✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

द
दिपोटी यांनी
Sat, 10/08/2011 - 03:09  ·  लेख
लेख
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे. http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे. 'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत. जर भारतातील अनेक भाषांपैकी मराठी (व बंगाली) भाषांतील साहित्य अधिक अभिजात, समृध्द व दर्जेदार मानले जाते तर याचे प्रतिबिंब 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित झालेल्या-होणार्‍या साहित्यिकांच्या यादीत का बरे दिसत नाही? बंगाली साहित्यिकांच्याबाबतीत हे चित्र कसे काय आहे? विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या 'आणि मी' या अत्यंत वाचनीय अशा लेखसंग्रहातील 'सन्मान, सम्मान इ.' या अत्यंत वाचनीय लेखात अशा पारितोषिक-पुरस्कार-सन्मानांसाठी प्रतिभा, दर्जेदार साहित्यनिर्मिती, या व अशा इतर आवश्यक निकषांबरोबरच 'पडद्यामागील हालचाली' हा निकष सुध्दा - अर्थात काही पुरस्कारांच्याबाबतीत - लागू पडतो असे लिहिल्याचे आठवते. माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27084 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

शीर्षक

सुनील
Wed, 10/12/2011 - 10:16 नवीन
'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र? येथी मराठी साहित्यिक म्हणजे मराठी भाषेत लिहिणारा साहित्यिक असे गृहित धरतो. कारण द रा बेंद्रे हे ज्ञानपीठ विजेते कन्नड कवी मराठी भाषक होते!
  • Log in or register to post comments

पी व्ही नरसिंहराव हे कसे

आशु जोग
गुरुवार, 10/13/2011 - 00:08 नवीन
पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाही पण त्यांनी लिहिलेले एखादे पुस्तक सांगा म्हटले तर तो अडखळतो व्यक्ती आणि वल्ली चे तेलुगु रुपांतर नरसिंहराव यांनी केले आहे.
  • Log in or register to post comments

हे

चिरोटा
गुरुवार, 10/13/2011 - 12:02 नवीन
पी व्ही नरसिंहराव हे कसे विद्वान आहेत आणि कित्येक भाषांवर त्यांचे कसे प्रभुत्व आहे हे सांगताना तेलुगु माणूस थकत नाही
हे नविनच ऐकतोय. ईतक्या वर्षात एकही तेलगु मित्राने त्यांची महती गायल्याचे आठवत नाही.चिरंजीवीबद्दल म्हणाल तर ठीक आहे.एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्‍या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अतिप्रचंड सहमत चिरोटाजी......

वपाडाव
Fri, 10/14/2011 - 12:00 नवीन
एकूणच तेलगु मध्यम्/उच्च वर्ग पुस्तके,साहित्य,भाषा,संस्कृती ह्या वेळ 'व्यर्थ' घालवणार्‍या गोष्टींना जीवनात फार थारा देत नाही असे माझे निरिक्षण आहे. आपल्या तेलेगु मित्राला चार तेलगु कवी/लेखकांची नावे विचारा.!
अतिप्रचंड सहमत चिरोटाजी......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

माझ्या वैयक्तिक मते तर विजय

अप्पा जोगळेकर
Fri, 10/14/2011 - 22:50 नवीन
माझ्या वैयक्तिक मते तर विजय तेंडुलकर, पुल देशपांडे, जयवंत दळवी, चिंत्र्यं खानोलकर ही मंडळी या मानदंडासाठी निश्चित पात्र आहेत / होती ('ज्ञानपीठ' पुरस्कार मरणोत्तर दिला जातो की नाही याबद्दल माहिती नाही). आपले काय मत आहे? पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सार्थच वाटतो. प्र. के. अत्रे यांना हा पुरस्कार मिळाला आहे की नाही हे मला ठाउक नाही. पण मिळालेला असेल असे वाटते. जर मिळाला नसेल तर तो त्यांच्यावर झालेला सगळ्यात मोठा अन्याय होय. भारतात होउन गेलेला आजवरचा सर्वश्रेष्ठ लेखक जर कोणी असेल ते आचार्य अत्रे हेच होय, असे प्रामाणिक मत आहे. साहित्याचे असे एकही दालन नाही, असा एकही कोपरा नाही की जिथे हा माणून मुक्तपणे आणि समर्थपणे वावरला नाही. कविता (मॄदू, गंभीर,विनोदी,विडंबन सगळ्या प्रकारच्या), नाटके (गंभीर,विनोदी,राजकीय्,सामाजिक अशी सगळ्या प्रकारची), चित्रपट कथा (गंभीर,विनोदी,राजकीय्,सामाजिक अशी सगळ्या प्रकारच्या), चरित्र लेखन, आत्मचरित्र लेखन, नाटकातील पदांची रचना करणे, चित्रपटातील गाणी लिहिणे, लहान मुलांसाठी वाचनमाला, शैक्षणिक पुस्तकांचे लिखाण,प्रचंड प्रमाणावर वॄत्तपत्रीय लिखाण आणि ऐतिहासिक कादंबरीसुद्धा, ही यादी संपतच नाही. जर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा झाला तर विडंबन काव्याचे ते जनक आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर असा लेखक गेल्या दहा हजार वर्षांत होउन गेलेला नाही.
  • Log in or register to post comments

>>पु.ल.देशपांडे यांच्या

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 10/15/2011 - 23:29 नवीन
>>पु.ल.देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि तो सार्थच वाटतो. आयला, हे काय नवीनच ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

साहित्य अकादमी

फारएन्ड
Sun, 10/16/2011 - 12:54 नवीन
तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य अकादमीचा पुरस्कार. पहिला लेखकाला असतो व दुसरा पुस्तकाला, असा माझा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 10/27/2011 - 16:04 नवीन
तो ज्ञानपीठ नव्हे, साहित्य अकादमीचा पुरस्कार या दुरुस्तीबद्दल आभार. माझ्याकडून चूक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा