✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असा अनुभव यावा म्हणूनच का?

व
वेदश्री यांनी
Tue, 11/10/2009 - 23:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21107 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

थंडी आणि

शेखर
Wed, 11/11/2009 - 00:20 नवीन
थंडी आणि भीतीने थरथरत अनाशा पोटीच झोपायच्या आधी मोबाईलच्या उजेडात डायरीत इतकेच लिहिले .. "अख्खा दिवस ऑफिसमध्ये राबल्यावर थकून घरी परतताना असा अनुभव येण्यासाठीच का मी पाळते सगळे कायदे आणि भरते सगळे कर?" मी पण कर भरतो. त्या कराचा उपयोग स्थानिक लो़कांसाठि होत नसेल तर मी पण सगळा कर का भरावा? मी भरलेल्या करातुन युपी बिहार मधुन येण्यार्‍या लोकाना झोपड्या ऐवजी पक्की घेरे सरकार बांधुन देणार असेल तर काय करावे? हे थांबण्यासाठी काही लोक आवाज उठावणार असतील आणी त्यामुळे जर थोडेफार असले अनुभव येणार असतील तर मला चालतील. शेखर
  • Log in or register to post comments

व्यक्तिगत मत

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 01:12 नवीन
माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर माझ्या ताटात पोळी येत असेल तर एखाद्या (अशक्त?) भावंडाच्या पोळीवर तूप वाढले जात असल्याबद्दल माझी कसलीच तक्रार नसते. भावंडाशी मारझोड करून काय हशील? तुम्ही म्हणता अगदी तो मुद्दा जरी गृहित धरला तरी 'आवाज उठावणे' या प्रक्रियेतून विधायक असे काय घडले? स्थानिकांसाठी घरे उभी राहिलेली मलातरी दिसली नाहीत उलट त्यांचे येण्याजाण्याचे आधीच असलेले हाल आणखीच वाढण्यात भर पडलीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

तुमच्या

शेखर
Wed, 11/11/2009 - 01:33 नवीन
तुमच्या मता विषयी आदर आहे... पण त्या अशक्त भावाचे (चुलत) आई वडिल काही करत नाहीत.. त्यामुळे हे सर्व अशक्त भाऊ आमचे तुप कायमच खाणार .. त्याना तुप द्यायच्या नादात आमच्या सख्ख्या भावाना पोळी जर मिळणार नसेल तर...? तुम्ही म्हणता अगदी तो मुद्दा जरी गृहित धरला तरी 'आवाज उठावणे' या प्रक्रियेतून विधायक असे काय घडले? आपल्या कडे विधायक पद्धतीने आवाज उठवल्यास त्यास केराची टोपली दाखवली जाते.. तुम्ही सांगा मग कसा आवाज उठावायाचा? माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर माझ्या ताटात पोळी येत असेल त्यांना तुप घालण्यामुळे उद्या तुमच्या ताटात पोळी नसेल तर तुम्ही काय कराल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

सारासार विचार

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 01:46 नवीन
संयुक्त कुटुंबात चुलत,मावस, मामे,आत्ये वगैरे सगळेच येतील की त्यांच्यात्यांच्या गुणदोषांसकट. ते सगळे निभवावे लागतेच मोठे कुटुंब म्हटले की. 'आमच्या'पासून 'आपल्या'पर्यंत प्रवास करणेच जर मान्य नसेल तर मग प्रत्येकाने वेगळा घरोबा करायचा का? तसे केल्याने तरी सगळे प्रश्न सुटणार आहेत का? भावांमध्ये भांडणं झाली म्हणून काय लगेच घरात मोडतोड करायची का? भावंडाच्या ताटात तूप वाढले जाऊन माझ्या ताटात पोळी येत नसेल तर त्यात भावंडाची चूक नाही तर वाढणार्‍याची चूक आहे ज्याला चूक लक्षात आणून देईन. सारासार विचार करून योग्य तिथे किल्ली फिरवली की आवाज उठवायची गरज पडणार नाहीसे वाटते. यासाठी एकजूट मात्र महत्त्वाची. काल इंग्रज होते आणि आज आपलीच काही माणसं आहेत पण नियम तोच... फोडा आणि राज्य करा! ६० वर्षात काहीच का शिकलो नाही आपण???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

भावंडाच्य

शेखर
Wed, 11/11/2009 - 02:05 नवीन
भावंडाच्या ताटात तूप वाढले जाऊन माझ्या ताटात पोळी येत नसेल तर त्यात भावंडाची चूक नाही तर वाढणार्‍याची चूक आहे ज्याला चूक लक्षात आणून देईन. सारासार विचार करून योग्य तिथे किल्ली फिरवली की आवाज उठवायची गरज पडणार नाहीसे वाटते. यासाठी एकजूट मात्र महत्त्वाची. समजा उदाहरणार्थ राज ठाकरे चुक असतील तर त्यांना चुक लक्षात आणुन देता येईल. पण त्याच बरोबर विधायक कामात त्यांच्या मागे एकजुटीने उभे पण राहिले पाहिजे. हे आपल्यातले किती जण करतात? चुक सांगणारे भरपुर लोक असतात. पण योग्य मार्ग सांगुन त्या मार्गावर चालण्यास मदत करणारे किती असतात? नुसतीच चुक लक्षात आणुन देऊन चालणार नाही तर त्यांचा बरोबरीने पण चालले पाहिजे. राहणार आहोत का आपण त्यांच्या बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

पाठिंबा व्यक्तीला नाही कार्याला...

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:25 नवीन
शेखर, मी व्यक्तीला पाठिंबा कधीच देत/देणार नाही, मी पाठिंबा देते तो विधायक कार्याला. माझ्या पातळीवर मी असा पाठिंबा देण्याचा कायमच पूर्ण प्रयत्न करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

व्यक्ती/संस्था

शेखर
Wed, 11/11/2009 - 04:56 नवीन
तुमच्या मतां अथवा भुमिकेच्या प्रामाणिकपणा बद्दल अजिबात संदेह नाही. पण व्यक्ती/संस्था (व्यक्ती समुह) ह्यांच्या शिवाय कुठलेही कार्य होत नसते. मग अश्या वक्ती किंवा समुहाला त्यांच्या गुण दोषांसहित स्वीकारले पाहिजे. त्यांच्या चुका दाखवुन त्या दुरुस्त करुन घेतल्या पाहिजेत. नुसता त्रागा ( जो योग्य आहे) करुन काहीही साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

"असो. अशा

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/11/2009 - 12:52 नवीन
"असो. अशा मोठ्या मोठ्या शहरांमधे अशा छोट्या छोट्या घटना होतच असतात. " इति. मा. गृहमंत्री आर आर पाटील अवांतरः ज्या लोकानी बसेस फोडल्या त्यानी रस्त्यावरच्या दुचा़कीवाल्याना पण मारहाण केली का? पादचार्‍याना पण मारहाण केली का? मग तुम्हाला भिती वाटायचे कारण काय. मग उगाच साप साप म्हणून भुई का बडवत आहात. तुम्हाला उशीर झाला, मनस्ताप झाला हे समजू शकतो पण तुमच्या परिसरातल्या मिट्ट काळोखाला हिंसक जमाव कारणीभूत होता का? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

वाईट प्रसंग आला

धनंजय
Wed, 11/11/2009 - 01:38 नवीन
तुमच्यावर (आणि बहुधा खूप मराठीभाषकांवर) असा प्रसंग आला याबद्दल वाईट वाटते. माझ्या लहानपणी यापेक्षा लहान प्रमाणात गोव्यात कोंकणी-मराठी भाषावाद चालू होता. अशीच एकदा एक सरकारी बस मोडून रस्त्यावर आडवी केली, म्हणून शाळेला सुटी मिळाल्याचे आठवते. त्या वेळी गंमत वाटली होती. (शिवाय ज्या बाजूने बस उलटवली ते आमच्या तालुक्यातले, म्हणून त्यांच्याबद्दल हुर्रेऽ! अशा प्रकारचा अभिमानही होता. पण आम्ही शाळेत असताना तिथे पलीकडे अडकलो असतो तर? आई-बाबांची काळजीने काय हालत झाली असती... बहुधा जाळपोळ आणि विध्वंस हा "आपल्या बळाच्या" भागातच करता येतो. दुसर्‍या भागात जाऊन "आवाज उठवणे" योजनेच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने शक्यच नसावे, असा माझा कयास आहे. हे म्हणजे शेजारच्या पोराने दगड मारला म्हणून आपल्या घरच्या मुलांना बदडून काढण्यासारखे आहे. "असा आवाज नाही उठवला तर कसा आवाज उठवावा" मला तर खरे हा प्रश्नच समजत नाही.
  • Log in or register to post comments

पूर्णपणे सहमत!

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:02 नवीन
>हे म्हणजे शेजारच्या पोराने दगड मारला म्हणून आपल्या घरच्या मुलांना बदडून काढण्यासारखे आहे. "असा आवाज नाही उठवला तर कसा आवाज उठवावा" मला तर खरे हा प्रश्नच समजत नाही. अगदी बरोब्बर बोललात तुम्ही, धनंजय. पूर्णपणे सहमत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

थोडेफार चालायचेच

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 11/11/2009 - 01:48 नवीन
वेदश्रीतै, तुम्हाला थोडाफार त्रास झाला तर एवढे वाईट वाटून घेऊ नका. विधानसभेत धक्काबुक्की करायला लागते तर रस्त्यावर थोडीफार अडचण येणारच ना. अहो मराठी माणसाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. सामान्य माणसाचे जगणे ते काय जगणे आहे? दिवसभर काम करून घरी तर सर्वच जातात. पण मायमराठीच्या उद्धारासाठी एक दिवस तरी थोडेफार हाल झाले तर त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments

?

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:11 नवीन
अक्षय, >सामान्य माणसाचे जगणे ते काय जगणे आहे? मग आम्ही सामान्यांनी जगायचेही नाही का? >दिवसभर काम करून घरी तर सर्वच जातात. पण मायमराठीच्या उद्धारासाठी एक दिवस तरी थोडेफार हाल झाले तर त्यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? काय उद्धार झाला मायमराठीचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

काय उद्धार

निमीत्त मात्र
Wed, 11/11/2009 - 02:22 नवीन
काय उद्धार झाला मायमराठीचा?
काय हे? असे प्रश्न विचारुनच तुम्ही मराठीची प्रगती रोखत आहात. 'राज ठाकरेंचा मुलगा म्हणे इंग्रजी माध्यमातुन शिकतो (आणि जर्मनची पेश्शल टूशन लावतो) तेव्हा कुठे गेली मराठीची अस्मिता?' हा एक तसलाच प्रश्न वैचारीक नंपुसकत्व आहे असले विचार म्हणजे. त्यापेक्षा मारा झोडा, डोकी फोडा, बशी जाळा मग कसं सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

हाहाहाहा!

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:32 नवीन
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

मला वाटते..

हुप्प्या
Wed, 11/11/2009 - 02:04 नवीन
राजने शिवाजी राजांचा आदर्श ठेवावा आणि सामान्य लोकांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. असल्या बसाबिसा फोडून काही फायदा नाही. पण मराठीविषयी आक्रमक भूमिका घेणे आजिबात गैर नाही. इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे. आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच.
  • Log in or register to post comments

सन्मान कमवायचा असतो!

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:18 नवीन
>इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे. कोणी दिला मायमराठीला मोलकरणीचा दर्जा? घरी आलेले पाहुणे जर घराच्या मालकिणीचा दर्जा ठरवत असतील तर मग घरातली मूळ मंडळी कोण आहेत म्हणायची? > आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच. सन्मान मिळवून दिला जात नसतो, कमावला जात असतो. 'मिळवून दिलेला' सन्मान टिकाऊ नसतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

उत्तरे

हुप्प्या
Wed, 11/11/2009 - 04:36 नवीन
<< कोणी दिला मायमराठीला मोलकरणीचा दर्जा? घरी आलेले पाहुणे जर घराच्या मालकिणीचा दर्जा ठरवत असतील तर मग घरातली मूळ मंडळी कोण आहेत म्हणायची? << नालायक, लाचार काँग्रेसी नेत्यांनी सर्वात आधी आपल्या भाषेला दुय्यम वा तिय्यम दर्जा दिला. शिवसेनेने सुरवातीला मराठीचा मुद्दा उचलून धरला पण हिंदुत्ववादी बनण्याच्या नादात तो सोडून दिला. घरी आलेले पाहुणे? अहो महाराष्ट्रातील कठपुतळी नेत्यांच्या दोर्‍या दिल्लीतील गांधी घराण्याच्या विद्यमान सदस्याच्या हातात असत. असे ४०-५० वर्षे चालू आहे. आणि त्यामुळे असून खास मालक घरचा म्हणती चोर त्याला अशी वेळ मराठीवर आली आहे. घरातील मूळ माणसे आपला स्वाभिमान सोडून कुत्र्यासारख्या शेपट्या हलवत, लाळ गाळत दिल्लिश्वर वा दिल्लीश्वरीभोवती पिंगा घालत होती आणि आहेत म्हणूनच ही रड आहे. > सन्मान मिळवून दिला जात नसतो, कमावला जात असतो. 'मिळवून दिलेला' सन्मान टिकाऊ नसतो! < ठीक मग असे म्हणतो की राज ठाकरे हा मराठीचा सुपुत्र आपल्या आईकरता सन्मान कमावतो आहे. त्याकरता साम, दाम, भेद आणि दंड असे सगळे उपाय वापरत आहे. आता खूष?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

इतकी वर्षे

निमीत्त मात्र
Wed, 11/11/2009 - 02:24 नवीन
इतकी वर्षे ह्या मायमराठीला, घराच्या मालकिणीला तिच्याच घरात मोलकरणीचा दर्जा दिला गेला आहे. आज राज ठाकरे तिला उचित सन्मान मिळवून देत असेल तर मला तरी ते आवडेलच.
हो आधी स्वत:पासूनच सुरुवात करुन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून राज साहेब आणि मनसे नेत्यांनी योग्य उदाहरण ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

हो

हुप्प्या
Wed, 11/11/2009 - 04:40 नवीन
पोटासाठी इंग्रजी आणि हृदयासाठी मराठी. दोन्ही आवश्यक आहेत. इंग्रजी माध्यमात शिकणारे लोकही मराठीवर प्रेम करू शकतात आणि करतातही. आपण चतुर आहात म्हणून आपण ते आधीच ओळखलेले दिसते! भले शाब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

पोटासाठी

निमीत्त मात्र
Wed, 11/11/2009 - 06:17 नवीन
पोटासाठी इंग्रजी आणि हृदयासाठी मराठी.
हुप हुप... =)) समस्त मिपाकर इंग्रजी माध्यमातलेच असावेत, कारण मराठी माध्यमातून शिकून पोट भरायची मारामार इंटरनेट संगणक कुठून मिळायचे त्याना.. चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

मराठी

पर्नल नेने मराठे
Wed, 11/11/2009 - 10:37 नवीन
L) मराठी माध्यम (राज ठाकरे न मी एकाच शाळेतले ;) ) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

>>समस्त

प्रभो
Wed, 11/11/2009 - 10:42 नवीन
>>समस्त मिपाकर इंग्रजी माध्यमातलेच असावेत, कारण मराठी माध्यमातून शिकून पोट भरायची मारामार इंटरनेट संगणक कुठून मिळायचे त्याना.. वाचून हसावं का रडावं हे कळेना.....मराठी माध्यमातून शिकणार्‍यांना नोकर्‍या मिळत नाहीत का??? मला तर वाटतं होतं की मराठी तरूणांनाच आजकाल नोकर्‍या मिळत नाहीत म्हणे...... मी ही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे.... बाकी चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

मराठी

मदनबाण
Wed, 11/11/2009 - 10:46 नवीन
मी ही मराठी माध्यमातूनच शिकलो आहे.... मदनबाण..... Jaipur Indian Oil fire pushes migratory birds to Uttar Pradesh http://www.thaindian.com/newsportal/enviornment/jaipur-indian-oil-fire-pushes-migratory-birds-to-uttar-pradesh_100271077.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

अभिनंदन

हुप्प्या
Wed, 11/11/2009 - 11:04 नवीन
आपण मराठी माध्यमातून शिकलात आणि यशस्वी झालात त्याबद्दल अभिनंदन. पण मुद्दा वेगळा आहे. निमित्त मात्र एक काडी लावून गेलेत की ज्याची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात त्यांना मराठीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. हे मला साफ नामंजूर आहे. आजकाल मराठी शाळांचा दर्जा घसरलेला आहे हे अनेकांच्या अनुभवावरून सांगतो आहे. तेव्हा मुलांची करियर चांगली व्हावी म्हणून त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तर फार महापाप झाले आणि अबु आझमी इतकेच हे लोक मराठी द्वेष्टे आहेत असा एक सूर निमित्त मात्र आणि अन्य लावत आहेत त्याला मी खोडून काढू इच्छितो. इंग्रजी माध्यमात मुले शिकल्यामुळे त्यांचे मराठी प्रेम ऑटोम्याटिकली संपते हे आजिबात खरे नाही. बाकी मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा घसरला आहे का नाही ह्याविषयी वाद घालायचा असल्यास वेगळा घालू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

काय झालं?

समंजस
Wed, 11/11/2009 - 11:11 नवीन
काय झालं? मराठी माध्यमात शिक्षण घेण्याची सुचना करणार्‍यां कडुन काही उत्तर आलेलं नाही?? मी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतलयं. अभियांत्रीकीचं सोडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

जाऊ द्यात ...

छोटा डॉन
Wed, 11/11/2009 - 11:06 नवीन
प्रभोशेठ, जाऊ द्यात, तो मुद्दा वेगळा आहे. ह्याला खास "आंतरजालीय उपहासात्मक शैली" म्हणतात. ह्याचा वापर करण्यामागेही काही खास कारणे असतात. बराच मोठ्ठा विषय आहे आहे हा, तुम्ही ते सिरीयसली आणि शब्दशः घेऊ नका, त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते पहा ;) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

<<<हो आधी

विशाल कुलकर्णी
Wed, 11/11/2009 - 11:05 नवीन
<<<हो आधी स्वत:पासूनच सुरुवात करुन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालून राज साहेब आणि मनसे नेत्यांनी योग्य उदाहरण ठेवले आहे.>>> मात्र साहेब, तुम्ही विनोद भारी करता राव. मला वाटतं शिक्षण कुठल्या भाषेतुन घेतलं यापेक्षा त्या शिक्षणाचा उपयोग तुम्ही कुठल्या भाषेच्या विकासासाठी, उद्धारासाठी करता हे जास्त महत्वाचे आहे. आणि शत्रूला नामोहरम करायचे असेल तर आधी त्याच्या गोटात शिरून, त्यांची अंडी-पिल्ली जाणून घेणे, त्याची कमजोरी तसेच सामर्थ्याची माहिती करून घेणे आणि त्या दृष्टीने स्वतःला तयार करणे ही युद्धनीती आहे. बाकी विरोधच करायचा म्हटले की कुठल्याही मुद्याचा बाऊ करता येतो हे वेगळे. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

प्रकाटाआ

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:11 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

सामान्यांनी जमेल तसे जगावे

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 11/11/2009 - 02:13 नवीन
वेदश्रीतै, तुम्ही तात्यांनी मांडलेले विचार वाचा. तुम्हाला त्याग काय असतो याची व्यवस्थित कल्पना येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

जमेल तसे जगणे??!!!

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:39 नवीन
जर एक सामान्य म्हणून माझ्याकडून देशासाठी जरुर ते सगळे प्रयत्न करूनदेखील जर मला 'जमेल तसेच जगणे' मिळणार असेल तर मी कशाला पोसू या लोकांना कर भरुन? तात्याच्या लेखातील हाताळलेल्या क्षेत्राबद्दल मला अजिबात गती नाही त्यामुळे मी काय बोलणार त्यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

उत्तर नाही

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 11/11/2009 - 02:45 नवीन
माझ्यापाशी उत्तर नाही. पण तुम्ही कर भरत रहा. सामान्य माणसाने कायदा मोडू नये नाहीतर शिक्षा होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

:D

वेदश्री
Wed, 11/11/2009 - 02:52 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

सहमत!!

समंजस
Wed, 11/11/2009 - 11:28 नवीन
तुम्ही कर भरत राहा. ह्या असल्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करा. संयुक्त कुटुंबात भावंडा मध्ये खाण्या/पिण्या वरून थोडी फार भांडणे/मारामारी ही होतच असतात म्हणून काय ह्याने रागावूनं आई/काकूंनी स्वैंपाक करून जेवायला घालू नये?? अहो कर नाही भरलात तर चुलत भावंडे उपाशी राहणार ना? शेवटी आमच्या चुलत भावंडाची आणि त्यांच्या पालकांना पोसण्याची जबाबदारी ही आमचीच आहे. त्यामुळे मी तरी कर भरतच राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अक्षय पुर्णपात्रे

ही बातमी

पक्या
Wed, 11/11/2009 - 02:42 नवीन
ही बातमी वाचा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5217269.cms मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसगाड्यांचे नुकसान करणे/ दगडफेक करणे हे निषेधार्ह आहे. आणि वरील बातमी खरी असेल तर आपणच (मनसे) आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत हे स्पष्ट दिसतेय. अबू ह्या प्रकरणातून नामानिराळा राहिल आणि मनसे चे नाव मात्र परत गुंडागर्दी करतात म्हणून खराब होणार. -जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

तुमचा

कालिन्दि मुधोळ्कर
Wed, 11/11/2009 - 03:02 नवीन
तुमचा अनुभव वाचून वाईट वाटले. पण सामान्य माणसांच्या हाल-अपेष्टा, गैरसोयी या बद्दल मनसे किंवा इतर पक्ष यांना काही देणं घेणं असेल असं वाटत नाही. अशा हुल्लडबाजी मधे व्रुद्ध लोकांचे झालेले हाल मी पाहिले आहेत.
  • Log in or register to post comments

+१

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/11/2009 - 12:14 नवीन
सहमत आहे. माओवादी, नक्षलवादी यांच्या हिंसेमध्ये सामान्य पोलिस शिपाई ठार होतात त्याचे कोणत्याच कम्युनिस्टप़क्षाला घेणे नसते. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर

काही

रेवती
Wed, 11/11/2009 - 07:05 नवीन
काही लोकांचे म्हणणे आहे त्याप्रमाणे मायमराठीसाठी आपण एवढे सहन केले पाहिजे. आपण म्हणजे आपली लहान मुलेबाळे आणि घरातले वृद्धही त्यातच धरायचे का? असे झाले तर काय होइल या विचारानेच अर्धमेले होण्याची वेळ आली म्हणायची! या स्पेशल मोक्यावर सगळ्या मंत्र्यांची मुले/वृद्ध मात्र उबदार (की थंडगार?) घरट्यात असणार. काही वर्षात यांच्यापैकी कुणीजर पार्टीबदल केला तर दंग्यात सापडलेल्यांच्या आहुतीचे काय? बाकीच्या राज्यांमध्ये तेथील जनता त्यांच्या भाषेसाठी असे काय दिवे लावत आहेत? स्वतःचे मूल / म्हतारे आईवडील समोरच्या दंग्यात सापडले असताना स्वभाषेसाठी म्हणून त्यांच्या परत येण्याची आशा सोडणारे किती आहेत? याचा अर्थ माझे मराठीवर प्रेम नाही असा होत नाही पण ते प्रेम सिद्ध करायला मारामारी, दंगे, जाळपोळ यांचे समर्थन करायला तयारी नाही. रेवती
  • Log in or register to post comments

हम्म् ....

छोटा डॉन
Wed, 11/11/2009 - 11:03 नवीन
हम्म्म्, मुद्दा वादाचा आहे खरा. वैयक्तिक पातळीवर जर मी विचार केला तर मला खरोखर ह्या घटनेची चीड आली. अशा घटनांचा त्रास सामान्य नागरिकांना व्हायला नको ह्याबाबत सहमत आहे. मात्र मी जर सामाजिक पातळीवर जाऊन पाहिले तर मात्र मला ह्यात स्पष्टपणे "अपरिहार्यपणा" जातो. मी आता "मनसे" ह्या एकट्या पक्षाबद्दल न बोलता एकुनच रस्त्यावर उतरणे आणि आंदोलने ह्याबद्दल बोलतो आहे. कदाचित त्या कार्यकर्त्यांसमोर हाच सोपा आणि सुलभ पर्याय असावा असे वाटते. तसेही असंतोष होता सरकारबद्दल आणि आंदोलन ही सरकारविरुद्धच होते. मग हे आंदोलन करताना जर काही संघटना मोर्चा काढुन सरकारी कार्यालयाकडे अथवा मंत्रालयाकडे कुच करत असतील तर ट्राफिक ज्यॅम अपरिहार्य नाही का ? त्यांनी मोर्चा काढावा तरी कुठे ? जर ते मॉबचा मोर्चा न विस्कळीतपणे गेले तर त्या प्रश्नांची तिव्रता सरकारपर्यंत आणि मिडीयासमोर खरोखर पोहचेल ? अहो गांधीयुगात अगदी सत्याग्रह करायचा म्हणला तरी रस्त्यावर अथवा एखाद्या कार्यालयासमोर ठाण मांडुन बसावे लागत होते. अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते. बाकी खासगी वहानांची तोडफोड वगैरे नि:संशय चुकीचे आहे ... बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यातुन सामान्य माणसाला होणार्‍या त्रासाबाबत मी ह्या घटनांच्या विरोधात आहे पण मी एक "सामाजिक अपरिहार्यता" म्हणुन ह्या गोष्टी स्विकारतो. असो. अवांतर : वर काही खासकरुन "उपहासात्मक प्रतिसाद" दिसले, त्यांना एक विनंती आहे की लोकशाही / हुकुमशाही असलेल्या एखाद्या अशा देशाचे उदाहरण द्यावे की जिथे आंदोलने ह्या मार्गाने होत नाहीत. उद्या जरी आम्ही मेणबत्या घेऊन शांतता मार्गाने निदर्शने करत राहिलो तरी ते पाहुनही एखाद्याच्या मस्तकाची शीर सरकणार नाही कशाहुन ? ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

डाण्याशी

llपुण्याचे पेशवेll
Wed, 11/11/2009 - 12:16 नवीन
डाण्याशी डिफाल्ट सहमत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

असहमत!

Nile
Wed, 11/11/2009 - 12:22 नवीन
मात्र मी जर सामाजिक पातळीवर जाऊन पाहिले तर मात्र मला ह्यात स्पष्टपणे "अपरिहार्यपणा" जातो.
ह्या विधानाशी असहमत आहे. सोपं कारण आहे, इजी टारगेट्स. जितका जास्त सर्वसामान्यांना त्रास होइल तितकं महत्त्वाचं. समजा ही चळवळ आहे आणि सर्वसामान्यांना समजलंच नाही तर त्याचा उपयोग काय?
अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.
ही वाचुन मात्र हसु आलं बरका! अहो उलट आम्ही त्यांच्याकडुन 'आमच्या' कराच्या पैशातुन काही विधायक काम करावं म्हणुन निवडुन देतो असं आम्हाला वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

नाही पटलं..

समंजस
Wed, 11/11/2009 - 15:48 नवीन
अहो उलट आम्ही त्यांच्याकडुन 'आमच्या' कराच्या पैशातुन काही विधायक काम करावं म्हणुन निवडुन देतो असं आम्हाला वाटतं! नाही पटलं! ज्यांना तुम्ही निवडून दिलंय(मनसेलाच मत दिलंय हे गृहीत धरुन) ती मंडळी विधानसभेत होती, दगडफेकीत नाही. दगडफेक करणारे हे तळागाळातले कार्यकर्ते होते. आमदार हे विधायक कार्य करण्या करीता निवडून येतात? सरकार स्थापनेच्या घोळावरुन तरी तसे दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आत्मपीडा

प्रकाश घाटपांडे
Wed, 11/11/2009 - 13:24 नवीन
अहो गांधीयुगात अगदी सत्याग्रह करायचा म्हणला तरी रस्त्यावर अथवा एखाद्या कार्यालयासमोर ठाण मांडुन बसावे लागत होते. अशा वेळी जी दगडफेक वगैरे होते ती बसवर करायची व सामान्य लोकांना त्रास व्हावा ह्या भावनेतुन नसुन बस हे सरकारच्या मालकीची एक वस्तु आहे म्हणुन त्याच्यावर निषेध व्यक्त केला जातो असे आम्हाला वाटते.
मान्य पण उपोषण/सत्याग्रह असो वा जाळपोळ तोडफोड ही देखील आत्मपीडा च आहे. यात नुकसान आपलेच वा स्वकीयांचेच असते. स्वतःवरच उद्विग्न होउन स्वत:च्या घरातील वस्तुंची तोडफोड करणारे देखील असतातच. नंतर त्याचा फटका थेट आपल्यालाच मोजायला लागल्याने पश्चाताप देखील होतो पण कबुल करायचे धैर्य नसते. सार्वजनिक नुकसानीत ही किंमत विभागली जाते त्यामुळे त्याचा 'लोड' एकट्यावर येत नाही.
बाकी मी पुन्हा एकदा सांगतो की ह्यातुन सामान्य माणसाला होणार्‍या त्रासाबाबत मी ह्या घटनांच्या विरोधात आहे पण मी एक "सामाजिक अपरिहार्यता" म्हणुन ह्या गोष्टी स्विकारतो.
काळानुसार सामाजिक अपरिहार्यतेची परिमाण बदलत असतात इतकेच. संवेदनशील मनाची ती असहाय्यता असते परंतु आपल्या हातात काही नसल्याने त्याचे रुपांतर अपरिहार्यतेत होत. समुहमानसिकता ही विवेकी वा विचारी नसते. म्हणुनच समुहाला धड असते डोके नसते असे म्हणतात. लोकशाहीत संख्याबळ मह्त्वाचे असल्याने समुह मानसिकतेला महत्व असते. लोकशाही पद्धतीने पांडवांचा जय कधीच झाला नसता. पाच पांडव अगदी सहावा कर्ण पुढे श्रीकृष्ण जरी मतदानाला पांडवांच्या बाजुने आला तरी शंभर कौरवांचे एकगठ्ठा मतदान हे कौरवांच्याच बाजुने निकाल देणार. जनमानसिकता बदलणे ही प्रबोधनाची स्लो प्रोसेस आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

आयबीएन लोकमत

प्रकाश घाटपांडे
Wed, 11/11/2009 - 11:14 नवीन
आयबीएन लोकमत वर विधानसभेतील झालेल्या गोंधळावर आत्ताच एक लाईव्ह कार्यक्रम झाला. पत्रकार हेमंत देसाई, आमदार कपिल पाटील व आमदार राम कदम यांच्याशी निखिल वागळे यांनी चर्चा घडवुन आणली. मराठीचा मक्ता हा फक्त मनसेचा नाही. सभागृहाची शिस्त,चर्चेची सभ्यता,लोकप्रतिनिधीचे अधिकार, कानाखाली आवाज काढण्याची भाषा, हिंदी ही मराठीची शत्रु आहे का?, विचारांची आक्रमकता, महाराष्ट्राच्या समस्या असे अनेक विषय त्यात आले. चर्चा विचारप्रवर्तक होती. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

घाटपांडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/11/2009 - 12:22 नवीन
घाटपांडे साहेब, निखिल वागळेंचे एक ठरलेले आहे. मनसे कशी चूक आहे, हे दाखवायचे ते काम करतात आणि समारोप करतांना म्हणायचे आझमींचेही चूकले. बरं जनतेचा कौल घेतला की तो निखिल वागळेच्याच विरोधात जातो. असो, आयबीएनच्या चर्चा ऐकतोच आहे. अरे बाबा, भाषा आणि स्थानिकांना नौकर-या या विषयावर कोणी तरी बोलतंय त्यांचंही जरा कौतुक करा ना ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आयबीएन लोकमत

आशिष सुर्वे
Wed, 11/11/2009 - 11:22 नवीन
घाटपांडे साहेब, अजून थोडी माहिती दिलीत तर उपकॄत होईन. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

निलंबनाची कारवाई

प्रकाश घाटपांडे
Wed, 11/11/2009 - 11:45 नवीन
हेमंत देसाई- मनसेनी सभागृहाची माफी मागितल्यास कारवाई सौम्य करणे योग्य आहे. यापुर्वी असे प्रकार घडले आहेत पुन्हा ते घडु नयेत म्हणुन कारवाई आवश्यक. मराठीचा प्रचार व प्रसार व्यावहारिक पर्याय देउन करावा. कपिल पाटील- मराठीचा मुद्दा हा इतरांचाही आहे. अकांडतांडव योग्य नाही राम कदम- सभागृहाची दिलगरी ( माफी शब्द नाही) पण अबु आझमीची माफी नाही. आमची आक्रमकता योग्यच एकूण चर्चा योग्य वाटली. निखिल वागळेंना तिन्ही जणांना सांभाळणे कठीण जात होते. बहुसंख्यांचे (एसेमेस) मत निलंबनाची कारवाई मागे घ्यावी असेच होते माझे मत- मराठीचा मुद्दा योग्य असला तरी तो हाताळण्याचे साधन मात्र लोकशाहीला मारक आहे. जनतेच्या संपत्तीचे नुकसान हे आपलेच नुकसान आहे. ते तुमच्या आमच्या खिशातुनच भरुन द्यायचे असते. अबु आझमी ने डिवचण्यासाठी हे केले आहे ते मराठीच्या द्वेषातुनही नाही व हिंदीच्या प्रेमातुनही नाही. ते प्रसिद्धीच्या प्रेमातुनच आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

बहुसंख्या

अवलिया
Wed, 11/11/2009 - 11:49 नवीन
बहुसंख्यांचे (एसेमेस) मत निलंबनाची कारवाई मागे घ्यावी असेच होते स्वारस्यपुर्ण कल. हे बहुसंख्य बहुधा कर न भरणारे आणि ऑफिसात न राबणारे असावेत... असो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

व्हयं व्हयं ...

छोटा डॉन
Wed, 11/11/2009 - 12:02 नवीन
>>हे बहुसंख्य बहुधा कर न भरणारे आणि ऑफिसात न राबणारे असावेत... असो. =)) होय होय, सहमत आहे. कर भरणारे व ऑफिसात राबणारे लोक मनसेच्या आंदोलनामुळे त्यांचे "संध्याकाळचे टिव्हीवरचे डेली सोप्स" विविध कारणामुळे बुडल्याने संतप्त होते असे रावसरांच्या प्रतिसादातुन कळाले. ते समस पाठवण्याची शक्यता कमीच आहे ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सहमत

विशाल कुलकर्णी
Wed, 11/11/2009 - 12:06 नवीन
<<कर भरणारे व ऑफिसात राबणारे लोक मनसेच्या आंदोलनामुळे त्यांचे "संध्याकाळचे टिव्हीवरचे डेली सोप्स" विविध कारणामुळे बुडल्याने संतप्त होते असे रावसरांच्या प्रतिसादातुन कळाले.>>> डान्या जबरा रे ... =)) =)) >:) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हे निखील

समंजस
Wed, 11/11/2009 - 12:17 नवीन
निखिल वागळें तेच का? जे काही वर्ष आधी 'महानगर' नावाचं वर्तमानपत्र चालवायचे आणि शिवसेनेवर नेहमी आगपाखड करायचे? यामुळे चिडून जाउन शिवसेनेने त्यांच्या कार्यालयात एक-दोन वेळेस तोडफोड केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा