Skip to main content

वाङ्मय

‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ च्या निमित्ताने

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/10/2020 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशनाकडून 25 सप्टेंबर 2020 रोजी ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या निमित्ताने हा लेख): ‘ज्यांच्या चेहर्‍यासमोर प्रतिक्रिया मागणारे कॅमेरे नसतात!’ अशा ‘जगातील भल्या बुर्‍या घटनांची नोंद घेणार्‍या सर्व सहृदय माणसांना...’ हा ग्रंथ (‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’) अर्पण केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळावा म्हणून 2012 साली ब्लॉग लिखाणाला सुरुवात केली. (आणि म्हणूनच या ग्रंथाचीही आज निर्मिती झाली.) ब्लॉगमधून लिखाण करताना साहित्यिकापेक्षा सामाजिक होण्यात जास्त आनंद मिळतो!

दोन घडीचा डाव.....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 06/10/2020 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
*दोन घडीचा डाव...* *"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!! चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो.

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 28/09/2020 12:06 या दिवशी प्रकाशित केले.

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखक लेखनवाला यांनी शुक्रवार, 18/09/2020 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

माणूस आणि एकलेपण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 16/09/2020 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात. माणूस या जगात एकटा जगू शकेल?

लबरे़ज

लेखक ज्येष्ठागौरी यांनी शनिवार, 12/09/2020 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
लबरे़ज... आज अचानक एक खजिना हातात लागला कोणाच्यातरी कृपेनं आणि मायेनं!निमित्त होतं आर डी बर्मन ह्यांच्यावर असलेला quintessential sunshine इतकं समर्पक नाव असलेला हा कार्यक्रम!

पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 06/09/2020 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी कालच हे पुस्तक वाचुन संपवले. याआधी मी सुहास शिरवळकर यांची दुनियादारी, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज व पडद्याआड ही पुस्तके वाचली आहेत. प्रामुख्याने कोर्ट रूम ड्रामा व रहस्यमयी कथा ह्या लेखनप्रकारात या लेखकाचा चांगलाच हातखंडा होता. ह्या पुस्तकाबद्दल मला mx Player वरच्या "समांतर" नावाच्या सुहास शिरवळकरांच्याच पुस्तकापासुन प्रेरित होउन बनवलेल्या वेब सिरीज मुळे माहिती मिळाली. समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण वाटते.

देव आणि माणूस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/09/2020 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आधी देव का आधी माणूस? आज आपण जे देव भजतो ते सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत का? (आहेत असं आपण समजतो. माणसाला बुध्दी आहे. म्हणून तो पूजा, पाठ, विधी, कर्मकांड वगैरे करतो. मुक्या प्राण्यांना बुध्दी नाही, म्हणून ते देवाला भजत नाहीत, असंही आपलं प्रामाणिक मत असू शकतं. ) प्राण्यांसाठी विशिष्ट एखादा देव असेल तर तो कोणता? प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात? पूजा कशी करतात? प्राण्यांच्या देवांची मंदिरं कुठं असतात? समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल? वाघांचा देव वाघासारखा असावा का?

सांग दर्पणा

लेखक ज्येष्ठागौरी यांनी मंगळवार, 01/09/2020 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सांग दर्पणा... एका अगदी प्रिय दुकानात चक्कर मारताना अतीव सुंदर आरसा दिसला,एकदम स्वच्छ चकचकीत आणि सागवानी लाकडाची सुंदर किनार.मन थबकलं तिथंच,मनात विचार करूनही त्या क्षणी घरात योग्य जागा सापडेना त्याच्यासाठी. मग पुन्हा येण्याचा निश्चय करून वळले. शास्त्रात शिकवलंय की आरसा ही एक प्रकाश परावर्तित करणारी चमकदार वस्तू असते.