✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पौराणिक विमाने

आ
आनन्दा यांनी
Sat, 04/14/2012 - 19:29  ·  लेख
लेख
सहज जालावर फिरता फिरता काही दुवे मिळाले, त्यावरुन अधिक खोलात जाता पुढील गोष्टी समजल्या. "पेरु" (खायचा नव्हे :) ) देशाच्या पश्चिम किनर्‍यावर म्हणे एक त्रिशूळ कोरलेला आहे, आणि त्या त्रिशूळबद्दल एक असा मतप्रवाह आहे कि तो त्रिशूळ हा विमानांसाठी दिशादर्शक होता त्या काळी... http://blog.travelpod.com/travel-photo/richardandsusie/2007_adventures/1176901560/paracas_trident.jpg/tpod.html अधिक संशोधन करता असे कळले कि त्याच प्रदेशात विमानांच्या काही प्रतिकृती सापडल्या आहेत म्हणे. प. वि. वर्तकानी या सर्वांचा परामर्ष "वास्तव रामयण" या पुस्तकात घेतला आहे... https://sites.google.com/site/vvmpune/other-works/about-trident-peru म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात खरेच विमाने होती की काय? http://www.2atoms.com/weird/ancient/plane.htm ही म्हणे धावपट्टी असावी http://www.billandcori.com/peru/nazcalines.htm आश्चर्य म्हणजे मी गूगल नकाशात पाहिले असता खरेच काहीतरी अगम्य रेषा दिसतात की!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78970 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

वा! वा!

Nile
Fri, 04/20/2012 - 20:46 नवीन
अत्यंत थर्ड क्लास रिमार्क.
तुम्ही बरोबर ओळखला!
ज्यांची बुद्धी केवळ पचनसंस्थेच्या दुसऱ्या टोकावरचे विनोद करण्याइतकी आहे त्यांच्या तोंडी लागण्यात काही हशील नाही, तरी केवळ निषेध व्यक्त करतो.
वा! तुमच्या सारखे लोक नसत तर मिसळपावचे काय झालं असतं नाही! तुमचे महान कार्य असेच चालू ठेवा. मिसळपावसाठी तुम्ही म्हणजे जंगलातल्या मागासलेल्या जमातीसाठी अंधारातले काजवेच जणू! सद्ध्यातरी तुमच्या लोकांना विमान वगैरे संज्ञांचा अर्थ समजावण्याच्या महान कार्यात माझा खोडा झाला म्हणून स्वारी म्हणतो! चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हम्म...

दादा कोंडके
Sat, 04/14/2012 - 20:30 नवीन
विमानंच का? दळणवळाच्या साधनात अजुनही पुढं काही नवीन शोध लागतील. मग ते सुद्धा पुर्वीच कसे होते ती सांगणारे लेख येतील. पण ते तेंव्हाच येतील आत्ता येणार नाहीत, कारण मग त्याचा उपयोग होईल ना! :) बाकी रामायणात मारुती एक रोबो होता, किंवा गणपती म्हणजे डेस्कटॉप संगणकच होता (कान म्हणजे दोन स्पीकर, पोट म्हणजे मॉनिटर आणि डोकं म्हणजे सिपीयु. हे कमी म्हणून दोन्ही समोर उंदीरच असतो म्हणे) वगैरे थिअरीज ऐकण्यात आहेत!
  • Log in or register to post comments

पृथ्वीवर माणूस उपरा

प्राध्यापक
Sat, 04/14/2012 - 21:24 नवीन
या विषया संबधात प्रा.सुरेशचन्द्र नाडकर्णी यांच्या 'पृथ्वीवर माणुस उपराच' या पुस्तकात सविस्तर माहीती आहे ,या विषयावर सर्वप्रथम लेखन एरीक व्हॅअन डेनिकन या संशोधकाने केलेले आहेत ,सदर पुस्तकात पृथ्वीवर मानवाच्या अगोदर ही एक प्रगत संस्कृती अस्तीत्वात होती असा दावा करण्यात आलेला आहे.सुमारे १२/१३ वर्षापुर्वी सकाळ वर्तमान पत्रात एअक लेखमाला हि नाडकर्णी यांनी चालवली होती.
  • Log in or register to post comments

पेरु मधील त्या मोठ्ठ्या

शिल्पा ब
Sat, 04/14/2012 - 21:41 नवीन
पेरु मधील त्या मोठ्ठ्या आकृत्या म्हणजे आकाशातुन देवांना दिसावं की खाली लोकं त्यांचे भक्त आहेत म्हणुन काढलेल्या आहेत असं डिस्कव्हरी चॅनल वर पाहीलेलं आहे. असो, ते नासाला कसा अन काय फायदा झाला ते लिंकवलं तर आमचंही ज्ञान वाढेल तरी मृगनयनी तैंनी हे मनावर घ्यावंच. खरंतर अशी देवभोळी लोकंच देशाची संपत्ती आहेत. नैतर पाश्चिमात्यांनी आपले सगळे पुराणकालीन शोध चोरुनदेखील आपल्याला कळले नसते.
  • Log in or register to post comments

च्यायला, ही बै नुसते चिमटेच घेत र्‍हाती. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/15/2012 - 10:05 नवीन
>>>>>देवभोळी लोकंच देशाची संपत्ती आहेत. कृपया, देवभोळ्या लोकांची टींगल करु नये ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे (देवभोळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

"नासाला कसा अन काय फायदा झाला

चित्रगुप्त
Sat, 04/14/2012 - 22:13 नवीन
"नासाला कसा अन काय फायदा झाला ते लिंकवलं तर आमचंही ज्ञान वाढेल तरी मृगनयनी तैंनी हे मनावर घ्यावंच" ....अगदी असंच म्हणतो. तसंच......."पद्माकर वर्तक" इज द ग्रेट मॅन!!!.. आय नो हिम.......... तर मग खालील खुलासा अपेक्षित आहे: वर्तक साहेबांना "ब्रम्हर्षी" ही पदवी कुणी दिली, हे जाणून घेण्यास उत्सुक आहे, कारण पुराणकाली ही पदवी मिळवण्यासाठी विश्वामित्र ऋषींनी घनघोर तपश्चर्या केली होती, आणि स्वतः "ब्रम्हर्षी" असलेले वसिष्ठच केवळ त्यांना ते सर्टिफिकेट देउ शकत होते. असे असताना या कलियुगात वर्तकांना ही पदवी देण्यारा कोण बुवा हा नरपुंगव ? अशी जिज्ञासा वाटणे सहाजीकच... ...की... उदाहरणार्थ त्याकाळी "पुणेकर" नावाची एक जमात असे, ही मंडळी अखिल जगतातील यच्चयावत नियमांना हुबेहुब अपवाद वगैरे असत ..... तसे काही आहे काय?
  • Log in or register to post comments

नुस्तं धावपट्टीगत काहीतरी

JAGOMOHANPYARE
Sat, 04/14/2012 - 23:42 नवीन
नुस्तं धावपट्टीगत काहीतरी दिस्लं की हा विमान होता याचा पुरावा मानायचा? असो.. एक इनोद............ एकदा एक चिनी मानूस आणि एक हिंदुत्ववादी मनुष्य उत्खनन करत फिरत असतात. आधी चीन मध्ये जातात. तिथे उकरतात तर एक टेलिफोनची केबल मिळते.. चिनी मानुस म्हणतो.. यावरुन हे सिद्ध होते की आमच्या देशात प्राचीन काळी टेलिफोन होते. मग भारतात उकरतात, तर काहीच मिळत नाही.. चिनी मानुस तुच्छतेने म्हणतो.. तुमच्या देशात तर साधी केबलसुद्धा मिळाली नाही. तेच तर... यावरुन हे सिद्ध होते की प्राचीन काळी आमच्या देशात मोबाइल आणि वायरलेस होते.... हिंदुत्ववादी गर्वाने म्हणतो.. :)
  • Log in or register to post comments

जामोप्या

रमताराम
Sun, 04/15/2012 - 00:23 नवीन
पुरावे मागायचे नसतात असे, देशद्रोही, संस्कृतीद्रोही कुठले. मुकाट्याने उचलून फेसबुकावर टाका नि गावभर लाईक करा असा जोगवा मागायला सुरवात करा बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

व्वावा, जबरा इनोद

chipatakhdumdum
Sun, 04/15/2012 - 00:37 नवीन
जरा मिसळपाव सोडून इतर काहीतरी वाचत जावा की राव. निदान बेळगावी पुस्तक तरी......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

च्यायला, वर्तकांच्या विचारांना जालावर मरण नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/15/2012 - 10:28 नवीन
वर्तकांच्या वास्तव रामायणात या पौराणिक विमानांच्या बाबतीत वर्तक म्हणतात पाहा पृ.क्र. १३८ शेवटचा उतारा पाहा. पुष्पक विमानातून उतरल्यानंतर रामाला चांगलं विमान मिळालं होतं. पण, रामानं त्या विमानाच्या ड्रायव्हरला विमान घेऊन जा ''वैश्रवणाला तू नेत जा ! मी तुला आज्ञा देतो, जा. (यु.१२७)असे सांगितले आणि ते विमान निघून गेलं. वर्तकांच्या भाषेत '' रामाची ही वृत्ती खास भारतीय माणसाचीच वृत्ती आहे. रामापासून आजपर्यंत भारतातील माणसे अशीच वागली आहेत, म्हणूनच आपल्या देशाचे व संस्कृतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जगात कुठलीही वस्तू दिसली की ती मिळविण्याचा व तशीच वस्तू भारतात बनविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तरच जगातील स्पर्धेत आपण टिकून राहू . आपल्याला हे जमणार नाही' असे म्हणून हातपाय गाळून बसण्याची वृत्ती आता तरी सोडून दिली पाहिजे'' विमान रामाच्या ताब्यात असूनही आपल्या ताब्यात ठेवलं नाही. तसं दुसरं विमान बनविण्याचा विचार सुद्धा आला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या वर्तकांच्या विचारांवरुन असे म्हणता येते की, रामाकडे हजार वर्ष पुढे पाहण्याची दृष्टी नव्हती, याबद्दल माझ्याही मनात आता कोणती शंका उरली नाही. बाकी, विमानाला इंधन म्हणून पार्‍याचा वापर होत होता आणि पुढे पारा दुर्मिळ झाल्यामुळे इंधनसमस्या निर्माण झाली आणि अशी विमानं नष्ट झाली हा वकिली मुद्दा पटण्यासारखा आहे. आज पेट्रोल-डिझेल नष्ट झाल्यावर आपल्यालाही आजची वाहतूक साधनं हजार वर्षानंतर दिसणार नाही तशीच परिस्थिती झाल्यामुळे त्या काळातील विमानं आज दिसत नाही. असो, थकलो आता. कोणाला जिज्ञासा असेल तर अजून माहिती डकवीन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Sun, 04/15/2012 - 11:59 नवीन
मिपावरील ही असली संस्कृतीभक्षक आणि संस्कृतीला अपमानस्पद विधाने बघून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली. अहो विमानाचे काय घेऊन बसलात, त्याकाळातील (रामायण, महाभारत इ.) युद्धात वापरल्या गेलेल्या अग्नीअस्त्र, पर्जन्यास्त्र, पाशुपत, ब्रह्मास्त्र इ. अस्त्रांमुळे निर्माण झालेला संहार आणि हानी वाचा. आजकालच्या अण्वस्त्रांमुळे होणार्‍या हानीच्या वर्णनाशी अगदी तंतोतंत जुळतात. रामायणात समुद्र ओलांडून जाणाच्या पहिल्या प्रयत्न केलेल्या सुग्रीवाने केलेले पृथ्वीचे वर्णन आणि आज सॅटेलाईट पाठवत असलेले पृथ्वीचे वर्णन किती जुळते ते स्वतःच तपासा. ररा आणि शिल्पाबैं सारख्या संस्कृतीभक्षकांना मिपावरुन ७ दिवसांसाठी निलंबीत करावे आणि सदर धाग्याची आणि वर्तकांची खिल्ली उडवणार्‍या ननींचे सदस्यत्व महिनाभरासाठी निलंबीत करावे असा प्रस्ताव मी मांडत आहे. हे सर्व लोक परकीय शक्तींचे हस्तक असून, भारतीय संस्कृतीचे पाळे मूळे उपसण्यासाठीच भारतात कार्यरत आहेत.
  • Log in or register to post comments

शास्त्रज्ञ परा (पारा नव्हे,

रामजोशी
Sun, 04/15/2012 - 16:18 नवीन
शास्त्रज्ञ परा (पारा नव्हे, नाहीतर लागाल उडायला !) आणि तेही आपण विसरलात.... माकडांनी टाकलेली दगडं पाण्यात कशी तरंगली असे हे नतद्रष्ट लोक विचारतात, पण लोखंडाची एवढी मोठी जहाजे पाण्यावर कशी तरंगतात हे यांना माहीत नाही काय ....... निलंबनाबद्दल पाठिंबा........... सकाळमधे एका शास्त्रज्ञ बाईंनी घटत्कोच एक रोबो होता असे सिद्ध केल्याबद्दल वाचल्याची आठवण झाली. अर्थात तो त्यांचा दुर्दैवाने शेवटचा लेख ठरला त्याचेही कारण तेच... परकीय हस्तकच आहे... नाहीतर त्या बाईंनी जगातील एकूण एक शोध भारतातच कसे लागले होते हे सिद्ध करायचा विडाच उचलला होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

विषय आला आहे म्हणून...

आनन्दा
Mon, 04/16/2012 - 09:03 नवीन
आपण रामसेतूची उपग्रह प्रतिमा पाहिली आहे का? अगदी सरळ सुस्पष्ट आहे हो.. मी पण चकित झालो! http://maps.google.com/maps/place?cid=5287905973995940885&q=RamSetu,+Tamil+Nadu,+India&hl=en&ved=0CBgQ-gswAA&sa=X&ei=VZKLT6DFIKSViAfi4smRBg&sig2=uW9FOBf19XDE7TRbZ_KWpA आणि सहज एक प्रश्न मनात आला. जर हा खरेच मानवी निर्मिती असेल तर इथेच सगळ्यात कमी अंतर आहे हे कसे कळले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामजोशी

एक विचार करून पहा. बघा पटतोय

रमताराम
Mon, 04/16/2012 - 14:49 नवीन
एक विचार करून पहा. बघा पटतोय का. असं घडणं शक्य आहे का? (असंच घडलं असा माझा दावा नाही, इतर कोणाचा आहे का हे ही ठाऊक नाही.) मुळात एकसंध, सलग असलेला भूभाग, मधे कुठेतरी खाचखळगे असणारच (सपाट भूभाग शक्य आहे तसेच खाचखळग्याचा, किंबहुना जो भूभाग पाहतो तो जितका मोठा घ्याल तितकी दुसरी शक्यता जास्त, बरोबर ना?) काही कारणाने (विज्ञानवादी म्हणतील हिमयुग संपताना हिम वितळल्याने, पण आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे असे नाही. कोण्या रामाने बाण मारून असे केले असेही समजू शकतो) समुद्राच्या पाण्याची पातळी उंचावली. यामुळे नैसर्गिक खळग्यांमधे पाणी भरले गेले नि भारत नि श्रीलंका असा सलग भूभाग, मधे भरल्या गेलेल्या पाण्यामुळे विलग झाला. मधल्या भागात जो उंचवट्याचा भाग होता (कदाचित पर्वतरांगांचा) तो त्याच्या उंचीमुळे खळग्यांपेक्षा वर दिसतो. आज समजा पुण्याचा परिसरात पूर्ण पाणी भरले गेले नि पुणे हा एकच जलाशय झाला (बरेच लोक खुश होतील पण ते जाऊ द्या) आणि अ. नगर नि मुंबई वेगळे झाले तर काही शतकांनंतर मधल्या - पाण्यात असणार्‍या पण शहरापेक्षा उंच असल्याने वरून पुलाप्रमाणे दिसणार्‍या - पर्वतराजीला मानवनिर्मितीत पूल असे म्हणता येईल का? केवळ सलग दिसतो एवढा पुरावा मानवनिर्मित आहे हे सांगण्यास पुरेसा कसा काय ठरतो? समजा तो मानवनिर्मित आहे नि रामानेच बांधला. बरं मग, आता त्याचं काय करायचं? काढा फोटो, टाका फेसबुकवर नि आणा पाच-पंचवीस लाईक्स. बसा हाटेलात नि मारा गफ्फा 'आपल्याकडे कसं सग्गळ ग्रेट होतं नै' च्या. या फालतू अस्मितेच्या प्रश्नात अडकून राहण्यापेक्षा जर खरेच आपल्याकडे पूर्वी आधुनिक तंत्रज्ञान होते असे समजत असू तर मग उरलेले जे अजूनही अंधारात आहे ते उजेडात आणून पाश्चात्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न आपण का करीत नाही? तिकडे लागलेले शोधच वरातीमागून घोडे फिरवत 'आमचेच होते बरं का' म्हणणे ही आत्मसंतुष्ट वृत्ती आपल्याला नक्की काय देते? एरवी वैयक्तिक आयुष्यात पाश्चात्यांनी लावलेल्या शोधांच्या मागे धावायचे, त्यांनीच निर्माण केलेली केवळ सुखोपभोगाची साधने गोळा करायची नि वर दांभिकपणे आपली संस्कृती वगैरेच्या गप्पा मारायच्या कशाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

पटले अगदी १०० टक्के पटले.

मृत्युन्जय
Mon, 04/16/2012 - 15:03 नवीन
पटले अगदी १०० टक्के पटले. आपले पुर्वज लै भारी म्हणत बसण्यात काहीच अर्थ नाही. आज ९९% शोध परदेशात लागत असतील तर पुर्वजांच्या पराक्रमावर आपण आपल्या मिशीला पीळ देण्यात काहीच अर्थ नाही. पण मला मुळात कळत नाही की जर आपला इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक आहे. हे शोध आम्च्या पुर्वजांनी लावलेच नव्हते असा गैरसमज करुन घेण्यात तरी काय हशील आहे. नक्की कसला न्यूनगंड आहे आपल्याला? इतिहासातून काहितरी शिकता आले तर शिका ना? नसेल येत शिकता तर काही हरकत नाही पण किमान तो इतिहास नाकारण्यात काय अर्थ आहे? पुर्वजांच्या पुण्याईवर जगुन आपली प्रगती नाही होउ शकणार हे सोळा आणे सत्य आहे. पण मग त्यांची पुण्याई नाकारुन ते लागणार आहेत का? आपल्याकडे एक प्रगत इतिहास होता आणि आपण माती खाल्ली म्हणुन आज या अव्स्थेवर पोचलो आहोत आणि इथुन पुढे आपल्यालाच यातुन मार्ग काढायचा आहे हे मनाशी ठरवले तर पुर्वजांचा पराक्रम आपल्याला थोडी का होइना प्रेरणा, आत्मविश्वास देणार नाही का? आणी समजा नसेल देणार तर ज्यांना मिळु शकते त्यांची टिंगलटवाळी करण्यात काय हशील? आपण आपलाच प्रगत इतिहास का नाकारतो आहोत? तो गोंजारत बसुन प्रगती साधणार नाही तसा तो नाकारुनही साधणार नाही. मग तो मान्य करुन जर काही बरे साध्य होत असेल तर का नाही? असो राहता राहिली गोष्ट लंकेच्या पुलाची तर तो रामाने बांधलेला नाही हे मान्य करणे सद्यपरिस्थितीत जास्त शहाणपणाचे पण त्या पूलाचे आणि रामायणाचे काहितरी कनेक्शन नक्की आहे ना? नेमका तिथेच पूल होता हे आपल्या अडाणी. अशिक्षित पुर्वजांना कसे कळाले. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांनी केला असे आपण तुर्तास मानुयात पण मुळात नुसत्या डोळ्यांना न दिसणारा पूला त्यांनी कधी आणि कुठे आणि कसा शोधला आणॉ तो जर त्यांना ज्ञात होता तर ते नक्कीच थोडीतरी प्रगती केलेले होते की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

>>असो राहता राहिली गोष्ट

नितिन थत्ते
Mon, 04/16/2012 - 15:41 नवीन
>>असो राहता राहिली गोष्ट लंकेच्या पुलाची तर तो रामाने बांधलेला नाही हे मान्य करणे सद्यपरिस्थितीत जास्त शहाणपणाचे पण त्या पूलाचे आणि रामायणाचे काहितरी कनेक्शन नक्की आहे ना? ज्याला श्रीलंका म्हणतात त्या लंकेचे आणि रामायणाचे कनेक्शन देखील शंकास्पद आहे. रामायणातली लंका ही मध्यप्रदेशात असावी असा निष्कर्ष असल्याचे इरावती कर्व्यांच्या पुस्तकात वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

एक शंका-- तरंगत्या दगडांचा

बाळ सप्रे
Mon, 04/16/2012 - 17:10 नवीन
एक शंका-- तरंगत्या दगडांचा पूल पाण्याखाली कसा गेला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

(No subject)

JAGOMOHANPYARE
Mon, 04/16/2012 - 17:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

पेंट निघतोय की!

ऋषिकेश
Tue, 04/17/2012 - 09:47 नवीन
अवं त्यावर हन्मानाने श्रीराम पेंटल्याने ते तरंगत नव्हते का? इतक्यावर्षात कन्चाबी पेंट निघतोय की! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

हन्मानाने नाय वो...

इरसाल
Tue, 04/17/2012 - 10:20 नवीन
ते नल-नील व्हते. असुद्या. बादवे : संभवामि युगे युगे कोणी वाचल्येय काय ? त्या नुसार...... चंद्रावर प्रथम पाय लावणारा होता नील आर्मस्ट्राँग आणी आपल्या पुराणांनुसार चंद्रावर प्रथम पाउल ठेवणारा बाहुबली होता.त्याने केलेले वर्णन आणी आता उपग्रहांनी काढलेले पृथ्वीचे फोटो ह्यात बरेच साम्य आहे. आता योगायोग हा की बाहुबली = आर्मस्ट्राँग. विशेष म्हणजे मी ह्यातुन काही सिद्ध करत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

सहमत , पण ...

तर्कवादी
Wed, 07/27/2022 - 16:53 नवीन
पण मला मुळात कळत नाही की जर आपला इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काय चूक आहे.
सहमत .. इतिहास दैदीप्यमान असेल तर त्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण ज्या शोधांचे पुरावे वा तत्वतः पटणारे विवेचनही देवू शकत नाही त्या गोष्टी कपोलकल्पितच मानायला हव्या. विमान होते म्हंटल्यावर, ते कसे उडायचे ? त्याचे तंत्रज्ञान नेमके कसे होते, इंधन कोणते वापरले जायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. रामायण व महाभारतापुरतं म्हणायचं तर या कथांना अधिकृतपणे फक्त महाकाव्य म्हंटलेले आहे, इतिहास नव्हे. ( संदर्भ : मराठी विश्वकोष) तसेच रामसेतू बद्दलही : (संदर्भ ) रामाचा सेतू : भारत–श्रीलंका यांदरम्यानच्या सागर भागातील ३० किमी. लांबीची प्रवाळ खडकांची रांग. तिलाच ॲडम्स ब्रिज (आदमचा पूल) किंवा सेतुबंध असेही म्हणतात. भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील रामेश्वरम् (पांबन) बेट व श्रीलंकेतील मानार बेट यांना जोडणारी ही खडकांची रांग काही ठिकाणी तुटलेली आहे. रामायणातील युद्धकांडात वर्णन केलेला, लंकेवर स्वारी करण्यासाठी नल वानराकरवी रामाने व वानरसेनेने बांधलेला सेतू तो हाच, असे मानले जाते. यावरूनच रामाने लंकेत प्रवेश करून रावणाचा पराभव केला व सीतेची सुटका केली, अशी कथा आहे. भूवैज्ञानिक अभ्यासानुसार मात्र रामाचा सेतू ही खडकांची रांग म्हणजे प्रवाळांपासून तयार झालेली प्रवाळशैलभित्ती आहे बाकी अभिमान बाळगण्याबद्दल - -: अनेक गोष्टी आहेत - स्थापत्यशास्त्राचे अत्युत्कृष्ट नमुने आहेत (कोणार्कचे वा इतर अनेक भव्य मंदिरे, अंजिठा सारख्या लेणी , विविध स्तुप, ताजमहालसारख्या वास्तु). मोहंजोदडो आता पाकिस्तानात असले तरी ते भारतातील सिंधू संस्कृतीचा भाग होते. तिथली आधुनिक नगररचना (रस्ते, सांडपाण्याचा निचरा ई) अतिशय अभिमानास्पद नाहीत का ? भारतीयांच्या धातुविज्ञानाचा पुरावा असणारे अशोक स्तंभ अभिमानास्पद आहे. याशिवाय शुन्याची संकल्पना, दशमान पध्दती ई अनेक अभिमानास्पद गोष्टी असताना विमानाच्या विनोदाचा अट्टहास कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पु्ण्यात डॉ. सुरेश विश्वनाथ

श्रीगुरुजी
Wed, 07/27/2022 - 21:48 नवीन
पु्ण्यात डॉ. सुरेश विश्वनाथ भावे नावाचे वैद्यकीय व्यवसाय असलेले एक संशोधक होते. त्यांचे स्वत:चे एक लहान विमान होते. त्यातून पौराणिक, ऐतिहासिक वर्णनांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करायचे. आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे. याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले. श्रीरामसेतूवर सुद्धा त्यांनी बरेच संशोधन केले, नासाची त्या भागाची छायाचित्रे पाहिली, स्वतःच्या विमानातून त्या भागावर उड्डाण करून सेतू कोठे असावा हे समुद्राच्या पाण्याच्या रंगात पडलेल्या फरकावरून नक्की केले. एक दिवस ते स्वतः एका नावेतून समुद्रात सेतूपर्यंत पोहोचले. त्यांचा एक सहाय्यक वरून विमानातून त्यांना मार्गदर्शन करीत होता. शेवटी श्रीरामसेतू तेथे आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सावधगिरी बाळगून नावाड्याच्या मदतीने ते समुद्रात पाण्यात उतरले. त्यांना अक्षरशः चार साडेचार फुटांवर पायाला खडकासारखा आधार मिळाला. त्यावर ते उभे राहिल्यानंतर ते छातीपर्यंत बुडले होते परंतु पायाखाली एखादी भिंत किंवा खडकांची सलग रांग असल्याचे त्यांना लक्षात आले. ते त्यावर थोडे अंतर चालले. नावाड्याने त्यांची प्रकाशचित्रेही घेतली. नंतर ते परत आले व आपल्या अनुभवांवर त्यांनी एक दीर्घ लेख लिहिला होता. आकाशातून चित्रण केले तर त्या जागी श्रीलंकेपर्यंत पाण्याखाली गडद रंगाचा अरूंद पट्टा दिसतो. श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर ही Times of India ची बातमी - https://m.timesofindia.com/city/pune/re-tracing-ramas-footsteps/articleshow/1297271098.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी

तर्कवादी
Wed, 07/27/2022 - 23:48 नवीन
आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदासाने लिहिलेल्या संस्कृत प्रहसनात अशी कल्पना केली आहे की कालिदास पत्नीपासून दूर रामटेकेमध्ये असतो व पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन आषाढ मासारंभी नागपूरपासून मध्यप्रदेशकडे चाललेल्या एका मेघासोबत तो पत्नीसाठी निरोप पाठवितो. तो मेघ ज्या ज्या प्रदेशांवरून जातो त्या प्रदेशांचे विहंगम वर्णन कालिदासाने केले आहे. याचा पडताळा घेण्यासाठी एक दिवस डॉ. भावे आषाढ मासारंभी स्वतः आपल्या विमानात बसून त्या भूप्रदेशावरून गेले व कालिदासाने वर्णन हकेलेले बहुतांशी भूप्रदेश वर्णनाप्रमाणे दिसतात असे त्यांना आढळले.
अरे वा... मग कालिदासाच्या कल्पनाशक्तीला सलाम... वर मी उल्लेखलेल्या अभिमानास्पद बाबींत कालिदास सारख्या प्रतिभावान कवीचाही सामावेश व्हायला हवाच. असो. बाकी कालिदासानेही कुठे विमानाचा दावा केला नाही त्यामुळे तो प्रश्न येत नाहीच. आणि तरीही एकंदरीत विमानाच्या दाव्याबाबत चर्चा करायची असेल तर मी वरच्या प्रतिसादात उल्लेखलेले प्रश्न (विमानाचे तंत्रज्ञान, कोणत्या तत्वावर ते चालायचे, इंधनाचा प्रकार ई ई) टाळून पुढे जाता यायचे नाही.
श्रीरामसेतू म्हणतात तो हाच असे त्यांचे म्हणणे होते.
हो असे अनेकांचे म्हणणे आहे. पण त्याबद्दल विश्वकोषातले अधिकृत विवेचन मी वर उद्धृत केले आहे. असो. माझ्या मते आपल्या संस्कृतीबद्दल न्यूनगंड बाळगणारे लोकच बहूधा विमानाच्या वा तत्स्म अचाट कथा पसरवित असणार. आणि इतर अनेक गोष्टी (ज्या मी वरील प्रतिसादात उल्लेखल्या आहेत) ज्यांच्या करिता कोणत्याही नव्या पुराव्याची गरज नाही, ज्या अगदी सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट दिसत आहेत त्यांचे महत्व बहुधा या मंडळींच्या लक्षात येत नसावे किंवा त्या गोष्टींचा अभिमानही वाटत नसावा म्हणून त्या गोष्टींचा उल्लेखही न करता ते केवळ काही अचाट /कपोलकल्पित बाबी पुढे रेटण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पराकाकांशी सहमत

सहज
Mon, 04/16/2012 - 10:53 नवीन
जब ज़ीरो दिया मेरे भारत ने भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आयी तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलायी देता ना दशमलव भारत तो यूँ चाँद पे जाना मुश्किल था धरती और चाँद की दूरी का अंदाज़ा लगाना मुश्किल था सभ्यता जहाँ पहले आयी पहले जनमी है जहाँ पे कला अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला संसार चला और आगे बढ़ा यूँ आगे बढ़ा, बढ़ता ही गया भगवान करे ये और बढ़े बढ़ता ही रहे और फूले-फले - गीतकार इंदीवर, मुळ प्रेरणा देशप्रेमी भारतकुमार वर्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अय्या, पुराऽऽऽणेऽऽऽऽऽऽ

कवितानागेश
Sun, 04/15/2012 - 14:46 नवीन
अय्या, पुराऽऽऽणेऽऽऽऽऽऽ !!!? आपले पूर्वज कित्ती थापाडे आणि अडाणी होते हे माहित नाही का तुम्हाला? आपण तर बाबा विज्ञानवादी आणि सत्यान्वेषी! ( स्वतःचेच गालगुच्चे घेणारी एखादी स्मायली मिळेल का इथे?)
  • Log in or register to post comments

एक साधा तर्क...

मुक्त विहारि
Sun, 04/15/2012 - 17:17 नवीन
ग्रुहीत धरु या की हे सगळे शोध भारतात लागले. मग जेंव्हा पहिले परकीय आक्रमण आले.(माझ्या आठवणी प्रमाणे अलेक्झांडर, त्याच्या आधी माहित नाही, कुणी सांगीतल्यास उत्तम).तर मग आपल्या कडे ही विमाने का न्हवती? (कारण अलेक्झांडरने कुठल्याही विद्यापीठाचा नाश केलेला वाचनांत आले नाही.... विद्यापीठे तोडल्या गेली ती मुसलमानी राजवटीत.) माझ्या अंदाजाने, व्यास आणि वाल्मिकी , हे फार कल्पक विज्ञान कथा लेखक आणि तत्ववेत्ते असावेत. ह्या पैकी व्यास जास्त....कारण.. १. टेस्ट ट्युब बेबी...१०० मूले एका वेळी.. (पुढे मागे हे पण होवू शकेल) २. दूर चित्र वाणी.... संजय आणि ध्रुतराष्ट्र ३. मयसभा.... आज-काल अशी घरे निर्माण होवु शकतात ४. जमिनीला न टेकणारा रथ... चुंबकीय तत्वावर चालणारी गाडी ५. अणू बाँब... पण व्यास ह्यांनी अजुन एक मोठे काम केले ते म्हणजे "गीता".... म्हणजे व्यास हे वैद्य पण होते असे समजायला हरकत नाही. कारण मनो-विज्ञान शास्त्र आणि गीतोपदेश काही वेगळे नाही वाटत. (हेच सुत्र अजुन चांगल्या प्रकारे चाणक्याने वापरले....."कौटिल्याचे अर्थशास्त्र "आणि गीतेतील "राजाची कर्तव्ये " जवळ जवळ सारखीच आहेत... आणि कौटिल्याने त्यात काळानुरुप बदल पण केला आहे....कौटिल्याचा उल्लेख न करण्याचा मोह टाळता आला नाही, कारण "कौटिल्याचे अर्थशास्त्र " हे पुस्तक वाचल्या शिवाय भगवत्-गीतेचा अभ्यास पुर्ण होत नाही.)
  • Log in or register to post comments

होऽऽऽऽऽऽ होऽऽ होऽ

रमताराम
Mon, 04/16/2012 - 14:30 नवीन
कासरा आवरा हो, गाडी अंमळ जोरात सुटली. जरा तपशीलात गफलत आहे हो. १. १०० मुले गांधारीचीच नाहीत नि एका वेळची तर मुळीच नाहीत. चौदा मुले गांधारीची ती ही वेगवेगळ्या वेळी जन्मलेली. गीता ही व्यासांच्या महाभारताचा भाग नव्हे. मयसभेच्या अस्तित्वाबाबत कोणतीही शंका/आक्षेप घेतलेला आमच्या पाहण्यात आलेला नाही. ....."कौटिल्याचे अर्थशास्त्र "आणि गीतेतील "राजाची कर्तव्ये " जवळ जवळ सारखीच आहेत... आँ. जाऊ दे हा मुद्दा इतरांना प्रतिवाद करण्यास सोडून देतो. व्यास हे वैद्य पण होते असे समजायला हरकत नाही. खो: खो: खो: हे असं आहे बघा. चांगले सुश्रुत, वाग्भट नि चरक यांच्यासारखे दिग्गज आपल्याकडे होऊन गेलेले असताना नि त्यांचे श्रेय जगन्मान्य असताना उगाचच मानसशास्त्राचे श्रेयही लाटण्याचा प्रयत्न करून हास्यास्पद का व्हावे. सर्वसामान्य वर्तणुकीचे चार नियम नि मानसशास्त्र यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हो सायबा. हे म्हणजे सीतेने काढलेल्या रावणाच्या अंगठ्यावरून कैकेयीच्या दासीने उरलेला सारा रावण चितारावा तसं दिस्तंय राव. लैच हुशार की हो तुम्ही. ;) (ह. घ्या हे वे. सां. न. ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

१०० मुले गांधारीचीच नाहीत नि

मृत्युन्जय
Mon, 04/16/2012 - 14:49 नवीन
१०० मुले गांधारीचीच नाहीत नि एका वेळची तर मुळीच नाहीत. चौदा मुले गांधारीची ती ही वेगवेगळ्या वेळी जन्मलेली. गीता ही व्यासांच्या महाभारताचा भाग नव्हे. तार्किक दृष्ट्या हेच बरोबर वाटते. पण महाभारतात तर्काच्या पट्टीवर पटणार्‍या फारच कमी गोष्टी आहेत. १ महिन्याच्या अंतराने जन्मलेली गांधारीची १०१ मुले (१०० मुलगे + १ मुलगी) हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार. १४ मुलांची थियरी महाभारतात नाही. दु या आद्याक्षराने नावे असले १४ मुले तेवढी गांधारीची बाकी सगळी दासींची मुले हा निष्कर्ष भैरप्पांच्या पर्व मधला. ती १४ मुले (ली) अशी: Duryodhana, Duhsasana, Duhsaha, Duhshala, Durmukha, Durdharsha, Dushpradharshana; Durmarshana, Dushkarna, Durmada, Dushpradharsha, Durvirochana; Duradhara, Dushala (Daughter) महाभारतातली कथा मोठी चमत्कारिक आहे आणी ऐकणे नक्कीच हास्यास्पद वाटेल पण महाभारतानुसार ती सर्व १०१ मुले माठात मांसाचा तुकडा ठेवुन त्यातुन जन्माला आली. Saomething like Test Tube Baby असे काही जणांचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

असहमत

रमताराम
Mon, 04/16/2012 - 14:56 नवीन
१४ मुले तेवढी गांधारीची बाकी सगळी दासींची मुले हा निष्कर्ष भैरप्पांच्या पर्व मधला. हा तर्क - तुम्ही म्हणता म्हणून तर्क - असलाच तर भैरप्पापूर्व ( :) )आहे. कारण शांताबाईंच्या आणि/किंवा, इरावतीबाईंच्या लेखांमधूनही याचा उल्लेख आहे. नेमके संदर्भ आठवत नाहीत. पर्व वाचण्यापूर्वीपासून मी गांधारीची चौदा मुले हेच गृहित धरून चाललो होतो. बहुधा अरुणाताईंचीही एक युयुत्सुवरील कथा आहे युद्धोत्तर काळावर, त्यातही असाच उल्लेख आहे. संदर्भ शोधून सापडले तर इथेच लिहिन. परंतु हा घाऊक १००-१०१ मुले जन्माला येण्याचा भाग मूळ महाभारतात नसावा (पौराणिक असावा) किंवा प्रक्षिप्त ठरवला गेलेला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नाही हो. संदर्भ मूळ मानल्या

मृत्युन्जय
Mon, 04/16/2012 - 15:24 नवीन
नाही हो. संदर्भ मूळ मानल्या जाणार्‍या महाभारतातही असाच आहे आणि तो प्रक्षिप्त मानला गेलेला नाही. युगांत किंवा व्यासपर्व मध्ये हे वाचल्यासारखे वाटत नाही तरी परत वाचुन खात्री करुन घेतो. आणि कसेही असले तरी तो एका आधुनिक (भैरप्पा, भागवत, कर्वे आधुनिक बरंका :) ) लेखकाचा निष्कर्ष आहे. मूळ महाभारतातला नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

गीता व्यासानी नाही लिहिली, मग

JAGOMOHANPYARE
Mon, 04/16/2012 - 15:31 नवीन
गीता व्यासानी नाही लिहिली, मग कुणी लिहिली? ( शंकराचार्यानी का? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आता या प्रतिसादाला काही ही

चाफा
Sun, 04/15/2012 - 21:08 नवीन
आता या प्रतिसादाला काही ही म्हणा :) पण सध्या अशाच काहीश्या संदर्भात उकराउकरी चालू आहे त्यामूळे आलाच लेख नजरेत तर लिहून टाकतो. बाकी मुद्दे बाजूला राहू दे १) त्या चमकत्या त्रिशूलाचा उल्लेख रामायणातही आहे, दुसरं म्हणजे तो अशा दगडात कोरलेला आहे की तो फार ठिसूळ असतो मग हे कोरीव काम कुणी आणि कसे केले ? २) नाझ्का लाईन्स नुसत्याच रेषा नाहीत तर आजूबाजूला काही चित्रेही आहेत जी उंचावरूनच स्पष्ट दिसतात मग हा उपद्व्याप कुणी आणि का केला ? ३) आजही बर्फ नसलेल्या उत्तरध्रूवाचे नकाशे उपलब्ध नाहीत तरीही बर्फाखाली झाकलेल्या भूभागाचा एक हरणाच्या कातडीवर रेखाटलेला नकाशा पुरातन काळात माणसानेच बनवलेला आहे. या सगळ्या गोष्टींकडे नक्की कुठल्या नजरेने पहाणार आपण ?
  • Log in or register to post comments

पण त्या माणसाने हरणाचे कातडे

JAGOMOHANPYARE
Sun, 04/15/2012 - 21:29 नवीन
पण त्या माणसाने हरणाचे कातडे का वापरले? कागद नव्हता का? म्हणजे त्या काळात विमान होते पण कागद पेन नव्हते असे म्हणायचे आहे का? मग विमान तयार करायचा आराखडा कातड्यावरच होता का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा

कागदाचा शोधही भारतानेच लावला आहे...

योगप्रभू
Mon, 04/16/2012 - 10:19 नवीन
प्राचीन काळात ऋषी-मुनी आपले लिखाण भूर्जपत्रांवर करत, तर राजाज्ञा कापडावर लिहून प्रसृत केली जाई. मात्र दूत पाठवून तोंडी निरोप देण्याची पद्धत सर्रास वापरात होती. नंतर कागदाचा शोध भारतात लागला. आपण तो चीनने लावला, असे वाचत आलो, परंतु नव्या संशोधनानुसार चीनच्याही आधी भारतात कागद वापरला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याबाबतचा माहितीपूर्ण लेख 'विमर्श' या त्रैमासिकाच्या जानेवारी ते मार्च १२ काळातील 'इतिहास प्रबोधन' विशेषांकात श्री. गोसावी यांनी लिहिला आहे. अभ्यासकांनी जरुर वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अधिक माहिती...

मन१
Sun, 04/15/2012 - 21:31 नवीन
मुद्दा क्र.३ बद्दल अधिक माहिती मिळेल काय? नीटसे कळाले नाही. एरव्ही मौनव्रती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा

डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी

गणामास्तर
Mon, 04/16/2012 - 20:13 नवीन
डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या "पृथ्वीवर माणूस उपराच" या पुस्तकात यासंबंधी माहिती दिली आहे. अ‍ॅडमिरल पिरी रीस (हा बहुतेक फ्रेंच होता) याने खूप पूर्वी हरणाच्या कातड्यावर जगाचा नकाशा बनवला होता, जो आजच्या जगाच्या नकाशाशी तंतोतंत जुळतो आणि तसा नकाशा उपग्रहाच्या मदती शिवाय बनवणे शक्य नाही. तो नकाशा आज हि पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

नक्की मनोबा , अ‍ॅडमिरल पिरी

चाफा
Tue, 04/17/2012 - 20:10 नवीन
नक्की मनोबा , अ‍ॅडमिरल पिरी रीस यांनी अंतराष्ट्रीय भौगोलीक दिनाच्या निमित्ताने सोळाव्या शतकातले काही नकाशे संयुक्त राष्ट संघटनेने भरवलेल्या प्रदर्शनात मांडले होते. ते त्यांना तुर्कस्थानात टोपीकापी की काहीश्या नावाच्या राजवाड्यात मिळाले त्यात तो नकाशा होता, तसेही त्यांचे दोन नकाशे आजही बर्लिन च्या स्टेट लायब्ररीत आहेत. अर्थात माझी माझ्या कामाच्या संदर्भात चाललेली काहीशी उकराउकरी आहे ही बाकी पुराणात विमानं होती की नाही हे वाद चालू राहू दे न जाणो चर्चेतून इथेच एखाद्या मर्क्युरी व्हर्टेक्स इंजिनाचा आराखडा तयार व्हायचा :) जमोप्या तो नकाशा बनवणारा कार्टोग्राफर होता ना ! त्याला ऐन वेळी कागद मिळालाच नसेल मग काय समोर हरीण दिसलं काढला त्यानं त्याच्यावरच नकाशा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

असो

ऋषिकेश
Mon, 04/16/2012 - 09:40 नवीन
हा हा हा! असो!
  • Log in or register to post comments

च्यामारी एवढ्या महान

मृत्युन्जय
Mon, 04/16/2012 - 10:30 नवीन
च्यामारी एवढ्या महान गोष्टींचे शोध भारतात लागले? काहितरी काय राव? सर्व महत्वाचे शोध पल्याड लागतात . म्हणुन तर आपल्याकडचे विद्वान लोक आताशा तिकडे जातात ना? इथे आता उरलय कोण विद्वान आणि पुर्वीतरी कोण होते? उगाच कचर्‍याच्या ढीगात हिरे शोधायचे प्रयत्न का करताय राव? लायकीत रहावा ना आपल्या. तुमच्या देशात दळभद्री लोकच काय ते जन्मले. शोधकर्ते सगळे हुष्षार गोर्‍यांच्या देशात जन्मल हे सत्य जेवढ्या लवकर पचवाल तेवढे बरे आहे तुमच्यासाठी नाहितर इनोच्या बाटल्याच्या बाटल्या संपवाव्या लागतील. राहिता राहिला प्रश्न पुराणात केलेल्या उल्लेखांचा तर ती तर चक्क बकवास आहे. काही उत्तम कल्पनाशक्ती असलेल्या माणसांनी लिहिलेल्या कादंबर्‍यांचा नसता उदोउदो करुन त्यातल्या खोट्या खोट्या गोष्टी खर्‍या मानण्याची बाळबोध वृत्ती पाहिली की खरेच हसावे की रडावे ते कळत नाही. जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे स्वप्नांच्या दुनियेत हरवुन बसला आहात आणि वर वावड्या उडवा की रश्याननांना वेदांमध्ये विज्ञानाची महान सूत्रे दिसली म्हणे. आणि दिसली तर दिसली ते ही तसलेच येडे नाहित काय? स्वतःच्या देशाला वाचवु शकले काय मुर्ख लेकाचे? अमेरिकेतल्या शहाण्या लोकांसमोर त्यांचा काय पाड. असो. जागे व्हा. जागो रे जागोरे जागो. सिर्फ उठो नही जागो. वाटल्यास तो जागो चहा प्या. नसेलच तर ब्रेकफास्ट टी प्या (आमच्या गोर्‍या मालकाच्या देशातला) नसेलच तर स्टारबक्सची कॉफी प्या पण जागा.
  • Log in or register to post comments

आमच्याकडं आहे असलं एक विमान,

५० फक्त
Mon, 04/16/2012 - 11:06 नवीन
आमच्याकडं आहे असलं एक विमान, पण लायसन नाही म्हणुन उडवत नाही. जाउदे उगाच नॉल्स्टेजॉलिव्ह्करृकिसद्क व्हायला होतं.
  • Log in or register to post comments

अरे देवा.. शिवकर, वर्तक आदि

गवि
Mon, 04/16/2012 - 11:16 नवीन
अरे देवा.. शिवकर, वर्तक आदि परतले...?! बरं..
  • Log in or register to post comments

+ १

पहाटवारा
Mon, 04/16/2012 - 14:04 नवीन
अरे देवा , आधीच महाभारत काय कमी झालेय म्हणून आता रामायण हि आता जोडिला .. बरं .. येऊ द्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वा दोन टोकाची चार मते वाचून

गणपा
Mon, 04/16/2012 - 12:52 नवीन
वा दोन टोकाची चार मते वाचून मजा आली. (चांगलं ते स्वीकारणारा ) गण्या.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Mon, 04/16/2012 - 17:51 नवीन
+१ (श्रुती/ स्मृती/ पुराणोक्तवाल्यांना जाउ द्या बारा गडगड्याच्या विहीरीत. त्यांच्या विरोधात असलेल्यांचीही भली मोठी परंपरा या भारतवर्षात आहे आणि ती वेदांच्याही पूर्वीची आहे असे हल्ली वारंवार वाचनात येते. या विरोधक (तथाकथित सांख्य, चार्वाकवादी, इहवादी, बुद्धीप्रामाण्यवादी वगैरे वगैरे) लोकांनी वेदपूर्व काळ ते इ.स. २०१२ पर्यंत कोणकोणते वैज्ञानिक शोध लावले, त्यातले आजरोजी किती व्यावहारिक वापरात आहेत यावर कुणी लेख/ लेखमाला लिहीली तर वाचायला आवडेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आपल्या पुराणात सगळे काही आहे

पुण्याचे वटवाघूळ
Mon, 04/16/2012 - 13:15 नवीन
आपल्या पुराणांमध्ये सगळे काही आहे. पुराणात "तैतियान" नावाची बोट बुडाल्याचा उल्लेख आहे. बरोबर १०० वर्षांपूर्वी Titanic नावाची बोट बुडली पण आमच्या पूर्वजांनी ते कित्येक शतके आधीच सांगून ठेवले होते. :)
  • Log in or register to post comments

पुराणंच कशाला?

JAGOMOHANPYARE
Mon, 04/16/2012 - 17:08 नवीन
पुराणंच कशाला? सत्यनारायणाच्या पुस्तकात सुद्धा बुडालेली आणि परत वर आलेली बोट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

बोईंग, एअरबस, अन्तोनोव,

गवि
Mon, 04/16/2012 - 13:33 नवीन
बोईंग, एअरबस, अन्तोनोव, गेलाबाजार किमान बीचक्राफ्ट किंगएअर किंवा सेस्ना सायटेशनच्या लेव्हलचं तरी.... असं पूर्ण देशी बनावटीचं एकही प्रवासी विमान बनवू न शकलेल्या देशाने पोथ्यांतील अभिमान कितीकाळ बाळगावा? तो एक सारस विमानाचा प्रकल्प पाहताना धुगधुगी वाटली होती पण तोही बनत बनत कोसळलाच.. अर्थातच जुन्या काळात भारतात काहीच ज्ञान नव्हतं असं म्हणणं म्हणजे निव्वळ हास्यास्पद मूर्खपणा ठरेल. पण आता पश्चिमेस शोध लागला की नंतर मग आपल्याकडेही तो फार्फार पूर्वी लागून हरवला होता असं बाडं चापसून सांगण्याची वृत्ती सोडून आपण नवीन निर्मितीस लागू तो उत्तम दिवस. होतं ना मर्क्युरी आयन व्होर्टेक्स इंजिन आपल्याकडे.. ठीक. पण आता नाही ना सापडत ते.? अरे.. मग आत्ता आजरोजी जे आयन प्रपल्शनचं ज्ञान अस्तित्वात आहे तेवढं तरी आत्मसात करुया की... का नुसतं नासाच्या शंभर वर्षं आधी आम्ही हे केलं होतं असं म्हणून आत्ता कॉलर टाईट करत बसायचं..?? आयन प्रपल्शनच्या ताकदीवर निर्वातात सूक्ष्म हालचाली जेमतेम करता येतात. वातावरणात विमानाला उचलू किंवा ढकलू शकेल अशी शक्ती त्यातून उभी राहू शकत नाही हे वास्तव आजरोजी दिसत असतानाही आपल्याकडे असलेलं (तळपदेंचं) विमान आयन प्रपल्शनवर चालायचं असा विश्वास का बाळगावा? विशेषतः त्याची रिप्रोड्युसिबल नोंद शिल्लक नसताना? इथेच मार खातो आपण..
  • Log in or register to post comments

होतं ना मर्क्युरी आयन

सुहास..
Mon, 04/16/2012 - 13:54 नवीन
होतं ना मर्क्युरी आयन व्होर्टेक्स इंजिन आपल्याकडे.. ठीक. पण आता नाही ना सापडत ते.? अरे.. मग आत्ता आजरोजी जे आयन प्रपल्शनचं ज्ञान अस्तित्वात आहे तेवढं तरी आत्मसात करुया की... का नुसतं नासाच्या शंभर वर्षं आधी आम्ही हे केलं होतं असं म्हणून आत्ता कॉलर टाईट करत बसायचं..?? आयन प्रपल्शनच्या ताकदीवर निर्वातात सूक्ष्म हालचाली जेमतेम करता येतात. वातावरणात विमानाला उचलू किंवा ढकलू शकेल अशी शक्ती त्यातून उभी राहू शकत नाही हे वास्तव आजरोजी दिसत असतानाही आपल्याकडे असलेलं (तळपदेंचं) विमान आयन प्रपल्शनवर चालायचं असा विश्वास का बाळगावा? विशेषतः त्याची रिप्रोड्युसिबल नोंद शिल्लक नसताना? विमान डोक्यावरून गेले ;) केवळ धागाकर्त्यासाठी :: अजुन एक 'विकीपिडीत' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वरती चर्चेत त्या (पक्षी: आयन

गवि
Mon, 04/16/2012 - 13:59 नवीन
वरती चर्चेत त्या (पक्षी: आयन प्रपल्शन) तंत्रज्ञानाचा उल्लेख अनेकदा आलेला पाहून मी अधिक संदर्भ न देता तो उल्लेख केला. गूगलबाबांच्या जमान्यात न समजण्यासारखं काही उरलंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

गूगलबाबांच्या जमान्यात न

सुहास..
Mon, 04/16/2012 - 14:03 नवीन
गूगलबाबांच्या जमान्यात न समजण्यासारखं काही उरलंय का? >> :) बघतो आहे !! एखादा लेहमन टर्म मध्ये लिखाण येवु द्यात की , समजायला सोप्पे पडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा