुपंत नागराळे यांचे नागराळे हे गाव.
असा हा तांबड्या मातीतील कुस्तीसाठी संपन्न असणारा हा भाग.
मला अभिमान आहे मी दह्यारी या गावामध्ये जन्मलो याचा !
प्रतिक्रिया
सुंदर पण त्रोटक.
साजिदभाऊ, इतिहास आवडला.
लेख आवडला
"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......
धन्यवाद तुमचे ! थोडी (?) अवांतर माहिती (मला मिळाली ती ) प्रदर्शि
जब्राट लेख + वरील प्रतिसाद.
+१
खूप छान माहिती. मस्त लिहीलंय.
मस्त!
बघू जमतंय का ?
हो, बरोबर.
साजिदभाऊ, दुसरा प्रतिसादही लय
अन याबरोबरच विनंतीवजा आवाहन
चंबा मुतनाळ
लेख आणि प्रतिसाद
साजिदभाई, तुम्ही तुपारीचा