मागे मागे धावणारी..
दिसतील स्थानके,
फलाटावर दिसतील थांबूनी..
जिवंत पुतळे!
रोज रोज पटरी वरूनी..
गरगर फिरणारे,
दिसेल चेहर्या चेहर्यावरी,
जीवन जाळे!
हे छान. आवडले.
(मुंबईकर)बेसनलाडू
चवथ्या सीटच्या संदर्भाने चक्रावलो होतो... आता आठवण येउन अर्थ कळला.
छानच आहे कविता.
ठाण्याला शाळेतल्या सुटीत मी जात असे, तेव्हा लोकलचे आकर्षणही वाटे, गर्दीची भीतीही वाटे. मुंबईत न राहाता मध्य रेल्वेची सर्व उपनगरीय स्थानके पाठ होती, कुठल्या स्थानकाचा फलट उजव्या आणि कुठल्या स्थानकाचा फलाट डावीकडे हे सगळे पाठ असण्याइतके चक्रम आकर्षण होते.
स्वातीताई,
सुंदर कविता लिहिलीत.सुरवाती पासून शेवट पर्यंत लिंक ठेवलेली पाहून मला मी १८ वर्ष मागे घेऊन गेलो.कवितेचा मुख्य गाभा तोच पण मुंबईची वस्ति वाढल्याने ,
"ऊन, पाऊस, वाऱ्याशी,
सम साधणे!"
कसं काय जमत असावं आता लोकांना ह्याच कुतुहल वाटतं.कादाचित माझ्या वयोमानामुळे तसं वाटत असावं.
मनातला आशय समर्पकपणे विशद करायला कविते सारखं दुसरं साधन नाही हेच खरं.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
मस्त!
आभारी आहे.
छान!
पुतळे,जाळे
छान आहे कविता....
धन्यवाद
वा
छान
मनापासून आभार
स्वातीताई,
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद पाहून आनंद झाला.