संस्कृत भाषा
एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे
भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक
पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील
तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.
माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत
असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा
आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला
म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र
आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक
सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.
हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात
संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि
त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते.
उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही
राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली
की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली
ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.
तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज
आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली
नाही
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आज इतके तरूण संस्कृत लेखन
प्रचंड्भाव अखंड्ताडित्
काय हरकत आहे असा नोंदवायला?
आधीच मृत + उगाच भीती
मनाला पटेल असा प्रतिसाद.
ठीक आहे. हे मान्य की भाषा
negative..
बर्याच अंशी सहमत
सहजराव तुमच्या पत्रात थोडी
अतिसुंदर!
संस्क्रुत मधे अरे वाअ !!! हे
धन्यवादः।
तुम्ही तर
वाह
ॠचा
धन्यवाद चिंतामणी आणि गोगोल!
अरे हो, सांगायचे राहीले की....
संस्कृत अजून जिवंत आहे!
आठवण
मला झाली आठवण.
संस्कृत
+१
ऐका हो ऐका !!!
त्या व्यक्तीच्या मातृभाशे
हम्म
मला या 'गीर्वाणवाणी'चा (देवांच्या भाषेचा) अभिमान आहे
प्रतीसादा बद्दल धन्यवाद!!
हिंदी -संस्कृत - मराठीतले आवाहन
ये हुई ना बात!
>>अर्थात जाणकारांकडून ही
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे!
उत्तर
सुरेख! / एक विनंती