एक आकांत : गाणार्याचे पोर
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एका पेक्षा अनेक लग्न, बहुपत्नीत्व ह्याला उघड मान्यता नसली तरी त्यात फार वावगे नं मानणार्या पिढीतील पुढच्या पिढीतील एक तरुण...आपल्या अंगातील असामान्य कलागुणाची नुकतीच ओळख होऊ लागलेली...अत्यंत लहान वयात कमालीचे खडतर दिवस काढून, १२ गावचे पाणी पिऊन आलेली अकाली समज...
त्यात स्वतःच्याच मामे बहिणीशी लग्न... ३ अपत्य झाल्यावर आयुष्यात आलेली आणखीन एक तरुणी ...तिच्याशी वेगळा संसार ...दुसरीकडे स्वतःच्या विवाहानंतर झालेला आईचा 'बाळंत रोगात' झालेला मृत्यू..वडिलांनी केलेले दुसरे लग्न...आणि त्या लग्नातून पुढे झालेली ९ भावंडे ...
एकाच वेळी झपाट्याने बहरणारी कला कारकीर्द, येणारा धो धो नाहीतरी वाढता पैसा, २ समांतर प्रपंच...जुन्या प्रपंचावर नवीन प्रपंचाचा वरचष्मा...पर्यायाने २ प्रपंचातील राहणीमानातला वाढता फरक...
तरीही कुटुंबप्रमुखाची दोन्ही प्रपान्चांना आपल्यापरीने सुखी ठेवण्याचा प्रयत्न...संभवत: त्यातील अपुर्या यशाने सुरु झालेली गुंतागुंती....
त्यातच दोन्ही संसारात नवीन अपत्यांचा प्रवेश...
आत्मचरित्रकाराच्या व्यक्तिगत आयुष्यातील वडिलांनी फक्त त्याच्यासाठी गायलेला मालकंस तो हि कॉलेज च्या वयातल्या मुलाला जवळ घेऊन हि एक अत्युच्च अविस्मरणीय घटना...
पुढे पुढे वयपरत्वे (वडील व मुलगा दोघांचेहि) परस्पर संबंधात येणारी कटुता कमी कमी होणे आणि लोभस ओढ वाढत जाणे
ह्या सगळ्यांची एक ओघवती मांडणी...
वाचकाला कोणत्याही न्यायाधीशाच्या भूमिकेत नं लोटता मांडलेला एक धुमसता .. आकांत...कमालीचा अस्वस्थ करणारा...
सतत काही प्रश्न मनात सतावणारे..
हे सगळं खरं आहे? जर असेल तर कितपत?? हे वाचून आपण काय करणार? जर नसेल तर .... तर...?
आणि आता ह्या वेळी सगळी पात्रे कालवश झाल्यावर ...ह्याचे नक्की प्रयोजन?? केवळ दस्तावेज हा दर्जा देऊन मूळ आक्रोशाला कमी लेखणे बरोबर का चूक ... नक्की काय?
पण एक अस्वस्थ करणारा वाचनानुभव...
प्रतिक्रिया
हे काय आहे. पुस्तक परीचय/ की
राघवेंद्र भीमसेन जोशी
रसग्रहण
खरंच प्रयोजन काय हा प्रश्न
अस्स
-१००
आणखी एक
प्रयोजन मूळ वाक्य
अत्रंगी पाऊस म्हणतात
शीर्षकात
आणखी एक
"अमुकतमुकला विरोध करणारे आपण
असाच अनुभव मला श्री मंगेश
भोग असतात. जो भोगतो त्याला
होय
अगदी बरोबर
.
त्यांचा
तात्यांच्या प्रतिक्रियेच्या
प्रतिक्रीयेचं सोड,
मोठ्या लोकांचे नातेवाईक
व्यंकटेश माडगूळकरांच्या
ऋषीचे कुळ
खरं आहे.
हेच खरे.....
रविशंकरांची पहिली पत्नी
अगदी
माहितीबद्दल धन्यवाद !
देणं
माझी माहिती अशी....
"माझी माहिती अशी आहे की प्रथम
आदरणिय
पुलं देशपांडे यांच्या बद्द्ल
तिन महत्त्वाचे निसर्गनियम इथे
भोग असतात. जो भोगतो त्याला
बाहेर कुणाला सांगावे तर
ना.सी. फडके च्या पहील्या पत्नी च्या मुलीने हे एक पुस्तक लिहीलय!