( उशिराने आलेलं ) शहाणपण.....
रहायला भलं मोठठ घर आहे
झोपायला स्वतंत्र खोली आहे
अंगावर पांघरणारे "बाबा" नाहीत.....
म्हणून झोप मात्र हरवली आहे ! 
जेवायला रोज चमचमीत मिळते
आतून ढेकर मात्र येत नाही !
शिळ्या पोळी-पिठल्याची चव यावी
म्हणून रात्री एक पोळी उरवली आहे ! 
कामावर जायला कंपनीची बस आहे
इमर्जान्सीला मोबाईल फोन आहे
सुबत्ताअसूनही मुलं नाखूष का?
गरीबीत पण आमची सोय कशी पुरवली आहे? 
या कुशीवर वळतो , बाबा दिसतात
त्या कुशीवर वळतो , आईचे कष्ट दिसतात
उताणी पडलो तर मन मारलेले ताई-दादा दिसतात
आठवांच्या आसवांत रात्र रात्र जिरवली आहे ! 
सुखांसाठी पैसा लागतो पण.....
नुसत्या पैशाने सुख मिळत नाही !
कष्टाची बी प्रेमाच्या खताने आता मी
समाधानाच्या मातीत जिरवली आहे !.......
-------उदय गंगाधर सप्रे - ठाणे.
        
  
प्रतिक्रिया
16 Dec 2009 - 2:58 pm | अवलिया
श्री रा रा उदयजी सप्रेजीसाहेब
आपली कविता छान आहे.
मात्र अनिवासी सुखी माणसांकडुन मिळणा-या थपडांना तयार रहा. विशेषतः सिंगापुर आणि यक्षनगरीतील भारतमातेचे कर्तृत्ववान सुपुत्र आपल्यावर विशेष रोष दर्शवु शकतात.
धन्यवाद !
--अवलिया
16 Dec 2009 - 3:06 pm | टारझन
डोळे पाणावले ..!