मालोजी राव ते शिव विश्णुचे एकत्रित रुप्च आहे म्हणुन त्याचे नाव पान्डुरन्ग आहे,तसेच त्याच्या मस्तकावर त्यान्नी शिवलिन्ग सुद्धा धारण केले आहे म्हणुनच तो पान्डुरन्ग आहे.
आपला ईतिहासा बद्दलचा अभ्यास निसन्शय माझ्यापेक्षा अधीक आहे पण आपल्या द़क्षिणी पद्धतिच्या मुकुटावर शिव्लिन्ग असुन त्याचे छायाचित्र देण्याचा प्रयत्न करिन्,आणि ते छायाचित्र माढा येथिल मुर्तिचे आहे,तसेच सध्या पन्ढरपुर येथिल मुर्तिवर्सुद्धा असेच शिवलिन्ग आहे असे वाटते.
मूर्ती प्रत्यक्षात पहिली नाही (मुकुट नसताना) परंतु भक्त आणि वारकरी विठ्ठलाने डोक्यावर शिवलिंग धारण केले आहे असे मानतात. विठ्ठल जर शैव-वैष्णव समन्वयाचे प्रतिक असेल तर डोक्यावर शिवलिंग असावे.१७ व्या शतकात चंद्रभागेमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळाली होती त्यातील विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग स्पष्ट कोरले होते.त्या मुर्तीही पंढरपुरात आहेत असे ऐकून आहे.
मालोजीराव्,आमचे वार्करि मित्र अजुन वारिहुन परत आले नस्ल्याने प्रस्तुत शिव्लिन्गाचे छायाचित्र देण्यास विलम्ब होत आहे म्हणुन क्षमस्व्,जसे मिळेल तसे लवकरात लवकर,देण्याचा प्रयत्न करिन.
स्कंद पुराण आणि पदमपुराणाशिवाय विष्णुपुराणांतर्गत तिसरे माहात्म्य डॉ ढेरे याना उपलब्ध झाले होते पण त्यात गूढ मंत्राचा श्लोक आहे कि नाही याबाबत ते खुलासा करत नाहीत. या माहात्म्याबद्दल संशय वाटण्याचे कारण म्हणजे ही माहात्म्ये लोकजीवनात मूर्ती प्रसिद्ध पावल्यानंतर लिहिली गेली असल्याचा संभव असून त्यांना प्राचीनत्व प्राप्त होण्यासाठी पुराणांचा साज चढविला गेला आहे. सत्यनारयणा पोथोला जसे ' स्कंदपुराणे रेवाखंडे' या शादप्रयोगाने प्राचीनत्व देण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या माहात्म्यांची विश्वसनीयता व प्राचीनता कितपत मानायची याचा संशोधकांनी विचार केला पाहिजे. शिवाय पुराणांच्या प्रतीमध्ये एकवाक्यता
नाही. वेळोवेळी त्यात भर घालण्यात आलेली दिसते. त्यामुळं मूळ थी कोणती व त्य।त कसेकसे बदल होत गेले याचे संशोधनझाल्याशिवाय माहात्म्ये संशोधनाचे साधन होऊ शकणार नाहीत.
डॉ. ढेरे यांच्या मते आद्य विठ्ठलमूर्ती चे अनन्य साधारण वैशिष्ठ्य म्हणजे त्यावर कोरलेला नाममंत्र कूटलोक होय परंतू आपण हे पाहिले आहे को, ही दोनही माहात्म्ये ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय वाटत माहीत. त्यापेक्षाही अधिक विश्वसनीय मूर्तीचे लक्षण. म्हणजे संतानी वर्णंत केलेले विठ्ठलमूतिचे स्वरूप हे होय. विठलाच्या मूर्तीवर जर मंत्राक्षरमाला असती तर संतानी त्याचा उल्ळेख केला असता. विठ्ठलाचे नित्य दर्शन घणारे, पंढरपूरात स्थायिक असणारे, व मूर्तीचे संपूर्ण दर्शन होण्याची सहजशक्यता असलेल्या, संताच्या वर्णनात मंत्राक्षरमालेचा लवमात्र उल्लेख नाही. यांने स्पष्टीकरण करण्याचे उत्तरदायित्व डॉ. ढेरे यांना मुळीच टाळता येणार नाही. भक्त- सम्राट नामदेव महाराज, संत जनाबाई, शिवकल्याण यासारच्या पंढरपुरवासीय व नित्य दक्षंन घेणार्या संतांच्या वर्णनात मंत्राक्षर मालेचा उल्लेख नसणे हे आश्चर्य कारक वाटते. त्यामुळ अश्या तर्हेची मंत्राक्षरमाला या प्राचीन मूर्तीवर नसावी असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आद्यमूर्तीच्या वर्णनात संतांचे शब्द
विश्वसनीय का? ज्यांच्या विश्वसनीयतेबद्दल शंका आहे अशा माहात्म्याची वणंने प्रमाण मानावयाची याच्याबद्दल फारसा संदेह बाळगण्याचे कारण नाही. संतांची वर्णने अधिकृत समजावयास कोणतीच हरकत वाटत नाही. अर्थात ज्यांना प्राचीन मूर्तीच्या अनन्य साधारण वेशिष्ठ्याचा डोलारा उभा करावयाचा आहे
त्यांना मात्र ही वर्णने नि:संशय अडचणीत टाकणारी आहेत.
आपल्या सिद्धांताला अन्य रचनांची पृष्टी म्हणन जी इतर साधने 'विठ्ठलसहस्रनाम स्तोत्र' ' विठठल अष्टोत्तर शतनाम स्तोत्र' डॉ. ढेरे घेतात त्या साधनांच्या प्राचीनतेबद्दल ते स्वतः साशंक आहेत आणि त्यांचे कारणही ते मान्य करतात. अशा कृतींचा “ रचना हेतूच मळी पावित्र्य व प्राचीनता वाढवून सांगण्याचा असतो आणि त्यासाठी त्यांचा कर्ता आपले नांव पुसून टाकोत असतो.” डॉ. ढेरे यांचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे
गोरोबा कुंभाराचा काळ,( त्याने पांडुरंगाला विटेवर वेटिंग ठेवले. खूप वेळ. कंटाळून पांडुरंगाने हात कटीवर ठेवले. "अरे लवकर बाहेर ये, रुक्मिणी वाट पाहातेय.") अल्लदीन खिलजी वारंगळपर्यंत ( आन्ध्रा) देवळे फोडत गेला तो काळ, त्या भीतीने महाराष्ट्रात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागात मूर्ती हलवण्याची क्लपना आली असावी. गुराख्यांचा कापडी टोपी घातलेला देव होता.
प्रतिक्रिया
मी पंढरपूरला ३०-३५ वेळा गेलो
आजच वाचले.
अजुन एक माहिती.
छान माहिती !
.
शैव-वैष्णव
ते शिवलिंग नसून दक्षिणी
वल्ली जी
माढा येथील मूर्तीचे छायाचित्र
मूर्ती प्रत्यक्षात पहिली नाही
धन्यवाद
नविन व उत्तम माहिती. धन्यवाद!
सुरेख लेख
माढा
बाकी, प्रतिसाद वाचतो आहेच.
छान माहिती आणि फोटो. प्रतिसाद
लेख नजरेतून निसटला होता. फार
गावडेसरांशी सहमत. लेख आवडला.
खूप छान लेख.. बर्याच नवीन
श्रीविठ्ठलमूर्ती वाद खंडन लेखक- डॉ. गोपाळ गोविद बेणारे यांच्या
वा.
वीटेवरी उभा पांडुरंग