जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले
जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले
संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
=)) >:)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले
जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले
संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
हे जबरा बर का.....
मदनबाण>>>>>
पान मांडता वेगळे कोणी माती घेउन आले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
उडले आमुचे जीव येथुनि जातो रे सौंगड्या
पाय निघेना म्हणोन करण्या काड्या हे रुतले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ
ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ
हा हा हा! :)
आंबोळी, सुंदर लिहिलं आहेस...
जियो...! :)
तात्या.
एक पूर्ण असहमती -
तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि
ह्या ओळीस माझा विरोध आहे!
माझ्या मते/माहितीप्रमाणे डांबिसने मुक्तरावाबाबत लिहिताना तस्ताचा उल्लेख केला होता तो संदर्भ इथे आहे. डांबिसाने डायरेक्ट तस्त घेऊन फिरण्याची उपमा देऊन मुक्तरावांचा अपमान केला आहे असंच माझं मत आहे. वास्तविक मुक्तरावाने मूळ 'आसपास'ला जो प्रतिसाद दिला होता तो मलाही पटला नव्हता परंतु तरीही मुक्तराव हा माणूस कुणा मागे तस्त घेऊन फिरणार्यातला नक्कीच नाही असंच मी प्रांजळपणे म्हणेन!
डांबिसाने केवळ 'तस्त घेऊन फिरणे' या शब्दांबाबत दोन शब्दांची दिलगिरी व्यक्त केली असती तर मला ते अधिक आवडलं असतं! कारण डांबिसाप्रमाणेच मुक्तराव हा माणूस देखील मिपावर प्रेमच करणारा आहे आणि कुणा बाहेरच्या लोकांमुळे दोन मिपाकरात वितुष्ट व कडवटपणा नको असंच मला प्रामाणिकपणे वाटतं!
असो! सगळ्याच गोष्टी काही माझ्या हातात नाहीत! पण दोन मिपाकरांतलं बाहेरच्या माणसामुळे आलेलं हे फुकटचं वितुष्ट मालकाच्या जागेवर बसून बघताना मला त्रास होतो एवढं मात्र खरं!
आपला,
(मुक्तराव व डांबिस, दोघांचाही मित्र!) तात्या.
अजून एक शेवटचं -
ही कविता आणि आता हिला येणारे प्रतिसाद इतपत ठीक आहे परंतु आता या विषयावर नव्याने पुन्हा कुणी काही लिहू नये असं मला वाटतं! जनरल डायर ते लेखन ठेवतील असं वाटत नाही! एक तमासगीर माणसाचंच हे संस्थळ असल्यामुळे मिपाला तमाश्यांचं तसं विशेष काही वाटत नाही, कारण तमाशाही काही वेळकरता बरा वाटतो. परंतु इथे फक्त सतत तमाशाच व्हावा, याला मात्र जनरल डायर यांचा तीव्र विरोध असेल. प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते.
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी कळकळीचे विनंती!
तात्या.
प्रत्येक गोष्ट तारतम्याने करावी, त्यातच गंमत असते.
सहमत तात्या, फक्त तुमच्याकडून हा सल्ला बर्राच उशीरा आला. तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.
डांबिसाच्या प्रतिसादातील तस्त हा शब्द आम्ही कवितेत वापरला. पण त्यामुळे मिसळपाववर जर गावकर्यांच्यात वितुष्ट येत आसेल तर ही कविता कुठली ही पुर्व सुचना न देता उडवल्यास माझी कसलीही हरकत नाही.
हा शब्द वापरला म्हणून मी मुक्तरावान्ची जाहीर माफी मागत आहे. आजुनही कोणास खटकले/लागले आसेल तर मी त्यांची ही माफी मागतो.
ज्.डायरयानी ही कविता उडवल्यास आमचा पाठिंबा.
--आंबोळी
आंबोळी,
पेल्यातलं एक वादळ माजवू पाहणार्या एका कवितेला एक उत्तर म्हणून तुझी ही कविता चांगलीच आहे, फक्त त्यातला एक संदर्भ मला चुकीचा वाटला तेवढा बोलून दाखवला! बाकी, कविता उडवायची गरज नाही! :)
हा शब्द वापरला म्हणून मी मुक्तरावान्ची जाहीर माफी मागत आहे.
बस! बात खतम..! :)
आपला,
(मिपा एक परिवार आहे असं मानणारा!) तात्या.
आता हा घोळ चवीबाहेर आंबलाय. जरूरीपेक्षा जास्त फरमेन्ट झाली तर एरवी चवदार लागणारी आंबोळी देखील खावीशी वाटत नाही. तात्याराव, आंबोळीचे नाही म्हणत मी, पण मिसळपाव खाता खाता या आधी बरेच (रबरा सारखे लागणारे) मटनाचे तुकडे व हाडे पण तोंडात गेली. तेव्हा चटकदार पदार्थच तेवढे चालू ठेवून हटेलाची शान कायम ठेवा.
---- खवय्या.
प्रेषक विसोबा खेचर ( शनी, 05/31/2008 - 16:21) .
तारतम्य सोडून सगळ्यांचे बोलून/लिहून झाले आहे असे दिसते आहे.
जरा भाषा,
हाण तदमाताय
आणिक झेंगट होवुन बसले.....
सुंदर कविता...!
विचार पटले
सहमत....
:)
धन्यवाद...
जाहिर माफी
:)
हम्म
खरे बोललात.
मस्त रे
जास्तीच आंबलय