Skip to main content

आज नेताजी सुभाष यांची ६७ वी पुण्यतिथी

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 18/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
akherJPG आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची ६७वी पुण्यतिथी. सशस्त्र क्रांतिच्या पर्वाचा कळस ठरलेल्या, आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ येउन ठेपलेल्या - मोइरांग येथे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकावणार्‍या नेताजींना स्वतंत्र हिंदुस्थान पाहायचे भाग्य लाभले नाही. मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या आझाद हिंद सेनेचाच होता. नेताजींच्या ६७ व्या स्मृतिदिनी नेताजींना सादर प्रणाम
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3182
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

नेताजींना आदरांजली. स्वातंत्र्याची प्रक्रिया गतिमान करण्यात नेताजी आणि त्यांच्या आझाद हिंद फौजेचा मोठा सहभाग होता.

नेताजींना सादर प्रणाम

सुभाषबाबूंच्या स्मृतीस सादर प्रणाम - (सुभाषबाबू दैवत असलेला) सोकाजी

--^--^--^--

अवांतरः >> मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या आझाद हिंद सेनेचाच होता. सरकारी इतिहासाच्या पुस्तकात वाचलं नाहीत का, ६ वी ७ वीत "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" डोंबल :) :) :) ........ आम्ही त्या ओळीचं विडंबन केलं होतं : "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा रचला पाया" :)

In reply to by sagarparadkar

सरकारी इतिहासाच्या पुस्तकात वाचलं नाहीत का, ६ वी ७ वीत "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" डोंबल ........ आम्ही त्या ओळीचं विडंबन केलं होतं : "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा रचला पाया"
इतर कोणाही क्रांतिकारकाला/स्वातंत्र्यसैनिकाला अभिवादन करताना महात्मा गांधींना चार-दोन टपल्या मारल्याच पाहिजेत असा नियम आहे का? आणि गांधीजींचा 'राष्ट्रपिता' हा उल्लेख सर्वप्रथम स्वतः सुभाषबाबूंनीच केला होता त्याचे काय?

नेताजींना श्रध्दांजली. पण त्यांचा मृत्यू नक्की त्या विमान अपघातात झाला होता का याविषयी बरेच वादविवाद आहेत. आज नेताजींना ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही श्रध्दांजली वाहत आहात म्हणजे त्या अपघातात त्यांचा खरोखरच मृत्यू झाला होता असे तुमचे मत आहे का? मागे कुठेतरी वाचल्याचे आठवते की १८ ऑगस्ट १९४५ रोजी त्या बेटावर कोणताच विमान अपघात झाला नव्हता.

नेताजींना अभिवादन. पण एवढे लिहुनच थांबावे. मागील एका धाग्यात ब्रिटीश चांगले कि जापानी चांगले ह्यावर मॅरॅथॉन चर्चा झाली होती आणि मुळ धाग्याचा उद्देशच वाया गेला होता. नेताजी ग्रेट होतेच ह्यात वाद नाही. नेताजी, सावरकर, वल्लभभाई पटेल अशा माणसांनी जर देशाचे नेतृत्व केले असते तर चित्र नक्कीच वेगळे असते. काँग्रेस काय किंवा भाजपा काय, ( एक जण ५० वर्षे राज्य करतोय तर दुस-याने साडेचार वर्षे राज्य केलं) देशाला एक नीट दिशा द्यायचे काम कोणीच केले नाही. असो, हा एक सेपरेट धाग्याचा विषय होईल म्हणुन येथेच थांबतो. नेताजींना पुन्हा एकदा श्रद्धांजली.

In reply to by अमोल खरे

देशाला एक नीट दिशा द्यायचे काम कोणीच केले नाही. दिशा ? अरे इतके वर्ष सत्ता भोगुनही साधे धड रस्ते नाही या देशात ! सध्या साल २०१२ हा इतक्या वर्षांचा विकास ?