✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका

श
श्रीगुरुजी यांनी
Fri, 11/01/2013 - 20:58  ·  लेख
लेख
नोव्हेंबर-डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान व मिझोराम या राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. १) म.प्र. (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - काँग्रेस, १९९८ - काँग्रेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे) एकूण जागा - २३० २००८ ची परिस्थिती - भाजप (१४३), काँग्रेस (७१) २०१३ चा अंदाज - भाजप (१४८-१६०), काँग्रेस (५२-६२) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-sweeps-madhya-pradesh-may-win-148160-seats/431055-3-236.html २) छत्तीसगड (२०००- काँगेस, २००३ पासून भाजप सत्तेत आहे) एकूण जागा - ९० २००८ ची परिस्थिती - भाजप (५०), काँग्रेस (३८) २०१३ चा अंदाज - भाजप (६१-७१), काँग्रेस (१६-२४) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-set-to-rout-congress-in-chhattisgarh-win-6171-seats/431048-3-235.html ३) राजस्थान (१९८५ - काँग्रेस, १९९० - भाजप, १९९३ - भाजप, १९९८ - काँग्रेस, २००३ - भाजप, २००८ - काँग्रेस, २००८ पासून काँग्रेस सत्तेत आहे) एकूण जागा - २०० २००८ ची परिस्थिती - भाजप (७८), काँग्रेस (९६) २०१३ चा अंदाज - भाजप (११५-१२५), काँग्रेस (६०-६८) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-bjp-may-storm-to-power-in-rajasthan-with-115125-seats/431256-3-239.html ४) दिल्ली (१९९३ - भाजप, १९९८ पासून काँग्रेस सत्तेत आहे) एकूण जागा - ७० २००८ ची परिस्थिती - भाजप (२३), काँग्रेस (४३) २०१३ चा अंदाज - भाजप (२२-२८), काँग्रेस (१९-२५), आम आदमी पक्ष (१९-२५) http://ibnlive.in.com/news/prepoll-survey-hung-assembly-in-delhi-as-aap-hits-bjp-congress-hard/431438-80-258.html दिल्लीत अत्यंत चुरशीची स्थिती आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने जबरदस्त आव्हान उभे केले आहे. या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढते आहे. कदाचित शेवटी या पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा अंदाज - २००९ ची स्थिती - युपीए (२५५. यात काँग्रेसचा वाटा २०६), एनडीए (१६१. यात भाजपचा वाटा ११६) २०१४ चा अंदाज - युपीए (१३४-१४२. यात काँग्रेसचा वाटा ११६-१२४), एनडीए (१८७-१९५. यात भाजपचा वाटा १७१-१७९) http://ibnlive.in.com/news/big-gains-likely-for-bjp-nda-in-lok-sabha-polls-big-drop-for-upa-congress/431621-80.html काँग्रेस व पर्यायाने युपीएची जबरदस्त पीछेहाट होण्याचा अंदाज असून अनेक मित्रपक्ष व स्वकीय सोडून गेलेले असताना सुद्धा भाजप व पर्यायाने एनडीएची परिस्थिती खूपच सुधारत आहे. हाच मोदी इफेक्ट असेल का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
59809 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

.

उद्दाम
Sat, 11/02/2013 - 12:46 नवीन
आज पेप्रात बातमी आहे. मोदी लताबै ना भेटले. फार बरं वाटलं. :) भाजपेयी लताबैना भेटले, तर बै बोलल्या होत्या, मी यांची मुलगी. आणि ते निवडणुकीत पडले. आता मोदी लताबैना भेटले. त्या बोलल्या हे माझे भाऊ. आता भाऊंना कधी धक्का मिळणार ? :)
  • Log in or register to post comments

विशफुल थिंकिंग

मन१
Sat, 11/02/2013 - 22:27 नवीन
.
  • Log in or register to post comments

भाजप आणि अविवाहीत यांचा बराच

विजुभाऊ
Sun, 11/03/2013 - 03:51 नवीन
भाजप आणि अविवाहीत यांचा बराच जवळचा संबन्ध आहे. अडवाणी जर अविवाहीत असते तर ते बहुतेक पम्तप्रधान झाले असते.
  • Log in or register to post comments

याचे कारण

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 12/04/2013 - 20:39 नवीन
भाजप हे संघपरीवाराचे पिल्लु आहे...आणि बरेचसे आघाडीचे(जुन्या पिढीतले) नेते हे संघात स्वयंसेवक होते.संघकार्यासाठी अविवाहीत राहीले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जनमत चाचणी वर बंदी

रमेश आठवले
Sun, 11/03/2013 - 10:49 नवीन
आजच times मध्ये वाचले कि कॉंग्रेस निवडणूक आयोगाकडे अर्ज करणार आहे की असे जनमत चाचणीचे सर्वे बंद करावे..याचा अर्थ इतरांना काहीही वाटो कॉंग्रेसचा श्रीगुरुजी यांनी वर दिलेल्या आकड्यावर विश्वास आहे. आणि त्यांना पुढील चाचणीत आपले पितळ आणखी उघडे पडेल असे वाटते आहे .. एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी हे आकडे राजदीप सरदेसाई सारख्या कायम भाजप विरोधी असलेल्या माणसांनी दिले आहेत.
  • Log in or register to post comments

पायाखालची वाळू सरकली

क्लिंटन
Sun, 11/03/2013 - 15:59 नवीन
याचा अर्थ एकच की मोदींमुळे काँग्रेस पक्षाची भयंकर भंबेरी उडाली आहे. इतकी वर्षे जनमत चाचण्यांना फाट्यावर मारणारा काँग्रेस पक्ष आता या चाचण्यांवर बंदी घालायची मागणी करेल याची तर्कसंगती लागत नाही. १९९८ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असे सगळ्या चाचण्यांनी सांगितले होते पण प्रत्यक्षात जिंकला काँग्रेस पक्ष. २००४ मध्ये काय झाले हे वेगळे लिहायलाच नको. तेव्हापासून जनमत चाचण्यांना काँग्रेस पक्षाने फारसे महत्व दिलेले नव्हते. मग आताच काय बदलले? दुसरे म्हणजे मध्य प्रदेशातील कमळे असलेले तलाव झाकावेत अशी अंमळ वेडसर मागणी काँग्रेस पक्षाने केली. त्याचे कारण काय? तर कमळांचे तलाव बघून मतदार आपोआप भाजपकडे आकर्षित होतील!! प्रत्यक्ष २०१४ मध्ये काय होईल हे सांगता येत नाही पण मोदींमुळे काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

मोदी हा मिडीयाने मोठा केलेला

ध्यानस्थ बगळा
Sun, 11/03/2013 - 16:25 नवीन
मोदी हा मिडीयाने मोठा केलेला माणूस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१

श्रीगुरुजी
Sun, 11/03/2013 - 20:17 नवीन
पुढील काही महिन्यात काँग्रेस मोदींना कोणत्यातरी खटल्यात गुंतवायचा आटोकाट प्रयत्न करेल अशी चिन्हे आहेत. फॅसिस्ट प्रवृत्तीचा हा पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी, सत्ता टिकविण्यासाठी व विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गेली ६६ वर्षे भारतीय जनता अनुभवत आहे. आणिबाणी, न्यायालयाचे निकाल फिरविणे, आपल्या विरूद्ध पक्षात असणार्‍या शत्रुघ्न सिन्हा, किशोरकुमार इ. कलाकारांची मुस्कटदाबी करणे, पैसे देऊन लोकसभेत खासदारांची मते विकत घेणे (१९९३ आणि २००८) असे अनेक कुमार्ग या पक्षाने यापूर्वी यशस्वीरित्या हाताळले आहेत. जानेवारी १९९६ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही पुरावे असताना नरसिंहरावांनी विरोधी पक्षातील अडवाणी, शरद यादव इ. बरोबर स्वपक्षातील माधवराव शिंदे, कमलनाथ इ. विरोधकांना खोट्या खटल्यात गुंतवून त्यांच्या निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता मोदींच्या बाबतीत तसेच होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

+१

मालोजीराव
गुरुवार, 11/21/2013 - 12:55 नवीन
हा पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी, सत्ता टिकविण्यासाठी व विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गेली ६६ वर्षे भारतीय जनता अनुभवत आहे. आणिबाणी, न्यायालयाचे निकाल फिरविणे
म्हणून हा पक्ष इतकी वर्षे सत्तेत आहे आणि इथून पुढेही राहणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

५ राज्यांच्या डिसेंबर २०१३ मधील निवडणुका

विनोद१८
Sun, 11/03/2013 - 21:44 नवीन
..बरोबर आहे तुमचे म्हणणे श्रीगुरुजी. गेल्या काहि महिन्यातील श्री. मोदीन्च्या ते जातील त्या प्रत्येक सभेला मिळणारा जनतेचा अभुतपूर्व प्रतिसाद पाहिला असता काँग्रेसचे धाबे दणाणले आहे हे निश्चित, यात काहीच शन्का नाही. त्याना खोट्या खटल्यात गुंतवून त्यांच्या निवडणुकीत अडथळे निर्माण करतीलच परन्तु शारिरीक हल्ले सुद्धा केले जाऊ शकतात, आपल्याला आठवत असेलच ' असा एक हल्ला श्री. अटलबिहारी वाजपेयीन्वर एका प्रचारसभेत अहमदाबाद्जवळ साधारणपणे २५ वर्षापूर्वी झाला होता, श्रीमती इन्दिरा गान्धीचा काळ होता तो. अलिकडे काँग्रेस पक्षीय बगळे फारच उन्मत्त व उद्दाम झालेसे वाटतात असे दिसते नाही का ?? आणि एकूणच श्री. मोदी यान्च्यामुळे अनेकान्चा ध्यानभन्ग होतो याचा प्रत्यय येतोच आहे..... ??
विनोद१८
  • Log in or register to post comments

>>> असा एक हल्ला श्री.

श्रीगुरुजी
Mon, 11/04/2013 - 12:17 नवीन
>>> असा एक हल्ला श्री. अटलबिहारी वाजपेयीन्वर एका प्रचारसभेत अहमदाबाद्जवळ साधारणपणे २५ वर्षापूर्वी झाला होता, श्रीमती इन्दिरा गान्धीचा काळ होता तो. गुजरातेत मेहसाणा येथे वाजपेयींवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यात त्यांना जखमी केले होते. हा हल्ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लगेचच म्हणजे नोव्हेंबर १९८४ मध्ये झाला होता.
  • Log in or register to post comments

भाजपला तामिळनाडू (३९ खासदार),

श्रीगुरुजी
Mon, 11/04/2013 - 12:38 नवीन
भाजपला तामिळनाडू (३९ खासदार), केरळ (२०), प. बंगाल (४२), जम्मू-काश्मिर (६), ओरिसा (२१) आणि आंध्रप्रदेश (४२) या ६ राज्यातील व आसाम वगळता ईशान्येतील राज्यांतील ८ जागा मिळून एकूण १७८ जागांपैकी फारतर ३-४ जागा मिळतील (आंध्रप्रदेशात १-२, ओरिसात ०-१ व ईशान्येकडील राज्यात एखादी जागा). त्यामुळे उर्वरीत ३६५ जागांपैकी किमान २७० जागा (म्हणजे अंदाजे ७५ टक्के जागा) भाजप व मित्रपक्षांना मिळवाव्या लागतील. भाजपला तामिळनाडू, प.बंगाल व केरळ राज्यात ५-६ टक्के मते मिळतात, पण एकही खासदार स्वबळावर निवडून येत नाही. आंध्रप्रदेश व ओरिसात भाजपला १० टक्क्यांहून अधिक मते मिळतात. तिथे कदाचित १-२ खासदार निवडून येऊ शकतील. सद्यपरिस्थितीत उर्वरीत भारतात भाजपला कर्नाटकात ४-६, महाराष्ट्रात १२-१४, गुजरातेत २०-२१, गोव्यात १, छत्तीसगडमध्ये ७-८, म.प्र. मध्ये १८-२०, राजस्थानमध्ये २०-२१, पंजाबमध्ये १-२, दिल्लीत ३-४, हरयानात २-३, हि.प्र.मध्ये ३, उत्तराखंडमध्ये ४, उ.प्र.मध्ये २५-३०, बिहारमध्ये १५-२०, झारखंडमध्ये ६-७ व आसाममध्ये २-३ जागा मिळू शकतील. एकंदरीत भाजपला सध्या १५०-१७५ च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना १२-१३ व अकाली दल ६-७ जागा मिळवू शकेल. एकंदरीत एनडीए १८० च्या आसपास जाईल. अगदी सर्वोत्तम कामगिरी केली तर भाजप १७५ व एनडीए १९५ पर्यंत जाईल. त्यामुळे बहुमतासाठी किमान ८० जागा कमी पडतील. काँग्रेसप्रणीत युपीए १५० च्या आतच राहील व इतरांना २०० च्या आसपास जागा मिळतील. बहुमतासाठी भाजपला नवीन मित्र शोधणे आवश्यक आहे. अद्रमुक, तेलगू देसम व येडीयुरप्पा बरोबर आले तर भाजपच्या किमान ५-६ जागा वाढतील व एनडीएच्या किमान ५० जागा वाढतील. तरीसुद्धा २०-२५ जागा कमी पडतील. एकंदरीत काँग्रेसच्या बाह्य समर्थनाने तिसर्‍या आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. काँग्रेस कदाचित दलित कार्ड खेळून मीराकुमार किंवा सुशीलकुमार शिंदेंचे नाव पुढे आणून इतर पक्षांच्या सहाय्याने सरकार स्थापन करायचा प्रयत्न करेल. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता धूसर आहे. भाजप कदाचित अडवाणी किंवा सुषमा स्वराजांचे नाव पुढे आणून अजून काही पक्षांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करेल. पण कोणतेही सरकार स्थापन झाले तरी ते २ वर्षांहून अधिक काळ टिकणार नाही व २०१५ किंवा २०१६ मध्ये मध्यावधी निवडणूक होईल.
  • Log in or register to post comments

+११११

प्यारे१
Mon, 11/04/2013 - 12:55 नवीन
+११११ कालच हया विषयावर (नेहमीप्रमाणं) चर्चा सुरु होती. इन मिन तीन राज्यांत भाजप सरकार आहे. सोशल नेटवर्कींग साईटवर मोदी 'आले नि न पाहताच झाले'च्या थाटात चर्चा सुरु आहे. बाकी काँग्रेस अत्यंत धूर्तपणं निवडणुका जिंकतं, किमान 'हरत नाही' हा पूर्वानुभव आहे. मीराकुमार ची शक्यता जास्त आहे. सुशिलकुमार ना इतर उत्तरभारतीय पसंती देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या १७८ जागांपैकी १०० जागा

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 23:19 नवीन
या १७८ जागांपैकी १०० जागा भाजपला मिळतील. मोदींची हवा अशीच कायम राहीली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जयललिता

रमेश आठवले
Mon, 11/04/2013 - 18:29 नवीन
जयललिता यांचे सध्याचे धोरण द्र . मु. क. ला विरोध एवढेच आहे. त्यामुळे स्वत:ला पी म बनता येणार नाही याची खात्री झाली तर त्यांच्या गटाची मते भाजप च्या बाजून होतील.. महाराष्ट्रात ४८ पैकी शिवसेनेबरोबर २४ पेक्षा जास्त जागा मिळतील. देशाच्या घटने प्रमाणे स्थिर सरकार होऊ शकले नाही तर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. हे कोणालाच रुचणार नाही. त्यामुळे -जिकडे सरशी तिकडे पारशी - हे धोरण असलेलेले तृणमूल आणि बिजू जनता दल, अग अग म्हशी मला कुठे नेशी असा कांगावा करीत भा ज पा च्या कडे येतील.
  • Log in or register to post comments

>>> त्यामुळे -जिकडे सरशी

श्रीगुरुजी
Mon, 11/04/2013 - 20:12 नवीन
>>> त्यामुळे -जिकडे सरशी तिकडे पारशी - हे धोरण असलेलेले तृणमूल आणि बिजू जनता दल, अग अग म्हशी मला कुठे नेशी असा कांगावा करीत भा ज पा च्या कडे येतील. नवीन पटनाईक व तृणमूल काँग्रेसने कोणत्याही इतर पक्षांच्या कुबड्या न घेता स्वबळावर बहुमत मिळविलेले आहे. त्यांना इतर पक्षांची गरज नाही. उलट भाजप व काँग्रेसला त्यांची गरज आहे. नवीन पटनाईकांना व ममता बॅनर्जींना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळे ते आपले राज्य सोडून केंद्रात येण्याची शक्यता कमी आहे. आपल्या पक्षाचे राज्य असताना औटघटकेच्या पंतप्रधान पदाच्या मोहामुळे आपण दिल्लीत गेलो तर काही महिन्यातच पंतप्रधानपद जाईल आणि राज्यात आपल्यामागे मुख्यमंत्रीपदावर बसलेला प्रतिस्पर्धी आपल्याला निर्माण होईल या भीतिने देखील ते केंद्रात जायच्या मोहात पडणार नाहीत. त्याऐवजी किंगमेकरच्या भूमिकेत राहणे त्यांना आवडेल. याऊलट जयललिता, पवार व नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे. पंतप्रधानपदाच्या खूर्चीवर १ सेकंद बसायला मिळणार असेल तरी ते हातातली उरलेली सर्व पदे सोडून धावत येतील. उद्या पंतप्रधानपद गेले तरी जयललिता नि:संकोच परत तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर बसेल. पवारांना तर गमावण्यासारखे काहीच नाही व महाराष्ट्रात मिळविण्यासारखे काहीच नाही, त्यामुळेच ते गेली अनेक वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून ताटकळत उभे आहेत. नितीशकुमार औटघटकेच्या पंतप्रधानपदावर खुष असेल आणि नंतर देवेगौडा सारखा कालबाह्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

आणखी थोडेसे

रमेश आठवले
Mon, 11/04/2013 - 21:49 नवीन
नवीन आणि ममता, बाजपेयी यांच्याबरोबर बरोबर राहिले होते त्यानंतर ममता या कॉंग्रेस सरकारात घटक झाल्या होत्या..आपण म्हणता त्याप्रमाणे ते दोघे एकच राज्यात प्रभावी असल्याने पी म पदासाठी प्रयत्न करणार नसावेत . नितीश कुमार यांनी अवेळी 'हात' दाखवून अवलक्षण करून घेतले आहे . लालूजी जेल मध्ये आहेत. भा ज पा ने धूर्तपणाने विधान सभेत विरोधी पक्षाचे नेतेपदी सुशील कुमार मोदी यांच्या ऐवजी कोणी यादव याना नेमले आहे. या वरून बिहार मधे भा ज प ला ४० पैकी २० पेक्षा जास्त जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. त्या शिवाय अपक्ष आहेतच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तळटीप

रमेश आठवले
Tue, 11/05/2013 - 02:57 नवीन
मला वाटते की ओरिसा मधे बिजू दल आणि भा ज प यांचे संयुक्त सरकार होते. त्यावेळी क्न्धाल येथील स्वामींचा खून आणि त्या नन्तरच्या उसळलेल्या ख्रिश्चन - हिंदू दंगलीमुळे नवीन ने भा ज पा ची साथ सोडली. हा निर्णय घेताना नवीन यांनी त्यांच्या पक्षाच्या मोह्पात्रा या राज्यसभेच्या सदस्यांचा सल्ला महत्वाचा मानला होता. आता नवीन आणि मोह्पात्रा यांचे बिनसले आहे असे समजले.. स्वामींच्या मारेकऱ्यांना नुकतीच शिक्षा झाली आहे. तरी या वातावरणात बिजू दल आणि भा ज प यांना दिल्लीत हातमिळवणी करणे जड जाणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

भाजपाला जाणीव आहे

चौकटराजा
Mon, 11/04/2013 - 19:59 नवीन
भाजपाला सर्व प्रतिकूल प्रवाहांची जाणीव आहे. त्यांची एकच आशा त्याना आहे की २०० च्या आसपास ते व त्यांचे आताचे सहकारी आले तर उरलेले आयाराम त्याना येऊन मिळतील. बाकी कोण्त्याही कारणाने भाजपाला यश मिळणे शक्य नाही. मोदीनी अगदी क्रांतिकारी मुद्दे आणले तरी ग्रामीण भागातील लोकाना त्याचे काही सोयरसुतक असणार नाही.
  • Log in or register to post comments

एबीपी न्यूज्-दैनिक भास्कर

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/07/2013 - 15:20 नवीन
एबीपी न्यूज्-दैनिक भास्कर यांच्या मतदान चाचणीनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला ९० पैकी ६० जागा (४४ टक्के मते) मिळण्याची शक्यता आहे. http://www.hindustantimes.com/specials/coverage/myindia-myvote/chunk-ht-ui-myindiamyvote-chhattisgarh/chattisgarh-opinion-poll-predicts-third-term-for-bjp/sp-article10-1147525.aspx याआधी आयबीएन-लोकमतचा अंदाज देखील बराचसा असाच होता (भाजप ६१-७१ जागा, ४६ टक्के मते).
  • Log in or register to post comments

भाजपाला बहुमत मिळेल ही शक्यता

विजुभाऊ
Fri, 11/08/2013 - 02:21 नवीन
भाजपाला बहुमत मिळेल ही शक्यता कमी आहे. गडकरींची मनीमॅजीक चालली आणि शरदपवार भाजपच्या ताटात जाऊन बसले तर मात्र काही साम्गता येत नाही. पण बहुमत मिळाले तरी काठावरचे मिळेल भाजप आणि संघ यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे.
  • Log in or register to post comments

हा इंडीया-टुडेचा नवीन पोल

श्रीगुरुजी
Fri, 11/08/2013 - 13:19 नवीन
हा इंडीया-टुडेचा नवीन पोल http://indiatoday.intoday.in/story/india-today-org-poll-2014-general-elections-bjp-congress-chhattisgarh-delhi-madhya-pradesh-delhi/1/322082.html या पोलनुसार खालील परिस्थिती असेल. १) म.प्र. - भाजप (१४०), काँग्रेस (७८) २) छत्तीसगड - भाजप (४६), काँग्रेस (४२) ३) दिल्ली - भाजप (३६), काँग्रेस (२२), आआप (८) ४) राजस्थान - भाजप (१२०), काँग्रेस (७६) झी न्यूज्-सी फोर चे अंदाज १) म.प्र. - भाजप (१००-११०), काँग्रेस (९९-१०९) २) छत्तीसगड - भाजप (४१-४६), काँग्रेस (४१-४६)
  • Log in or register to post comments

आज वानखेडेवर सामना बघण्यासाठी

श्रीगुरुजी
Fri, 11/15/2013 - 20:49 नवीन
आज वानखेडेवर सामना बघण्यासाठी पप्पू आल्याआल्या लगेचच प्रेक्षकांनी "मोदी", "मोदी" अशा घोषणा सुरू केल्या. त्यानंतर बरेच इन्टरेस्टिंग ट्वीट्स पण आले. http://indiawires.com/26262/news/national/rahul-gandhi-comes-to-wankhede-people-chants-for-modi/
  • Log in or register to post comments

सोशल नेटवर्कींग

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 12/04/2013 - 20:47 नवीन
सोशल नेटवर्कींग साईटस वरचे ट्वीट आणि फिरणारे मेसेजेस हा एक निव्वळ भंपक प्रकार आहे. एखाद्या उमेदवाराची किंवा पक्षाची ईमेज तयार करण्यासाठी अशी कामे करणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मोदींच्या लाटेने भाजपला पूर्ण

arunjoshi123
Fri, 11/15/2013 - 23:12 नवीन
मोदींच्या लाटेने भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. जिथे भाजप नाही तिथे त्याला प्रवेश मिळेल. हे कर्नाटकात होताना मी पाहिले आहे. इतके काही अवघड नाही. फक्त निवडणूक येईपर्यंत भाजपकडून काही मोठी चूक व्हायला नको.
  • Log in or register to post comments

सहमत आहे !

चेतनकुलकर्णी_85
Fri, 11/15/2013 - 23:22 नवीन
सहमत आहे ! सौथ मधील स्थानिक लोकांशी पण बोलताना मोदी बाबत असलेले समर्थन वाढीस लागलेले स्पष्ट दिसते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

?

नितिन थत्ते
Sat, 11/16/2013 - 21:29 नवीन
>>हे कर्नाटकात होताना मी पाहिले आहे कधी?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

पप्पूच्या सभेचा फज्जा

श्रीगुरुजी
Mon, 11/18/2013 - 12:59 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Rahul-Rally-a-flop-Show-in-Delhi/articleshow/25973937.cms
  • Log in or register to post comments

औटघटकेचे

मारकुटे
Mon, 11/18/2013 - 13:15 नवीन
मुलायमसिंग पंतप्रधान होऊ शकतात.
  • Log in or register to post comments

म.प्र. - भाजप सत्ता राखण्याची शक्यता

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/21/2013 - 12:42 नवीन
http://www.newsbullet.in/india/34-more/47958-abp-news-poll-predicts-bjp-return-in-mp या नवीन सर्वेक्षणानुसार म.प्र. मध्ये भाजप २३० पैकी १५५ जागा मिळवून पूर्ण बहुमत मिळविण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

समजत नाही

क्लिंटन
गुरुवार, 11/21/2013 - 12:55 नवीन
कालच्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते की मोदींच्या मध्य प्रदेशातील सभांना फारशी गर्दी झाली नव्हती. पण अशा स्वरूपाची बातमी इतर कुठल्याही वर्तमानपत्रात वाचायला मिळाली नाही.मोदींच्या सभेचा फज्जा झाला तर ती वर्तमानपत्रांसाठी फार मोठी बातमी होईल आणि त्यावर भरपूर चर्वितचर्वण चालेल हे वेगळे सांगायला नकोच.या दुव्यावर मध्य प्रदेशातील सभांचे व्हिडिओ दिले आहेत.ते बघून खरोखरच गर्दी नव्हती का याची खातरजमा करायला मला वेळ मिळालेला नाही.पण त्याचबरोबर ज्योतिरादित्य शिंदे म्हणतात की मध्य प्रदेशात मोदींना बोलावावे लागले याचाच अर्थ भाजपला विजयाची खात्री नाही !! म्हणजेच मोदी भाजपची मते वाढवू शकतात हे एका परिने ज्योतिरादित्यांनी मान्यच केले की नाही? तेव्हा नक्की काय चालू आहे हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एबीपी न्यूज च्या नवीन

श्रीगुरुजी
Fri, 11/29/2013 - 14:15 नवीन
एबीपी न्यूज च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - ३२, काँग्रेस - २५, आम आदमी पक्ष - १०, इतर - ३ http://indiatoday.intoday.in/story/hung-house-in-delhi-bjp-largest-party-says-survey/1/326856.html इंडिया-टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - ४०, काँग्रेस - १८, आम आदमी पक्ष - १०, इतर - २ एकंदरीत दिल्लीत काँग्रेसचा पराभव नक्की दिसतो, पण बहुमत कोणाला मिळेल हे अजून नक्की नाही.
  • Log in or register to post comments

इंडिया न्यूज-सी व्होटर च्या

श्रीगुरुजी
Mon, 12/02/2013 - 13:14 नवीन
इंडिया न्यूज-सी व्होटर च्या नवीन सर्वेक्षणानुसार दिल्लीत अशी परिस्थिती असेल. भाजप - २९, काँग्रेस - २७, आम आदमी पक्ष - १०, बसप - २, इतर - २ एकंदरीत दिल्लीत काँग्रेसचा पराभव नक्की दिसतो, पण बहुमत कोणाला मिळेल हे अजून नक्की नाही. वरील आकडे खरे ठरले तर काँग्रेसला जास्त संधी आहे. बसप काँग्रेसलाच पाठिंबा देणार (नाही दिला तर काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनचा बडगा आहेच). इतर्/अपक्ष वगैरे काँग्रेसकडेच जातील. आआपचे काही आमदार काँग्रेसच्या गळाला लागतील. नाहीतर केजरीवालांवर काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनच्या माध्यमातून दडपण आणून काँग्रेसलाच पाठिंबा द्यायला लावतील.
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Mon, 12/02/2013 - 13:15 नवीन
असले रीपोर्टस हे देतातच कसे या न्यूज चॅनेल्सना इन्कम टॅक्सची नोटीस पाठवावी सी बी आय चा झक्कू मागे लावावा झालंच तर विनयभंग, बला... च्या दोन चार केसेस टाकणेही सरकारला अवघड नाही
  • Log in or register to post comments

राजस्थानमधे तर वसुंधराबाईंना

सौंदाळा
Mon, 12/02/2013 - 14:19 नवीन
राजस्थानमधे तर वसुंधराबाईंना आताच अभिनंदनाचे संदेश यायला लागलेत म्हणे. १० डिसेंबरला शपथविधी!! यतपत तयारी चालु केलीये भाजपाने.
  • Log in or register to post comments

प्रतिकुल/अनुकूल परिनाम

देव मासा
Mon, 12/02/2013 - 15:50 नवीन
देशात घडलेल्या अशा कुठ्ल्या घटना आहेत , ज्याचा प्रतिकुल/अनुकूल परिनाम २०१३ मधील निवडणुकान वर होऊ शकतो?
  • Log in or register to post comments

उघडकीस आलेले

बाप्पू
Tue, 12/03/2013 - 00:26 नवीन
उघडकीस आलेले बरेच नवीन घोटाळे, वाढलेले दहशतवादी हल्ले, वाढलेली महागाई , वाढलेली जातीय तेढ, सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेले महत्वपूर्ण निर्णय ( अन्न सुरक्षा विधेयक, कसाब आणि अफजल गुरु ची फाशी ई. ) गोष्टी अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करतील असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा

>>> देशात घडलेल्या अशा

श्रीगुरुजी
गुरुवार, 12/05/2013 - 13:18 नवीन
>>> देशात घडलेल्या अशा कुठ्ल्या घटना आहेत , ज्याचा प्रतिकुल/अनुकूल परिनाम २०१३ मधील निवडणुकान वर होऊ शकतो? खालील गोष्टींचा काँग्रेससाठी अनुकूल व भाजपसाठी प्रतिकूल परीणाम होऊ शकतो. - अत्यंत स्वच्छ प्रतिमा, जागतिक कीर्तिचे अर्थतज्ज्ञ, अत्यंत कणखर, अत्यंत कार्यक्षम पण तरीही मितभाषी व नम्र असलेल्या मनमोहन सिंगांचे धडाडीचे नेतृत्व - भ्रष्टाचार व दहशतवाद याविरूद्ध त्यांनी घेतलेली अत्यंत कठोर भूमिका व त्याविरूद्ध "झिरो टॉलरन्स" धोरण - गेल्या ९-१० वर्षात न भूतो न भविष्यति अशी प्रगती करून जागतिक महासत्ता बनलेला भारत देश - जागतिक नेता म्हणून मनमोहन सिंगांना मिळालेली मान्यता व त्यांचा जगभर पसरलेला दबदबा - पाकिस्तान, चीन, श्रीलंका, बांगलादेश इ. खोडकर शेजार्‍यांवर त्यांनी बसविलेली जरब - सोनियाजींचा त्याग व त्यांची गरीब, दलित, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक इ. विषयी असलेली तळमळ - राहुलजींचे सळसळते व स्फूर्तीदायी युवा नेतृत्व - भाजपचा जातीयवाद - इतर विरोधी पक्षांचा नाकर्तेपणा - सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा, धर्मनिरपेक्ष असलेला, समाजवादी विचारांचा,गरीब, दलित, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्या बाजूने लढणारा काँग्रेस पक्ष - दिग्विजयसिंग सारख्या आधुनिक चाणक्यांचे मार्गदर्शन हे सर्व मुद्दे बघितले तर २०१४ निवडणुकीत काँग्रेसला एकट्याच्या बळावर दोन तृतीयांश बहुमत मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देव मासा

काँग्रेसला पर्याय नाही हेच

ग्रेटथिन्कर
Tue, 12/03/2013 - 08:32 नवीन
काँग्रेसला पर्याय नाही हेच खरे.
  • Log in or register to post comments

माझा अंदाज

ऋषिकेश
Tue, 12/03/2013 - 16:46 नवीन
माझे अंदाज ऐसीवर दिले आहेत त्याचे फक्त दुवे देतो: मध्य प्रदेश छत्तीसगढ राजस्थान याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये विरोधकांची मते दुभागली जाऊन काँग्रेसला निसटते बहुमत मिळेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

इग्झिट पोल्स सत्याच्या जवळ

ऋषिकेश
गुरुवार, 12/05/2013 - 10:41 नवीन
इग्झिट पोल्स सत्याच्या जवळ असतील तर माझे छत्तीसगढ वगळता सगळेच अंदाज साफ चुकले आहेत :( निव्वळ आकड्यांवरून हे अंदाज बांधायला अधिक विदा हवा अशी खूणगाठ बांधली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

हो हो हो!

हुप्प्या
Sun, 12/08/2013 - 12:11 नवीन
काँग्रेसला निसटते बहुमत? ह्ह्पुवा! जनतेच्या सुदैवाने आणि काँग्रेसमिंध्यांच्या दुर्दैवाने काँग्रेसला निसटते बहुमत न मिळता निसटते मत मिळाले. आप की ख्वाहिश पूरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

वोट टाकून आलो. तिन्ही

विवेकपटाईत
Wed, 12/04/2013 - 19:05 नवीन
वोट टाकून आलो. तिन्ही पार्टीनच्या टेबलांवर सारखीच गर्दी दिसत होती. खरी परिस्थिती ८ तारखेलाच कळू शकते.
  • Log in or register to post comments

Exit Poll: तीन राज्यात भाजप पुढे

मंदार कात्रे
Wed, 12/04/2013 - 21:05 नवीन
4 Dec 2013, 2035 hrs ISTTweet दिल्लीत भाजपला बहुमत मिळत नसले तरी सर्वात मोठा पक्ष ठरतोय. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या हाती सत्तेची चावी येण्याची शक्यता आहे. तर मिझोरममध्ये कॉंग्रेस बहुमताच्या जवळ पोचणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments

भाजपा

दुश्यन्त
Wed, 12/04/2013 - 22:57 नवीन
चारहि राज्यात भाजप सत्तेत येइल असा माझा अन्दाज आहे. रमण सिन्ग (छत्तीसगढ), शिवराज (मप्र) आणि आता हर्षवर्धन (दिल्ली) हे चार चान्गले चेहरे भाजपाने दिले आहेत.गोव्यामधील पर्रिकरपण या यादीमध्ये येतात.
  • Log in or register to post comments

पोल ऑफ पोल्स

विकास
Wed, 12/04/2013 - 23:04 नवीन
Image removed. दुवा: एनडीटिव्ही
  • Log in or register to post comments

कुणीतरी त्यामिझो राम कडेही लक्ष दया हो

दिनेश चिले
गुरुवार, 12/05/2013 - 12:16 नवीन
कुणीतरी त्यामिझो राम कडेही लक्ष दया हो. ते राज्यही आपल्याच देशात आहे. भले छोटे राज्य का असेना. बहुतेक तिकडे एक्झिट पोल वाले फिरकले नसणार.
  • Log in or register to post comments

.

उद्दाम
गुरुवार, 12/05/2013 - 13:44 नवीन
आता अयोद्येच्या रामालाच वाळीत टाकले आहे. त्या कोपर्‍यातल्या मिझो रामाला कोण इचारणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश चिले

चांगला जोक आणि तोही

इष्टुर फाकडा
गुरुवार, 12/05/2013 - 13:57 नवीन
चांगला जोक आणि तोही तुमच्याकडून ! असो, ते रामाला (अयोध्येच्या) वाळीत टाकले ते चांगले कि वाईट ? वाळीत टाकल्यावर भाजप धर्मनिरपेक्ष झाला का ? भाजपने रामाला वाळीत टाकायला हवे होते कि नाही ? माझे टंकनश्रम नेहमीप्रमाणे फुकट आहेत पण क्लिंटन च्या पायावर पाय ठेवून लिहित आहे. तुम्ही शेपूट घालून पळणार हे नक्की आहेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उद्दाम

.

उद्दाम
गुरुवार, 12/05/2013 - 14:08 नवीन
ते भाजपावाल्यांना इचारा. रामाला वाळीत त्यानी टाकलं. आम्ही न्हाई. त्यान्नी आधी राम सोडला. मग ते कलम ३७० की काय ते सोडलं. भाजपाच्या सगळ्या गोष्टी आता काँग्रेससारख्याच होणार. मग सरळ भाजपा काँग्रेसातच विलिन का नाही करत? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा